Saturday, December 6, 2014

जब मैं छोटा था,-.गुलज़ार

 




जब मैं छोटा था, शायद दुनिया बहुत बड़ी हुआ करती थी..
मुझे याद है मेरे घर से "स्कूल" तक का वो रास्ता,
क्या क्या नहीं था वहां, चाट के ठेले,  जलेबी की दुकान,बर्फ के गोले सब कुछ,
अब वहां "मोबाइल शॉप","विडियो पार्लर" हैं,
फिर भी सब सूना है..
शायद अब दुनिया सिमट रही है... .
.
जब मैं छोटा था, शायद शामें बहुत लम्बी हुआ करती थीं...
मैं हाथ में पतंग की डोर पकड़े, घंटों उड़ा करता था,
वो लम्बी "साइकिल रेस", वो बचपन के खेल,
वो हर शाम थक के चूर हो जाना,
अबशाम नहीं होती, दिन ढलता है और सीधे रात हो जाती है.
शायद वक्त सिमट रहा है..
जब मैं छोटा था, शायद दोस्ती बहुत गहरी हुआ करती थी,
दिन भर वो हुजूम बनाकर खेलना,
वो दोस्तों के घर का खाना,
वो लड़कियों की बातें,
वो साथ रोना...
अब भी मेरे कई दोस्त हैं, पर दोस्ती जाने कहाँ है,
जब भी  "traffic signal" पर मिलते हैं "Hi" हो जाती है,
और अपने अपने रास्ते चल देते हैं,
होली, दीवाली, जन्मदिन, नए साल पर बस SMS आ जाते हैं,
शायद अब रिश्ते बदल रहें हैं.. !


जब मैं छोटा था,  तब खेल भी अजीब हुआ करते थे,
छुपन छुपाई, लंगडी टांग, पोषम पा, टिप्पी टीपी टाप. अब internet, office, से फुर्सत ही नहीं मिलती..
शायद ज़िन्दगी बदल रही है. . .  


जिंदगी का सबसे बड़ा सच यही है.. जो अकसर क़ब्रिस्तान के बाहर बोर्ड पर लिखा होता है...
"मंजिल तो यही थी, बस जिंदगी गुज़र गयी मेरी यहाँ आते आते" . ज़िंदगी का लम्हा बहुत छोटा सा है...
कल की कोई बुनियाद नहीं है और आने वाला कल  सिर्फ सपने में ही है..
अब बच गए इस पल में..
तमन्नाओं से भर इस जिंदगी में हम सिर्फ भाग रहे हैं.
कुछ रफ़्तार धीमी करो, मेरे दोस्त,
और इस ज़िंदगी को जियो.. खूब जियो मेरे दोस्त..... ।।

Wednesday, December 3, 2014

दिल ढूंढता , है फिर वही --गुलझार




दिल ढूंढता , है फिर वही फुर्सत के रात दिन
बैठे रहें तसव्वुर -ऐ -जाना किये हुए

जाड़ों की नर्म धुप और आँगन में लेट कर
आँखों पे खींच कर तेरे दामन के साए को
औंधे पड़े रहें कभी करवट लिए हुए

या गर्मियों की रात जो पुरवाइयाँ चले
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए

बर्फीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूंजती हुयी , खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे भीगे से लम्हे लिए हुए


मन शोधत आहे ; पूर्वीचे निवांत दिवस
बसून प्रियतमेबद्दलची दिवास्वप्ने पाहत राहण्याचे !

हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हात अंगणात निवांतपणे पडून
डोळ्यांवर ओढून घेत तुझ्या पदराच्या सावलीला
उताणे पडून राहायचो ; कधी एका कुशीवर!

किवा उन्हाळ्यातील रात्री ; पूर्वेकडून वाहणारे वारे
थंड गार सफेद चादरीत उशिरापर्यंत जागायचो
ताऱ्यांकडे बघत बसायचो ; छतावर पडून राहून !

बर्फाळ थंडीमध्ये कोणत्यातरी डोंगरावर
दर्यांमध्ये घुमणारे शांततेचे प्रतिध्वनी ऐकत
डोळ्यामध्ये  भिजलेले क्षण साठवत साठवत !

Tuesday, December 2, 2014

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता - ग्रेस



ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
प्रेषक, संजय क्षीरसागर, Thu, 09/10/2014 - 01:05
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू.
अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक!
खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती. इतकी अप्रतिम कविता `दुर्बोध' म्हणून उपेक्षित राहिली असती.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |
(गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत)
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |
_________________________________
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडतो.
एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, (त्यात) स्वत:चा प्रियकर असलेली आणि तरीही (स्वत:शी) आईचं नातं जडलेली!
अत्यंत जीवघेणी असह्यता, आणि तरीही सहज पार करता येईल असं दु:ख पण नात्याच्या मर्यादा, अशी बेहद्द गुंतागुंतीची स्थिती.
सामान्य व्यक्तीच्या जीवनात असं दु:ख असंभव, तरीही दु:खही भावना सगळ्यांना समान (मग कारण काहीही असो). असाह्यता केवळ बेजोड, पण आपल्यासाठी केवळ कल्पना म्हणून, (किमान संवेदनाशिल व्यक्ती) तरी ती बेदखल करु शकत नाही. आणि समजा कुणी केली, तर मग कविता कशी समजणार ?
तर असा हा अप्रतिम काव्यविषय आणि ग्रेससारख्या चिंतनशील, सौंदर्यवादी आणि प्रतिभावंत कवीची रचना, केवळ लाजवाब!
____________________________________
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
नादमय शब्दयोजना कशी असावी आणि तीही प्रचलित मराठीसारख्या (ज्ञानेश्वरांच्या नाही), नाद-दुर्लभ भाषेत, याचा प्रत्यय देणारं शब्दसंयोजन पाऊस निनादत होता !
आणि त्यापूर्वी येणारा तो शब्द, ‘रिमझिम’ !
आणि तो शब्द जिच्याशी जोडलायं ती कमालीची लक्षवेधी ओळ ती गेली तेव्हा’ !
पहिल्या ओळीतच नादमय शब्दसंयोजन, लयीचा अत्यंत नाजूक हेलकावा आणि सर्वांचा मिळून एक चित्रदर्शी परिणाम :
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता’!
रसिकमनाला खेचून घेईल अशी सुरुवात.
आणि लगेच तिच्या (ओलसर) केशकुंतलांची मेघांशी केलेली रुपकात्मक सरमिसळ! जस्ट मॅडनेस!
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
त्यावर कहर म्हणजे (ती प्रियकराकडे निघाल्यानं) स्वत:च्या मनाची झालेली गुंतागुंत सोडवायचा अत्यंत लाघवी प्रयत्न... हा सूर्य सोडवित होता’ !
काय कमाल प्रतिभा आहे या माणसाची, निव्वळ थक्क होऊन जावं!
______________________________________________
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
मग पुन्हा मनाचा कोंडमारा आणि काय लाजवाब अभिव्यक्ती, ‘ घनव्याकुळ मीही रडलो’. कसे सुचत असावेत शब्द या प्रतिभावंताला? ‘घनव्याकुळ’.
स्वत:चा शब्द तरीही अर्थाशी ईमान, काव्यविषयाशी एकसंधता आणि पावसाच्या माहौलशी एकरुपता!
एका शब्दात सगळा परिणाम एकवटण्याची किमया, रसिकाला स्वत:च्या प्रगल्भ अनुभवाच्या खोलीशी नेण्याची ताकत.
आणि दुसर्‍या ओळीत सामाजिक उपहासाचं किती नाजूक भान,
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
कवीच्या दु:खाशी जे समरुप होऊ शकत नाहीत अशा सावध (खरं तर असंवेदनाशील) लोकांना, असे विचार म्हणजे केवळ पाचोळा!
______________________________________
पुन्हा एकवार तीच जीवाची घालमेल, पण मांडणीची बेतहाशा नज़ाकत :
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
आता ती आई राहिली नाही त्यामुळे बालपण संपलं. घरापासून अंगण दूर झालं!
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
आता या आयुष्याच्या बद्ध चौकटीत (मिणमिणत्या) कंदीलासारखी एकाकी अवस्था!
__________________________________
स्वत:च्या आणि आईच्या वयातलं अंतर, मोहाचा भुलावा आणि नात्याचा तोल, ग्रेस काय बहारीनं जपतोयं. एकदा असं ही वाटून गेलं की बंध पार करावा :
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
.... पण अचानक :
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता
नातं ही केवळ मान्यता आहे हे कुणाही प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तीला कळतं, पण तो अर्थबोध जरी शब्दातून वगळला तरी उरलेल्या शब्दातून पुन्हा अर्थ उगवतोच!
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता
काय कमालीची संयत मांडणी आहे.
____________________________
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
आता मी असाच मोठा होईन आणि कोरडाच वाढत राहीन. आईपासून (त्या गहिर्‍या नात्यापासून) तुटण्याचं दु:ख आता असं काही गोठलंय की पुन्हा गहिंवर यावा असं काही घडणार नाही.
काय कमालीचं वर्णन आहे व्याकुळतेचं मज आता गहिंवर नाही
आणि शेवटच्या ओळी तर काय कहर आहेत!
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता
म्हणजे ज्या आईची सामाजानं अवहेलना करु नये, तिची लज्जा झाकली जावी म्हणून मी कृष्ण झालो, तिला सर्वतोपरी झाकायचा प्रयत्न केला (ते नातं सावरतांना आता अशी काही असहायता आलीये की) मीच... सर्वस्वी निर्वस्त्र झालोयं

Saturday, November 29, 2014

सिरे उधड़ गए -गुलज़ार

 
 
हवास का जहान साथ ले गया
वो सारे बादबान साथ ले गया
बताएँ क्या, वो आफ़्ताब था कोई
गया तो आसमान साथ ले गया
किताब बंद की और उठ के चल दिया
तमाम दास्तान साथ ले गया
वो बेपनाह प्यार करता था मुझे
गया तो मेरी जान साथ ले गया
मैं सजदे से उठा तो कोई भी न था
वो पांव के निशान साथ ले गया
सिरे उधड़ गए हैं, सुबह-ओ-शाम के
वो मेरे दो जहान साथ ले गया

 अक्कलेचे विश्व बरोबर घेऊन गेला
तो सगळी जहाजाची शिडे बरोबर घेऊन गेला !
काय सांगू ; तो कोणी सुर्य होता 
गेला तर आकाश बरोबर घेऊन गेला !
पुस्तक बंद केले आणि उठून निघून गेला
सगळ्या कहाण्या बरोबर घेऊन गेला !
तो माझ्यावर बेधुंद प्रेम  करत होता
गेला तर माझा जीव बरोबर घेऊन गेला !
मी प्रार्थनेतून उठलो तर कोणिच   नव्हते
तो आपल्या पावलांच्या खुणा सुधा बरोबर घेऊन गेला !
सकाळ संध्याकाळेची जशी डोकीच उखडली आहेत
तो माझी दोन्ही विश्व  बरोबर घेऊन गेला !

Thursday, November 27, 2014

आधी रात को ये दुनिया वाले -


आधी रात को ये दुनिया वाले जब ख़ाबों में खो जाते हैं
ऐसे में मुहब्बत के रोगी यादों के चराग़ जलाते हैं
करते हैं मुहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है
आतीं हैं बहारें गुलशन में हर फूल मगर कब खिलता है
मैं राँझा था तू हीर थी हम अपना प्यार निभा सके
यूँ प्यार के ख़्वाब बहुत देखे ताबीर मगर हम पा सके
मैंने तो बहुत चाहा लेकिन तू रख ना सकी वादों का भरम
अब रह रह कर याद आता है जो तूने किया इस दिल पे सितम
पर्दा जो हटा दूँ चेहरे से तुझे लोग कहेंगे हरजाई
मजबूर हूँ मैं दिल के हाथों मन्ज़ूर नहीं तेरी रुस्वाई
सोचा है के अपने होंठों पर मैं चुप की मोहर लगा लूँगा
मैं तेरी सुलगती यादों से अब इस दिल को बहला लूँगा

अर्ध्या रात्री जेंव्हा दुनियावाले जेंव्हा स्वप्नात हरवले असतात
अश्या मध्ये प्रेमाचे मरीज आठवणीचे दिवे जाळत बसले असतात!
करतात प्रेम सगळेच जण; पण प्रत्येकाला कोठे प्रतिसाद मिळतो ?
फुलांच्या बगीच्यात बहार आली असताना सुधा ;प्रत्येक कळी कोठे उमलत असते ?
मी रांझा नव्हतो आणि तू हिर नव्हतीस ; आपण आपले प्रेम निभाऊ शकलो नाही
तशी प्रेमाची स्वप्ने खूप बघितली ; पण शेवटा पर्यंत पोचू शकलो नाही !
मी तर खूप चाहत होतो पण तू राखू शकली नाहीस आपल्या वचनांचा भ्रम
आता राहून राहून आठवण येती आहे ;  जुळूमाची तो तू माझ्या हृदयावर केलास!
विचार केला आता आपले  ओठ  बंद ठेवावेत
आणि तुझ्या धगधगणार्या आठवणीनी ह्या दिलाचे मनोरंजन करावे !