Thursday, November 28, 2019
आफ्रीन आफ्रीन । जावेद अख्तर
Wednesday, November 27, 2019
ऐसान होगा तेरा मुझपर
एहसान तेरा होगा मुझपर
मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते.
जंगली या सिनेमाची कथा एका वाक्यात सांगता येईल - एका करारी, कडक, अरसिक माणसात केवळ प्रेमामुळे घडलेला बदल.
एहसान तेरा होगा मुझ पर
दिल चाहता है वो कहने दो
मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है
तिचा राग हा काही रूठे रूठे पियाचा हा लटका राग नाही, म्हणून तो विनवतो,
रोने कहोगे रो लेंगे अब
ऑंसूँ का हमारे गम ना करो
वो बहते हैं तो बहने दो
काळ कुणासाठीही थांबत नाही. दिवसाच्या उदरात काय दडले असते, ते सांगता येत नाही. जवळच्या माणसांशी साधलेला संवाद ही खरे तर सर्वात मोठी भेट असते. नाते टिकवणारी रेशीमगाठ असते.
मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. यातला मोहब्बत हा शब्द तर रफीजींनी किती वेगवेगळया तऱ्हांनी गायला आहे.
याच चित्रपटातले 'चाहे कोई मुझे जंगली कहे' हे गीत अतिशय प्रसिध्द आहे. तरीही चित्रीकरण, शब्द, सूर आणि अभिनयाच्या अंगांनी विचार केला, तर हे गीत बाजी मारून जाते. याच गीतात लक्षात येते की, एका जंगली माणसाला प्रेमाने पूर्ण बदलवले आहे. ह्या गीतातील प्रेमाचा उघड इजहार इतका हळुवार आहे की नायिकेचा रागसुध्दा त्या सुरांनी वितळतो.
हे गीत फक्त रफीजींच्या आवाजात रेकॉर्ड होणार होते. त्या सुरांची मोहिनीच एवढी अफाट की परत लताजींच्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह शंकर-जयकिशन यांना टाळता आला नाही.
आईच्या हट्टापुढे नमून शेखर, राजशी लग्न न करण्याचे वचन देतो खरा, पण त्याच वेळी ती सोडून कुणाशीही लग्न न करण्याची शपथ घेतो. अशा प्रियकरावर जीव ओवाळून टाकावासा कुणाला वाटणार नाही! प्रेमाचे हे उदात्त दर्शन दिपवून टाकणारे. नवल नाही की नायिकासुध्दा त्या सुरांत सूर मिळवताना म्हणते,
चाहे बना दो चाहे मिटा दो
मर भी गये तो देंगे दुवाएँ
उड़ उड़ के कहेगी खाक सनम
ये दर्द ए मोहब्बत सहने दो
मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है
मुझे पलको की छाँव में रहने दो।
Monday, November 25, 2019
महाराष्ट्र सरकार
Friday, November 8, 2019
पु ल नचे चित्रपटीय विनोद
Sunday, October 27, 2019
हृदयनाथ मंगेशकर
Friday, October 18, 2019
एक प्यार का नगमा है। प्रिया प्रभुदेसाई
एक प्यार का नगमा है
हे गाणे विखुरलेल्या, बरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहे. आनंद, आपत्ती, आशा, दुःख, आजारपण, अगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करते. जीवनातील आनंदाचे गाणे हे असेच गाता आले पाहिजे.

शिवाजी पार्क येथील लेडी जमशेटजी रोड, नेहमीचा रस्ता आहे माझा. दुतर्फा झाडे आहेत या रस्त्यावर. कडक उन्हाळ्यात सावली मिळण्याएवढी उंच वाढली आहेत. तरीही मुंबई धुळीने एवढी माखलेली असते की कोणत्याही ऋतूत हिरवेगार, प्रसन्न वगैरे वाटत नाही. आपण आपल्याच कामात एवढे गर्क असतो की न बोलता मायेची पाखर घालणार्या या झाडांकडे कधी लक्षसुद्धा जात नाही.
हेच समीकरण पुरुष आणि स्त्री या नात्यातसुद्धा आहे.
एक प्यार का नगमा है
मौजों की रवानी है
जिंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है
शोर या सिनेमाचा गाभा आहे पती आणि पत्नी यांच्यातील प्रेम, तसेच वडील आणि मुलगा यांच्यातील बंध. जीवनातील खडतर प्रसंगातसुद्धा एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवणार्या कुटुंबाचे हे गीत आहे. एका अपघातात शंकरच्या (मनोज कुमार) पत्नीचा (नंदा) मृत्यू होतो. आपल्या मुलाला वाचवताना ती प्राण गमावते, पण त्या धक्क्यानेे मुलाची वाचा जाते.
ऑपरेशनच्या साहाय्याने मुलगा बोलू शकतो, हे डॉक्टरांनी सांगितल्यावर प्रयत्नांची शर्थ करून शंकर पैसे जमवतो. ऑपरेशन यशस्वी होते. त्याच वेळी त्याच्या कारखान्यात एक अपघात होतो आणि त्यात शंकर मात्र आपली ऐकण्याची शक्ती गमावून बसतो.
हे गाणे विस्कटलेल्या, बरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहे. आनंद, आपत्ती, आशा, दुःख, आजारपण, अगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करते.
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है
दो पल के जीवन से, इक उम्र चुरानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है
जन्म आपल्या हातात नसतो, मृत्यू तर नकोसा असूनही टाळता येत नाही. मग आपल्या हातात काय उरते? हातात असते ते या दोन क्षणांतील असंख्य क्षण. त्यातूनच आपले जीवन घडवायचे असते, जगायचे असते. प्रत्येक क्षणाची किंमत जगूनच द्यायची असते. मग तो क्षण सर्वार्थाने का जगू नये! बरेच काही गमावले असले, तरी जे मिळाले आहे त्याची कृतार्थता आणि कृतज्ञता या गीतात आहे.
संसारात जेव्हा दोन माणसे एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील अहंकाराचा संघर्ष, त्यांच्या स्वभावातील मूलभूत फरक, परिस्थितीला तोंड देण्याच्या भिन्न पद्धती ह्या सर्व गोष्टी असतातच; परंतु एकमेकांना समजून घेण्याची इच्छा, एकमेकांबद्दल विश्वास हा या नात्याचा आधार असतो. जगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर अनुभव वाटून घेण्याची धडपड त्यांना एकत्र ठेवते.
तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है
ह्या गीताचे चित्रण म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा कोलाज. गाण्यात भूतकाळाची आणि वर्तमानकाळाची दृश्ये एकमेकांत मिसळली आहेत. हा चित्रपट सत्तरच्या दशकातला, हे पाहिले तर उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा अतिशय हुशारीने वापर करून हे गीत चित्रित केले आहे. गाण्याच्या चित्रीकरणात नायिकेच्या दोन प्रतिमा एकमेकांच्यात मिसळून परत वेगवेगळ्या दिशेने गेलेल्या दाखवल्या आहेत. सुख-दुःखाच्या क्षणांनीच आयुष्य समृद्ध होते. तसेही उन्हाने पोळल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाहीच. महत्त्वाचे असते ते एकमेकांच्या संगतीने कोणत्याही परिस्थितीचा सामना करणे.
तूफ़ान तो आना है, आ कर चले जाना है
बादल है ये कुछ पल का, छा कर ढल जाना है
परछाईयाँ रह जाती, रह जाती निशानी हैं
जिंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है
अडचणी येतातच, पण मन साफ ठेवून हातातला हात घट्ट पकडला तर निघूनही जातात. एकदा हे आयुष्य तुझे आणि माझे आहे असे उमगले, तर त्यांच्या खुणा जरी राहिल्या तरी त्या एकत्र राहायला मदत करतात. आयुष्यातील आनंदाला क्षणभंगुरतेचा शाप असतोच, म्हणून जगण्यासाठी महत्त्वाची असते ती कधीही न सुटणारी साथ.