Sunday, May 26, 2019

मोदीजी Management lessons

सर्वांनीच वाचा* 🙏

*लोकसभा 2019 च्या निर्णयातून उद्योजकांना कोणते धडे घेता येतील* ?

*1.Brand is everything*
ब्रँड सगळ्यात महत्वाचा असतो, प्रॉडक्ट पेक्षा मोठा आणि कंपनी पेक्षाही मोठा. भाजपा ने भाजप सरकार बोलण्यापेक्षा, "मोदी" सरकार अशीच संकल्पना मतदारांपुढे ठेवली. कारण मोदी हा पर्सनल ब्रँड भाजपा या कंपनी पेक्षा मोठा आहे.

*2.Protect your brand at any costs* - काही करून ब्रँड व्हॅल्यू जपणे महत्वाचे आहे. एकदा ब्रँड खराब झाला की पुन्हा त्याला चांगलं करणं प्रचंड कठीण आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल काहीही माहीत नसलेल्यानी "पप्पू" हा शब्द लक्षात ठेवला आहे. हीच त्यांची ब्रँड इमेज त्यांना जिंकू देत नाही.

*3.Do not confuse customers* - आपल्या ग्राहकांना संभ्रमात ठेवू नका. पंतप्रधान कोण बनणार, हिंदुत्व, प्रखर राष्ट्राभिमान हे भाजपाचे मुद्दे मतदारांना योग्य प्रकारे माहिती करून देण्यात आले होते. याउलट काँग्रेस व इतर पक्षांनी पंतप्रधान कोण होणार हे गुलदस्त्यात ठेवले होते. कधी गरिबी, कधी शेतकरी तर कधी अल्पसंख्याक तर कधी भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे त्यांनी घेतले त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्ट्सची असंख्य वैशिष्ट्ये दाखविण्यापेक्षा मोजक्या एक किंवा दोन महत्वाच्या ग्राहकोपयोगी वैशिष्टयांवर लक्ष केंद्रित केले पाहीजे.

*4.Everybody is not your customer* - समाजातील सर्व घटकांना एकत्र जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महत्वाच्या किंवा मोठ्या घटकांना आकर्षित करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी होती. उद्योजकांनीही आपल्यासाठी योग्य मार्केट ठरवून ते डेव्हलप करण्यासाठी मेहनत केली पाहिजे.

*5.Commnunicate more and clear / talk to your customers* - वेगवेगळ्या मार्गानी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेला आपल्या योजनांबद्दल सतत सांगून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेलाही सरकारी कामकाजाबाबत कधी नव्हे इतकी माहिती होती.

*6.Every brand needs revival* - भाजपाने "मोदी" ब्रँडवर फोकस केले त्यामुळे भाजपा जिंकली याविरुद्ध कांग्रेस ने त्यांच्या "काँग्रेस" ब्रॅंडला नवे रूप दिलेच नाही. याबाबत लाईफबॉय किंवा होंडा या दोन ब्रॅन्डस कडून शिकता येईल. खूप जुने ब्रॅण्डस असूनही या दोनीही ब्रँड्सने वेळोवेळी कात टाकली आहे. सतत नव्या रूपात आणि नव्या पॅकेजिंगमध्ये दिसत असल्याने हे दोन्ही ब्रॅण्डस टिकून आहेत.

*7.Customers don't buy, they choose* - एकवेळ तुम्ही सर्वोत्तम नसलात तरी चालेल परंतु तुम्ही इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे असले पाहिजे. ग्राहक सर्वोत्तमाच्या नव्हे तर वेगळेपणाच्या शोधात असतो. मोदींनी अनेक चुका केल्या असतीलही परंतु केवळ त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांनी त्यांना पसंती दिली. उद्योजकांनीही आपल्या उत्पादन व सेवांमध्ये काय वेगळं देता येईल याचा अभ्यास केला पाहिजे.

*8.Make your customers your promoters* - जोपर्यंत आपले ग्राहक आपले चाहते बनणार नाहीत तोपर्यंत मोठं यश मिळणार नाही. मोदींच खरं प्रमोशन त्यांच्या चाहत्यांनीच केलं (ज्यांना भक्त म्हणून संबोधलं गेलं !) , परंतु भक्ती ही शक्ती किंवा युक्ती पेक्षा नेहमीच सरस ठरत आली आहे. उद्योजकानो , तुम्ही स्वतः किती चांगले आहात हे जगाला सांगण्यापेक्षा , तुम्ही किती चांगले आहात हे जगाला सांगणारे इतर लोक तयार करा. (मार्केटिंगच्या भाषेत त्याला social proof म्हणतात.).

पटले तर शेअर करा 👍

मोदी जी मयुरेश डनके

“सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र”

सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश नुसता राखायचा म्हटलं तरी ते सोपं काम नाही. प्रत्येक राज्य वेगळं, तिथले प्रश्न वेगळे, नैसर्गिक-भौगोलिक समस्या वेगळ्या, तिथल्या नागरिकांच्या गरजा वेगळ्या.. प्रत्येक राज्यनिहाय ही अशी यादी करायची म्हटली तरी आपलं डोकं हलेल, अशी स्थिती. त्यात पुन्हा विरोधकांनी तोफा डागायला केलेली सुरूवात आणि दररोज एक नवा विषय काढून माजवलेलं रणकंदन...! ह्या सगळ्या जंजाळात नुसतं टिकून राहिलं तरी खूप झालं असतं..!

आपणच जरा विचार करून पाहू. आपल्या परिचयातली किंवा नात्यातली व्यक्ती, आपला मित्र-मैत्रिण किंवा आॅफिसमधला सहकारी आपल्याविषयी एखादा शब्द बोलला तर आपल्याला त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिल्याशिवाय झोप लागत नाही, चैन पडत नाही. आपण अस्वस्थ होतो, संतापानं पेटून उठतो. ती व्यक्ती समोर आली तर आपल्या हातून त्याच्या गालावर चार बोटं उठतीलही.. आणि कुणीही ह्या प्रतिक्रियेला ‘अगदी स्वाभाविकच आहे हे’ असंच म्हणतील.

रस्त्यावरच्या कोण कुठल्या अनोळखी व्यक्तीनं आपल्या वाटेत गाडी जरी आडवी घातली तरी आपल्या तोंडून चार उच्च दर्जाच्या शिव्या हासडल्या जातातच. हाॅटेलातल्या वेटरनं आणलेल्या फिंगर बाऊलमधलं पाणी जरासं कोमट असलं तर त्याची काॅलर धरण्यापर्यंत आपली मजल जाते. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, चंदू पारखी यांच्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखा पाहून खऱ्या जगात नागरिकांनी त्यांना हातापायांनी प्रसाद दिल्याचीही उदाहरणं आहेत. मनुष्यप्राणी मुळातच अतिसंवेदनशील.. क्षुल्लक गोष्टीवरून एखाद्याच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार करायलाही आपण मागेपुढे पाहत नाही.

पण कुणीही उठावं अन् चारचौघांत अत्यंत घाणेरड्या शिव्या द्याव्यात, आयाबहिणींवरून शिव्या द्याव्यात, बायकोवरून-वैवाहिक जीवनावरून शिव्या द्याव्यात, पार पुरूषत्वावरूनही शिव्या द्याव्यात, हा प्रकार एक व्यक्ती अत्यंत शांत चित्तानं पाहत होती. कोण होती ही व्यक्ती? सार्वभौम भारताचे लोकनिर्वाचित पंतप्रधान श्रीमान नरेंद्र दामोदरदास मोदी..!

लोक बेजबाबदार म्हणत होते, नीच म्हणत होते, चोर म्हणत होते, सैनिकांच्या प्राणांचा सौदा करणारा माणूस असं म्हणत होते, आरएसएस चा कुत्रा म्हणत होते, बेफिकीर, बेशरम, फुटाणा म्हणत होते, अश्लील शिव्यांना तर काही सुमारच नव्हता आणि भारताचे माननीय पंतप्रधान हे सर्व सहन करत होते.

पत्रकारांची गोष्ट तर काय वर्णावी? ऐरावताला कशी दहा तोंडं असतात, तशा पत्रकारांना दहा जिभा फुटलेल्या होत्या. काही पत्रकार त्यांची अक्कल काढत होते, काही त्यांची लायकी काढत होते, काही त्यांच्या चारित्र्यावर तोंडसुख घेत होते. त्यांना शिव्याशाप देणाऱ्या आणि त्यांची निंदानालस्ती करणाऱ्या व्यक्तींना वृत्त वाहिन्यांचे संपादक “विचारवंत, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक” अशी बिरूदं लावत होते. त्यांना चर्चेत बोलण्यासाठी स्वतंत्र वेळ दिला जात होता, त्यांचं बोलणं मध्येच तोडलं जात नव्हतं. हे सगळं प्रकरण संपूर्ण देश रोज पाहत होता.

हे सगळं कमी पडलं म्हणून की काय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, माजी सनदी अधिकारी, नामवंत साहित्यिक, कलावंत, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक ही फौजही यात सामील झाली. प्रसारमाध्यमांसमोर बोलत होतेच, पण त्यानं काहीच होईना म्हणून मग पुरस्कार परत करण्याचे प्रकार सुरू झाले. त्यानंही काही होईना. मग ‘आम्हाला या देशात राहण्याची भीती वाटते, असुरक्षित वाटतं’ असंही म्हणून झालं. हे एखाद्या सामान्य माणसानं केलं असतं तर त्याला कुणी हिंग लावूनही विचारलं नसतं. पण ही तर सेलिब्रिटी माणसं..! देशातली लोकप्रिय व्यक्तिमत्त्वं..! त्यांना पुढं करून अस्वस्थता निर्माण करण्याची एकही संधी माध्यमांनी सोडली नाही. पण तेही अस्त्र निष्फळ ठरलं. “मोदी पंतप्रधान झाले तर आम्ही हा देश सोडून जाऊ” हेही म्हणून झालं. निवडणुका तोंडावर आल्यावर तर यांनी ‘मोदींना मत देऊ नका’ असं जाहीर आवाहन करून सह्यांची मोहीम उघडली.

आपण त्यांच्या जागी जरा स्वत:ला ठेवून पाहू आणि स्वत:लाच प्रश्न विचारू की, ‘त्यांच्या जागी मी असतो तर मला त्यांच्याइतकं शांत राहणं जमलं असतं का?’ आपल्या कुटुंबियांपैकी कुणाचा असा अपमान झाला तर सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि त्या विवक्षित व्यक्तीचे हातपाय तोडायला पण मागेपुढे पाहत नाहीत. पण इथे तर पंतप्रधानांच्या एकाही नातेवाईकानेही तक्रार केली नाही.

एका देशाचा पंतप्रधान मनात आणेल तर काय करू शकणार नाही? त्यांना काय अशक्य आहे? संपूर्ण राष्ट्रीय यंत्रणा कामाला लावून एकेकाला पकडून त्याचे वाटेल ते हाल करू शकले असते. आयुष्यातून,सामाजिक जीवनातून कायमचं उठवू शकले असते. आणि ह्याविषयी इतकी गोपनीयता बाळगली गेली असती की, वाहत्या वाऱ्यालाही याचा पत्ता लागला नसता. हातात सत्ता असूनही इतका संयम आणि स्थिरबुद्धी यांच्यात आली कशी? हा प्रश्न एक मानसतज्ञ म्हणून पडणं अगदी स्वाभाविक होतं.

व्यक्तिगत किंवा खाजगी जीवनातील घटनांचा प्रचंड विपर्यास करून प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न पाच वर्षं सुरू होता. त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या संपत्तीपर्यंत एकही गोष्ट अशी नसेल, ज्यावर टीका झाली नाही. “एक चहावाला देश काय सांभाळणार?” इथपासून सुरू झालेली आगपाखड “ज्याला स्वत:ची बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार?” इथपर्यंत घसरली. एअरस्ट्राईकसंदर्भातही “मी स्वत:च एक विमान चालवत होतो असंही मोदी म्हणतील” अशीही चेष्टा झाली. पण, हा माणूस शांत राहिला, हेच अभ्यासण्यासारखं आहे.

एकेरीत उल्लेख होऊन टीकेचा धनी होण्याचा प्रसंग मोदींवर वारंवार आला. विरोधी पक्षांनी त्यांना तोंडदेखली सन्मानजनक वागणूक देखील दिली नाही. एखाद्या व्यक्तीनं चारचौघात आपल्याला ओळख दाखवली नाही किंवा ती व्यक्ती आपल्याशी नीट बोलली नाही तर आपला किती तिळपापड होतो? मग पंतप्रधानांचा झाला नसेल का?

आपल्याला आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबियांचे, आपल्या जातीचे, धर्माचे, संबंधित संघटनांचे, राजकीय पक्षांचे कडवे स्वाभिमान असतात, आहेत. पराकोटीचे इगो असतात, आहेत. कुणीतरी लिहिलेल्या एका वाक्यावरून किंवा कुणीतरी केलेल्या एका वक्तव्यावरून आपण सामान्य माणूस असूनही जर हातात दगड घेऊ शकतो, जर समोरच्यावर हात उचलू शकतो, जर सरकारी मालमत्तेचं नुकसान करू शकतो, तर मग देशाच्या पंतप्रधानांनी तर काय काय करायला हवं?

मोदींनी हिटलरगिरी केली असा आरोप अनेकजण करत होते, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली अशीही ओरड होत होती. पण अगदी शब्दश:च सांगायचं झालं तर, गेली पाच वर्षं जे नित्यनेमानं त्यांना शिव्यांची लाखोली वाहत होते, त्यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही निर्बंध आले नाहीत. सगळेजण मोदींवर टीका करण्याचा आनंद अगदी मनसोक्त लुटत राहिले.

ज्यांना राजकारण म्हणजे काय आणि ते कशाशी खातात हे माहीतही नाही, तेही मोदींचे केवळ विरोधकच नव्हे तर शत्रू बनले. ज्यांना स्वत:च्या जिल्ह्याचा नकाशा नीट माहीत नाही, ती माणसं पुलवामा-बालाकोट वर बोलायला लागली. दिवसाला मिळालेला इंटरनेट डेटा केवळ मोदी-शहांना शिव्या देण्यापोटीच खर्च करणारेही अनेकजण होते. माझ्यासारख्याला हे समजलंच नाही की, मोदींच्या कट्टर विरोधात जावं असं या सामान्य माणसांना का वाटलं?

फेसबुकवरच्या वृत्तवाहिन्यांच्या पेजवरच्या कमेंट्स मी उत्सुकतेने वाचत असे. त्यातले बहुतांश मोदीविरोधक खोट्या नावांनी अकाऊंट्स काढून शिवीगाळ करतात, हे लक्षात आलं. काॅलेजात शिकणारे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते यांचे स्वतंत्र फेसबुक ग्रुप सुरू झाले. त्या ग्रुपचं नाव निराळंच आणि आतमध्ये मोदी-शहांना नुसत्या शिव्याच..! काॅलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा शाळाशिक्षकांचं मोदीजींनी काय वाकडं केलं, हे कुणालाच माहित नाही. पण संपूर्ण देश मोदीविरोधात आहे असा आभास यशस्वीपणे निर्माण केला गेला. एकूण काय तर, चहापेक्षा किटली गरम...!
पण, स्वत:चं काम, किंवा दैनंदिन कार्यक्रम यांमध्ये तसूभरही विचलित न होता पंतप्रधान स्वत:चं काम करत राहिले. पाच वर्षांत त्यांनी एकदाही सुट्टी घेतली नाही आणि विशेष म्हणजे ते एकदाही आजारी पडले नाहीत. व्यक्तिगत टीकेकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ते अतिशय शांत राहिले.

त्यांच्या स्थिरबुद्धीला आणि शांततेला तडाच जात नाही, हे पाहून त्यांचे विरोधकच अधिक अस्वस्थ होत गेले. ‘आम्ही राजकारण सोडून देऊ’ इथपासून ते ‘मोदी पंतप्रधान झाले तर आत्महत्या करू’ इथपर्यंत वक्तव्यं करून झाली. पण कशाचाही परिणाम ह्या चिरेबंदी व्यक्तिमत्वावर झाला नाही. साधा ओरखडाही उठला नाही. त्यामुळेच, समोरच्या व्यक्ती अधिक अस्वस्थ होत गेल्या आणि त्यांना त्यांच्या ध्येयधोरणांचे, उद्दिष्टांचे, राजकीय भूमिकांचे भानच उरले नाही. यालाच ‘संदीग्धता’ असं म्हणता येईल.

अनेक खुसपटं मुद्दाम उकरून काढण्यात आली, त्यांच्या वक्तव्यांचा मोठ्या प्रमाणात विपर्यास करण्यात आला. देशभर टीकेच्या झोडी उठवण्यात आल्या. ह्याचा किती मानसिक ताण त्यांच्यावर आला असेल? आॅफिसमधला एक माणूस आपल्याला सहकार्य करत नसेल तर माणसं सरळ राजीनामा देऊन मोकळी होतात. ह्या व्यक्तीनं पाच वर्षं कसं काम केलं असेल?

ह्या पाच वर्षांत आपण आपला काहीही संबंध नसताना देशाच्या नेतृत्वावर विनाकारणच नकारात्मक तणाव निर्माण करत राहिलो, ह्याची कणभरही जाणीव लोकांना नाही. अतिरिक्त मानसिक तणाव व्यक्तीच्या कार्यक्षमतेची आणि निर्णयक्षमतेची अतोनात हानी करतो. माणसं सैरभैर होतात, त्यांच्या हातून चुका घडायला लागतात. पण, २०१४ मध्ये ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाला मतपेटीद्वारे पसंती दिली, त्यांना हे नक्कीच कळून चुकलं असेल की, त्यांनी एका अत्यंत कणखर, सक्षम आणि चारित्र्यवान व्यक्तीची निवड केली आहे आणि ती निवड योग्यच आहे.

ते शांत राहिले, गंभीरपणे-प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि त्यांचा मार्ग आक्रमत राहिले. मॅस्लोच्या मांडणीनुसार, आत्मवास्तविकीकरणाच्या स्तरावर मा.पंतप्रधान कधीच पोचलेले आहेत. मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे, मी ह्या पदावर कशाकरिता आहे, माझं कर्तव्य काय आहे, या क्षणी माझी भूमिका काय असली पाहिजे, माझी देहबोली कशी असली पाहिजे, मी नेमक्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे ह्या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं त्यांच्याकडे असल्याशिवाय इतकं शांत राहणं शक्यच नाही.

सत्ता, पैसा, राजपद, सुखोपभोग, विलास यापैकी कशाचाही मोह असला असता तर त्यांनी चवताळून उत्तरं दिली असती, विरोधकांवर धावून गेले असते, पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली असती. पण यातलं काहीच घडलं नाही. उतावीळपणे किंवा संतापाच्या भरात त्यांनी कुठलंच पाऊल उचललं नाही. त्यांचं भावनिक नियंत्रण किती उच्च दर्जाचं असेल, याची आपण कल्पना करू शकू.

राजकीय जीवनात राहूनही त्यांनी स्वत्व आणि स्वाभिमान सोडला तर नाहीच, शिवाय देशावर त्याची सक्तीही केली नाही. ‘माझा विरोध करणाऱ्यांना घरात घुसून मारा’ असली आक्रमक हिंसक आवाहनं त्यांनी कधीही केली नाहीत. पंतप्रधान पदाला अशोभनीय ठरेल असं वर्तन त्यांनी कधीही केलं नाही. विखारी वक्तव्यांपासून ते दूर राहिले. मतांसाठी त्यांनी स्वत:च्या श्रद्धांशी प्रतारणा केली नाही. विरोधकांच्या टीकास्त्रांना ते कृतीतून उत्तर देत राहिले.

परंतु, दुसऱ्या टोकाला शालेय विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत राहिले, विविध क्षेत्रातील कल्पक आणि कर्तृत्ववान मान्यवरांशी ते चर्चा करत राहिले, उत्तम आणि अभ्यासू श्रोता बनून नवनवी माहिती ते घेत राहिले. समाजोपयोगी कार्य सेवाभावानं करणाऱ्या व्यक्तींना ते देशापुढे आणत राहिले. विविध तज्ञांच्या कामात राजकीय इच्छाशक्ती हा अडसर बनू न देता, त्यांनी त्यांना उन्मुक्त संधी दिल्या. देशाच्या कर्तृत्वाची प्रेरणा ते सतत फुलवत राहिले.

आपण त्यांचे डोळे पहावेत. ते एका निराळ्याच तेजानं चमकत असतात. समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधण्याची त्यांना सवय आहे.  त्यांचं शांतपणानं पण दमदार पावलं टाकत चालणं पहा. प्रत्येक पाऊल पूर्ण विचारांतीच टाकण्याचा आत्मविश्वास त्यातून दिसून येईल. त्यांची बोलण्याची पद्धत किंवा संवादांची फेक पहा. ते अतिशय संयमानं पण ठामपणानं त्यांची मतं मांडतात. ‘मला असं बोलायचं नव्हतं, माझा असा हेतू नव्हता’ अशी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही, त्याचं कारण तेच आहे.

ही सगळी उत्तम, स्थितप्रज्ञ आणि दृढनिश्चयी नेतृत्वाची व्यक्तिमत्त्व गुणवैशिष्ट्यं आहेत. ज्या प्रकारच्या आत्यंतिक स्वार्थानं बरबटलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही ते त्यांच्या ध्येयाकडे चालत राहिले, याचाच अर्थ असा की ह्या व्यक्तीकडे प्रचंड सहनशक्ती आहे आणि तेवढाच प्रचंड आत्मविश्वासही आहे. शक्ती कुठं, किती वापरावी आणि युक्ती कुठं,किती वापरावी हे त्यांना नेमकं उमगलेलं आहे. विरोधकांनी अन्य कुठलंही काम न करता त्यांनी केवळ आपल्यावर टीका करत राहण्यातच रममाण असावं अशी त्यांची योजना होती की ते आपोआपच घडत गेलं असावं, हा मात्र स्वतंत्र अभ्यासाचा विषय असू शकतो.

अत्यंत सामान्य व्यक्तींना राष्ट्रपती भवनात बोलावून त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करणं, सीमेवरील सैनिकांसह दिवाळी साजरी करणं, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही ज्या त्या ठिकाणच्या विविध व्यक्तींची आवर्जून भेट घेणं, सार्वजनिक जीवनातही थेट सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळणं ह्या त्यांच्या कृती उत्तम भावनिक बुद्धिमत्ता आणि उच्च दर्जाची आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता यांची चुणूक दाखवून देतात. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या विषयात त्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले, त्यानुसार तज्ञांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घेण्याकडे त्यांचा कल दिसतो. कुणाचं किती, कुठलं आणि केव्हा ऐकावं ह्याचं पक्कं गणित त्यांनी मांडूनच ठेवलेलं दिसतं. त्यामुळेच, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण ह्याबाबतीतले त्यांचे आडाखे अचूक सिद्ध होत गेले. म्हणजे, ह्या व्यक्तीची दूरदृष्टी उत्तम आहे.

आता उरला शेवटचा मुद्दा. तो म्हणजे “सत्तातुराणां न भयं न लज्जा” असं एक संस्कृत वचन आहे. (ज्यांना ते उच्चारणं जमत नसेल त्यांनी उगाच चावटपणा करून संस्कृतविषयक ज्ञानाचा जाहीर प्रयोग करण्याच्या भानगडीत मुळीच पडू नये. मागे अशाच प्रयत्नांत अनेकांची फसगत झालेली आहे.) ‘सत्तेकरिता हपापलेल्यांना ना भीती, ना लाज’ असा त्या वचनाचा अर्थ. पण ह्या उक्तीमध्ये मा. पंतप्रधान मुळीच बसत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांपासून ते गेली अनेक वर्षे लांबच आहेत. त्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मूळ पायाच प्रखर राष्ट्रविचार, नैतिकता आणि विवेक ह्यांच्या रसातच घातला गेला आहे.

आता असे प्रधानमंत्री लाभल्याबद्दल आनंद, समाधान व्यक्त करायचं की सकाळ-संध्याकाळ बोटं मोडत बसायचं, हे प्रत्येकानं आपापलं ठरवावं.

(हा लेख राजकीय अंगानं मुळीच लिहिलेला नसून तो केवळ व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्याचा एक साधा प्रयत्न आहे. त्यात अनेक तृटी असू शकतात. बाकी मतभेद, मतांतरं असू शकतातच. पण कितीही मोह झाला तरी अर्थशून्य टीका करून आपल्या अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन जाहीररित्या मांडू नये.)

©️मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

Friday, May 24, 2019

अटल जि

*एक सुफळ संपूर्ण प्रेमकहाणी…*

*विजय चोरमारे*
वरिष्ठ सहाय्यक संपादक
महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
…...........
राजधानी दिल्लीतल्या वरिष्ठ राजकीय वर्तुळात राजकुमारी कौल यांना सगळे ओळखत होते. त्यांचं निधन चार मे २०१४ रोजी झालं. त्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध केली. त्यानंतर सर्वसामान्यांना राजकुमारी कौल यांच्याबद्दल कळलं. एका अज्ञात प्रेमकहानीच्या पुस्तकाची काही पानं उलगडली गेली. राजकुमारी कौल यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं, तेव्हा त्यासंदर्भात जी प्रेसनोट काढण्यात आली होती त्यामध्ये, ‘वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्य’ असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

खरोखर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाचा त्या अविभाज्य भाग होत्या. चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांची वाजपेयी यांच्यासोबत मैत्री होती. पती प्रा. बी. एन. कौल हयात असताना वाजपेयी यांनी त्या दोघांसोबत खूप काळ व्यतीत केला. प्रा. कौल यांच्या निधनानंतर वाजपेयी यांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा स्वीकार केला. त्या वाजपेयी यांच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ति बनल्या. अशी व्यक्ती सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींमध्ये ढवळाढवळ करीत असते आणि त्यामुळे वादग्रस्त ठरते. परंत राजकुमारी कौल यांनी राजकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवले आणि संबंध केवळ व्यक्तिगत पातळीवरच जपले. त्याला छान कौटुंबिक उबदारपणाचे आवरण दिले.

अटलबिहारी वाजपेयींसाठी येणारे फोन राजकुमारी कौल याच घेत होत्या. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागतही त्याच करायच्या. त्यांचं निधन झालं तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धामधुमीचा काळ होता. त्यावेळच्या व्यस्ततेतूनही वेळ काढून काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाजपेयींच्या घरी  जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. यावरून राजकुमारी कौल यांचं वाजपेयींच्या कुटुंबातलं स्थान किती महत्त्वाचं आणि सन्मानाचं होतं, हे लक्षात येतं.

राजकुमारी कौल आणि अटलबिहारी वाजपेयी यांची ही कहाणी एखाद्या चित्रपटाची कथा बनावी अशी  तरल होती. त्यातली तरलता आणि त्या कहानीचा खानदानी आब अखेरपर्यंत टिकून राहिला. सोशल मीडियाच्या सवंग कालखंडातही त्याला गॉसिपचे स्वरुप आले नाही, तसे कुणी देण्याचा प्रयत्नही केला नाही. अटलजींचं आदरणीय आणि निर्मळ व्यक्तिमत्त्वच त्याला कारणीभूत होतं.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेमुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी राजकुमारी कौल यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. बाकी भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. ‘बहुत ममता से भरी हुयी थी’ ही सुषमा स्वराज यांची त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांचं नेमकं वर्णन करणारी होती.

वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. बाकीच्याही कुणी त्या फंदात पडले नाही. ‘मिसेस कौल’ म्हणूनच त्या स्वत:ची ओळख करून द्यायच्या आणि आपण वाजपेयींच्या मित्र असल्याचं सांगायच्या. वाजपेयी पंतप्रधान असताना ७, रेसकोर्स येथेही मिसेस कौल म्हणूनच त्या राहिल्या.

ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये (सध्याचे लक्ष्मीबाई कॉलेज) शिकत असल्यापासून अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची ओळख होती. ग्वाल्हेरच्या मोरार परिसरात कौल यांचे कुटुंबीय राहात होते. नंतर त्यांनी शहर सोडले. कॉलेजमध्ये असताना वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्यात अनोखे भावबंध निर्माण झाले होते. परंतु काही कारणांनी ती प्रेमकहाणी अधुरीच राहिली. वाजपेयींनी राजकुमारींना प्रेमपत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या, परंतु त्यांना त्या पत्राचं उत्तर मिळालं नाही. त्यामुळं ते मनातून दुखावले होते. पुढं दोघांचे रस्ते वेगळे झाले.

राजकुमारी यांचा विवाह प्रा. बी. एन. कौल यांच्याशी झाला. ते दिल्लीच्या रामजस कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि कॉलेजच्या होस्टेलचेही वॉर्डन होते. पतीसोबत राजकुमारी कौल दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर वाजपेयी यांच्याशी त्यांचा पुन्हा संपर्क सुरू झाला.

अलिकडेच दिवंगत झालेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश निकम यांनी राजकुमारी कौल यांच्या निधनानंतर त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना उजाळा दिला होता.

भाजपचे बीट कव्हर करीत असताना निकम यांना वारंवार वाजपेयींच्या निवासस्थानी फोन करावा लागायचा. तो लँडलाइनचा जमाना होता. रात्री कधीही फोन केला तरी एक महिला फोन उचलायची. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आवाज होता. निकम लिहितात, ‘मी त्यांना वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या फोन होल्डवर ठेवायला सांगायच्या आणि नंतर वाजपेयी फोनवर यायचे. हे वारंवार घडायचं. अतिशय सभ्य, सुसंस्कृत आवाजात पलीकडून आपली ओळख करून दिली जायची, ‘मी मिसेस कौल बोलते.’ असं बऱ्याचवेळा घडलं. म्हणजे फोन मिसेस कौल उचलायच्या आणि थोड्या वेळानं वाजपेयी फोनवर यायचे.’

एके दिवशी निकम यांनी फोन केल्यावर ‘मिसेस कौल बोलते’, असा नेहमीचा आवाज आला. वाजपेयींच्याबद्दल विचारल्यावर त्या पुन्हा म्हणाल्या, ‘मी मिसेस कौल बोलतेय’. त्यावर कोणतंही कुतूहल न दाखवता निकम म्हणाले, ‘होय मॅडम, मला ठाऊक आहे.’ हे असं झाल्यावर नेहमीच्या आदबशीरपणे आणि आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला माहीत नसावं मी कोण आहे ते!’

‘नाही मॅडम’, निकम यांनी थोडं अपराधीपणानं उत्तर दिलं.

‘मी मिसेस कौल, राजकुमारी कौल. वाजपेयीजी आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे चाळीस वर्षांपासून मित्र आहोत. तुम्हाला ठाऊक नाही?’ त्यांनी आश्चर्ययुक्त कुतूहलानं विचारलं.

‘ओह, सॉरी मॅडम, मला ठाऊक नव्हतं.’ निकम यांनी उत्तर दिलं. त्या हसल्या आणि त्यांनी वाजपेयी आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं. त्या आणि त्यांच्या पतीसोबत वाजपेयी राहात असल्याच्या आठवणीही सांगितल्या.

वाजपेयींनी आपल्या कॉलेजच्या काळातील या मैत्रिणीबद्दल कधी सार्वजनिकरित्या काही सांगितलं नाही. एका मुलाखतीमध्ये राजकुमारी कौल म्हणाल्या होत्या की, ‘मला आणि अटलजींनाही कधी आपल्या नात्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही.’

राजकीय, सामाजिक जीवनात अटलजींच्याबद्दल एवढा आदर होता, की या नात्याबद्दल कधी माध्यमांनी बातम्या रंगवल्या नाहीत किंवा राजकीय वर्तुळात कधी गॉसिपिंग झालं नाही. वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले, त्या तिन्ही वेळेला त्यांचं घर मिसेस कौल आणि वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य याच सांभाळत होत्या. वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांचं हे नातं वाजपेयींच्या कौटुंबिक आणि राजकीय वर्तुळातल्या नेत्यांनी सहज स्वीकारलं होतं.

कोणत्याही प्रेमकहाणीचा शेवट दोन प्रकारे होत असतो. एकतर ताटातूट होते. किंवा दोघं लग्न करतात. वाजपेयी आणि राजकुमारी यांची प्रेमकहाणी वेगळी आहे. दोघांची ताटातूट झाली. पैकी एकाचं लग्न झालं. त्यानंतर दोघं भेटले. अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले. त्याअर्थानं विचार केला, तर ही प्रेम कहाणी सुफळ संपूर्ण ठरली, असं म्हणता येईल.
111111111111

उत्कृष्ट राजनितिज्ञ, कवी ,पद्मविभुषण, भारतरत्न माजी पंतप्रधान मा.श्री अटल बिहारी वाजपेयी यांच निधन .
*अटल है ध्यास अटल है विश्वास*
देशाच्या राजकारणात जवळपास ६० वर्ष अविरत उत्साहाने आणि अतिशय सभ्यतेने वावरणा-या राजकारण्यांमध्ये अटलजींचे नाव आदराने घेतले जाते. एक हिंदी कवी म्हणून जीवनाची  सुरुवात करणारे अटलजी, हे शामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहवासात आले. त्यांचे सचिव बनले आणि अटलजींच्या नेतृत्वाला परिसस्पर्श झाला. १९५७ मध्ये बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवणारे वाजपेयी, बलरामपूरला निवडणूक लढवायला जाताना कोणतेही रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या तिस-या वर्गाच्या डब्यात, जिथे सामान ठेवतात त्या वरच्या बाकावर झोपून बलरामपूरला पोहोचले होते. त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाणात (अपनी अपनी बात) त्यांनी त्या प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. संसदेमध्ये पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर तरुणपणातल्या त्यांच्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षाच्या बाकाला आणि विषयांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या सदस्याला, सत्ताधारी पक्षाच्या बाकावरचे सदस्य किती सन्मानाने वागवतात आणि त्याचा कसा आदर करतात, याचे उदाहरण वाजपेयीच आहेत. त्यावेळचे सर्वोच्च लोकप्रिय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही वाजपेयी यांच्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण भाषणाने प्रभावीत होत असत आणि याच पंडितजींनी तेवढय़ाच मोकळेपणाने १९५८ सालातच सांगून टाकले होते की, ‘प्रधानमंत्री पद के लिए अटलजी का एक दिन पक्का..’ पंडितजींचे ते शब्द २८ वर्र्षानी खरे ठरले. १९९६च्या लोकसभेत १६२ जागा मिळवणा-या भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि अवघ्या १३ दिवसांकरिता वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभागृहात पुरेसे बहुमत मिळवता आले नाही म्हणून मतदान होण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रपतींकडे जाऊन राजीनामा सादर केला.
पंतप्रधान होण्यापूर्वी जनसंघाचे संस्थापक सदस्य, खासदार (१९५७, १९६२), जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), लोकसभेतल्या जनसंघ गटाचे नेते (१९५७ ते १९७७), जनता पक्षाच्या सरकारात परराष्ट्रमंत्री (१९७७ ते १९७९), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८० ते १९८६), भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८० ते १९९६),  भारताचे पंतप्रधान,  (१९९६ आणि १९९८ ते २००४) अशी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द आहे. या कारकिर्दीप्रमाणेच सामान्य माणसाला वाजपेयी माहिती आहेत ते एक अमोघ वक्ते आणि सभा गाजवणारे नेते म्हणून. जुन्या जनसंघाने आणि नंतर भाजपाने ‘प्रधानमंत्री की अगली बारी-अटलबिहारी’ अशा अनेक वेळा घोषणा दिल्या होत्या. त्या घोषणा वाजपेयी यांच्या नेतृत्वामुळेच वास्तवात उतरू शकल्या. ते पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांचा चेहरा कधी ‘कट्टर’ वाटला नाही आणि त्यांची सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याची सर्वव्यापक भूमिका कधीही लपून राहिली नाही.  राजकीय हिंसाचाराला वाजपेयींचा जसा विरोध होता तसाच जाती-धर्माच्या नावावर राजकारणात टोकाचे मतभेद करण्यालाही त्यांचा विरोध होता. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या सगळ्या उन्मादात वाजपेयी कुठेही सामील झालेले नव्हते आणि ‘जे झाले ते योग्य झालेले नाही’, असे त्यांचे प्रांजळ मत त्यांनी अगदी स्पष्टपणे नोंदवलेले होते. ते काँग्रेसचे विरोधक होते; पण, देशाच्या उभारणीत काँग्रेसचा जो प्रचंड त्याग आहे, त्याबद्दल नेहमीच ते आदराने बोलत असत. विरोधी बाकावर असतानाही पंडितजींच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती करताना त्यांना कधी संकोच वाटला नाही आणि स्वत: परराष्ट्रमंत्री झाल्यावरही पंडितजींबद्दल गौरवाचे उद्गार काढताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही

वाजपेयींचे भाषण जेवढे मोहून टाकणारे असायचे, अगदी तेवढेच त्यांचे ललित लेखनही प्रासादिक आहे. काही काळ ते पत्रकारही होते. ‘पांचजन्य’ या साप्ताहिकात ते लेखन करीत असत. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे व्यवसायाने राजकारणी असताना मनाने ते कवी होते आणि त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्या रसपूर्ण अशा साहित्याचा परिचय भारतीय रसिक वाचकांना झालेला आहे. त्यांचे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितांच्या काव्य गायनाचे कार्यक्रमही रंगू लागले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची मने जुळली. याचे आणखी एक कारण म्हणजे राजकारणात राहूनही या दोघांची मने कवींची होती, हळूवार होती, संवेदनाक्षम होती. त्यामुळे लोकसभेत आक्रमक होणा-या या दोन्ही नेत्यांनी आपल्या हळूवार भावनांचे प्रदर्शन साहित्यामध्ये अतिशय लालित्यपूर्ण रितीने केलेले आहे.
आशा या महान ,तपस्वी ,थोर व्यक्तीचा जिवन प्रवास थांबला ,त्यांच्या आत्मास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹💐💐🌷