[07/02, 4:41 am] Charudatta: मित्रांनो, "जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल' हे गाणे सर्वांनाच आवडते, 'गुलामी' चित्रपटातील गुलज़ार यांनी लिहिलेले हे गीत अशीच याची ओळख, पण मुळात हे गाणे ७०० वर्षापूर्वीचे आहे, १४ व्या शतकात अमीर खुसरो यांनी हे लिहिले आहे, इतकी वर्ष या गाण्याने अनेक पिढ्यांना भूरळ पाडली आहे, विशेष म्हणजे सांगितले तर आश्चर्य वाटेल पण हे गीत म्हणजे हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या संम्मीलनाचे आगळे वेगळे प्रतीक आहे, कारण हे गीत दोन भाषेत आहे, फ़ारसी आणि ब्रज या त्या दोन भाषा, मूळ गीतातील पहिले कडवे फ़ारसी भाषेत आहे तर दुसरे अस्सल भारतीय अशा ब्रज भाषेत, ७०० वर्षांपूर्वी काही कलावंत दोन भिन्न संस्कृतीला भाषेच्या सहाय्याने एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न करीत होते, त्याअर्थी या गीताचे मोल अधिक आहे, अनेक ख्यातनाम गायकांनी हे गीत गायले आहे, नव्हे त्यांना तो मोह आवरला नाही इतके ते अप्रतीम आहे ! सोबत सम्पूर्ण मूळ गीत देत आहे, नक्की वाचा !
"जिहाल-ए-मिस्कीं मकुन तगाफुल,
दुराय नैना बनाय बतियाँ।
किताबे हिज्राँ, न दारम ऐ जाँ,
न लेहु काहे लगाय छतियाँ।।
शबाने हिज्राँ दराज चूँ जुल्फ बरोजे वसलत चूँ उम्र कोताह।
सखी पिया को जो मैं न देखूँ तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ।
यकायक अज़दिल दू चश्मे जादू बसद फरेबम बवुर्द तस्कीं।
किसे पड़ी है जो जा सुनावे पियारे पी को हमारी बतियाँ
चूँ शम्आ सोजाँ, चूँ जर्रा हैराँ, हमेशा गिरियाँ ब इश्के आँ माह।
न नींद नैंना, न अंग चैना, न आप आये न भेजे पतियाँ।।
बहक्के रोजे विसाले दिलबर के दाद मारा फरेब खुसरो।
सपीत मन के दराये राखूँ जो जाय पाऊँ पिया की खतियाँ।
- अमीर खुसरो
[07/02, 4:41 am] Charudatta: लक्ष मुद्दाम दुसरीकडे वळवून, निरनिराळ्या कहाण्या रचून
माझ्या ह्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करण्याचा तुझा प्रयत्न मला कळतो आहे!
( खरे तर ही माझी अवस्था तुझ्या विरहामुळेच झाली आहे!)
प्रिये , माझ्या सहनशक्तीचा कडेलोट होत आहे,
अशा स्थितीत तू मला हृदयाशी का कवताळत नाही आहेस?
तुझे लांब कुरळे केस म्हणजे जणू विरहाच्या प्रदिर्घ रात्री
आपल्या मिलनाचा वेळ जवळ जवळ काहीच नाही!
सखी प्रिया ची साथ नसेल तर ह्या अंधाऱ्या रात्री कशा बरे कटतील?
तुझ्या शेकडो विभ्रमांनी माझी आधीच दुर्दशा झाली आहे!
कोणाला माझी इतकी काळजी पडली आहे,
जो माझी अवस्था प्रियेला जाऊन सांगेल!
एखाद्या मिणमिणत्या पणती प्रमाणे,
मी प्रेमाच्या वण्यव्यात भटकतो आहे!
बैचेन मन , थकलेली काया,
ती येत नाही,तिचा निरोपही येत नाही!!
ती मला एकदा तरी भेटावि ह्या आशेनं मी व्याकुळ आहे,
ती तुला खूप काळ नुसती झुलवत आहे खुसरो!!
हे शापित जीवन मी असाच जगत राहीन,
कारण कधीतरी मिलनाची वेळ येईल अशी आशा आहे !!!
अनुवाद- चारुदत्त
No comments:
Post a Comment