अमरप्रेम : रसास्वाद
१९७० साली आपल्याच हिंगेर कोचुरी या कथेवर अरबिंद मुखर्जी साहेबांनी उत्तम कुमार आणि साबित्री चटर्जीला घेवून एक अफाट बंगाली सिनेमा बनवला " निशिपद्म". नचिकेत घोष साहेबांच्या अफाट संगीतानी सजलेला हां चित्रपट ( मन्ना डेन्ना नेशनल अवार्ड आहे या चित्रपटासाठी ). हां सिनेमा शक्ती सामंता साहेबांनी बघितला आणि ते प्रेमाताच पडले या चित्रपटाच्या. अरबिंद कडून त्यांनी ही स्क्रिप्ट घेतली आणि त्यांनाच हिंदीत लिहायला लावली. शक्ती सामंता स्वतः दिग्दर्शन करणार होते. संगीत पंचम कड़े, गीतकार म्हणून आनंद बक्षी, हीरो म्हणून राजेश खन्ना आणि हेरोइन म्हणून शर्मीला. बघता बघता " अमरप्रेम " फ्लोरवर गेला, बनला आणि ऑल टाइम ग्रेट झाला.
पण हां चित्रपट ऑल टाइम ग्रेट झाला तो सगळ्यांनी घेतलेल्या अफाट मेहनती मुळे. रिहर्सल वगरेला न मानणारा राजेश खन्ना स्क्रिप्टवर अभ्यास करु लागला, शक्ती सामंतानीं बेफाट डिटेलिंग केले आणि हसत खेळत टून्स बनावणारा पंचम बारा बारा तास म्यूजिक रूम मध्ये घालवायला लागला. शक्ती सामंतांना या चित्रपटासाठी स्वर्गीय संगीताची गरज होती आणि पंचमला दादा बर्मनच्या सावलीतून बाहेर येण्याची.
अमरप्रेम साठी आंनद बक्षी साहेबांनी काय जबरदस्त गाणी लिहिली आहेत. आपली कलम त्यांनी पणाला लावली आहे अस म्हंटल तरी कमीच पडेल. एक एक शब्द म्हणजे मोती आणि या सुंदर मोत्यांना पंचमनी या जगा पलीकडच कोंदण लावले आहे. किशोरदाचा अमरप्रेम मध्ये लागलेला आवाज म्हणजे साक्षात स्वरराजाचा आवाज. तीन सोलो गाणी आहेत किशोरदाच्या आवाजात पण अशी की, या तीन सोलोच्या भरोश्यावर देखील ते लीजेंड झाले असते.
लताला पण अशीच दोन खूबसूरत गाणी दिली आहेत पंचमनी अमरप्रेम मध्ये. " रैना बीती जाये" म्हणजे अक्षरश: कहर आहे. दादा बर्मन कड़े असिस्टेंट म्हणून असतांना पंचमनी बनवलेली अर्धवट ट्यून. दादा बर्मनना राग मिक्स केलेले आवडत नसे, म्हणून कदाचीत ही ट्यून तशीच पडून राहिली असावी. पण बरच झाल, पंचमच्या सर्वोत्तम गाण्या पैकी एक असलेले हे गाणे पंचमच्या नावावर झाल. श्रोत्यांना सर्व सुरात चींब भिजवण्यात पंचमला फार आनंद मिळत असावा. रैना बीती जायेचा मुखडा आहे तोड़ी रागात आणि अन्तरा आहे खमज रागात. लतानी पण आपले संपूर्ण कौशल्य पणास लावून गायले आहे हे गाणे.
इराणी संतूरचा एक तुकडा वापरला आहे पंचमनी या गाण्यात ( शिव कुमार शर्मा साहेबांनी वाजवल आहे ) आणि आपण त्या तुकड्याचे रसग्रहण करतो न करतो तोच येतो एक बासरीच्या पैच, हरिप्रसाद साहेबांनी वाजवलेला. पंडित मल्लिकार्जुन मंसूर साहेबांनी हया गाण्याची स्तुती करतांना यात असलेल्या नोट्सच भरभरुन कौतुक केले आहे. रैना बीती जाये ऐकल्यावर साक्षात मदन मोहन साहेबांनी अभिनंदनाचा फोन केला होता दादा बर्मनला पण हे गाणे पंचमच आहे या वर मात्र ते बराच काळ विश्वास ठेवु शकले नाही.
तोड़ी म्हणजे सकाळचा राग आणि खमज उत्तर रात्रिचा पण पंचमनी याच अफाट कॉम्बिनेशन केले आहे. अमरप्रेम मध्ये पंचमनी खमज रागाचा भरपूर उपयोग केला पण प्रत्येक गाणे वेगळे आणि अफाट. "बड़ा नटखट है रे " मध्ये पण यशोदा आणि किशन कन्हैयाच वेगळेच नाते विणले आहे. वेश्यागृहात असलेल्या स्त्रीच्या वाटल्या येणारे ते काही तिचे स्वतःचे क्षण.
" चिंगारी कोई भड़के " म्हणजे कळस आहे या चित्रपटाचा. गिटारच्या माइनर कॉर्डनी पंचमनी या गाण्याची सुरवात केली आहे, मग हळूच बासरी येते आणि संपूर्ण गाण्यात हळुवार वायलिन वाजत राहत. तीव्र मध्यमचा इतका सुरेख वापर फार थोड्याच गाण्यात झाला आहे. भानु गुप्ताच गिटार, पंडीत हरिप्रसाद साहेबांची बासरी, चक्रवर्ती साहेबांच वायलिन आणि मग त्यावर किशोरदाचा आवाज, सगळ कस स्वर्गीय. आनंद बक्षी साहेबांचे पाय धरले असते मी या एका गाण्यासाठी. कसले अफाट बोल आहेत. परत एकदा रागांचा वापर करुन एक अजरामर गाणे बनवले पंचमनी. हे गाणे मग अनेक ठिकाणी बेंचमार्क ठरत गेले.
हेमंत कुमार, पंडीत अजॉय चक्रबर्ती साहेबांचे हे आवडते कम्पोजीशन असल्याच त्यांनी सांगीतले आहे, शक्ति सामंतानी हे त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीतल सर्वोत्तम गाणे होते असे म्हंटले पण खरी दाद दिली ती पंडीत ए टी कानन साहेबांनी. " ज्यांना किशोर कुमार आवडत नाही आणि जे असल्या अप्रतीम कलाकृतीच कौतुक करु शकत नाही ते मैड आहेत"
अजुन ऐंग्री यंग मैनचा ज़माना सुरु व्हायचा होता आणि लोकांना कोणीतरी रिबेल स्टार हवा होता. अमरप्रेम मध्ये असच एक गाणे आहे जे त्याकाळी लोकांच्या भावनांना डायरेक्ट हात घालणारे होते. " कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना ". आपल्याला काय वाट्टेल ते बोलाणाऱ्या लोकांकडे आपण काय लक्ष द्यायचे, सोड त्यांना असे म्हणत किशोर गातो " छोड़ो बेकार की बातो में, कही बीत न जाये रैना". गाण्याचे बोल आणि पंचमची अफाट ट्यूननी डायरेक्ट लोकांच्या काळजाला हात घातला. खमज राग हळुवार पणे मिसळला आहे राग कलावती मध्ये पंचमनी या गाण्यात. संगीतात रागांचा वापर कसा करावा याचे उदाहरण देण्यासाठी पंडीत अजॉय चक्रवर्ती साहेब हे गाणे वापरत असत. सहज गुणगुणता येणारे हे गाणे मात्र कसल अफाट आहे. या गाण्यातले बोल बघा, आनंद बक्षी साहेबांनी चाबुक ओढले आहेत त्या काळच्या समाजातील दूहीवर. बीत न जाये रैना यात किशोर इतका लड़ीवाळ खेळला आहे " रैना " या शब्दाशी. किशोरदानी काही काही घेतलेया हरकती म्हणजे स्वर्गीयच
एखाद्या ट्रायोलॉजी सारखी आहेत किशोरदाची तीन सोलो गाणी अमरप्रेम मध्ये. चिंगारी कोई भड़के म्हणजे झालेल्या दुःखाच गाणे, कुछ तो लोग कहेंगे म्हणजे छोड़ो यार, जगला फाट्यावर मारू आणि ये क्या हुवा म्हणजे आलेल्या दुखःद अनुभवाची टिंगलच. किशोरदा कसल भन्नाट गायला आहे हे गाणे .
डोली में बिठाई के कहा हे गाणे गायला पंचम नी तर साक्षात दादा बर्मनला बोलावाले. या चित्रपटानी पंचमच्या टैलेंटला योग्य मान सन्मान मिळवून दिला आणि मुख्य म्हणजे पंचम म्हणजे वेस्टर्न यातून पंचम बाहेर आला. ज्या वेस्टर्न स्टाइलसाठी काही जाणकार पंचमला ओळखतात त्यांना कदाचीत हे माहीत नसेल की पंचमच्या पहिल्या दहा गाण्यात एकही गाणे वेस्टर्न स्टाइलच नाही. पंचमनी त्याच्या एकंदर कारकीर्दीत तीन पिढ्यांना भुरळ घातली आणि तेही त्यांना आवडते ते संगीत देवून, उगाच नाही सुनील दत्त साहेब म्हणाले आहे " He understood youth like no other music director did "