जसे “ शिवरायांचे आठवावे रूप “ असे प्रत्येक मराठी माणूस म्हणतो तसेच आम्ही दक्षिण महाराष्ट्रीय इंजींनीयर म्हणू “पंडित काकांचे आठवावे रूप”
ईतीहास परिवार व वारसा :
काका हे श्री शंकर राव (अप्पा) दाजी कुलकर्णी या थोर इंजींनीयर उद्योजकांचे चे सर्वात छोटे बंधु ..
इचलकरंजी जवळील , माणकापुर (कर्नाटक) या गावातील मध्यमवर्गीय कुलकर्णी मंडळी .
शंकर राव , LK किर्लोस्करांकडे तरबेज मेकॅनिक म्हणून नोकरीला होते .
इचलकरंजी पाणी पुरवठा , पावसाळा आणि पुर स्वातंत्र्य पूर्व काळात इचलकरंजी येथील संस्थानिक घोरपडे सरकार. 19 40-45 मध्ये असेल . प्रचंड पुरामुळे गावाला पाणी पुरवठा करणारे इंजिन पुरात बुडाले . बंद पडले ... इंग्रजी कंपन्या नी रेपेरी करायला पाण्यातून बाहेर काढून आणायला संगितले. .. म्हणजे काही आठवडे पाण्याशिवाय ?
त्यावेळी , आप्पांनी पुरात पाण्यात जाऊन मशीन रीपेयरी केले ... ही होती आमच्या परिवाराची इन्जीनीयरिंग सुरुवात . या सफलतेने माणकापुरेंना जागा पैसा आणि कारखाना मिळाला .
त्यातून ऊभी राहिली “कुल्को” ... दोन पूर्ण वेग वेगेळे गुण असलेले अप्पा आणि तात्या .. यांच्या जोडीने कुल्को ही भारतातील सर्वात मोठी इंजिन करणारी भारतीय कंपनी बनली
याच कंपनीने , यशवंत राव चव्हाण यांच्या मदतीने मोटर कार निर्मितीचे परवाने मिळवले .
आणि खास भारतीय अशी मीरा कार निर्माण केली . मारुति ला टक्कर देत , यशवंतरावा बरोबर कुल्को ने ही इंदिरा जी चा झटका खाल्ला .
कुल्को बंद पडली..
त्या आधी पंडित काकांनी कुल्को ला लागणारे पार्ट तैय्यार करण्यासाठी एक छोटे मशीन शॉप चालू केले होते .. पहिले कामगार होते , त्यांचे परम मित्र बाळासाहेब हळदीकर.
. .
....
FIE सुरवातीचा काळ : प्रेरणा
न्हाव्याचे कटींग मशीन : ..काही ही करू पण प्रॉडक्ट करू .. ही जिद्द .
अनेकांना माहीत नसेल , पण 1950-55 मध्ये (वयाच्या पंचविशीत ) काका अपांच्या मागे न्हाव्याचे कटींग मशीन करणार म्हणून लागले होते. पण त्याच काळात कुलको चे काम जास्त झाल्याने तो विचार मागे पडला . पण नंतर परत एक परदेश प्रवास त्यांना हार्डनेस टेस्टर / बालनसिंग मशीन डोळ्यासमोर येऊ लागले . .
त्याच काळात काकानी एक ग्रायंडिंग मशीन खरेदी करून मुंबईच्या “फ्यूएल इंजेक्शन” या कम्पनीला फ्यूएल पंपाचे पार्ट करून द्यायला सुरू केले होते . 30-40 कामगारांचे त्यांचे नवे युनिट 1960 मध्ये प्रगत झाले होते. कुल्को शिवाय स्वतंत्र अस्तित्व , काकांनी निर्माण केले होते. हीच आजच्या FIE ची सुरुवात .
थोडे पसे हातात आल्यावर, काकांनी ते कशावर “उधळले” हे आजच्या छोट्या उद्योजकांनी समजून घेतले पाहिजे ... त्या काळात परदेश गमन हे अत्यंत उधळपट्टी चे होते . पण काकांनी प्रचंड खर्च औद्योगिक एक्झिबिशन पाहण्यावर खर्च केले . स्वतः एकटे जाऊन स्टॉल लावले . परदेशी कारखानदार मित्र बनवले . जे पुढील काळात खूप मदतीला आले .. उदा, श्री सायटो . जे जपान मध्ये यूनी व्हरसल टेस्टिंग मशीन तैय्यार करत होते .
अश्याच प्रदर्शनातून कल्पना घेऊन काकांनी बनवलेला पहीला (कमर्शियल) प्रॉडक्ट म्हणजे हार्ड नेस्स टेस्टर . त्याच काळात, त्यांनी electronic बालन्सिंग मशीन करणे चालू केले .
जसे शिवरायांनी मावळ्यांना, अडाणी जनतेला मदतीला घेऊन स्वराज्य निर्माण केले तसेच काकांनी केले . MG (?) कुलकर्णी या सारखे इलेक्ट्रिशियन, काही मेकॅनिक , वायरमन ना बरोबर घेऊन, रेडियो , स्पीकर चे पार्ट वापरुन त्यांनी बालन्सिंग चे सेंन्सर निर्माण केले . पहिले मशीन, 1962-65 मध्ये उत्तर परदेशात विकल्याचे ऐकले आहे. त्याच वेळी अनेक परदेश वार्या केल्या.. 1695-67 दरम्यान युरोप मध्ये श्री गजाननराव कुंभोजकर या गणितज्ञा बरोबर परदेशी तंत्रज्ञान विकास करणे चालू केले .
काकांची ही एक खासीयत होती . गणितज्ञ, मानसोपचार तज्ञ , वकील (राजाभाऊ फडणवीस) , सिविल इंजींनीर ( कै. JV कुलकर्णी –बंडा )असे विविध व्यक्ति मत्व त्यांनी कारखान दारीत आणण्याचे प्रयत्न केले.
त्या टेस्टिंग मशीन करण्याच्या प्रयत्नांना आलेल्या यशातून आजचा सगळा गोतावळा उभा राहिला असे म्हणायला हरकत नाही
आज ही FIE ही , भारतातील सर्वात मोठी व नावाजलेले टेस्टिंग मशीन करणारी कंपनी असावी .
महाराष्ट्रातल्या अनेक सिनेमा गृहात पूर्वी documentary दाखवली जायची . यात काकांनी कामगारांना लुना वाटल्याचे नेहमी आभिमानाने दाखवले जायचे .
कामगारांना दूध केळी देणारे ते कदाचित पहिलेच मालक असतील .
कामगारांच्या आरोग्यासाठी डॉक्टर ठेवणारे अनेक मालक असतील पण काम गारांच्या मानसीक स्वास्थ्यसाठी मानसोपचार तज्ञ त्याकाळात (1965) नेमणारे दूरदृष्टी असणारे काका ..... शिवाजी महाराज च कारखानदरी साठी ,
आज प्रचंड परिवार एकत्र गुफला तो काकांनीच .
काकांच्या तीसर्या पीढीतील आम्ही 70-80 भावंड एकत्र आहोत ते काकांची मुळेच ..
शे दोनशे माणसांचा प्रचंड परिवार एकत्र करून उन्हाळ्याची सुट्टी एकत्रपणे पन्हाळा गडावर दोन दोन महीने साजरी करणारा आख्या पांच क्रोशीत सापडेल का ?? .. आणि हो.... नुसतेच गोला करायचे नाही .... तर त्यांच्यासाठी इतिहास तज्ञ गुळवणींचे व्याखाने , उत्खनन प्रयोग. .. करवंदच्या जाळीतून भ्रमण … असे अनेक उपकरम राबवायचे ... असा कोणी होणे नाही ... झाला ही नाही .
इचलकरंजी सारख्या गावात काकांनी किती थोर लोक आणले ... त्याच्या 10% पण कोणी अनू शकणार नाही .
व्यक्तिमत्व : .
प्रचंड हजरजबाबी :
प्रचंड विनोद बुद्धी :
टोकाची मस्करी खोरी :
वाद विवादात प्रचंड क्षमता : .
नेहमीच थोडा वेळ एका बाजूने, तर थोड्या वेळाने दुसर्या बाजूने वाद घालत. .
टोकाची कारण मीमांसा: (?) :
असामान्य विचार शक्ति :
असामान्य स्मरण शक्ति :
टोकाची विश्लेषण शक्ति :
कल्पनेच्या पलिकडची चिकित्सक बुद्धी :
शाकाहारी पदार्थातील चवीतील सूक्ष्म छटा साठी प्रचंड पाठपुरावा करणारे :
असामान्य वाचन :
प्रचंड मित्र परिवार :
इतीहासाची प्रचंड आवड :
प्रचंड पणे परिवारात रमणारे :
No comments:
Post a Comment