....
#मीनाकुमारी......
युसूफ खान म्हणजे दिलीप कुमार ज्या ताकदी चा अभिनय सम्राट आहे, आणि त्याच मुळे त्याला ट्रॅजेडी किंग चा खिताब बहाल केला, आणि एक प्रश्न माझ्या समोर वारंवार पडतो कि त्याच्या ताकदीची नटी कोण असू शकेल, लोक सगळ्या अप्सरा समोर आणतील, पण माझ्या मते दिलीप कुमार च्या अभिनयाला तोडीसतोड पुरून उरणारी किंवा उरून पुरणारी क्लास नटी म्हणजेच लेडी ट्रॅजेडी क्वीन महेजबी बानो उर्फ आमची तुमची "मीना कुमारी"!!
बैजू बावरा बघून मी किती तरी वेळ त्या अल्हडश्या पोरीजवळ घुटमळत होतो, ती "गौरी" खरंच अभिनयात इतकी उजळली, कि खास रोषणाई कोणाला करावी नाही लागली, लोकांना फारच कमी माहिती आहे अगदी दिलीप कुमार च्या आवाज पेक्ष्या हि कमी माहिती , कि मीना कुमारी नि वयाच्या चवथ्या वर्षा पासून मरुस्तवर, हिंदी , उर्दू, आणि पंजाबी सिनेमात काम करून आपली सेवा बहाल केली आहे, या अभिनेत्रींचे आयुष्य इतके खडतर गेले असेल, याची मला या क्षण पर्यंत कल्पना न्हवती. ती मद्य पिणारी होती, नवऱ्यापासून दूर राहत होती (नंतर पुन्हा नवऱ्याकडेच गेली, त्यात हे हि आलं), वेगवेगळ्या नटांबरोबर "किस्से" महशूर झाले, इतक्या फाल्तुक ज्ञाना पलीकडे लोकांनी मीना कुमारी ला कुठे हि मोजगणतीत आणलेच नाही.
महेजबी हिची आई प्रभादेवी हिने एका बंगाली मुला बरोबर लग्न केलं, नंतर काही कारणांनंतर ते लग्न मोडले, महेजबी ची आजी जी कलकत्त्यात राहणारी होती, तिने तिच्या सुनेला घरातून हाकलले, नंतर ती कानपूर ला आली आणि अलिबक्स या पंजाबी माणसाशी नाळ जुळली, आणि इकबाल बानो नाव धारण केलं अलिबक्स सिनेमा नाटकात हार्मोनियम वाजवायचा, त्यांना अपत्य झाले महेजबी, अलिबक्स यांनी अशोक कुमार हिला आपली मुलगी दाखवली, सिनेमात घ्यायला!!, आणि बघताच क्षणी दादामुनी बोलून गेले कि "अरे ये तो बेहद खूबसूरत है, तुम बडी हो जाओ बेटी हम तुम्हारे हिरो बनेंगे" नुसतं वाक्य तर निघून गेलं, पण पुढे अशोक कुमार तिचे हिरो बनले देखील, अशोक कुमार यांनी अलिबक्स ला दिग्दर्शक "विजय भट्ट" यांच्या कडे घेऊन गेले आणि त्यांनी मुलीला दाखवताच ते बोलले "मियाँ, तुम्हारी बेटी माशाल्लाह बेहद खूबसूरत है, नगीना है नगीना, बस तराशने कि जरुरत है, चमकेगी पर इस पर महेजबी नाम नही जचता, इसे प्रभा नाम दे दे ", अलिबक्स बोलले कि नही हुजूर प्रभा इस्की माँ का निकाह के पेहले का नाम था....आणि पटकन विजय भट्ट बोलले - तो ठीक है हम इसे नाम देते है - "मीना कुमारी" .......
आणि मीना कुमारी .....मीना कुमारी होती....आणि ती आज पण मीना कुमारीच आहे.....
मीनाकुमारी म्हंटल ना कि लोकांना आठवतात, ते स्वर्णीम डायलॉग, ते चिरतरुण गाणी, संगीत, आणि तो सोनेरी इतिहास...यातून लोक आज हि बाहेर येऊ इच्छित नाही, त्यांना त्याच स्वप्नां मध्ये राहायला आवडतं...."गौरी" बैजूबावरा मध्ये जेंव्हा गाणं ऐकते
" तू गंगा कि मौज मै जमना कि धारा ,
हो के रहेगा मिलन , ये हमारा,
हो हमारा - तुम्हारा , रहेगा मिलन,
ये हमारा तुम्हारा ......हो जी हो......"
या गाण्यानंतर गौरी ज्या नावेत बसलेली असते ती आपसूक मागे येते, त्यात मीना कुमारी परकर पोलकं मध्ये दोन्ही गुढघे आपल्या पोटात घेऊन दोन्ही हाताने आपलाच चेहरा झाकलेल्या अवस्थेत बसलेली आहे, कारण सगळे तिच्याच कडे बघताये आणि तो सीन इतका जबरजस्त शूट केला आहे, आणि तो त्या काळी बहुप्रचलित सुद्धा झाला होता, बैजूबावरा गाण्यांनी तर प्रसिद्ध झालाच होता, पण तो सिनेमा मीना कुमारी नि सिनेमा आपल्या गळी उतरवला आणि स्वतःच्या खिश्यात सुद्धा; हे निर्विवाद होते.
वयाच्या चवथ्या वर्षी, बाल कलाकार म्हणून काम केलेली छोटीशी मुलगी, थोडी मोठी होताच, बेबी मीना आणि वयाच्या चवदाव्या वर्षी "मीना कुमारी" म्हणून नावलौकिक आली, सुरवाती च्या काळी, उर्दू इतकी सुस्पष्ट होती तरी तिने हिंदू धार्मिक म्हणजे हिंदू देवी किंवा राणी अश्या भूमिका केल्या व समीकरण हि जुळू लागले होते, याचं कारण हेच हि मीना कुमारी चे उर्दू आणि हिंदी चे अल्फाज ओघवते होते, तरल पाण्यासारखे वाहत होते, झरे होते झरे, आणि त्या शब्दांनी काळजावर चरे पडायचे चरे!!
त्या नंतरती मीना कुमारी व्यावसायिक चित्रपटात आली , त्या काळात मीना कुमारी हिची फी इतकी होती, तिने १९४० साली एका सिनेमाची फी म्हणून १०००० घेतले होते आणि हि सारी थेरं दिग्दर्शकाला पसंत पडत नसे, पण जर चित्रपट सृष्टीत राहायचे आहे, तर मीना कुमारी मुळे आपलं घोडं या दिमागात पाळणार नाही, हे सारेच जाणून होते, म्हणून ते सगळे मीना कुमारीच्या घराबाहेर वाट पाहायचे, याच्या नंतर फक्त राजेश खन्ना च्या वेळी हा स्टारडॅम पाहायला मिळाला होता, तर सारे शिलेदार पहारेदार मीनाकुमारीच्या घराच्या बाहेर "लायनीत" उभे असायचे.
फर्जंद ए वतन म्हणून पहिला चित्रपट बाल कलाकार म्हणून तिने केला, नेहेमीच होत प्रत्येकी बरोबर तेच हिच्या बरोबर झाले, तो सिनेमा अज्जीबात चालला नाही, असे बरेसे सिनेमात तिने सुरवातीला काम केले , आणि मग साल बाव्वन आला आणि आला “बैजूबावरा” आणि सगळीच गणित नव्याने मांडले गेले.
कमाल अमरोही ज्यांनी दादामुनी आणि मधुबाला हिला घेऊन एक सिनेमा बनवला "महल" यातच लता हिचं आयेगा आयेगा आयेगा आने वाला सुपर डुपर हिट गाणं होत, त्याने कमाल अमरोही ह्याला एका रात्रीतून हिट केलं. त्या नंतर त्यांनी परत मधुबालाला साइन केलं पुढच्या सिनेमात, पण मधुबालाच्या वडिलांचं आणि कमाल अमरोही यांचं वाजलं आणि कमाल अमरोही यांची मीना कुमारी ला साइन केलं पण एके वेळी मीना कुमारी आणि तिची धाकटी बहीण मधू महाबळेश्वर हुन येताना त्यांच्या कार चा अपघात झाला, मीनाकुमारीच्या हाताला मोठी दुखापत झाली आणि तिच्या डाव्या हाताच्या करंगळीला मीनाकुमारीचा साथ सोडावा लागला, त्या नंतर सगळेच हतबल झाले, जितक्या सिनेमात काम मिळाले होती ते सारे रखडले गेले, अनारकली हा सिनेमा सुद्धा गेला, आणि मीना कुमारी मुळे तिच्या समवयीन असणाऱ्या नट्याना काम मिळाले, पण आपल्या भाग्याशी जी पूर्ण पणे भांडली ती होती मीना कुमारी, ती पुन्हा उभी राहिली कमल अमरोही तिला अधून मधून भेटत होते इथूनच कमाल आणि मीना कुमारीचे सूत जुळू लागले, आणि , आणि इतक्या बखुबीनें - कौशल्याने प्रत्येक सिनेमात तिने तिच्या डाव्या हाताची करंगळी लपवली, लोकं अक्षरशः मरत होते तिची ; फक्त करंगळी बघण्यासाठी, ती तिने पाकिजात दुपट्टा ओढून लावपाळी, मै चूप रहुंगी मधे साडीच्या पदराने, तर दिल एक मंदिर मधे सतार (सतार का तंबोरा काही तरी होतं, दोनीही मधे तारा खाजवायच्या असतात , या बहुमोल माहिती ला सोडून मला त्यात कवडीचे ही ज्ञान नाहीं, अर्थातच माझ्या दुर्दैवाने) वाजवताना इतक्या बखुबीनें तिने आपली बोटं त्या तारे वर चालवली आणि चालाकी ने आपली करंगळी दाखवली नाहीं ती नाहीच आणि लता ने आणि मीना कुमारीने त्यात जीव ओतला, राजकुमार नुसता ठोंब्या सारखा बसून होता, आणि मीनाकुमारी पडद्या वर जीव ओततच सुटली होती –
"हम तेरे प्यार मी सारा आलम खो बैठे है,
तुम केहते कि ऐसे प्यार को भूल जाओ...."
संगीत हे तर मीना कुमारी च्या सिनेमाचं वैशिष्ट्य होतं, तिच्या भाग्याने तिला तसे गाणीं मिळाले, आणि ती ट्रॅजेडी क्वीन होतं गेली, दुःख, विवंचना , कारुण्य हे त्या काळी जर कोणी रुपेरी पडद्या वर साकारले तर ती म्हणजे फक्त आणि फक्त मीना कुमारी.
हिरो कितीही टुकार असला तरी आपल्या "दम" वर सिनेमा काढण्यात तिचा तर जुना हातखंडा होताच, तिच्या नशिबी प्रदीप कुमार, भारत भूषण सारखे ठोकले यावे याहून काय नशिबाची दुर्गती म्हणायची, बैजू बावरा मध्ये भारत भूषण आला, तसाच पुढे बहू बेगम मध्ये प्रदीप कुमार आला, साधी माशी हालत न्हवती यांच्या चेहऱ्याची आणि म्हणजे मीना कुमारी चा हिरो, मीना कुमारी ला मनातील इच्छा होती कि कुठला तरी सेन्सिटिव्ह रोल तिला मिळावा ज्यात दिलीप कुमार तिचा हिरो असे, पण तिची हि इच्छा अपुरीच राहिली, तशी ती आजाद मधे होती, ६० साली कोहिनूर आला (तोच ज्यात साप आणि मुंगूस ची लढाई होती, हे मला हि माहिती आहे, काय आहे कुठला हि सिनेमाचं नाव घेतले न कि आमचे टिकोजीराव आम्हाला असली बहुमोल माहिती देतच राहतात, त्या शिवाय त्यांची झालेली पुरणाची पोळी पचत नाही असा त्यांच्या समज आहे), पण कोहिनूर हा सिनेमा माझ्या मते दिलीप कुमार सारख्या हिरो साठी न्हवता, त्यात त्यानी छान काम केलं असं म्हणू शकू, पण दिलीप कुमार आणि मीना कुमारी म्हणजे "संजिदगी" हा भाव हवाच, आणि कोहिनूर पूर्ण पणाने विनोदाकडे झुकणारा माप, पण एक आहे हा सिनेमा म्हणजे त्या काळातील पर्वणी ठरला, दिलीप कुमार आणि मीना कुमारी तर होतेच पण यांच्या जोडीस होता नौशाद आणि म्हणून त्या सिनेमाच्या गाण्याने तर लोकांना मज्जाच आणून दिली, एक सुंदर कलाकृती म्हणजे-
" दो सितारो का जमी पर है मिलन आज कि रात....
आज कि रात,
मुस्कुराता है उम्मीदो का चमन आज कि रात......"
ज्या वर्षी "बैजू बावरा" आला, त्याच वर्षी मीना कुमारी ला सर्वोत्कृष्ट नटी म्हणून फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला, त्या नंतर मीना कुमारी ने मागे वळून नाही बघितले, त्या नंतर " एक रास्ता", "आरती" हीच आरती ज्यात मीना कुमारी ला हिरो म्हणून लाभले दादामुनी अशोक कुमार, ज्यांनी तिच्याच लहानपणी सांगितले कि "बेटा, तुम बडी हो जाओ फिर हम तुम्हारे हिरो बनेंगे" ज्यात एकाहून एक सरस गाणे होते - "कभी तो मिलेगी , कंही तो मिलेगी राहें किंवा आपने याद दिलाया तो मुझे याद आया, त्या नंतर आला शारदा राज कपूर बरोबर, परिणीता - अशोक कुमार. एक काळ तर असाच होता ज्यात एकूण तीन चित्रपटांसाठी फिल्मफेयर मधे एकाच नटी ची निवड केली आणि ती म्हणजे मीना कुमारी मै चूप रहुंगी, आरती आणि मीना कुमारीचा मास्टर स्ट्रोक " साहिब बीबी और गुलाम" आणि अर्थातच साहिब बीबी मधल्या छोट्या बहू ला तो अवॉर्ड मिळाला. यातील एक छोटा किस्सा आहे, तो असा कि या सिनेमा दरम्यान गुरुदत्त आणि वहिदा यांचे किस्से ऐकायला येत होते, त्यात वहिदाचं असं म्हणणे होते कि तिने छोटी बहू चा रोल करावा, पण गुरुदत्त मीना कुमारी ला घेऊ इच्छित होते, पण वहिदा हट्टाला पेटली, तरी गुरुदत्त यांनी तिला स्क्रीन टेस्ट द्यायला सांगितले, तिने एक संवाद बखुबी फेकला (कारण कितीही झालं तरी ती वहिदाचं होती) पण नंतर तिनेच तो शूट पहिला तर बोलली कि मला हा रोल इतक्या कमी वयात नाही जमणार तुम्ही मीनाला बोलवा, मैत्रीसाठी गुरुदत्त यांनी वहिदा साठी देखील नंतर यातच छोटासा रोल बनवला, पण मीनाकुमारी ने जो न्याय दिला "छोटी बहू" च्या रोल साठी. मीना कुमारी च्या उतरत्या काळात लोकांना असच वाटलं कि मीना कुमारी छोटी बहू चा रोल तिच्या रियल लाईफ मधे ही जगते आहे, मीनाकुमारीने तो रोल तिच्या वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी साकारला, आणि त्यातील गाणं –
"न जाओ सैय्या छुडा के बैय्या
कसम तुम्हारी मै रो पडुंगी, रो पडुंगी
मचल रहा है सुहाग मेरा
जो तुम न होंगे तो मै क्या करुंगी "….
- ये गाणं आज ही छोट्या छोट्या मुलांच्या तोंडी आहे, या हुन ज्यास्त काय यश अपेक्षित आहे.
या नंतर आला दिल आपण और प्रीत पराई - यात शैलेंद्र आणि हसरत जैपुरीने नुसता धुमाकूळ घातला होता, अक्षरशः वेड लावले लोकांनी या सिनेमाने आणि संगीताने, लता , रफी आणि आशा, मीना कुमारी - राजकुमार आणि हेलन सोबत खलनायकीचे भूमिकेत नादिरा- "अजीब दास्तान है ये ....कंहा सुरू कंहा खतम, ये मंजिल है कोनसी न वो समझ सके न हम...." किंवा "दिल अपना और प्रीत पराई किसने है ये रीत निभाई, आंधी ने एक दीप जलाया और पानीने है आग लगायी", मीनाकुमारीचा एक बहुचर्चित सिनेमा मला फारच आवडतो, एक तर तो पूर्ण "लखनौ" या शहरातील आहे, त्यात उर्दू अल्फाज मीनाकुमारी आणि अशोक कुमार ---सोबत (श्या) प्रदीप कुमार ( का का का घ्याचे याला हिच्या बरोबर) होतेच सिनेमा अर्थातच "बहू बेगम" - "हम इंतझार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे कि कयामत हो और तू आए" किंवा "दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे... यात साहिर यांनी तीन ओळी इतक्या सुंदर लिहिल्या आणि संगीतकार रोशन म्हणजे काय, त्यात साहिर म्हणतात कि "पूछे कोई दर्द ए वफा कोन दे गया, रातो को जागने कि सजा कोन दे गया, केहने पे हो मलाल तो हम क्या जवाब दे" या ओळी तंतोतंत मीनाकुमारीच्या खासगी आयुष्यातील वाटतात.
"दिल एक मंदिर" हा तामिळ सिनेमा " नैनजिळ और आलयाम" याचा रिमेक होता, यात मीनाकुमारी - राजकुमार आणि जुबली कुमार (राजेंद्र कुमार) ,मेहमूद , शंकर जयकिशन, हसरतजैपुरी आणि शैलेंद्र यांनी केलेला नुसता दंगा होता दंगा, राजेंद्र कुमार मीनाकुमारीशी प्रेम करत होता, मीनाकुमारीच लग्न राज कुमार शी झालेलं , राजेंद्र कुमार डॉक्टर , राज कुमार ला कॅंसर, आख्या ब्रह्माण्डात त्या जोडप्याला राजेंद्र कुमार शिवाय पर्याय न्हवता , मग ते त्याच्या कानपट्टीला बसले, तो बिचारा डॉक्टर पडला काय करणार , पण त्या काळातील सिनेमांचं हे वैशिष्ट्य होतं, जो पर्यंत आपल्या कुठे मुळे लोकांच्या डोक्याचा भुगा होतं नाही, त्यांच्या मेंदूला मुंग्या चावल्याचा भास होतं नाही, त्यांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही, तुम्ही बघा बहुबेगम (अशोक आणि प्रदीप कुमार), आरती (अशोक कुमार), गझल (सुनील दत्त), चित्रलेखा (अशोक कुमार), मै चूप रहुंगी (सुनील दत्त), मझली दीदी (धर्मेंद्र), दिल एक मंदिर (राज कुमार - राजेंद्र कुमार), भिगी रात (प्रदीप कुमार),पूर्णिमा (धर्मेंद्र), काजल (राज कुमार) आणि अशे बरेच...
"दायरा" हा कमाल अमरोही बरोबर काढताना त्यांच्या दोघात वितुष्ट आलं आणि कमाल यांनी मीनाकुमारीला तलाक दिला त्या वेळी ही मनाने शायर असलेली "नाझ" (मीना कुमारी "नाझ" म्हणून शायरी लिहायची) कमाल ला बोलली कि "तलाक तो दे रहे हो नजर ए कहर के साथ, जवानी भी मेरी लौटा दो मेहर के साथ" नंतर कधी तरी कमाल अमरोही पुन्हा मीनाकुमारी जवळ आला तो तिच्या मरणाच्या काळात. पण ज्या वेळी कमाल यांनी तिचा साथ सोडला त्या वेळी एक पंजाबी तरणा मुलगा तिच्या आयुष्यात आला आणि त्याच्या प्रेमाचे "चर्चे" रुपेरी पडद्या बाहेर ही गाजू लागले त्याच नाव होतं "धर्मेंद्र", जो तिच्या बरोबर काजल, पूर्णिमा , चंदन का पालना, मझली दीदी, प्रतिज्ञा, मै भी लडकी हूँ, बहारो कि मंजिल आणि सुप्रसिद्ध सिनेमा फुल और पत्थर आले, ओ. पी. रेलहान यात धर्मेंद्र च्या जागी सुनील दत्त ला घेणार होते , पण ते गणित काही सुटलं नाही, आणि शाकाच्या भूमिकेत धर्मेंद्र आला आणि शांतीदेवी च्या भूमिकेत आली मीनाकुमारी यात एकच डायलॉग खूप चर्चेत आला शांतीदेवी त्याला काही म्हणते तर तो लाकडी जिन्यावर एका हातात बंदूक घेऊन म्हणतो " शांती तुम नाही जानती ".
त्या नंतर तिने दारू हिला आपल्या जिव्हाळ्याचं केलं, तिने अक्षरशः डेटॉल च्या बाटल्यां मधे मद्य भरून ठेवले होते, साहिब बीबी और गुलाम मधल्या छोटी बहू ने खऱ्या खुऱ्या आयुष्यात डोकावू लागली होती. पण नंतर तिला धर्मेंद्र कडून देखील प्रेमभंग च झालं आणि ती अजूनच खचतच गेली.
नंतर एक सिनेमा किती तरी वर्ष पर्यंत रखडला गेला , आणि नंतर सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या दोघांनी मिळून कमाल अमरोही आणि मीना कुमारी याना समजावले कि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सिनेमा असा कात्रीत अडकवून ठेऊ नका, आणि सुनील दत्त दोघांचा मित्र असल्या मुळे, सुनील दत्त साठी दोघे पुन्हा तैयार झाले , एक आहे पण कि सुनील दत्त मुळे तुम्हा आम्हा एक सुंदर चित्रपट पाहायला मिळाला तो ज्याला तैयार व्हायला तब्बल सोळा (१६) वर्ष लागली, तो होता "पाकीजा", पाकीजा मधे जेव्हा मीनाकुमारी चलते चलते यु कोई मिल गया था या गाण्यात लोकं मीनाकुमारीचा चा डान्स आणि शेवटी ज्या वेळी ओळी येतात –
शब ए इंतझार आखिर कभी होगी मुक्तसर भी,
ए चिराग बुझ रहे है मेरे साथ जलते जलते…..
यात ज्या वेळी ओळ येते चिराग बुझ रहे है, त्या वेळी फक्त मीनाकुमारीचे डोळेच दाखवली, मोट्ठे पाणीदार डोळे आणि सहज अलगद ती त्यांना मिटून घेते आणि केमेरा हळू हळू सगळ्या दिव्यांकडे जातो, आणि एक एक "चिराग" इतक्या बखुबीनें विजतात, आणि फक्त अंधार होतो आणि नंतर ज्या वेळी जेव्हा कुऊऊऊऊऊऊउ अशी ट्रेन ची आवाज येते लोकांच्या चेहऱ्यावर आज ही स्मित उजाळ्याशिवाय राहत नाही, आणि नंतर फक्त पाण्याचे कारंजे दाखवतात; ही मीनाकुमारीची जादू आहे.
ज्या प्रकारे मीनाकुमारीला गाणीं एकाहून एक सुंदर , रसरशीत , सुरात भिजलेली , रागात मुसमुसलेली मिळाली तशीच तिला वैयक्तिक डायलाग एकाहून एक मिळाले, त्यातील काही अशे आहे - त्यात सर्वात ज्यास्त आहे अर्थातच पाकिजा मधील - त्या सिनेमाची सुरवात होते त्यात मीनाकुमारी पांघरूण घेऊन रेल्वेत झोपलेली आहे आणि राजकुमार ची एंट्री असते आणि तो एका कागदावर लिहून जातो, " आपके पाव देखे बोहोत हसीन है, इन्हे जमी पर मत उतारियेगा , मैले हो जायेंगे " , त्यात पुढे मीनाकुमारी बोलते-" हमारा बाजार एक कब्रिस्तान है औरतो का जिसमे रुह मर जाती है और जिस्म जिंदा राहते है",
"हमे अपना इलाज ए दर्द भी करना आता है , हम ऐसे जिने वाले है जिन्हें मरना भी आता है - बेनजीर,
"बुआ खिचडी नही पुलाव कहा करो, आखिर कुछ तो नवाबी शोक टपकने चाहिये खाने से- बहू बेगम".
"अफसोस कि लोग तो दूध से भी जल जाते है", आणि ज्या एका श्वासात मीनाकुमारी म्हणते ना "इस घर के इन्सानो को हर सांसो के बाद दुसरे साँस के लिये भी आपकी इजाजत लेनी पडती है" त्याला खरंच जवाब न्हवता.
दिल एक मंदिर है, न तो मंदिर से कोई मुरत हटायी जा सकती है, ना दिल मी बसी सूरत भुलाई जा सकती है, दिल अपना और प्रीत पराई मधील - " जिसे मरना नही आया, असे जिना नही आया" , देखकर आईंना हैरत हो गयी...मेरी सूरत उनकी सूरत हो गयी".
उतरत्या काळात एकदा मीनाकुमारीने मुमताज ला बोलावले आणि सांगितले कि माझ्या राहण्याची काही पण चिन्हे दिसत नाहीये, पण एकदा तुम्ही मला मदत केली होते, त्या वेळी माझ्या कडे काहीच न्हवते, आत्ताही माझ्या कडे काहीच नाहीये आठवणींशिवाय, माझा मुंबईचा एक बांगला आहे, ज्याची किंमत ३ लाख आहे, तो मी तुम्हाला देऊ इच्छित आहे, तुम्ही नही नका म्हणू, असा मुंबईचा तो बंगला मुमताज ला मिळाला.
वयाच्या चवथ्या वर्षी प्रवास सुरु झालेल्या मीनाकुमारीचं आयुष्य फारच खडतर होतं, तिने कदाचित इतके चटके सहन केले, यातना भोगल्या आणि ती फक्त ते रुपेरी पडद्या वर दाखवत होते, आम्हाला वाटत होतं कि ती काय लाजवाब अभिनय करते पण ती स्वतःलाच जगत होते आणि स्वतःच गणित सोडवत होती, काही कोडं तिच्याकडून ही सुटले नही आणि ते त्या विधात्याला ही सोडवता आले नही , हा दैवदुर्विलास अजून काहीच नाहीं, बंगाली, उर्दू, आणि हिंदी या भाषेचं प्रभुत्व असलेली ती स्त्री, सगळ्यात सिनेमातून तिने वेगवेगळ्या स्त्रीभूमिकांना उजागर केले, नवीन रेकार्ड प्रस्थापित केले, न मोडणारे रेकार्ड, स्टारडम पाहिलेली ती अतुलनीय स्त्री, नटी होती. आधी पैश्याची चणचण असल्यामुळे तिला अनाथाश्रमात राहावं लागलं, नंतर पुन्हा घरी आली, आर्थिक कुंचबणा इतकी कि इच्छा नसताना तिला सिनेमात यावं लागलं, हाताचा मोठा अपघात, नंतर कमाल अमरोही यांच्या शी थोडी जवळीक आणि मैलोन्मैल दुरावा, नंतर धर्मेंद्र यांच्या सोबत प्रेम प्रसंग, त्यातून ही प्रेम भंग, मग मद्य याला जवळ केलं, डॉक्टर ने सांगून दिले होते, कि जर आता मद्य प्यायला तर कायम च संपेल सगळं. नंतर दारुही सोडली पण खराब नशीब सुटतच न्हवतं, तिच्या लहान पणी ही पैसे न्हवते, ते तिच्या मरताना सुद्धा न्हवते.
दुःख, विवंचना, द्वेष, कारुण्य, दीनपणा, यात मीनाकुमारी इतकी घुस्मटली कि त्यातून तिला बाहेर निघता ही आले नाहीं, आणि हे सगळं सहन करता करता ३१ मार्च १९७२ ला मीनाकुमारीने या दुनियेतून रुक्सत केली, माझ्या मते ती स्त्री, नटी फक्त आणि फक्त सहन करायलाच जन्माला आली होती.
काही बहारदार गाणीं जी मीनाकुमारीच्या सिनेमात होती आपल्या साठी पेश आहे - दिल जो न केह सका, वोही राज ए दिल केहने कि रात आई है (भिगी रात), दवाखान्यातील बुजलेल्या खिडकीतून चंद्राकडे (आणि वेळ मिळाल्यास राज कुमार कडे) पाहत - रुक जा रात ठेहर जा रे चंदा, बिते न मिलन कि रैना (दिल एक मंदिर), हमसफर मेरे हमसफर पंख तुम परवाज हम (पूर्णिमा), मोहें भूल गये सावरिया (बैजू बावरा), रंग और नूर कि बारात किसे पेश करू (गझल), तोरा मन दर्पण केहलाये (काजल), छू लेने दो नाजूक औठो को कुछ और नही है जाम है ये (काजल), कभी तो मिलेगी, कंही तो मिलेगी राहे (आरती), ज्योती कलश छलके (भाभी कि चुडिया), हम इंतझार करेंगे तेरा कयामत तक (बहुबेगम), अजीब दास्तान है ए( दिल अपना और प्रीत पराई), हम तेरे प्यार मी सारा आलम खो बैठे है (दिल एक मंदिर), अपलॅम चपलॅम (आझाद), दूर कोई गाये (बैजू बावरा), मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन( काजल), उनसे नजरे मिली (गझल)
एक उत्कृष्ट शायर, अप्रतिम अभिनेत्री, शब्द प्रभुत्व असलेली , आयुष्यात फक्त ट्रॅजेडी बघणारी ट्रॅजेडी क्वीन - मीना कुमारी आज नही, पण शब्दात ही आज ही तमाम रसिकांच्या मनात आज ही अधिराज्य गाजवत आहे, ती सगळ्यात राहूनही वेगळी भासते हेच मीनाकुमारीचा वैशिष्ट आहे.
तिचाच शेर आहे -
"तुम क्या करोगे सून कर मेरे जिंदगी कि कहानी
बस लुफत किस्से है भिगे भिगे से "
तिच्याच गाण्यातील दोन ओळींनी मी सांगता करतो-
"हम इंतझार करेंगे तेरा कयामत तक , खुदा करे कि कयामत हो और तू आए
बिछाये शोख के सजदे वफा कि राहो मे , खडे है दीद कि हसरत लिये निगाहो मे
कबूल दिल कि इबादत हो , और तू आए, खुदा करे ही कयामत हो और तू आए"
मृणाल जोशी
#नवरात्रीतीलपहिलारंग#
#मीनाकुमारी#
२१.०९.२०१७
No comments:
Post a Comment