Thursday, October 11, 2018

अमिताभ _मानसी पटवर्धन

''अमिताभ बच्चन ''या नावाने अवघे बॉलीवूड व्यापून टाकले आहे."हिंदी सिनेसृष्टीचा सार्वभौम राजा",जणू "अभिनयाचा महासागर" ,"अंग्री यंग मेन" ,"बिग बी ","शहेनशहा" अशी कितीतरी बिरुदे सन्मानाने मिरविणारे सुपरस्टार म्हणजे ''अमिताभ बच्चन........''!!!!!!आज त्यांचा  जन्मदिन........!!!
त्यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा ......!!!!!!!

श्री हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचा सुपुत्र अमिताभ.......!!!!!त्यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला.ऐन विशीत असताना अभिनयात कारकीर्द करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले.प्रथम त्यांचा आवाज आणि उंची यामुळे चित्रपट सृष्टीत त्यांना नाकारण्यात आले.पण नंतर हाच भारदस्त आवाज घेऊन त्यांनी सिनेसृष्टी गाजविली आणि त्यांच्या अभिनयाने उत्तुंग उंची गाठली.त्यांचा आवाज आणि उंची हीच पुढे त्यांची बलस्थाने ठरली.

प्रसिद्ध दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांनी ''आनंद ''सिनेमातील डॉ.भास्कर चटर्जी या भूमिकेसाठी त्यांची निवड केली आणि अमिताभजींनी त्या भूमिकेचे सोने करून त्यांची निवड सार्थ ठरविली.सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासमोर बाबूमोशाय अमिताभ तसूभरही कमी पडले नाही.आपल्या संयत अभिनयाने त्यांची रसिकांची मने जिंकली.

''जंजीर ''......अमिताभजींच्या सिनेकारकीर्दीतील एक सोनेरी पान.......!!!!!!!!ज्याने त्यांना ''अंग्री यंग मेन ''च नवी इमेज दिली.........!!!!सलीम जावेद यांचे तडफदार संवाद,प्रकाश मेहरा यांचे उत्तम दिग्दर्शन आणि अमिताभजींचा जबरदस्त अभिनय यांनी एक नवे युग जन्मले.....!!!!!!

यानंतरच्या प्रत्येक चित्रपटाने त्यांनी यशाचा एक वेगळा अध्याय रचला.''मिली''मधील क्रोधी व प्रेमळ शेखर दयाळ'',चुपके चुपके'' मध्ये जयाबरोबर साकारलेला विनोदी "परिमल त्रिपाठी'',कभी कभी ''मधील रोमांटिक कवी,तर ''डॉन''मधील डेशिंग आगळा वेगळा डबल धमाका .............सारेच अविस्मरणीय........!!!!!!
''दिवार ''हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट.......!!!!यातील ''विजय वर्मा''ची भूमिका त्यांनी मोठ्या रुबाबात साकारली.तसेच ''शोले ''या त्यांच्या चित्रपटाने इतिहास घडविला..लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले.....!!!!!!"जय-विरू"ची दोस्ती अजरामर केली.रुपेरी पडदा दणाणून सोडला.''सिलसिला ''हा रेखाजी आणि अमिताभजी यांचा रोमांटिक चित्रपट......!!!!यातील गाणी,रोमान्स आजही रेशीमस्वप्नांची सैर करवितो... !!!!!अनेक स्वप्ने मनात फुलतात....!!!!

''कुली''या चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी झालेल्या जीवघेण्या अपघातातून केवळ देवाच्या कृपेने आणि लाखो चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे अमिताभ वाचले.''रिश्ते में तो हम सबके बाप लगते हैं,नाम हैं शहेनशहा ''अशा खुमासदार संवादांनी खर्जातील भारदस्त आवाजाने अमिताभ यांनी रुपेरी पडदा गाजविला."अग्निपथ" या चित्रपटातील ''विजय दीनानाथ चौहान''हि त्यांची भूमिकाही अविस्मरणीय आहे.

एबिसिएल च्या अपयशाने खचून न जाता अमिताभ यांनी पुन्हा गरुड भरारी घेतली आणि "कभी ख़ुशी कभी गम","कांटे","बागबान "या चित्रपटांनी जणू त्यांची दुसरी इनिंगच सुरु झाली.''सरकार ते सत्याग्रह" या चित्रपटांवर नजर टाकली तर अमिताभ यांची विशाल अभिनय कक्षा पाहून मन थक्क होते.

मोठ्या पडद्याप्रमाणेच छोटा पडदाही अमिताभ यांनी गाजविला.''कौन बनेगा करोडपतीच्या यशस्वी एन्करिंग ने आम जनतेला अमिताभजी अधिकच जवळचे वाटू लागले.या कार्यक्रमाची इतकी अफाट लोकप्रियता होती कि त्या वेळेत रस्ते ओस पडत असत.अगदी आताच्या ''युध''या अभिनय देव दिग्दर्शित मालिकेतील प्रमुख भूमिका त्यांनी अतिशय जोशात ,तरुणाला लाजवेल अशा उत्साहात साकारली.खरच त्यांच्या या असीम उत्साहापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.
वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अमिताभ यांनी अनेक चटके सहन केले,पण ते कधीही खचले नाहीत.......!!!त्यांनी खरे प्रेम केले ते केमेऱ्यावर.....!!!!!आपल्या भूमिकांवर.........!!

त्यांच्या "अग्निपथ" या सिनेमात त्यांचे वडील "हरिवंश राय बच्चन" यांच्या कवितेचा शीर्षक गीतासारखा करून घेतला आहे .या चित्रपटातील नायक विजय चौहानचे वडील लहानपणापासून त्याला ही कविता शिकवितात आणि त्याप्रमाणे वागण्याचे  संस्कार त्याच्यावर करतात.ती कविता पुढीलप्रमाणे-

अग्निपथ,अग्निपथ.अग्निपथ.....
वृक्ष हो भले खडे,
हो घने ,हो बडे,
एक पत्र छाह भी मांग मत मांग मत, मांग मत !
अग्निपथ ,अग्निपथ,अग्निपथ......!
तू न थकेगा कभी ,
तू न थमेगा कभी,
तू न मुडेगा कभी,कर शपथ,कर शपथ,कर शपथ!
अग्निपथ,अग्निपथ,अग्निपथ!
यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है,
अश्रू खेद रक्तसे लथ पथ, लथ पथ,लथ पथ!
अग्निपथ!अग्निपथ!अग्निपथ!

या चित्रपटाने अमिताभ यांना "राष्ट्रीय पुरस्कार" मिळवून दिला.बी .बी. सी.ने "सहस्त्रकातील अभिनेता" म्हणून गौरविलेला आणि "लंडन" येथील "मादाम तुसांच्या" वॅक्स म्युझियमने मेणाचा पुतळा करण्यासाठी निवडलेला ''करमणूक जगतातील पहिला भारतीय ''अशी कीर्ती संपादन केलेल्या अमिताभचा आज ७५वा वाढदिवस .........त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा गौरव शासनाने त्यांना ''पद्मश्री''आणि ''पद्मभूषण" देऊन केला आहे.

''अमिताभ बच्चन''....... हा बॉलीवूडचा जणू "तेजस्वी सूर्य" ....ज्याच्या अभिनयाच्या तेजाने हा रुपेरी पडदा नेहमीच झळाळत राहिला आणि राहील .......!!!!!अमिताभजी आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य व निरामय आरोग्य देवो......!!!!!!!!आपल्याला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा .......!!!!!जीवेत शरद: शतम्...!!!!

मानसी पटवर्धन

No comments:

Post a Comment