Friday, October 11, 2019

Amitabh

#अभिताबच्चन

लहानपणी जेव्हा फारसं उमजत नव्हतं तेव्हा हेच नाव बोलायचो मी! द ग्रेट अमिताभ बच्चन आज ७६ वर्षांचे पूर्ण होऊन ७७ व्या  वर्षांत पदार्पण करतांय!

काल ज्या शापित अप्सरेचा वाढदिवस होता ना त्या #देवयानी आणि हे #कच!

देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच! दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकायला येतांत, नकळतच देवयानी कचाच्या आणि कच देवयानींत गुरफटंत  जातांत! ईप्सित साध्य होतंय असं लक्षांत येतांच इंद्र आणि देवगुरु बृहस्पती कचाला कर्तव्याची जाणीव करुन देतांत. संजीवनी विद्या फक्त शुक्राचार्यांकडेच असते आणि कच लाडका शिष्य झालेला असतो, ह्मणूनच एक दिवस इतर शिष्य विष पाजुन कचाला मारतांत! त्याच्या कलेवराची राख मदिरेंत मिसळुन दैत्यगुरुंनाच प्राशन करवतांत!! कच मेलांय हे अंतर्ज्ञानानें शुक्राचार्यांना कळतं आणि त्याची अस्थीरक्षा आपल्यांच उदरांत आहे हे ही जाणवतं. इकडे देवयानी विलाप करत असते. कसंही करुन मला कच हवाच ह्या हट्टापुढे दैत्यगुरु हरतांत आणि लेकीला संजीवनी मंत्र शिकवतांत, संजीवनी मंत्राने ते कचाला जीवंत करुन; मरतांत! त्यांना देवयानी जीवंत करते आणि तेव्हाच कच तो मंत्र आत्मसात करतो!! कर्तव्य आणि प्रेम ह्यांत नेहमीच कर्तव्य वरचढ ठरतं आणि कच देवयानीला सोडुन इंद्रलोकांत परत जातो. देवयानी नंतर हस्तिनापूर नरेश ययातिंशी लग्न करते, पण तिचा जीव कचांतच असतो आणि ययातिंना शर्मिष्ठेपासुनचा पुत्र; वारस होतो. ही कथा किती खरी किती खोटी खरंच माहित नाही पण काल आणि आज ज्या दोघांचा वाढदिवस आहे ना त्यांची कथा ह्याहून फारशी वेगळी नाही.

एक गंगाकिनारेंवाला छोरा! दिग्गज गडगंज श्रीमंत लेखकाचा मुलगा रेडियोला मुलाखत देतो आणि आवाज चांगला नाही ह्मणून निवड होत नाही. घोड्यासारखा निमुळता चेहरा, हस्की आवाज, लंबुटांग वगैरे हिणवला जातो. मग त्यांच्या आयुष्यांत देवयानी रुपी रेखा येतांत आणि त्यांना ह्या आणि ह्यांना ते सावरतांत. दोघांची कारकिर्द दो अंजानें ह्मणत सिलसिला सुरु होतो, स्थिरावते आणि सुसाट धावत असतांना कचाला बृहस्पतींनी सांगावं तसं तिचा #मंगळ_वक्री आहे ह्मणून त्यांचे लेखक पिता तिला सोडुन अभिनय क्षेत्रांतल्यांच जया भादुरीशी लग्न करांयला सांगतांत. आणि जिच्यासोबत कारकीर्द आणि आयुष्य फुलवायचं असतं तिला टाकुन कचासारखे हे ही पुढे जातांत ती देवयानीसारखीच त्याची वाट पाहत जगत राहते, कित्येक ययाति तिच्या आयुष्यांत आले-गेले पण #कच_तो_एकच! ह्मटलं ना प्रेम आणि कर्तव्य ह्यांत प्रेम हरतं आणि श्रेष्ठ ठरतं ते कर्तव्यच!

ज्यांच्या पासुन अभिनय सुरु होतो असे एकमेव अभिनयाचे शाहों के शाह शेहनशाह अमिताभ बच्चन! खूप सोसलंय ह्यांनी पण त्यांची नम्रता, मार्दव आणि ते अस्खलित हिंदी बोलणं, संवादफेक, अभिनय नेहमीच वरचढ ठरतं. १९९६ साली लाईटबिल थकलंय ह्मणून वीज कापलीं होती जलस्याची! प्राण साहेबांनी मदत केली २ लाखांची; ज्यांच्या कधीकाळी #बरखुरदार नये आयें हो इस पुलिसथानें में ह्या अजरामर डॉयलॉगमुळे बच्चनसाहेबांची कारकिर्द तरली होती त्यांनीच आज तारलं होतं! बीआयएफआर नें एबीसीएल दिवाळखोर जाहीर केली, लोकांची देणीं केबीसीतुन फेडलींत ह्यांनी.
ज्या यश चोप्रांच्या सिलसिलामुळे सगळ्या प्रेमकहाणीवर शिक्कामोर्तब झालेलं त्यांच्याकडे माझ्यासाठी एखादं पिक्चर करा ह्मणायची वेळही ह्या दिग्गजांवर येऊन गेलींय. हीरो ह्मणून आपण आता चालणं अशक्य आहे हे मृत्युदाताच्या अपयशानें लक्षांत येतांच ऐश्वर्याच्या वडिलांच्या भुमिकेंत ह्यांनी सेकंड इनिंग सुरु केली आणि हे अभिनयाचे ही  बाप आहेत ह्यावर शिक्कामोर्तब केलं!

सुरेखापुणेकर ज्या वर्षी लावणी सम्राज्ञी झाल्या तेव्हा हे ही तिथे हजर होते आणि ह्यांनी त्यांचं कौतुक करतांना ह्मटलेलं, "सुरेखाजी आप लावणी की अमिताभ बच्चन है!" अभिनयांचे अमिताभ बच्चन ही टॉपमोस्ट उपमा प्रत्येक क्षेत्रांत टॉपमोस्ट होणाऱ्याला देणं सुरु झालं ते इथुन! रविकिशन, भोजपूरी चित्रपटांतला अमिताभ बच्चन ह्मणतांत त्याला! (कोण रविकिशन हे नसेल आठवत तर तेरे नाम पिक्चर आलं होतं त्यांत भूमिका चावलांचं लग्न ज्या पंड्याशी होणार असतं तो अभिनेता, रविकिशन!)
हिमालय! कसं वारा, ऊन, पाऊस, वादळ, पूर प्रखर ऊन सारं सहन करुनही हिमालयच राहतो तसं हे आहेत!

#केबीसी ह्या कार्यक्रमामुळें  ते मला जास्त आवडतांत! त्यांचं ते डाव्या हातांवर उजव्या हातांनं स्टायलिश टाळी वाजवत देवीयों और सज्जनों तालीयॉं बजतीं रेहनी चाहिये, लेडी कंटेस्टंट ला हॉटसीटवर अदबीनं बसवणं, देवीजीं क्या करेंगी अब आप, भाईंसाहब कैसे जवाब देंगे इस सवाल का?  वगैरे, हजरजबाबी उत्तर देणं, ते भारी ब्लेजर्स, शॉल, जोधपूरी सुटस्, कुर्ते, शेरवानी, शू, कोल्हापूरी चप्पल, जूतीं, मोजडी हे सग्गळं कॅरी करणं शिकावं तर फक्त ह्यांच्याच कडुन!

कधीकाळी ह्यांच्या नावांला झळाळीं नव्हती ह्मणून लतादिदींनी सिलसिलांतलं नीला आसमॉं सोबत रेकॉर्ड नव्हतं केलं ह्मणतांत त्यांच लता दिदी नंतर ह्यांच्या तारखा ॲडजस्ट करुन कॉन्सर्ट डिजाईन करायच्या! No Name to Fame ह्याचं बेस्टेस्ट उदाहरण ह्मणजे बच्चन साहेब! हे आणि असं बरंच काही सगळ शांतपणे सहन करुनही डोक्यांत नावाच्या वलयांची हवा न गेलेले अभिनेता ह्मणजे #बच्चनसाब!!

अमीन सयानी!  बिनाका गीतमालाचें उद्घोषक, जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरांवर होते तेव्हा त्यांना भेटायला एक  मुलगा यायचा, त्यांच्या सेक्रेटरी रोजी सांगायच्या अजुन सहा महिने तरी काही अपॉईंटमेंट नाहीये. तो मुलगा आल्यापावलीं परत जायचा, पुन्हा सहा महिन्यांनी यायचा, त्या सयानी साहेबांना सांगायच्या, ते विचारायचे अपॉईंटमेंट देणं जमलं तर तसं पहा नाही तर नंतर बोलाव! तो पोरगा परत जायचा. पाचव्यांदा तो मुलगा आला तर रोजी जींना दया आली त्यांनी सयानी साहेबांना विनंती केली की एकदा भेटा तरी त्याला पण सयानी साहेब नाही भेटले कारण अपॉईंटमेंट नव्हती. काही महिन्यांनी सयानी साहेब त्याच्या बेगमसाहिबा आणि रोजी जी एक पिक्चर पहायला गेले आणि रोजी जी हीरोला पाहतांच बोलल्या साहेब हाच तो मुलगा जो आपल्याकडे काम मागांयला येत होता, अमिताभ बच्चन आणि ते पिक्चर होतं #सात_हिंदुस्थानी! आणि तद्नंतर घडला तो फक्त ईतिहासच!!!

No comments:

Post a Comment