‘कुलभुषण पंडीत’ नावाचा बलुचिस्तानातून मुंबईत येत पोलीस अधिकारी झालेला काश्मिरी पंडीत युवक एक दिवस बाॅलीवूडमध्ये आघाडीचा हिरो होतो ही काही कल्पित कथा नाही..हि जिवंतपणीच दंतकथा झालेल्या ‘राजकुमार’ नावाच्या नायकाची रिअल लाईफ स्टोरी आहे..
डोक्यानं सणकी,तोंडानं फटकळ,स्वभावानं उद्धट आणि असंख्य तेवर असलेल्या या मणुष्याचे हे दुर्गुणच त्याचं ‘राजकुमार’ असल्याचं गुपित होते..पन्नास पंचावन्न किलो वजनाचा हा हिरो आपल्याच स्टाईलनं आणि कन्विक्शननं व्हिलनचा असा काही अपमान करायचा की तो बिचारा तिथंच गळपटायचा..’वक्त’मध्ये मदन पुरीनं नुसता चाकू हातात घेण्याचा उशीर,त्याच्या हातातून चाकू घेऊन फेकून देत ‘पागल मत बनो बलवीर,ये चाकू हैं बच्चो के खेलने की चिज नहीं’ म्हणत शाळकरी मुलाला पिटाळावं तसं हाकलून देतो..प्रलयनाथ गुंडास्वामीला संपूर्ण सिनेमाभर गेंडास्वामी म्हणत वर मिसाईलचे फ्युज कंडक्टर ‘खुंटीवरून पळवलेल्या चाव्या खिश्यात घेऊन फिरत त्या फेकून द्याव्या’ असं फक्त राजकुमारच करू शकतो😅
बरं राजकुमार खाजगी आयुष्यात हिच ‘अकड’ घेऊन बेपर्वा जगला..ज्या ‘जंजीर’मुळं ‘अमिताभ बच्चन’ नावाचा कल्ट बनला त्या सिनेमाची पहिली चाॅईस राजकुमार होता पण दिग्दर्शक प्रकाश मेहरा स्क्रिप्ट घेऊन गेला असता त्यानं डोक्यावर लावलेल्या तेलाच्या वासामुळं ‘हम तुम्हारे बिजनौरी तेल की बदबू बर्दाश्त नहीं कर सकते फिल्म तो बहोत दूर’ म्हणत परत पिटाळलं..रेस्ट इज हिस्ट्री...
एका पार्टीत हॅंडसम धर्मेंद्र लोकांच्या नजरा खेचत होता ते बघून “आजकल के हिरो हिरो कम और पहलवान ज्यादा लगते हैं.”म्हणत खो खो हसला होता..नंतर मारामारी टाळतांना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली😅
रामानंद सागर एकदा ‘आॅंखे’ नावाच्या सिनेमाची स्क्रिप्ट
घेऊन राजकुमारकडं गेले आणि त्यांनी या सिनेमाचा दुसरा हिरो धर्मेंद्र असल्याची माहिती दिली..राजकुमारनं लगेच आपल्या पाळीव कुत्र्याला बोलावत त्याला ‘जानी तुम ये फिल्म करोगे?’म्हणत विचारणा केली कुत्रा काहीच बोलला नाही...’देखो ये फिल्म तो हमारा कुत्ता भी नहीं करना चाहता,हम क्या खाक करेंगे’ म्हणत सिनेमात काम करायला नकार दिला..आता बोला!
या माणसाच्या वात्रटपणाचा कळस म्हणजे तो कुणालाच नावानं हाक नाही मारायचा..जितेंद्रला धर्मेंद्र,धर्मेंद्रला राजेंद्र आणि राजेंद्रला जितेंद्र म्हणायचा
स्पष्टीकरण काय तर? “जितेंदर,धरमिंदर,राजिंदर हो या
बंदर हमें क्या फर्क पड़ता है? राजकुमार के लिए सब सेम हैं😅
झिनत अमाननं बरेच ग्लॅमरस रोल केले,अनेक हिट सिनेमाचा ती भाग होती पण एका पार्टीत राजकुमारनं तिला “जानी,शक्ल-सूरत से तो माशाअल्लाह लगती हो,फिल्मों में ट्राई क्यों नहीं करती?”असा सल्ला देऊन टाकला होता😅
आता हा ‘ह्युमर होता की खोचकपणा?’ पण एकदा ज्वेलरी बघून बप्पी लाहिरीला राजकुमारनं “वाह, शानदार..एक से एक गहने,बस मंगलसूत्र की कमी रह गई है.” अशी काॅम्प्लिमेंट देऊन टाकली होती😅
‘जंगबाज’ नावाच्या सिनेमाच्या सेटवर सहकलाकार गोविंदा नेहमीप्रमाणं उशीरा आणि रंगबेरंगी कपडे घालून गेला..वात्रट राजकुमार गोविंदाच्या शर्टची आपल्या स्टाईलनं स्तुती करू लागला,”माशाअल्ला क्या शर्ट हैं वा वा...” गोविंदा महावात्रट..त्यानं लागलीच शर्ट काढला आणि ‘रख लिजिए’ म्हणत राजकुमारला देऊन टाकला
दुसऱ्या दिवशी सेटवर राजकुमार त्या शर्टाच्या फाडलेल्या तुकड्यानं नाक पुसत होता हा भाग वेगळा😅
मला तर कधी कधी शंका येते हा मणुष्य मुळचा नक्की बलुचिस्तानचा होता की पुण्याचा😅
हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे आज ८ आॅक्टोबर..
राजकुमारचा जन्मदिवस..
वक्त,हमराज,नीलकमल,पाकीजा,बुलंदी माझे पर्सनल फेव्हरेट सिनेमे..
हिरो येतील जातील पण राजकुमार होणे नाही.
#By Pradyavant
LlllllllllllLllllllllllllllllllllll
#CinemaGully
'फिल्म इंडस्ट्री आजकल हमारी जुतों की खाती है.!'
समूह वर कृपा देशपांडे ताई ची राजकुमार ची माहितीप्रद पोस्ट आहे ..
'फिल्म इंडस्ट्री आजकल हमारी जुतों की खाती है.!'अशी गर्वोक्ती करणारा पूर्वीचा अभिनेता कोण होता?.सांगा बघू!!.. ' हमराज. चित्रपटातील तो रहस्यमय क्लोज- अप.. पांढऱ्या शूज (बूट) घातलेला आठवा..
लहानपणी मी एकट्याने आयुष्यातला प्रथम सिनेमा राजकुमारचा पहिला होता 'फुल बने अंगारे..आजही माझ्या लक्ष्यात राहिला आहे. ते गाणे 'चांद आहे भरेगा, फुल दिल थाम लेंगे.. हूशन कि बात चाली तो.. सब तेरा नाम लेंगे..' विसरता येत नाही.राजकुमार अगदी पहिला माझा हिरो होता आणि हो.. लग्न नंतर आम्ही दोघांनी प्रथम पाहिलेला चित्रपट ही राजकुमारचा होता 'मरते दम तक '
राजकुमाराने रुपेरी पडद्या वरून एक्झिट मारली ते सर्व ज्ञात होते ..पण या जगातून ही एक्झिट घेतली ती बातमीच मुळी पत्रकारांना आणि बॉलीवूडला उशिरा मिळाली होती..म्हणजे सर्व काही आटोपल्या नंतर ... पत्रकार थोबाडात मारल्या सारखे झाले होते.धावत पळत "जानी"च्या घरी पोहोचले पण तेथे ही शुक शुकाट....कोणी धड माहिती देई ना...मग आता!!.. बाईट तर हवे होते....मरता क्या न करता??.. सरळ स्मशानात पोचले .
.तेथेही स्मशान शांतता..कोणाल विचारणार आणि कोणाचे फोटो घेणार.काहीच पेपरात छाप्न्या सारखे हाती लागत नव्हते, शेवटी तेही हाडाचे पत्रकार होते. केमेरे रोखले कोणा वर ? तर जानी राजकुमारचे पार्थिव चे अग्नी संस्कार ची व्यवस्था पाहणार्या स्मशानातल्या अशिक्षित पोरसवदा तरूणा वर...पत्रकाराने माईक त्या पुढे करून विचारले होते." कल आपने अग्नी संस्कार किया ..वो कौन थे आप जाणते हो??त्या मुलाने खांदे उडवीत सांगितले."''साब' अब हम को क्या मालूम?? यहा तो रोज कितने आते हे!!'....( ही मुलाखात मी टीवी वर बघितली होती)..
मधर इंडिया - मेहबूब खान यांनी अगदी परफ़ेकत ( टेलरमेड) पण छोटीसी भूमिका राजकुमाराला दिली होती.काही सुरुवातीच्या दृश्यात तो येतो आणि नंतर चित्रपट पूर्ण होई पर्यंत प्रेक्षकांना वाटते ..कदाचित तो परत येईल ... यातच सर्व काही आले कि तो राजकुमार होता.
फिल्म जगतात स्टाईल ( छटा हा शब्द) प्रचलित करणारे मात्र दोन अभिनेते एक राजकुमार आणि दुसरे शशीकपूर. मनात येईल ते बोलण्याची आणि खुमारी हे त्यांचे स्वभाव होताच. क्षणाचा हि विलंब न लावता समोरच्याला झाडून टाकायचा स्टाईल लोकांना खूप आवडायची (आठ्व 'वक्त' मधला तो सिन ..मदन पुरीच्या हातातला चाकू सहजपणे काढून घेत अगदी थंड पणे मारलेला डायलॉग .. ये बचोके के खेलणे कि चीज नही, लग जय तो खून निकाल आता है.' हाच संवाद इतर कुणी हिरो बोलतोय असा विचार करा. लगेच राजकुमाराची किंमत समजेल.
राजकुमार इतर हिरो सारखा चालू माणूस नव्हता.आपल्या आणि आपल्या परिवारा भोवती एक गूढ रहस्य वलये असलेला प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा मालक होता. लोकाना,पत्रकारांना त्याने नेहमी आपल्या आणि परिवारा पासून दूर ठेवले होते, इतके कि त्याच्या पत्नीचे नाव आज देखील बहुतेकांना नाहीत नाही. ( राजकुमाराने १९६० साली इंग्लो इंडियन एर- होस्टेस जेनीफर बरोबर लग्न केले होते. नंतर तिचे हिंदू नामकरण गायत्री केले होते).
बी आर चोपडाच्या "दिल एक मन्दिर"नंतर तो लोकांचा 'जानी' झाला आणि "वक्त"आणि ' हमराज ' नंतर तर राजकुमार वर पागल झाले. डान्स,गाणे हा आपला प्रदेश नाही हे त्याने बरोबर ओळखून शक्यतो वर कधी त्या भानगडीत पडला नाही. पर्सनालिटी च अशी होती की त्याला गर्दीत कुठे ही उभे करा...तुमचे लक्ष त्याच्या कडे च जाणार...जानी राजकुमार गळया ला मफलर अथवा पायात पांढरे शूज हमखास घातल्या शिवाय शॉट देत नसे. दिग्दर्शकाला त्याच्या साठी चार पांढरे शूज जोड राखीव ठेवावे लागत असे..हे सर्व बाबी त्यांच्या साठी 'लकी' आहेत अशी त्यांची अंधश्रद्धा ( श्रद्धा) असायची..
राजकुमारच्या व्यक्तिगत जीवना विषयी अधिक माहिती तो मरे पर्यंत कोणाला नाही. शोधा शोध करून एवढीच माहिती मिळते की बलुचिस्तान मधील लोरालाई गावी ८ ओक्टो.१९२६ रोजी मूळ नाव 'कुलभूषण पंडित ' चा जन्म झाला होता. मुंबईत तो सब इन्स्पेक्टर म्हणून पोलिस दलात नोकरी करीत होता.
मीना कुमारी सहित बर्याच अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडण्यास आतुर होत्या.पण' जानी सा'ब' ने किसी को घास नाही डाली. शुटींग च्या वेळी हा इझी चर वर आराम करीत पुस्तक वाचीत असायचा. कोणाही अभिनेत्री ची त्याच्या जवळ जाण्याची हिम्मत नसायची...भीती ही.. की न जाणो ..अपमान केला तर..धाक इतका की ..हाय !! हल्लो!! करायचा असेल तर दोन वेळा विचार करावा लागे.
शुटींग मध्ये गेप आला की, राजकुमार 'साब' इतरान प्रमाणे मेकप रूम मध्ये किंवा नव्यां मुली बरोबर गप्पामारीत कधीच दिसणार नाही...हा समरसेट मोम,मोम्पासा,शेक्सपियर अथवा बर्ट्रांड रसेल वाचीत बसलेला असणार.
मागील अवस्थेत गळ्याच्या कर्क रोगाने राजकुमार अगदी बेड वर असायचा. त्याची तीन मुले.. पुरू, पाणिनी आणि मुलगी वास्तविकता.. मुलगा पुरूने क्रोएशियन मॉडेल क्रौयालिक ग्रेडक बरोबर लग्न केले आहे " ब्रह्मचारी" नावच्या एका चित्रपटात हिरो म्हणून आला आणि नंतर तोही विस्मुर्तीत गेला.राजकुमार ने ३ जुलै १९९६ रोजी हॉजकिंस लिम्फोमा ' नावाच्या आजार मुळे गुपचूप या जगाचा निरोप घेतला.
- ननावरे वामनराव
Xxxxxxxxcccccxxxxxxx
जिनके घर शिशेके होते है…..:
बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताे चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.
या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.
एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही.दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये.
मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपअसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय असा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले.
या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत. मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.
भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.
चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत.
१९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर”मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.
८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला.
चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही.
राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही.…….आज त्यांचा जन्म दिवस.
-दासू भगत (८ ऑक्टोबर)
#CinemaGally
सर्व मित्रानां दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
Zzzzzzzzzzzz
#CinemaGully
#kripa
#राजकुमार
आज 8 ऑक्टोबर! राज कुमार यांचा जन्मदिन!
🌺🌺🌺
मूडी , सणकी, घमेंडी, फटकळ अशी शेलकी ज्याला तंतोतंत लागू होतात पण भारदस्त आवाज, विशिष्ट प्रकारची संवाद फेक, बोलायचा खास अंदाज,हजर जबाबी असेही ज्याच्या बद्दल बोलले जाते असं अजब रसायन म्हणजे कुलभूषण पंडीत उर्फ राजकुमार!
The most stylish person in Hindi film Industry! नाव राजकुमार पण जेवढा काळ चित्रपट सृष्टीत होता एखाद्या बादशहाप्रमाणे वावरला.
राजकुमारचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६
रोजी, बलुचिस्तान प्रांतातला. साधारण ४० च्या दशकात मुंबईत येऊन मुंबई पोलिसात नोकरी पत्करली. ६ फूट उंची, देखणा रुबाबदार चेहेरा, भारदस्त बोलणे त्यामुळे त्यांची समोरच्यावर छाप पडे. राजकुमारना खरं तर चित्रपटाचा शौकही नव्हता आणि त्यांनी एकही चित्रपट पाहिला नव्हता. पण त्यांच्या मित्रांना खात्री होती कि त्यांना हिंदीफिल्म इंडस्ट्री मध्ये नक्की यश मिळेल.
त्यांच्या मित्रांपैकी एकाने त्यांचे काही निवडक फोटो एका चित्रपट निर्मात्याला पाठवले. तसेच ते ज्या माहीम पोलीस स्टेशनला होते तिथे फिल्मी लोकांची बरीच ये जा होती. निर्माते बलदेव दुबे ह्यांनी राजकुमारना पहिली ऑफर दिली. १९५२ साली आलेला "रंगीली" हा त्यांचा पहिला चित्रपट! नायिका होती रेहाना! त्यानंतर आलेले घमंडी,आबशर,कृष्ण सुदामा अजिबात चालले नाहीत.
१९५७ साली आलेला सोहराब मोदींचा *नौशेरवाने आदिल* आणि मेहेबूबखान यांचा *मदर इंडिया* या दोन चित्रपटांनी त्यांना नांव मिळाले. पहिला चित्रपट इराणच्या सुलतानाच्या जीवनावर होता तर मदर इंडिया या मातीतला! नर्गिस च्या मजबूर, गरीब, शेतकरी पतीची भूमिका त्यांनी केलीय . खरं तर बापाच्या आणि मुलाच्या दोन्ही भूमिके साठी मेहेबूबखान यांना दिलिप कुमार हवे होते पण जी प्रथम पत्नी असेल त्या नर्गिसला आणि नंतर आई कसे म्हणू? असं म्हणून ती भूमिका नाकारली. त्यामुळे त्याजागी राजकुमार आणि सुनिल दत्तची वर्णी लागली.
१९५९ साली दक्षिणेतील प्रसिध्द निर्माते "एस एस वासन" ह्यांचा *पैगाम* या चित्र पटात दिलिप कुमारच्या मोठया भावाची भूमिका मिळाली. चित्रपट चांगलाच चालला. त्यानंतर मीनाकुमारी, किशोर कुमार बरोबर *शरारत* आणि शम्मी कपूर मालासिन्हा बरोबर थोडी निगेटीव्ह शेड असलेला *उजाला* हा चित्रपटही हीट झाला. *दिल अपना प्रीत पराई* मध्ये एक विवाहीत डॉक्टर आणि नर्सची प्रेमकहाणी आहे . *घराना* ह्या कौटुंबिक चित्रपटानंतर *दिल एक मंदीर* मध्ये एका कॅन्सर पेशंट च्या भूमिकेला Best Suppoeting actor हे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. *फूल वने अंगारे* मध्ये राजकुमारनी रुबाबदार आर्मी ऑफिसर साकारला तर *वक्त* मधे सुनिल दत्तचा हरवलेला मोठा भाऊ (सोफॅस्टिकेटेड थिफ "राजा") जो कुप्रसिध्द गुंड चिनॉय सेठ साठी काम करत असतो. ह्यातला #चिनॉय सेठ जिनके घर शीशेके हो खुद्द दुसरों पे पत्थर नहीं फेका करते" हा डायलॉग तेव्हा खूपच गाजला.
त्यानंतर मीनाकुमारी धर्मेंद्र आणि पद्मिनी बरोबर *काजल*, जितेंद्र, माला सिन्हा बरोबरचा *मेरे हुजुर*, वहिदा रेहेमान, मनोजकुमार बरोबरचा *नीलकमल* हा चित्रपट ज्यात वहिदा रेहेमानचा डबल रोल आहे . तिचा पूर्वजन्मीचा मूर्तिकार "चित्रसेनची" भूमिका राजकुमारने केली आहे. त्यांचे जास्तीत जास्त चित्रपट हे मल्टिस्टारर आहेत.
चेतन आनंद हे राजकुमारचे सगळ्यात जवळचे मित्र होते. पंजाबी कवी वारीस शहा लिखित एका "अमर प्रेमकहाणी" वर या महाकाव्या वर हा *हिर रांझा* हा चित्रपट आला. नायिका प्रिया राजवंश सोडली तर बाकी सर्व काही सुंदर! त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे "फिल्मफेअर"याला मिळाले. याचे संगीत मदन मोहन यांचे होते.
१९७१ सालचा एफ सी मेहेरा यांच्या *लाल पत्थर* मध्ये राजकुमार बरोबरच राखी, हेमामालिनी आणि विनोद मेहेरा ह्यांचाही अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्याचवर्षी आलेला राजेश खन्ना, माला सिन्हा सह *मर्यादा* हे चित्रपटही गाजले
१९७२ साली आलेला "पाकिझा"...एक
बेहेतरीन चित्रपट! "आपके पाव देखे, बहुत हंसीन हैं। इन्हे जमीनपर मत उतारिएगा। मैले हो जाएंगे" हा त्यांचा संवाद कोण विसरेल?
१९७३ मध्ये पुन्हा चेतन आनंदचा "इन्डो पाक" युध्दावर आधारीत चित्रपट *हिंदुस्तान की कसम* मधे राजकुमारनी त्यांना साजेशी एअरफोर्स भधील पायलटची भूमिका केली आहे, ह्यातही चेतन आनंदची फेवरीट प्रिया राजवंश आहे जिला अभिनय कशाशी खातात हे माहित नव्हतं. राज तिलक यांचा सस्पेन्स थ्रिलर "३६ घंटे जो अमेरिकन मूव्ही "The Desperare hours" वरुन घेतलेला होता.
*बुलंदी* अजून एक क्राईमथ्रिलर, ड्रामा! ज्यात राजकुमारची भन्नाट डायलॉग बाजी होती. बरोबर डॅनी, आशा पारेख! याशिवाय *चंबल की कसम* *सूर्या* *मरते दम तक*, *कुदरत*, *राजतिलक* *एक नई पहेली*, *शरारा*, *गलियोंका बादशहा* हे चित्रपट पण चालले. नंतर बरोबर ३२ वर्षांनी दोन लेजंडस ना एकत्र आणले तो चित्रपट म्हणजे सुभाष घईंचा *सौदागर*
दिलिपकुमार आणि राजकुमार दोघांनाही
एकत्र आणायचं म्हणजे कर्मकठीण काम!सुभाषजींनी पहिलं राजकुमारना साईन केलं. साहजिकच दुसर्याही तेवढ्याच महत्वाच्या भूमिकेत कोण घेणार असं विचारल्यावर सुभाषजी डिप्लोमॅटिकली उत्तरले, "अगर आप कहे तो दिलीपसाब को ले लूं? राजकुमारनी काहीच हरकत घेतली नाही आणी महत्वाचं म्हणजे या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन लेजंडस पुन्हा चांगले मित्र झाले. ह्यातला #हम खैरात नहीं लेते वीरसिंग! हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे! मगर वो बंदूक भी हमारी होगी, गोलीभी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा.. हा डायलॉग कोण विसरेल??
या इंडस्ट्रीत राजकुमारचे फारच कमी जणांशी सूर जुळले. त्यातले एक म्हणजे नाना पाटेकर! "तिरंगा" च्या वेळी काहीही अडचण न येता अर्धअधिक शूटिंग झाल्यावर राजकुमारच्या मनात आलं नानाचा रोल आपण करावा. निर्माते मेहूलकुमारना धडकीच भरली कारण नानांचा स्वभावही ते जाणून होते. पण नानांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे बरं झालं कि राजकुमारना च वाटले आपण नानाच्या रोलमध्ये शोभणार नाही आणि चित्रपट दुसरी कोणती अडचण न येता चित्रपट पूर्ण झाला. या आनंदा प्रित्यर्थ त्या दोघांचे पार्टीचे गाणे "पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी " नंतर घातलं जे सुरुवातीला नव्हतं!
राजकुमार यांचे जसे संवाद प्रसिध्दआहेत तसेच सनकी पणाचे किस्सेही प्रसिध्द आहेत. एक किस्सा असा आहे कि राजकुमार ड्रिंक्स सुरु झाली की कोट काढून खांद्यावर घेत. एका पार्टीत कोपर्यात अमिताभ बच्चनला उभे पाहून त्यांनी वेटरला सांगीतले जानीsss उस लंबू को यहां बुलाओ तो, हमें अपना कोट खूंटेसे टंगना है! किंवा एकदा एका पार्टीत भप्पीदांना इतके सारे दागिने घातलेले बघून म्हटले, जानीsss इतने सारे जेवर तो तुमने पहन लिये अब सिर्फ मंगलसूत्र बाकी है!
राजकपूरने "मेरा नाम जोकर ह्या त्यांच्या महत्वाच्या मल्टीस्टारर चित्रपटात राजकुमारला काम करण्यास विचारले असता मैं मनोज कुमार और धर्मेंद्र जैसे छोटे कलाकारोंके साथ काम नहीं करता! हे तर अगदीच बनावट वाटते कारण याआधी त्यांनी मनोजकुमार बरोबर "नीलकमल" मधे, धर्मेंद्र बरोबर "काजल" मधे एवढेच नाही तर नवख्या राजेश खन्ना बरोबर "मर्यादा" मधे फिरोज खान बरोबर "उंचे लोग" मधे तर विनोद मेहरा बरोबर "लाल पत्थर" मधे काम केलेले आहे.
काम नाकारण्या मागचे कारण वेगळेच असावे. खरे खोटे देव जाणे! पण मला वाटतं जरी ते फटकळ असले तरी ह्यात अतिशयोक्तीचा भागच जास्त वाटतो. तो माणूस एवढाच जरं विचित्र असता तर त्यांचं एवढ मोठं करीयर कधी झालचं नसतं. चेतन आनंद, बी आर चोप्रा, मेहूल कुमार आणि इतरही निर्मात्यांनी त्यांना पुन्हा पुन्हा घेतलचं नसतं! शेवटी आपल्याला त्यांच्या चित्रपटांशी मतलब!राजकुमारचे शेवटचे चित्रपट होते बेताज बादशहा, जवाब आणि God ans Gun.
९० च्या दशकात त्यांना घशाचा त्रास जाणवू लागला. राजकुमारचा विशिष्ट आवाज,विशिष्ट शैली याला जणू नजरच लागली. ज्याच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठलं तो बुलंद आवाजच त्यांना सोडून गेला. त्यांना घशाचा कॅन्सर झाला. त्यामुळे आवाजा वर परिणाम होउन त्यांचे बोलणेच क्षीण झाले. अगदी कान जवळ नेला तरचं ऐकायला येई. शेवटची दोन वर्ष खूप वेदना सोसल्या. त्यांनी त्यांची पत्नी गायत्री व मुले पुरु, पाणिनी आणि मुलगी वास्तविकता यांना बजावले होते कि त्यांच्या मरणाची बातमी अंतिम संस्कार झाल्याशिवाय प्रिय मित्र चेतन आनंद यांच्याशिवाय कुणालाही द्यायची नाही. ३ जुलै १९९६ रोजी या बेताज बादशहाने या दुनियेचा निरोप घेतला.
गोड आठवण...
दोस्तहो तेव्हा मी ९ वी त होते. एकदा आम्ही बाहेर जात असताना आमची गाडी आणि त्यांची जीप सांताक्रुझ ते माटुंगा कट टू कट बरोबरच होती आणि आम्ही अतीव कौतुक मिश्रित प्रेमाने त्या रुबाब दार, देखण्या हिरोकडे बघतच होतो, आता स्माईल देईल मग देईल अशी वाट बघत! त्यांनी चेहेरा निर्विकार ठेवला होता पण कॅडेल रोडला वळताना त्यांनी हसून हात उंचावलाच! आम्ही धन्य धन्य झालो...
राजकुमारच्या चित्रपटातली काही श्रवणीय गाणी...
*पैगाम*
*मैं क्यू ना नाचूं आज कहो जी
*इन्सान का इन्सान से हो भाईचारा
*शरारत*
*तेरा तीर ओ बेपीर दिलकेआरपार है
*हम मतवाले नौजवान
*मदर इंडिया*
*होली आईरे कन्हाई रंग छलके
*दुनियामें हम आए है तो जीनाही पडेगा
*नगरी नगरी द्वारे द्वारे
*मतवाला जिया डोले जिया
*नौशेरवाने आदील*
*भूल जाए सारे गम डूब जाए प्यारमें
*वक्त*
*चेहेरेपे खुशी छा जाती है
*हम जब आपकी आखोमें आ गए
*ओ मेरी जोहराजबीं
*आगे भी जाने ना ते
*काजल*
*छू लेने दो नाजुक होठोंको
*तोरा मन दर्पन कहलाए
*मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन
* उंचे लोग*
*हाय रे तेरे चंचल नैनवा
*आ जा रे मेरे प्यारके राही राह निहारू
*जान दिले दिवाना रुत जागी
*उजाला*
*ओ मोरा नादान बालमा न जाने
*दुनिया वालोंसे दूर जलनूवालोंसे दूर
*झूमता मौसम मस्त महिना
*छम छम लो सुनो छम छम
*तेरा जलवा जिसने देखा
*अब कहा जाए हम
*मेरे हुजूर*
*झनक झनक तोरी बाजे पायलिया
*हम जब सिमटके आपकी बाहोमें
*रुखसे जरा नकाब उठादो मेरे हुजूर
*गम उठानेके लिए मैं तो जिये जाऊंगा
*नीलकमल*
*हे रोम रोम में बसने वाले राम
*बाबुल की दुवाअए लेती जां
*ये जिंदगी जो थी अबतक मेरी पनाहोमें
*तुझको पुकारे मेरा प्यार
*दिल अपना प्रीत पराई
*अंदाज मेरा मस्ताना
*अजीब दासतां है ये कहांशुरु कहांखतम
*मेरा दिल अब तेरा ओ साजना
*दिल एक मंदीर*
*हम तेरे प्यारमें सारा आलम
*रक जा रात ठहर जा रे चंदा
*याद न जाए बीते दिनोंकी
*फूल बने अंगारे*
*चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे
*हीर रांझा*.
*मिलो ना तुम तो हम घबराए
*ये दुनिया ये महफिल मेरे कामकी नहीं
*दो दि टूटे दो दिल हारे
*नाचे अंगवे छलके रंगवे
*मेरी दुनियामें तुम आये
*लाल पत्थर*
*रे मन सूर में गा कोई ताल बेसूर ना बोले ना बोले
*सुनी सुनी सांस की सितार पर
*गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
*मर्यादा*
*तू भी आजा के आ गई रुत मस्तानी
*मुहब्बतके सुहाने दिन जवानीकी हंसी राते
*पाकिझा*
*चलो दिलदार चलो चांदके पार चलो
*मौसम है आशिकाना
*चलते चलते यूंही कोई मिल गया था
*हिंदुस्तान की कसम
*है तेरे साथ मेरी वफा मैं नहीं तो क्या
*हर तरफ अब यहीं अफसाने है
*सौदागर*
*इमली का बूटा बेरी का पेड इमली कच्के
© कृपा देशपांडे...पुणे
No comments:
Post a Comment