Wednesday, October 9, 2019

रेखा

[10/10, 9:11 am] Charudatta: जोहराजान... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

रेखाबद्दल काय बोलावं. 'सलामे इष्क'ला अमिताभ सुरु झाल्यावर तिच्या चेह-यावरचे हावभाव बघाल. त्या ओळींचे अर्थ तिच्या चेह-यावर स्क्रोल होतात, तिचं भारावून जाणं बघाल. अमर्याद, कशालाही तोंड देण्याची तयारी असणारं, क्वचित वेडं वाटणारं प्रेम, अर्पणभाव बघाल तिच्या चेह-यावर. असे कितीसे शॉट्स असतील तिला. पण आयुष्यात नवीन काहीतरी कळावं आणि हाच का तो कालचा माणूस असा आमूलाग्र बदल एखाद्या व्यक्तीत घडावा अशी दिसते रेखा त्यात. जितेंद्रने कादरखानबदल तक्रार केली होती, तो त्याच्या सिनेमासाठी चांगले संवाद लिहीत नाही म्हणून. असं नसावं काही. पुलं म्हणाले होते, काय म्हटलंय यापेक्षा कुणी म्हटलंय हे महत्वाचं असतं. 'आमा मिला लो हाथ' हा काही हिट होण्याचा संवाद नाही पण झाला. 'मकान उंचा बनानेसे इन्सान उंचा थोडी जो जाता है?', 'जिंदगीमें लोग मोहब्बत के सहारे जिते है, मै आपकी नफरतके सहारे जिऊंगा' आणि रेखाच्या तोंडी असलेला, विनोद खन्नाला निरुत्तर करणारा 'इतनी किमतपर तो मैं सिकंदरकी तस्वीरभी न बेचूं'. संवाद म्हणायला फक्त आवाज असून चालत नाही, चेहरा हलणारा हवा. 'इतनी किमतपे तो' म्हणताना रेखाच्या चेह-यावरची तुच्छता बघाल. खरंय, एवढ्याश्या रुपयांसाठी कोण सिकंदर बच्चन सोडणारे.

आता जोहराजानही म्हातारी झाली आणि सिकंदरपण. आमच्या डोळ्यापुढे मरताना शेवटी काही आनंदाचे क्षण फास्ट फॉरवर्ड होतील त्यात तुमचेही चेहरे असतील एवढं नक्की. 'मु का सि' परत बघणं आलं आता, आपणच आपले त्रास वाढवतो एवढं खरं.

जयंत विद्वांस
[10/10, 9:16 am] Charudatta: एक अपूर्ण स्वप्न - रेखा

एक एक घट रिकामा करत करत मी शेवटल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो, एक एक जलकुंभ आपल्या समोर रिते करत गेलो आणि आपण त्या भिजलेल्या कहाण्यांमध्ये चिंब भिजत गेला , आज शेवटला कुंभ आपल्या समोर आणला आहे, हा कुंभ का कोण जाणे बाहेरून जितका सुंदर दिसतोय, त्या हुन अधिक सुंदर तो आतून आहे, पण माझं मन थोडं विषन्न झालं आहे, कारण या प्रवासात या कुंभा नंतर अजून तरी माझ्या ओंजळीत काही नाही....

एक मुलगी जिचं, आयुष्य म्हणजे ऍक्टिंग, जिचे वडील जमिनी गणेशन (तामिळ) आणि आई पुष्पावली (तेलगू) असल्या प्रकारे दोन संस्कृती याचा अजोड निर्माण घरातच होता, आणि घर म्हणजे कलाकारांची खाणच....त्यांना अपत्य झाले तीच नाव ठेवले "भानूरेखा गणेशन", १०व्या वर्षी ही मुलगी "बेबी भानुरेखा" म्हणून बाल कलाकार म्हणून एका तेलगू सिनेमात आली त्या नंतर तिने हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये  " सावन भादो" मधून डेब्यू केलं....डोळे, केसं, नाक नक्षी, गाल, ओठांवर डाव्याबाजूला काळा छोट्टासा तिळ, संवाद फेक एकदम भारी, आणि अभिनयाबद्दल न बोललं गेलं तरच ठीक, कसदार अभिनय, एक सुंदर अभिनेत्री, एक अपूर्ण स्वप्न म्हणजेच - "रेखा"....

सावन भादो आला तरी लोकांना ती आवडत नव्हती, म्हणजे लोकं तिला नटी म्हणून स्वीकारच करत नव्हते, समीक्षकांच्या नेहेमीच ती "टार्गेट" राहिली, फिल्मी मासिकात ती कायम असायची, खूप कमी अभिनेत्र्या आहे ज्यांनी कमर्शिअल सिनेमा सोबत पेरेलल सिनेमा देखील केलं त्यात रेखा होतीच होती.

रेखाचा सावन भादो च्या वेळी रंग फारच सावळा आणि काळाच्या मिश्रणातून येतो तसा होता, त्या वर क्रिटिक्सची जत्रा भरली जायची आणि रेखाला नाव दिले होते - "अग्ली डकलिंग ऑफ फिल्म इंडस्ट्री".

७२ साली तिचा राजेंद्र कुमार बरोबर आला गोरा और काला त्यात हेमामालिनी देखील होती, दोघी दक्षिण भारतीय अभिनेत्र्या, पण दोघी एकमेकास तोड, यात राजेंद्र कुमार ने अफलातून रोल केला होता, पुन्हा ती राजेंद्र कुमार बरोबर पण आली याच वर्षी गाव हमारा शेहेर तुम्हारा.

त्या नंतर याचवर्षी रणधीर कपूर बरोबर आली त्या सिनेमाचं नाव होतं "रामपूर का लक्षमण", रणधीर कपूर स्वतः एका मुलाखतीत बोलला कि रेखा च्या डोळ्यात बघून अभिनय करूच नाही शकत, तुम्ही त्या पाणीदार डोळ्यात, गालावरच्या तिळात, त्या मंत्र मुग्ध सौंदर्यात अडकून जातात आणि तुम्हाला काय करायचं आहे तेच समजत नाही", अशी होती रेखा, दुसर्यांना मोहपाशात बांधून ठेवण्याचं मर्म तिला माहिती होतं.

गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम
पर तुम्हें लिख नहीं पाऊं, मैं उसका नाम, हाय राम....

त्या नंतर ७३ साली बरेच सिनेमे आले खून खून, कश्मकश, कीमत, बरखा बहार, अनोखी अदा आणि अमिताभ आणि राजेश खन्ना सोबत आली नमक हराम मध्ये पण त्यात ती राजेश खन्ना च्या सोबत होती, सिनेमात आनंद नंतर अमिताभ आणि राजेश खन्ना आत्ताच आले होते, यात अमिताभ एक श्रीमंत तर काका मजूर दाखवला, त्यात रेखा वर राजेश खन्ना लाईन मारत म्हणतो- नादिया से दरिया, दरिया से सागर, सागर से गेहरा जाम......१९७४ साली आला "वो मे नही" हा शिन्मा मराठी नाटक - तो मी नव्हे (आचार्य अत्रे) यांच्या वरून लिहिला गेलेला आहे. याच वर्षी आला प्राण जाय पर वचन ना जाये (सुनील दत्त) यात गम्मत ही कि सारेच गाणे - आशा भोसले ने गायले आहे एकूण ७ गाणी आहे या सिनेमात, आणि याच सिनेमापासून रेखा आणि आशा भोसले यांचं नातं खूप घट्ट होतं गेलं, लोकांना ही असाच वाटत कि रेखा च्या आवाजात आशा भोसले चा आवाज एकदम फिट्ट बसतो, म्हणजे आशा ताईंच्या आवाजात खूप वर्सालिटी आहे, ती रेखा च्या आवाजात पण आढळते. 

एक सिनेमा होतं ज्यात रेखा आणि दिलीप कुमार ही जोडी होती, पण काही कारणवश हा सिनेमा रिलीज नही होऊ शकला त्या सिनेमाचं नाव होतं- आग का दारिया, रेखा च्या मते, ती अशी हेरॉईन आहे ज्यात कुठला सिनेमा येतोय, रिलीज होतोय, प्रोमो होतंय हे सारच तिच्या हिशोबानी गौण होतं , तिच्या साठी हे बस होतं कि आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण दिलीप कुमार सोबत घालवले, हेच त्या सिनेमाचं यश आहे, कि इतका मोठ्ठा ऍक्टर आपल्या समोर उभा आहे, अर्थात हे खूप सोनेरी स्वप्नासारखं भासत होतं.

७५ साली शेवटले पिक्चर आली धरम करम यात ती राजकपूर आणि रणधीर कपूर सोबत आली -

इक दिन बिक जाएगा, माटी के मोल
जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल
दूजे के होंठों को, देकर अपने गीत
कोई निशानी छोड़, फिर दुनिया से डोल
इक दिन बिक जायेगा   ...

किंवा

मेरे हमसफ़र गीत हैं तेरे
गीत ही तो जीवन मीत हैं तेरे
हो नग़में प्यार के तू गाए जा
गाए जा और मुस्कराए जा
तेरे हमसफ़र गीत …

त्या नंतर ७६ साल आलं आणि रेखाच्या आयुष्यात एक स्वर्णीम अध्याय लिहीलं जाणार होतं. "अमिताभ बच्चन" नावाचं, आणि या डोहाच्या जोडीने सिनेमात आणि सिनेमाच्या बाहेर खूपच गदारोळ केलं, अक्षरशः या दोघानी धुमाकूळ केला.

याच वर्षी दो अंजाने मध्ये ती पहिल्यांदा आली अमिताभ बरोबर. त्या नंतर ७७ साली दिलदार, चक्कर, दिल का आलाप , खून पसींना, पलको कि छाव मे सारखे सिनेमे ही आलेत रेखा चे.

त्या नंतर आला १९७८ साली विनोद मेहरा बरोबर - "घर" आणि रेखा खऱ्या अर्थाने लोकांच्या घरा घरात जाऊन पोहोचली, याच सिनेमा नंतर असा ही उठाव झाला कि रेखा आणि विनोद मेहराचं काही तरी गोड गुपित आहे, पण काही महिन्या अगोदर तिने हे कबूल केलं माझं (माझं म्हणजे रेखाच ; माझं नाहीं काही)  आणि विनोदच तसं काहीच नाहीये, कारण आम्ही छान मित्र आहोत , को-स्टार्स आहोत.

घर या सिनेमाची गाणी खूप गाजली -

आज कल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते मेरे
बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए

जाने क्या होता है हर बात पे कुछ होता है
दिन में कुछ होता है और रात में कुछ होता है
थाम लेना जो कभी देखो हमें उड़ते हुए
आज कल पाँव...

किंवा-

आपकी आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं
आपकी आँखों में...

लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं
आपकी आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं
आपकी खामोशियाँ भी, आप की आवाज़ हैं
आपकी आँखों में...

या गाण्यात जी हस्ते ती , किती सुंदर वाटतं, हायसं वाटतं ते हसू ऐकताना सुद्धा...

किंवा -

तेरे बिना जिया जाए ना
बिन तेरे, तेरे बिन, साजना
सांस में सांस आये ना

जब भी ख्यालों में तू आये
मेरे बदन से खुशबू आये
महके बदन में रहा ना जाए
रहा जाए ना
तेरे बिना जिया...

सगळीच गाणी गुलजार ने लिहिलेली, पंचमच संगीत आणि लता मंगेशकर.

रेखा या सिनेमाच्या येई पर्यंत लता मंगेशकर कडे जायला घाबरत होती , तिच्या मते लता मंगेशकर म्हणजे स्वर्गातले गंधर्व, त्याच्या कडे आपल्या सारख्या लोकांनी जाऊ नये, त्याच विश्व वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे , म्हणून रेखा आणि आशा भोसले सख्या मैत्रिणीसारख्या राहत होत्या, पण लता मंगेशकर खूप लांब होती, रेखा स्वतःहून पहिल्यांदा गेली लता मंगेशकर कडे या घर च्या वेळी कि माझ्या साठी तुम्ही गाणे गाल का, ते ही खूप भीत भीत - लता ने म्हंटल - ख़ुशी से.... आणि लता ने घर साठी आवाज दिला रेखा ला आणि रेखा हिट झाली, घर सिनेमा नंतर समीक्षकांनी तिला हेरॉईन म्हणून मानायला तैयार केलं.

आणि उजाडला १९७८ आणि अमिताभ बरोबर आला मुक्कदर का सिकंदर - यात आणि खून भारी मांग मध्ये रेखा ने अप्रतिम काम केलंय, तस तर खूबसूरत, आणि उमराव जान पण आहे; तर मुक्कदार का सिकंदर मध्ये- जोहराबाई च्या भूमिकेशी न्याय केलायं रेखाने संपूर्ण रित्या, यातील गाणे आणि मुजरे वाली जोहराबाई, एक सुंदर समीकरण बनले होतं, कसली गाणी होती आणि सोबत अमिताभ बच्चन म्हणजे काही विचारूच नका (तुम्ही म्हणाल आम्ही कुठे विचारतोय!)- शेवटी रेखा मरते आणि नंतर अमिताभ पण मरतो, सिनेमात दोघेही मरतात आणिक रियल लाईफ मध्ये दोघे एक मेकांवर मरू लागले होतं.

दिल तो है दिल, दिल का ऐतबार, क्या कीजै
आ गया जो, किसी पे प्यार, क्या कीजै...

खालील गाणं मुद्दामून मी पूर्ण देत आहे, माझ्या सारख्या अधिकाधिक लोकांच्या मनाच्या कोपऱ्यात वसलेलं हे गाणं आहे

सलाम-ए-इश्क़ मेरी जाँ ज़रा क़ुबूल कर लो
तुम हमसे प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन, मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिये

मैं सुनाऊँ तुम्हें बात इक रात की
चांद भी अपनी पूरी जवानी पे था
दिल में तूफ़ान था, एक अरमान था
दिल का तूफ़ान अपनी रवानी पे था
एक बादल उधर से चला झूम के
देखते देखते चांद पर छा गया
चांद भी खो गया उसके आगोश में
उफ़ ये क्या हो गया जोश ही जोश में
मेरा दिल धडका,
मेरा दिल तडपा किसीकी नज़र के लिये
सलामे-इश्क़ मेरी जां ज़रा क़ुबूल कर लो ...

इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन
सुनके तेरी नज़र डबडबा जाएगी
बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी
मेरा दावा है होंठों पे आ जाएगी
तू मसीहा मुहब्बत के मारों का है
हम तेरा नाम सुनके चले आए हैं
अब दवा दे हमें या तू दे दे ज़हर
तेरी महफ़िल में ये दिलजले आए हैं
एक एहसान कर, एहसान कर,
इक एहसान कर अपने मेहमान पर
अपने मेहमान पर एक एहसान कर
दे दुआएं,  दे दुआएं तुझे उम्र भर के लिये

सलामे-इश्क़ मेरी जां ज़रा क़ुबूल कर लो .....

७९ साली आला मि. नटवरलाल,  रोशन च्या संगीत मध्ये आलं होतं गाणं -

परदेसीया ये सच हे पिया,
सब केहते है मेने तुझको दिल दे दिया....

रेखा च्या खासगी आयुष्यात जशे जशे चढ उतार दिसतील, तशे तशे परफॉर्मन्स तिच्या रोल्स मध्ये असायचे, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला आवडले तिचे रोल्स त्या वेळी खासगी आयुष्यात ती खूप खुश होती असा ती भासवीत होती, किंवा उलट ही असू शकेल...
त्या नंतर  अमिताभ आणि रेखाचाच पुन्हा सुहाग आला ७९ साली, फिल्मेकर , डायरेक्टर या हिरो आणि हिरोइन्स याच्या प्रेम प्रसंगाचे खूप फायदा उचलायचे, आणि तीच तीच जोडी ते घ्याचे, दिलीप कुमार - मधुबाला, देवानंद - सुरैया, वहिदा- गुरुदत्त, नर्गिस- राजकपूर, वैजयंतीमाला- राजकपूर, अमिताभ-रेखा.

या नंतर राम बलराम , जुदाई, काली घटा, नियत, आचल, ज्योती बनी ज्वाला,आले शिवाय याच वर्षी ह्रिषीकेश मुखर्जी यांनी रेखाला फोन केला आणि म्हणाले कि मुझे तुम पर पिक्चर निकलना है, उसने कहानी तुम पर ही रहेगी, करोगी न काम, तुम्हाला दिल जितना खूबसूरत है वेसी ही फिल्म रहेगी" आणि रेखा ला घेऊन ह्रिषीकेश दादांनी काढला - सुपर डुपर हिट शिन्मा -"खूबसूरत" - त्यात काय अफलातून डान्स केलायं रेखाने -

पिया बाँवरी पिया बाँवरी
पिया बाँवरी पिया बाँवरी
पी कहाँ पी कहाँ
पिया पिया बोले रे
पिया बाँवरी पिया बाँवरी
पिया बाँवरी

किंवा -

ऐ सुन सुन सुन दीदी तेरे लिए इक रिश्ता आया है

सुन सुन सुन लड़के में क्या गुन सुन सुन दीदी सुन
हे सुन सुन सुन दीदी तेरे ललाला उई लाला रा लाला...

अरे-अरे लगता है ना दीदी (किती लटक्या रागाने म्हणते रेखा)

दोन वेण्यांमध्ये रेखा खूप अपील होतं, ग्लॅमर्स, सुंदर, वय काय याच गणित नाहीं, हे सगळे तिला बोलले गेले तरी ती एवढाच म्हणायची कि एवढं नका बोलू तुम्ही फक्त एकच म्हणा - "रेखा इस रेखा" ही मोट्ठी पदवी आहे मला, खूबसूरत साठी तिला फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळालं.

खून भारी मांग हा सिनेमा येई पर्यंत खूपच बदल झाले होते, नंतर ऍक्शन सिनेमा येऊ लागले होते, रेखाने उत्सव मध्ये रोमॅंटिक रोल केला, खूबसुरत मध्ये अल्हड मुलीचा मुक्त आणि स्वछंद रोल केला, तसाच उमरावजान मध्ये तिने एक मुजरेवाली ला इतक्या खूबसुरत रित्या पेश केलं ज्याला काही जवाब नव्हता.त्याच प्रमाणे खून भरी मांग मधे ती "खुंखार" देखील झालीच.

खूबसुरत मध्ये म्हणते त्या प्रमाणे आपल्याला रेखाने निव्वळ "निर्मल आनंद" दिलाय.

१९८० - १९८१ मध्ये रेखा ने एकूण २२ सिनेमात काम केलं आणि सगळे यशस्वी सिनेमे प्रदर्शित देखील झाले, त्यात ८१ साली आला उमरावजान आणि फारूख शेख बरोबर उर्दू बोलणे म्हणजे मोठ्ठा आव्हान होतं, आणि उमरावजान केल्या नंतर रेखा प्रचंड गाजली , पण याचाच निगेटिव्ह इम्पेक्ट झाला पुढील आयुष्यावर, जो तो रेखा ला घेऊ इच्छित होतं पण प्रत्येकाची मागणी होती कि रेखाने "मुजरेवालीचाच" रोल करावा, ते तिच्या साठी फारच असहनीय होत होतं. त्यातील गाणी खूप प्रसिद्ध झाली , रेखा ची जादू यात आहे कि याच चित्रपटाचं ऐश्वर्याने काम केलं रिमेक मध्ये.

दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लीजिये
बस एक बार मेरा कहा मान लीजिये

इस अंजुमन में आपको आना है बार-बार
दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये
दिल चीज़ क्या है...

किंवा -
जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने...

किंवा -
इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं
इन आँखों से वाबस्ता अफ़साने हज़ारों हैं

रेखा तुम्हा आम्हा सारख्यां साठी म्हणते कि -

इक तुम ही नहीं तन्हाँ, उल्फ़त में मेरी रुसवा
इस शहर में तुम जैसे दीवाने हज़ारों हैं
इन आँखों की...

आणि खालील ओळी रेखा साठी किती खऱ्या वाटतात....

इक सिर्फ़ हम ही मय को, आँखों से पिलाते हैं
कहने को तो दुनिया में मयख़ाने हज़ारों हैं
इन आँखों की...

१९८१ साली अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यांमध्ये "जया" नावाचे विरझण पडले, आणि प्रेमाचं लोणी थोडं आंबुसलेलं झालं, आणि नंतर सगळंच विस्कटत चाललं, पण यश चोप्रा यांनी एक डाव खेळला आणि तो डाव ते जिंकले देखील- "सिलसिला".

यात दोघांचं प्रेम चोप्राने उघड उघड दाखवले आहे, यातील शायरी, गाणी, डायलॉग, नैनिताल मधील सीन-सिनेरी, काय सांगावे आणि काय नाहीं सिलसिलाच-

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए
दूर तक निगाहों में हैं गुल खिले हुए
ये गिला है आपकी निगाहों से
फूल भी हो दरमियान तो फासले हुए....

या सिनेमात रेखा सगळ्यात ज्यास्त सुंदर दिसलीये, मग ती झाडांमध्ये फिरताना असेल, किंवा अमिताभ चा हाथ पकडून समुद्रकिनारी असेल, किंवा, झाडाखाली अमिताभ च्या मांडीत स्वतःला झोकुन सगळे केसं मोकळे सोडून झोपलेली असो, किंवा आळस देताना रेखा असो, हुजूर कयामत है रेखा कयामत....

नीला आंसामा सो गया हो....नीला आंसामा सो गया हो...

एकदा कोणी पत्रकार ने विचारले कि रेखा जी क्या आप अमिताभ जी से प्यार करती है तेंव्हा रेखा बोलली कि - "इस दुनिया मी कोन ऐसा है जो अमिताभ से प्यार नही करता". अमिताभ बरोबर या आयकॉनिक पेयर च्या एकूण १० सुपर हिट जोड्या झाल्या.

८४ साली शेखर सुमन सोबत पेरेलल सिनेमात आली - "उत्सव" -

मन क्यों बेहका रे बेहका आधी रात को ....
बेला मेहका....हो.....बेला मेहका रे मेहका आधी रात को
किसने बन्सी बाजायी आधी रात को
जिसने पलके चुरायी आधी रात को...

हे गाणं अर्थातच दोघी बहिणींनी गायले आहे लता आणि आशा यांनी , लता दाद कशी देते ते इथे नमूद करावंसं वाटत- यात एक ओळ आहे आशा च्या आवाजात-

उसको....रोको न टोको....रोको न टोको
............(एक मोठ्ठा पॉज घेऊन) आधी रात को ....

ही ओळ गायल्या बरोबर लताने फक्त चष्मा वर करून आशा ला पाहिलं, आणि आशा ला समजले कि आपल्याला जमलं....ह्याला म्हणतात सिंक्रोनायजेशन..... पण मग नंतर वितुष्ट का यावं- दैवदुर्विलास अजून काय!

८९ मध्ये खून भारी मांग आली त्या आधी तिने ३ वर्षच ब्रेक घेतलं आणि जेंव्हा आली त्या वेळी माधुरी दीक्षित, श्रीदेवी , जयाप्रदा यांच्या लाटा उसळल्या होत्या. त्यात ती आली खून भारी मांग मध्ये आणि तिने स्पर्धा पुन्हा जिंकली, रेखा एक स्पॉंटेनिस अदाकारा आहे. रेखा स्वभावाने फारच अंतर्मुखी आहे, लाजाळू आहे, रिजर्व्ह स्वभावाची आहे, गौतम राज्याध्यक्ष यांची खास मैत्रीण रेखा - हिची विनोद कार्याची पातळी फार वरच्या थराची आहे, ४ दशकात तिने एकूण २८० हुन ज्यास्त सिनेमात काम केलं, खून भारी मांग नंतर तिने कॅरेक्टर रोल्स घ्याल सुरवात केली, जुबेदा, कोई मिल गया, क्रिश, लज्जा, बुलंदी, दिल है तुम्हारा, भूत, ओम शांती ओम, सदिया, सुपर नानी, आणि शमिताभ इथं पर्यंत तिचा प्रवास येऊन ठेपला आहे.

रेखाची एक सवय आहे ती तिचे केसं ज्यास्त करून मोकळे ठेवते आणि डाव्या बाजूने उजव्या बाजूला कायम सावरत राहते, हल्ली विद्या बालन तिच्या या सवयी ची मोट्ठी फॅन आहे आणि ती तिला हमखास फोल्लो करते.
रेखा तशी सार्वभौम सुखाच्या आहारी कधीच गेली नाही, पण संसारी सुखाला रेखा कायम बोचत राहिली, एक लग्न झालं होतं बिजनेसमॅन मुकेश अग्रेवाल शी, पण काळाच्या गणितापुढे सगळंच निष्फळ असते तसेच झाले, त्याने रेखाच्या दुपट्ट्याला गळ्यात बांधून गळफास लावून घेतला. आणि स्वतःची आणि रेखाची बायको म्हणून जीवन यात्रा क्षणार्धात संपवली....

अमिताभ कडून प्रेम अपेक्षित होतं, ते मिळालं नाही...अमिताभ च्या आधी जया भादुडी ही रेखाची जीवापाड प्रेम करणारी मैत्रीण होती, एका महानायकाच्या विभागणी मुळे या दोघी दुरावल्या, अजुनी जवळ यायचे चिन्ह काही दिसत नाही, हिट सिनेमे देऊन पण रेखा सुखाला आपल्या पदरात घ्याल मुसमुसतच राहिली, तिला जे ज्या वेळी हवं होतं ते तिला त्या वेळी नाहीच मिळालं, म्हणा असं प्रत्येक माणसा बरोबर होतं, त्या काही नवीन नाही, पण ५० वर्षांपासून ज्यास्त काळ जिने चित्रपट सृष्टीत घालवला ती अशी एकाकी राहणे म्हणजे आपल्याच काळजावर आपणच ओरबाडे खेचतोय असं वाटत्ये.

काळाने तिच्या मनावर नको तेंव्हा नको तसे प्रहार केले, काळाने रेखाला नखाने ओरबाडून काढले, आणि रेखा हसत मुखाने आपल्या सामोरी आली, आणि हसू लागली, आपल्याला ते हसणं फार सुखकारक वाटलं, थोड्या विनोदाची झालर आहे असं वाटायचं, रेखा कि रूपवान- सुंदर- तरुण- आहे असाच वाटायचं, पण मनाच्या खोलीत उतरून आपण पाहतच नाही. ती अशी अभिनेत्री आहे जिला स्वतःत रमायला आवडते, निर्सग, पक्षी, ढग, आकाश, नदी बघायला आवडते. रेखा कायम म्हणते कि ती एक्टरेस नाही ती परफॉर्मर आहे.इतका पैसे असून ती आज एकाकी आहे, तिच्या म्हणण्यानुसार ऍक्टिंग बडी टेडी चीझ है भैया - इसम तीन चिझे आती है - रोल्स - रोल्स और रोल्स......

रेखा म्हणजे नैसर्गिक, खरी, प्रेमळ, सौंदर्य, वात्सल्य, शंभर नंबरी सोनं, कसदार अभिनेत्री, उत्तर माणूस, नृत्यात पारंगत, विनोदवीर, हे आणि असले शब्द तिच्या समोर हात जोडून उभे राहतात, आणि म्हणत असतील - बाई आम्हाला कधी कडेवर घेते तसे सांग!!!

आज मी आपल्या समोर नऊ च्या नऊ जलकुंभ रिते केले, या सगळ्यांनी अमाप सुख दिले, प्रेम दिले, त्यांची अश्रू लपवली आणि आमच्या चेहऱ्यावर हसू आणले, आपण जगावं म्हणून या सगळ्या जणी झटल्या, झुरल्या, भांडल्या, पण आपल्याशी प्रेमच केलं, किती केलं याची तर गिनती पण नाही, आणि गणती पण नाही, आम्हाला कापसाच्या मऊ तळव्या प्रमाणे जपायचं एवढा ध्यास होतं म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर ठायी ठायी जखमा खाल्ल्या, नखशिखांत ओरबाडे सहन केले, आमच्या साठी त्यांनी फटके खाल्ले, अरे संपूर्ण आयुष्य झोकुन दिले.....

हे सार काही मला काय किंवा तुम्हाला काय एका स्वप्ना सारखंच वाटत ना, खोटं का बोलावे...

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.....  

त्यांनी काय दिलं हे शब्दात तर कधीच मांडता येणार नाही, मी एक माफक प्रयत्न केला, तो जमला असेल...अशी मीच माझ्या मनाची समजूत घालतो.....नऊ च्या नऊ जलकुंभांबद्दल सविस्तर उद्या दसऱ्याच्या मुहूर्ताला लिहीनच....तूर्तास....या नऊ च्या नऊ स्त्रियांना , नट्या यांना, माझ्या निवडक हिरोइन्स यांना मी मनाचा मुजरा करतो आणि पुन्हा आजच्या लेखाची सांगता करतो!!

रेखा जी..... सौंदर्य म्हणेज तुम्ही , आसुसलेलं प्रेम म्हणजे तुम्ही, तुमच्या मुळे आमच्या जगण्याला अर्थ लाभला, तुम्ही आमच्या आयुष्याची रेशमी गाठ अजून पक्की केली आहे, आमचं भाग्य उजळून निघाले आहे.....शेवट हाच कि .... तुमची जादू ओसरू शकतच नाही या मनाच्या कोपऱ्यात तुम्ही खूप खूप खोल वर रुतून बसलाय.....

जब भी थामा है तेरा हाथ तो ये देखा है
लोग केहते है कि बस हाथ कि "रेखा" है
हमने देखा है तकदीरो को जुडते हुए
आज कल पाँव...

मृणाल जोशी
२९.०९.२०१७
#नवरात्रीचानववारंग#
#रेखा#
[10/10, 9:18 am] Charudatta: भानू रेखा गणेशन...........हिंदी चित्रपट सृष्टीतील एकमेव उमराव जान........!!!!!एकमेव खुबसुरत वसंतसेना......!!!!!!आज या चिरतरुण ,सदाबहार रेखाजींचा जन्मदिन...........!!!रेखाजी ,तुम्हाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा............!!!!!!!!!!

    सुंदर कांजीवरम साडी आणि मौल्यवान दागिन्यांनी सजलेले त्यांचे रूप पाहणे म्हणजे सुखद पर्वणीच.....!!!!बालकलाकार म्हणून त्यांनी प्रथम ''रंगूला रत्नम ''या तमिळ सिनेमातून चित्रसृष्टीत पदार्पण केले......!!!!!त्यानंतर १९७० मध्ये आलेल्या ''सावन भादो''या हिंदी चित्रपटातून त्या नायिका म्हणून झळकल्या आणि हिंदी चित्रपट सृष्टीची भाग्य रेखाच बदलली.....!!!!!

   प्रथम दर्शनी साऊथ मधील सावळी ,साधारण अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.पण कालांतराने त्यांनी स्वत;च्या ''लुक्स ''कडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.आणि शिस्तबद्ध व्यायाम,योगाची साथ ,खाण्यावर नियंत्रण या सगळ्यामुळे त्यांचे वजन घटले....आणि जसे सुरवंटाचे  सुंदर फुलपाखरू बनते तसेच त्यांचे सौंदर्य उजळून एका सौंदर्यवती कलावान अभिनेत्रीचा जन्म झाला.त्यांचे हेच नवे रूप त्यांच्या ''दो अनजाने ''या चित्रपटात झळकले प्रेक्षकांना हे नवीन रूप आणि त्यांचा अभिनय दोन्ही गोष्टी भावल्या .त्यांच्या अभिनयाची चर्चा होऊ लागली.त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.यशाची एकेक पायरी चढत त्या लोकप्रियतेच्या आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर पोचल्या.

''घर ''या चित्रपटातून नवविवाहित तरुणी ''आरती'' ही भूमिका त्यांनी साकारली.यात बलात्कार झालेली "पिडीत स्त्री" त्यांनी रंगविली.प्रेयसी,नवपरिणीता,
पत्नी,पिडीत स्त्री असे अनेक कंगोरे असणारी ही भूमिका अभिनयाचा कस लावणारी होती.रेखाजीनी ती उत्तम साकारली.आपल्या अभिनयाने त्यात विविध रंग भरले.पतीवर नितांत प्रेम असूनही भोगलेल्या भीषण भूतकाळाने अस्वस्थ होणारी पत्नी रसिकांच्या डोळ्यात पाणी आणते...!!"आरतीची" अत्यंत संवेदनशील भूमिका रेखाजींनी आपल्या सुंदर अभिनयाने जिवंत केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळविली  आणि फिल्मफेअर चे पारितोषिकही. ...!!

  यानंतर रेखाजी आपल्या भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ बनल्या.अभिनयाला वाव देणाऱ्या मोजक्याच भूमिका त्या स्वीकारू लागल्या.''खुबसूरत ''हाही रेखाजींच्या'' चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ''असलेला चित्रपट............!!!!!!विनोदी अंदाज असलेली ही "चुलबुल्या मंजूची " भूमिका त्यांनी मोठ्या दिमाखात साकारली.हृषीकेश मुखर्जी या  मुरब्बी दिग्दर्शकाच्या परिस स्पर्शाने रेखाजींच्या  या भूमिकेचे सोने झाले आणि रसिकांच्या मनात "खुबसुरत  रेखा"जीनी "पिया बावरी" बनून अढळ स्थान मिळविले.

रेखाजीनी  अनेक नायकांबरोबर काम केले.पण अमिताभ बरोबर त्यांची विशेष जोडी जमली.आणि रसिकांनाही त्या दोघांची जोडी पसंत होती."मुकद्दर का सिकंदर","मिस्टर नटवरलाल" ,"सिलसिला" अशा अनेक चित्रपटातून ही जोडी झळकली .यश चोपडा यांच्या "सिलसिला" मधून त्यांची आणि जयाजींची जुगलबंदी विशेष रंगली.असे असले तरी "सिलसिला" ने जे खूबसुरत प्रेमाचे  ख्वाब रसिकांना दाखविले ते आजही रसिक मनी अमर आहे...यशजींसारख्या रोमान्स च्या बादशहाने रेखाजी आणि अमिताभ यांच्यातील प्रणय खऱ्या अर्थाने जिवंत केला...!!

रेखाजींच्या अभिनय कारकिर्दीतील शिरपेच म्हणावा असा चित्रपट म्हणजे ''उमराव जान''.......!!!!!ही "उमराव जान" रेखाजीनी रुपेरी पडद्यावर जिवंत केली.त्या भूमिकेत आपले प्राण ओतले.ही भूमिका म्हणजे त्यांच्यापुढील आव्हान होते...त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले,उर्दूचे प्रशिक्षण घेतले. खय्यामसाहेबांच्या संगीताने "उमराव जान" सजीव झाली आणि रेखाजींच्या फॅन मेल मध्ये वाढ झाली..."इन आंखो की मस्ती के मस्ताने हजारो है"....हे गीत प्रत्येकाच्या ओठी येऊ लागले..."उमराव" ची अदा, नृत्य,दु:ख,माता पित्यांपासून झालेली ताटातूट या साऱ्या भावना रेखाजींनी आपल्या अभिनयातून खुलविल्या...!!हीच उमराव जान ची भूमिका त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेली.

"खून भरी मांग" चित्रपटाची आखणी  करताना राकेश रोशन यांच्यासमोर रेखाजीच होत्या...आधी साधी भोळी गृहिणी,मुलांवर जीवापाड प्रेम करणारी आणि पतिनिधनानंतर तिच्यावर झालेल्या अन्यायाची झालेली  जाणीव आणि ज्या त्वेषाने ती आपल्यावरील अन्यायाचा सूड घेते तो खरच पाहण्यासारखा...!!

रेखाजींची आणखी एक अविस्मरणीय भूमिका ''इजाजत ''चित्रपटातील .......!!!भूमिकेचा बाज,समतोल साधून साकारलेली ,गुलजार या कलासक्त दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखालील उत्तम भूमिका असेच याचे वर्णन करता येईल.......!!!!''कुठ कुठ जायचा हनिमूनला''या गीतात त्यांनी आपले मराठमोळे रूप दाखवून मराठी रसिकांची मने जिंकली आहेत.

  कलेला स्थलकालाचे ,भाषा प्रांत यांचे बंधन नसते.रेखाजीनाही वयाचे बंधन नाही .आता त्या मोजक्याच भूमिका करतात.शासनाने त्यांना ''पदमश्री ''देऊन त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा गौरव केला आहे.आजही रसिक त्यांच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहतात.......!!!!!आजही  रेखाजी या अभिनयाच्या तारांगणात दिमाखाने लख लखत   आहेत.कधी "सुपर नानी" तर कधी "आस्था"मधील "असहाय स्त्री" जी परिस्थितीच्या जाळ्यात अलगद ओढली जाते...!!"परिणिता" मधील "कैसी पहेली जिंदगानी" म्हणणारी "मादक क्लब डान्सर" असो किंवा "नीला आसमा सो गया "म्हणत विरह वेदनेत दग्ध झालेली प्रेमिका असो,"इंकीलाब झिंदाबाद "म्हणत एकाधिकारशाहीविरुद्ध बंड पुकारणारी खूबसुरत मधील नायिका मंजू असो किंवा "आज कल पांव जमीपर नही पडते मेरे "म्हणत प्रेमातील बेहोषीची अनुभूती देणारी धुंद प्रेमिका आरती असो,रुपेरी पडद्यावरील तिचा वावर ,तिचा अभिनय नेहमीच नेत्र सुखद ठरला आहे..

प्रत्येक कलाकार आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दु:ख बाजूला सारून रसिकांचे मनोरंजन करत असतो..तामिळ अभिनेता "जेमिनी गणेशन" आणि तेलगू अभिनेत्री "पुष्पावल्ली" यांची ही कन्या ...त्यामुळे "अभिनय" तिच्या रक्तातच होता...रुपेरी पडदा गाजविणे हे तिचे स्वप्न कधीच नव्हते.तिला आकाशात उंच भरारी घ्यायची होती हवाई सुंदरी बनून....!!!आर्थिक जबाबदारी म्हणून ही पितृ प्रेमाला बाल्यातच वंचित झालेली कन्या चंदेरी दुनियेत आली...अवघे तेरा वर्षांचे वय...साथीला कुणी नसताना मुंबईसारख्या मोहनगरीत तिने पाऊल ठेवले...तेव्हा मुंबई तिला भयानक जंगलाप्रमाणे वाटे...हिंदी भाषेचा गंध नव्हता...तिच्या हळवेपणाचा फायदा घेणारे इथे अनेक होते..पण तरीही प्राप्त परिस्थितीशी झगडत तिने मार्गक्रमण केले...इथले कडूगोड अनुभव घेत ती चालत राहिली...कुण्या एकाच्या शिस्त बद्ध दिनचर्येने,अभिनय साकारताना त्यात झोकून देण्याच्या वृत्तीने तिला बदलून टाकले...तिची कांती उजळली...तिचा बांधा योगाने सुडौल झाला,तिच्या चोखंदळ भूमिकातील अभिनयाने तिने रसिकांना जिंकून घेतले...आजही ती हवीशी वाटते,तिचा स्वर ऐकण्यास कान अतुरलेले असतात,तिने "साठी" ओलांडली आहे,ती पडद्यावर "नानी" झालीये पण रसिकमनात मात्र आजही ती "उमराव जान" आहे,"वसंत सेना" आहे...सिलसिला मधील "चांदनी" हीच तिची ओळख आहे...काळाची पाऊलखुणा  तिच्या यौवनावर  उमटल्याच नाहीत...उमटणार नाहीत...!!!ती रसिकांच्या जीवनातील भाग्यरेखा आहे...!!!तिच्या कारकीर्दीकडे पाहिले की अचंबित व्हायला होते...आणि तिचेच गीत आठवते...

छोटी सी कहानी से, बारिशों की पानी से
सारी वादी भर गयी
न जाने क्यों, दिल भर गया
न जाने क्यों आँख भर गयी

स्वप्रयत्नाने,स्वकष्टाने आपले कर्तृत्व उजळून टाकणाऱ्या या गुणी तारकेला देव निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो.......!!!!!रेखाजी ,तुम जियो हजारो साल......सालके दिन हो पचास हजार........!!!!!!!!!!!!!

मानसी पटवर्धन.

No comments:

Post a Comment