😇 *व-हाडी ठसका*..😝😂
पुण्यातल्या मुलगा *श्रेयस* कट्टर विदर्भातल्या मुलीच्या प्रेमात पडला, आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले,मुलाच्या घरचे ह्या बातमीने हैराण झाले,
*"अरे पण तू असे कसे करू शकतोस?"*
मुलाने आपला निर्णय जाहीर केला,
*"लग्न करेन तर सोनालीशी नाहीतर संन्याशी",*
त्याचे बाबा जोरात ओरडले
*"अरे तू सन्या शी पण लग्न करायला तयार आहेस? मग सोनालीशीच लग्न कराचे का म्हणतोस ?"*
मुलगा म्हणजे श्रेयस वैतागून म्हणाला
*"नाही हो बाबा संन्यासी म्हणजे ते दाढी मिशा वाढवून फिरतात तसे",*
शेवटी मुलाच्या आईने माघार घेत लग्नाला परवानगी दिली...
लग्न थाटात पार पडले नवीन सून बाई सासरी निघाल्या, तिच्या आईने कान मंत्र दिला,
*”हे पाय सोनाली, बाई लग्न त तू तुह्या मर्जीन केल पन आपला वऱ्हाडी बाना राखून ठेव गड्या,नायतर होऊन जाशीन पुनेवाली."*
पोरीने आईला मिठी मारली आणि सांगितले
*"मी मरून जाईन पण वऱ्हाडीच राहीन तू नको कायजी करू".*
आईने प्रेमाने निरोप दिला, सोनाली सासरी आली.
*"नवीन सूनबाई"* .. सासूबाई म्हणाल्या,
*"आता मी मोकळी झाले गं बाई...मोकळी झाले?"*
सोनाली ने कान टवकारले, मनातच म्हणाली..
_'ह्या बाईच्या मनात का का लपून हाय ते पयले तपासा लागन मंग आपन आपले इचार सांगू तिले नाहीतर तूह काही खर नाही माले, तुले आईचा मंतर याद कराच लागते बाई'_ .. _“वऱ्हाडी रायजो “..ठरलं !!_
रात्री उशिरा पर्यंत गप्पाटप्पा मारून सासरची मंडळी सकाळी थोडी उशिराच उठली.. सोनाली मात्र आधी उठून कसे काय आहेत बाकीचे हे बघायला गेली , सासूबाई पण झोपल्याच होत्या,
सोनाली त्यांच्या कानाशी जाऊन जोरात ओरडली
*"आई चा मांडू का?"*
सासूबाई घाबरतच उठल्या,
*"अग हे काय मांडू? सोनाली, सकाळी सकाळी कानात काय ओरडतेस?"*
सोनाली म्हणाली,
*"मी का म्हटल का मी ‘पहाटेच' उठले नं..., त मले आता कंटाळा येऊन ऱ्हायला, त चा मांडू का बा अस इचारत होते, मन्जे सर्वे लोक आता उठूनच र्हायले नं ..म्हणून"*
सासू बाईना काहीच कळेना ही पहाटेच उठली आणि हीला कंटाळा आला आणि म्हणून मांडू का ? काय असत ते ? सासू बाईनी परत विचारले,
*" म्हणजे काय करणार आहेस? "*
सोनाली म्हणाली,
*"आवो आई मी म्हटल का चा मांडू का? "*
तेवढ्यात मुलगा उठला,
सासू बाई म्हणाल्या
*"अरे श्रेयस ही काय बोलते ते काही कळत नाही तूच विचार "*
तशी सोनाली म्हणाली
*“आवो मी त पहाटेच उठून बसली मले काही रातभर झोप लागली नाही बा.. मच्चर भाय डसे मंग मी उठूनच गेली”*
श्रेयस चक्रावला.... _हे काय ही तर रात्रभर जोरजोरात घोरत होती आता तासा पूर्वी माझा डोळा लागला..._
तोच सोनाली ओरडली...
*"आवो असे बह्याडावानी कावून पाहून राह्यले... मी म्हटल का चा मांडू का? "*
सासू बाई परत श्रेयसवर ओरडल्या,
*"अरे ती काय बोलते आहे असे किंचाळून ते बघ ना, शुंभा"*
श्रेयस भानावर आला,
*" अग ती म्हणते आहे कि चहा ठेऊ का? "*
*" अस होय मग ठेव की त्यात अस किंचाळायच कशाला,"*
*"आमी असच बोलत असतो"* सोनाली म्हणाली,
सासुबाईनी हात जोडले,
*"बर आता कोणाला चहा कि कॉफी ते विचारून घे",*
सोनाली बाहेर गेली,
*"कोणकोण चा घेणाराय ते सांगा बर पट पट आण कोनकोन कॉफी घेनार ते बी आताच सांगून द्या मन्जे तशी मले मांडाले",*
आता मांडू ह्याचा अर्थ घरात कळला होता, प्रत्येकाने आपली फर्माईश पेश केली,
लगेच सोनाली ओरडली
*"दातगीत घासले का गुरल्या करूनच बसून ऱ्हायले."*
_सगळे परत आं....? आता हे काय गुरल्या ,_
श्रेयस पुढे आला आणि म्हणाला
*"अरे दात घासलेत कि नुसती चूळ भरूनच बसलाय सगळे असे विचारतिये ती.. ओके ? "*
सोनाली चहा, कॉफी घेऊन आली, *"घ्या"*
*"एकदम बढीया बनाया है "* म्हणाली.
चहा घेता घेताच सोनाली तिच्या टोन मधे म्हणाली,
*"नाष्ट्याले काय बनवू ते सांगा न आई??"*
सासू बाई म्हणाल्या मी करते तू बैस,
सोनाली कसली ऐकतीये परत जोरात म्हणाली ,
*"कावोन अशा करता... मी देते न बनवून का बनवू ते सांगा उकरपेंडी बनवू का बढीया,"*
श्रेयसचे डोळे चमकले, सासूबाई विचारात पडल्या, सासरे पेपरात डोके खुपसून बसले इतर मंडळी सोयीस्कर रित्या आपापल्या कामाला लागली, सासूबाई प्रेमाने म्हणाल्या
*"आज पोहेच कर,"*
सोनाली परत बोललीच,
*"आवो आलू पोहे, बनवू का? पोपट (वाटाणे) त आता भेटनार नाही. त सांबार(कोथिंबीर) च टाकते,"*
सासरेबुवा वैतागले,
*"अरे हे काय चाललय ?पोपट काय, सांबर काय ? सकाळ पासून पोह्यात कोणी खात का? आपले साधे पोहे कर नाहीतर माझी बायको करेल, अन ए श्रेयस तू काय असले पदार्थ करायला परवानगी देणार आहेस? , असले भयानक प्रकार नकोत, उगाच कोणी ऐकल तर आपल्या घरावर प्राणीमित्र संघटना, मोर्चे काढतील",*
श्रेयस काही बोलणार तो सोनाली मध्ये ओरडली,
*"बर.... मी बनवते आलुपोहे पन सांबार त टाकाच लागते ते काही भयानक गीयानक नसते,"*
सासरे मान डोलावून पेपर वाचायला लागले,आणि म्हणाले *"घाला"*
*"सांबर,शेळी कोंबडी,आता काय काय पुढ्यात येईल देव जाणे,"*
सोनाली जोरात हासली अन् म्हणाली,
*" तुमी बी बम मजाक करता जी, मले वाटल नवत,"*
सासरे हताशपणे हसले,
श्रेयस खुश क्या बात है सुग्रण बायको..सोनालीने बटाटे, कोथिंबीर घालून पोहे केले, ते पाहून घरातील मंडळींचा जीव भांड्यात पडला,
पोहे खाता खातच सोनाली सासूबाईना म्हणाली
*"आई, आता तुमी आंग धून घ्या न पटकन, अन आवो, तुमी काल म्हनत होते ना म्हाल्या कड जातो आन येताना वठ्या कडून कपडे घेतो... त जा बर पटकन फुकट इथ बह्याडा सारख बसून राहू नका,"*
_सगळे परत आं..... आता हा कुठ जातोय ??_
श्रेयस म्हणाला
*"जरा सलून मध्ये जाऊन, आणि येताना धोब्याकडून कपडे घेऊन येतो,"*
_आता घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडू लागले ही कोणती भाषा बोलतीये, मराठी आहे असे तर वाटते,_
तेवढ्यात मैनाबाई आल्या कामाला,
*"काय सुनबाई मजेत का त्यांनी प्रश्न विचारला",*
*"मी त सादरी हावो, तुमी? बाहेर उन् चांगलच पडून ऱ्हायला न तुमी कानपट गिनपट बांधून डोक्यावर शेव (सावली) घेऊन फिरा बर ...नाहीतर झाव लागून तरास होते न ...खूप उन असन त कांदा बी ठेवाव जवळ... झाव नाही लागत, "*
सासूबाई सगळ ऐकत होत्या ही बया काय बोलतेय काही कळत नाही आता डोक्यावर शेव न कांदा घेतल्याने उन लागत नाही, म्हणे नुसती लाज काढणार आहे,
मैनाबाई काहीतरी समजल्या सारखी मान हालवून कामाला लागल्या,
सोनाली परत सासूबाईंच्या पुढे गेली तश्या त्याच म्हणाल्या *"थोड सावकाश बोल ग बाई मी ऐकतीये,"* सोनाली म्हणाली,
*"आता सैपाकाच पहा लागते न.. का बनवू आता फोड्नीच वरण, भात, पोळ्या अन भाजी कोनती बनवू , "*
सासूबाई म्हणाल्या,
*" मी बघते तू थांब,"*
ऐकेल तर ती सोनाली नाहीच,
*"आवो अस कस म्हनता तुमी, मी केल त का झाल ? तुमी करा आराम, बर त सांगा न भाजी कायची बनवा लागते? मी फ्रीज मदी पायल भेद्र(टोमॅटो), वांगे, अन खिरे पडून हाय, आलू न कांदे गिंदे घालून काही जमवू का, का नुस्त वरण कलसू, "*
_'अरे देवा.. ही काय बोलतीये एकदा समजल न तर नारळ ठेवीन रे बाबा',_ सासूबाई नि मनात देवाला नवसच बोलला,
*"काय करायचं ते कर पण जरा जपून. बोलणी मला खावी लागतील, तुझ्या रेसिपीमुळे,"*
*" आस कस म्हनताजी तुमी....*
*मी त आमच्या वेटाळात एक नंबर सैपाक बनवो न....*
*मी तवाच हे माह्या प्रेमात पडले,*
*माहया आई न मले सांगितलच होत का जे विद्यार्थी शिकाले येऊन राहते, त्यायची खान्या पेन्याची जबाबदारी घे,*
एखांदा पटतेच,सासूबाई थक्क होऊन पहात राहिल्या. *"कर बाई काही पण ..."*
सोनाली ने स्वयंपाक केला तिखट तर्रीदार ,
आवडला सगळ्यांना पण सासरे म्हणाले
*" सुनबाई मला थोडा तिखटाचा त्रास होतो" , जरा जपून ",*
सोनाली ओरडली
*"आस हाय का मंग पयलेच कावून नाही सांगितल मी तुमच्या साठी गोळा वरण पन ठेवल असत न ...."*
_सगळे हताश झाले अग बाई थोड हळू बोल आणि कमी तिखट कर बास.._
जेवल्यानंतर सगळे थोडे पडले हे वऱ्हाडी जेवणाची गुंगी चढू लागली होती, दुपारचा चहा झाला,
सासूबाई टीवीवर सिरीयल बघत होत्या, सोनाली तिच्या टोन मधे म्हणाली,
*"आई तुमी संध्याकाळी घुमता का? "*
*_काय?_* _त्या घाबरूनच गेल्या आता ही बया काय करायला सांगतेय कोण जाणे._
*"नाही,मंजे मले संध्याकाळी घुमाची सवय हाय ना, म्हनून विचारल",*
_अग बाई हीला संचार बिंचार होतो कि काय संध्याकाळचा?_
त्या घाबरूनच गेल्या,
उठून श्रेयसच बखोट धरून त्याला फरपटच आतल्या खोलीत घेऊन गेल्या
*"अरे मुर्खा आता हे काय ऐकतीये मी..?"*
श्रेयस गोंधळला .. *"काय झाल?"*
*"मालू संध्याकाळी घुमते म्हणजे, ते माहित नव्हत का तुला बावळटा, कसा रे तू आता ही रोज संध्याकाळी घुमायला लागली तर कसे होणार ? ".*
श्रेयसला सगळा गोंधळ लक्षात आला,
*"अग ती घुमायला म्हणजे बाहेर फिरायला जाऊ या का? असे विचारत असेल "*
सासूबाई हताशपणे खाली बसल्या श्रेयसला म्हणाल्या,
*"अरे कुठे वऱ्हाडी मराठी-पुणेरी मराठी अशी डिक्शनरी मिळते का ते बघ, एकाच दिवसात भितीने जीव अर्धा झाला पुढे अख्खा जन्म आहे रे...."*
😂😝 #cp
No comments:
Post a Comment