दोघे भेटले. नजरानजर झाली. हृदयाची खात्री पटली की हीच ती जिच्यासाठी मी इतके दिवस वाट पाहिली. नावगाव विचारायच्या आधीच ती गायब होते. आता परत कधी आणि कुठे भेटेल ती. नजर शोधत राहते, ती दिसते आणि शायर असलेला तो आशिक कधी बनला त्याच त्यालाच कळत नाही. त्याच्यातला वादक व्हायोलिन उचलतो आणि हृदय पिळवटून टाकणारी एक सुरावट वाजवतो.
सुभाष घईंच्या कर्ज चित्रपटातला हा प्रसंग. भारतातील नामवंत लक्ष्मी प्यारे जोडीतले प्यारेलाल शर्मा ह्यांनीच तो दिलखेच तुकडा वाजवलाय. लक्ष्मीप्यारे यांचं संगीत म्हणजे वाद्यांचा, खास करून व्हायोलिन, ताफाच वापरणे ही खासियत. हे गाणं अर्थात त्याच उत्तम उदाहरण. आनंद बक्षीच्या काव्याला प्रत्येक कडव्याला वेगळी चाल हा हिंदीतील अभूतपूर्व प्रयोग असावा. या असामान्य प्रयोगाला चार चांद लावले ते लक्ष्मी प्यारेचे लाडके गायक महंमद रफी साहेब यांनी.
दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर, दिल में जगाया आपने
पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने
अरे, मध मध म्हणजे किती असावा आवाजात. पहिल्या कडव्यातल *आपकी* आणि *मदहोश* हे शब्द ऐका एकदा. शब्दार्थ कळून त्याचा इतका प्रभावी उच्चार पुरुष गायकात फक्त रफीनाच जमला.
आपकी मदहोश नज़रें कर रही हैं शायरी
ये ग़ज़ल मेरी नहीं, ये ग़ज़ल है आपकी
मैंने तो बस वो लिखा, जो कुछ लिखाया आपने
दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर...
पुढे तो म्हणतो *यारों* की महफिल आणि आता फक्त एकटेपणाच्या *तन्हाईयाँ* उरल्या. परत एकदा ठळक केलेल्या शब्दांचे उच्चार ऐका.
कब कहाँ सब खो गयी, जितनी भी थी परछाईयाँ
उठ गयी यारों की महफ़िल, हो गयी तन्हाईयाँ
क्या किया शायद कोई, पर्दा गिराया आपने
दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर...
हा तन्हाई पण जबरदस्त शब्द आहे. उर्दू काव्यात नेहमी येणारा हा शब्द मराठीत अनुवाद करणं फार कठीण. एकटेपणा आणि कोणीतरी भेटावं याची आस एका शब्दात सांगणारी नजाकत इतर कुठल्याही शब्दात नाही. या नंतर अनेक वर्षांनी दिल चाहता है मध्ये सोनू निगम दिलतोड गायलाय आणि पडद्यावर समर्थपणे व्यक्त करायला आमिर. तन्हाई तन्हाई मीलो है फैली हुई तन्हाई.
तर ते असो.
अचानक ती महाफिलीतून अदृश्य होते आणि शेवटी तो उदास होतो. थोड्या वेळाने आपण वेगळे होऊ. आता मी तुला कुठे शोधू गं.
*नाम तक तो नही अपना बताया आपने* अशी प्रेमळ तक्रार करून तो परत सांगतो की प्रेमाचा दर्द माझ्या हृदयात तूच देऊन गेली आहेस.
और थोड़ी देर में बस, हम जुदा हो जायेंगे
आपको ढूँढूँगा कैसे रास्ते खो जायेंगे
नाम तक भी तो नहीं, अपना बताया आपने
दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर...
हृदयाच्या तारा छेडणारं व्हायोलिन, रफीची स्वर्गीय गायकी आणि ऋषी कपूरचा कमालीचा प्रभावी अभिनय यामुळे हे अप्रतिम सुंदर गाणं तितकंच प्रेक्षणीय देखील बनतं.
रफीसाहेब, मी सामान्य माणूस. पण तुमच्या माध्यमातून दैवी आवाज हृदयात पोचला की मग _मैंने तो बस वो लिखा, जो कुछ लिखाया आपने_ ही माझी प्रामाणिक कबुली.
रफीभक्त अभय गडीयार, ठाणे
9833570575
वरील मजकूर काहीही बदल न करता शेअर करायला हरकत नाही
No comments:
Post a Comment