मेरा सुंदर सपना बीत गया.....!!!!!
"मेरा सुंदर सपना बीत गयाssss....आजही या गाण्याचे मन व्याकुळ करणारे शब्द कानी पडले की मन कातर होते...दु:खी होते....ही जादू आहे या गाण्यातील शब्दांची,संगीताची आणि दर्दभऱ्या स्वराची...होय "गीता रॉय" यांचा स्वर होता तो ...हृदयात अलगदपणे शिरून मनात झिरपायचा तो स्वर....जीवनातील वेदना बोलक्या करणारा तो स्वर होता...ग्रेस म्हणतात की "गीता रॉय च्या स्वरातील चाकूचे रेशमी झळझळते पाते इतके सफाईदार होते की आर पार गेले तरी कळत नसे"..."रायबहादूर चुन्नीलाल" यांचा विरोध पत्करून हट्टाने "सचिन देव बर्मन" यांनी वरील गाण्यासाठी "गीताजींचा" स्वर निवडला...."दो भाई" चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही ,पण यातील गाणी मात्र प्रचंड गाजली ,त्यात गीताजींची ६ गाणी होती.."याद रखना मुझे याद रखना" ,"आज प्रीत का नाता टुट गया","हमे छोड पिया किस देस चले"...ही त्यातील काही गीते...गीताच्या स्वरात फक्त दु:खाची छटा नव्हती हं... त्या स्वराने घायाळ करणारी क्लब सोंग्स दिली,तर प्रेमाने ओतप्रोत अशी काही रोमँटिक युगलगीते दिली...भक्तिरसात भिजलेली काही रसाळ भजने दिली तर आपल्या मनाशीच हितगुज करणारी काही सोलो सोंग्स दिली....त्या स्वराकाशात सुरांच्या विविधरंगी छटा होत्या...आणि विशाल गगन व्यापण्याची क्षमता त्यात होती....आज गीताजींची जयंती......!!!!त्यांना लक्ष लक्ष प्रणाम...!!!!
देवेंद्रनाथ आणि अमिया रॉय चौधरी यांची ही कन्या..पूर्व बंगाल मधील फ़रीदपूर जिल्ह्यातील इदिलपूर चा जन्म...आई वडिलांचे प्रोत्साहन आणि मेघनेच्या खळाळत्या प्रवाहाची साथ तिला लाभली...मेघनेच्या तीरावरील नावाड्यांची गीते तिने मनात साठवून ठेवली... तिच्या प्रवाहाप्रमाणे आपणही मुक्तपणे गावे असे तिला वाटे... मुंबईच्या वास्तव्यात असेच एकदा मोकळेपणी गाताना हा स्वर "संगीतकार हनुमानप्रसाद" यांच्या कानी पडला ,न राहवून त्यांनी त्याचा शोध घेतला आणि गीताजींच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक मधाळ स्वर लाभला...!!!"गीताने पार्श्वगायन करावे" अशा हनुमानप्रसाद यांच्या आग्रहावरून "भक्त प्रल्हाद" मधील "सुनो सुनो हरी की लीला सुनाए"या समूह गीतात गीता प्रथम गायली...!!!हिरा गवसला होता...आता कोंदणाने सजणार होता....!!!!
नवकेतनच्या "बाजी" मधून पुन्हा एकदा गीताजी आणि सचिनदेव बर्मन यांनी यशाची पताका झळकविली...या दर्द भर्या स्वरात मादकता सुद्धा आहे,मस्ती आहे,नशा आहे हे "तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले,अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले....."हे या गाण्याने सिद्ध केले . रुपेरी पडद्यावर हे गीत सादर केले "गीता बाली" यांनी..."गीता बाली" यांची एकेक अदा "गीता रॉय" यांच्या स्वरातून प्रकटली...अगदी सुरवातीच्या गिटारच्या कॉर्डस समवेत आलेल्या हे हे हे हेssssया पाश्चात्य ढंगाच्या आकारापासून... हे गीत म्हणजे एका गीताचा अभिनय आणि दुसऱ्या गीताचा स्वर यांची जुगलबंदीच होती....आणि या गाण्याने त्यांच्या स्वरांचे आकाश मर्यादित नाही याची पोचपावतीच दिली जणू...!!!!बाजीमध्ये गीताजींची आणखीही गाणी होती.पहिल्या प्रेमाची जाणीव झाल्याने धडधडणारे हृदय आणि झालेला आनंद दाखविणारे ,गीताजींच्या उन्मुक्त स्वरातील गिरक्यांचा अनुभव देणारे "ये कौन आया की मेरे दिल की दुनिया में बहार आई" हे गीत तर "देख के अकेली मोहे बरखा सताए"हे त्यांच्या "टीप टीप टीप टीप"हा पर्जन्य ध्वनी अगदी झोकात टिपणारे गीत...!!! गीताजींचा नटखट स्वर आणि गीता बालीचा अंगावर शिंतोडे येत असल्याचा अभिनय यांचा सुंदर मेळ या गीतात दिसतो."आज की रात पिया दिल ना तोडो."..यात प्रियकराची घातलेली समजूत ,त्यासाठी स्वरातील अजीजी त्यांनी उत्तम व्यक्त केलीय..!!!
मधुर ,नशिल्या संगीताचा नजराणा रसिकांना देणाऱ्या नय्यरजींनी गीताच्या स्वरातील मादकतेचा सुंदर उपयोग केला आणि मग जन्मली अवीट गोडीची अनेक गीते...."बाबूजी धीरे चलना"(जे एकॉर्डियन च्या पिसेस नी आणि गीताच्या नशिल्या स्वरांनी बहरले होते),"जाता कहा है दिवाने."..यातील बेफिकिरी आणि स्वरातील नखरा अनुभवावा..."ठंडी हवा ,काली घटा आ ही गयी झुमके "मध्ये गीताचा स्वर आणि मधुबालेचे सौंदर्य दोन्ही ची मधुर नशा अनुभवायला मिळते..."हावडा ब्रिज "मध्ये नय्यर साहेबांनी तिला एकच गीत दिले,जे सगळ्यात लोकप्रिय झाले..."मेरा नाम चीन चीन चू" ही स्वरातील मदिर नशा होती...ताल सम्राट आणि गीत मलिका यांचे अनोखे सृजन होते ते...!!!!ही पाश्चात्य गायकी आत्मसात करण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले ,पाश्चात्य ढंगाच्या अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या,त्यातील बारकावे टिपले आणि ते आपल्या गायकीने सजविले...या गीताचे यश तिला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन गेले...नय्यरजींच्या पहिल्या "आसमान "या चित्रपटापासून त्यांना गीताची साथ होती..."आसमान" मधील "देखो जादुभरे तोरे नैन" हे सतारीच्या झंकाराने बहरलेले सुंदर गीत...!! "जरा सामने आ,जरा आँख मिला" मधील आव्हान (बाज),"हूँ अभी मैं जवा" मधील नशा (आर पार) ,"ये लो मैं हारी पिया "(आर पार)मधील नव्या नव्या प्रीतीतील सपशेल शरणागती कित्ती मधुर,"सुन सुन सुन सुन जालीमा "(आर पार)यातील प्रेमातील शरारत ,अवखळ पणा सारे काही त्यांनी समर्थपणे व्यक्त केले..त्यांची शब्द फेक वाखाणण्यासारखी....अगदी अचूक....!!!! बाबूजी धीरे चलना मध्ये "हाssssबडे धोके है" ...हा "हा "वरील हिंदोळा कित्ती नाजूक ,नशीला ...तिच्या स्वरात एक अनामिक हुरहूर होती...तो स्वर मनात आरपार जाऊन भिडे....!!!"बाजी"नंतर गीताजी सौ दत्त(गुरुदत्त च्या पत्नी) झाल्या...!!!!
गीताजींचा स्वर सोज्वळ होता, त्यात खानदानी शालीनता होती...!!!"जोगन" चित्रपटही मीरेच्या भजनांनी सजला होता..वेळप्रसंगी नशीला,मादक ,अवखळ होणारा हा स्वर भक्तिरसात रंगला की त्याला एक वेगळीच धार येई,उर्मी येई,जणू भक्तीच्या लाटेवर स्वार होऊन तो हृदयात शिरे.."जोगन" मधील भजनात हा स्वर अलौकीकत्वाच्या पातळीवर पोचला होता. गीताच्या भावोत्कट स्वराने भक्तीरंग छान पेलला..."बुलो सी रानी" यांचे संगीत चपखल होते!!!"घुंगट के पट खोल","मत जा जोगी","मैं तो गिरीधर के घर जाऊ","एरी मैं तो प्रेम दिवानी" अशी "जोगन" मधील मीरेची भजने गाताना त्यांनी जी एकरूपता साधली,जणू त्या कृष्ण रूप होऊन कृष्णरंगी सहजतेने रंगून गेल्या होत्या....आजही "मत जा मत जा जोगी" यातील त्यांची साद ऐकून हृदय द्रवते...तसेच "काला बाजार साठी" गायलेले ना मैं धन चाहू ,ना रतन चाहू(सुधा मल्होत्रा बरोबर) , "आनंद मठ "मधील जय जगदीश हरे (हेमंत कुमार यांच्याबरोबर),आन मिलो आन मिलो शाम सावरे(मन्ना डे यांच्याबरोबर-- देवदास),दर्शन प्यासी आई दासी(संग दिल...ज्यात जलतरंगाची सुंदर साथ अल्लाउद्दीन खासाहेबांनी केली आहे ही मोलाची माहिती ज्येष्ठ सिने अभ्यासक श्री अरुण पुराणिक यांनी दिली),कंकर कंकर से मैं पुछु..(हर हर महादेव)ही भजने ऐकून मन थक्क होते..भक्तीरंगात रंगलेले हे गीताजींचे रूप भुरळ घालणारे,त्यांचे अष्ट पैलुत्व सिद्ध करणारे होते..!!!
त्यांची युगलगीतेही मधाळ होती,वैविध्यपूर्ण होती...
१.."हम आप की आँखो में इस दिल को"...हे प्यासा मधील स्वप्न दृश्यावर आधारित रफीजींबरोबरचे गीत...
२.."आँखो ही आँखो में इशारा" हे सी आई डी मधील प्रणय गीत...ज्याचा मुखडा रफी यांनी म्हटला आहे आणि अंतरे मात्र गीताजींनी गायले आहेत...
३.."चुपके से मिले प्यासे प्यासे"... मंझील चित्रपटातील रफी यांच्या बरोबरचे हे युगलगीत...यात त्यांनी मुखडा आणि अंतरा यांच्या मध्ये प्रथम गद्यात गाण्याच्या ओळी म्हटल्या आहेत.. त्यामुळे गाणे खूप बहारीचे झाले आहे..त्यांचा "मद्धम् "ऐकत रहावा...!!!!
४.."दिल युं युं करता है"...१९४८मध्ये आलेल्या हिर राँझा चित्रपटातील दस्तुरखुद्द खैय्याम यांच्या बरोबर म्हटलेले हे गीत ,आजही तितकेच ताजे तवाने वाटते...नवथर प्रेमाची थर थर अशीच असते का..."अरमान है मिलनेके और मिलने से डरता है"यातील "है" वरील हरकत खूप सुंदर...!!!
५.."तुम जो हुए मेरे हमसफर"...12 '0 'क्लॉक मधील हे गीत डोळे मिटून ऐकणे हा एक सुखद अनुभव...समुद्राच्या लाटांसारखे हेलकावे असलेले हे गीत..नय्यर साहेबांची खूप सुंदर रचना रफी आणि गीताजी यांनी सुंदर गाऊन एक गीत शिल्प साकारले आहे..
६.."दो नैना तुम्हारे प्यारे प्यारे" (श्रीमतीजी...हेमंतकुमार ..गीता)हेही एक रोमँटिक युगलगीत...!!!!गीताजींनी म्हटलेले "जिया धडके शरम के मारे,सजन हम हारे, चलेंगे तेरे द्वारे,'तेरी दुनिया बसाएंगे.. गीताजींचा हा गोड वादा कित्ती सुंदर होता..
७.."गोरी तेरे नटखट नैना'..(हम भी इन्सान है..सुबिर सेन ..गीता)...एक अप्रतिम युगलगीत
८.."आँखो में तुम"..... (किशोर कुमार ,गीता,हाफ टिकट)-या शरारत भर्या युगलगीतात गीताजी किशोर कुमार यांच्यापुढे तितक्याच अवखळ पणे त्यांची साथ देतात...!!!!
९...खयालो में किसिके...(बावरे नैन..मुकेश बरोबर..रोशन)अवीट गोडीचे खूप गाजलेले गीत...!!!!
१०...रिमझिम के तराने लेके आई बरसात...(काला बाजार...रफी यांच्याबरोबर)बरसात च्या मोसमात हे गीत हमखास आठवतेच...!!!!किती समरस होऊन म्हटलंय दोघांनी..गीताजींचा "रुमघुम झुम झुम"चा उच्चार कित्ती सुंदर....!!!!
आपल्या सहगायिकांबरोबरही गीताजींनी अनेक गीते गायिली आहेत..."अखियां भूल गयी है सोना"(गुंज उठी शहनाई ...वसंत देसाई लताजींबरोबर),"जानू जानू रे" (इन्सान जाग उठा...आशाजींबरोबर.. एस डी बर्मन),"बचपन के दिन" (सुजाता..एस डी बर्मन,आशाजींबरोबर),"फुलवा बन महके"(हम भी इन्सान है..सुमनजींबरोबर) अशी अनेक गीते...!!!"बाट चलत नई चुनरी रंग डारी रे" हे "लडकी"चित्रपटातील गीत त्यांनी असे बहारदार पेश केले की चित्रपट संगीतात त्या आल्या नसत्या तर शास्त्रीय संगीत गायिका नक्की झाल्या असत्या...त्यांच्या गीतातील वैविध्य थक्क करते...सुजाता मधील "नन्ही परी सोने चली, हवा धीरे आना "ही लोरी त्यांनी ज्या ममतेने आणि लडिवाळ पणे म्हटली त्याला तोड नाही...!!!!प्यासा मधील "आज सजन मोहे अंग लगा ले जीवन सफल हो जाये..."यातील प्रियाच्या मिलनाची ओढ,त्यासाठी तिची होणारी तगमग त्यांनी तळमळीने व्यक्त केली..तर "जाने क्या तूने कही" हे जणू स्वरांचे मोहजाल होते....!!!गीताजींचा स्वराला गहन खोली होती,नाद होता,मंतरुन टाकणारी अदा होती... त्या जीव ओतून गात असत..."ता थैय्या करते आना"(पंचायत),"है ये दुनिया कौनसी"(सैलाब),"बरखा की रात में"(सरदार),"माने ना माने ना"(सवेरा)हे त्याचे काही पुरावे...!!!!
हिंदी सोबत त्या बंगाली,गुजराती अगदी मराठीतही गायल्या.. वसंत बापटांचे "जा सांग लक्ष्मणा सांग रामरायाला "या गीतातील सीतेची वेदना त्यांनी बोलकी केली तसेच "मुक्या मनाचे बोल साजणा" हे देखील त्यांचे गाजलेले गाणे..."शाहीर परशुराम" यांची एक लावणी त्या ठसक्यात गायच्या..."बोले कावळा लवतो डोळा "ही ती लावणी...संगीतकार होते श्री वसंत पवार...!!!!
हेमंतकुमार आणि गीताजी दोघेही बंगाली...आणि त्यांचे आपसातील ट्युनिंगही चांगले होते."आनंदमठ ते साहिब बीबी और गुलाम" ची ही सुरिली मैफल छान रंगली...!!!"जय जगदीश हरे "मधील त्यांचे स्वर दैवी असल्याचा साक्षात्कार होतो...मनाच्या गाभाऱ्यात भक्तीची ज्योत तेजविणारे गीत होते ते...!!!!
"शर्त" या चित्रपटात गीताजींनी गायलेले "न ये चांद होगा ,ना तारे रहेंगे,मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे"हे गीत जणू आपल्यावर मोहिनी घालते...!!!गीताजींचा स्वर ऐकत रहावासा वाटतो ,एका अनाम दुनियेची सफर घडवितो...तसेच "बादबान" मधील "कैसे कोई जिए " हे गीत सुद्धा आपल्या मनसागरात दु:खी लाटांची खळबळ माजविणारे...गीताजींनी हे दु:खाचे आकाश किती संयमित स्वरात तोलले आहे...त्या दु:खाच्या परिघाची व्याप्ती त्यांनी लीलया आपल्या स्वरातून व्यक्त केली आहे..!!!
हेमंत कुमार आणि गीताजी यांचे स्वर युगलगीतात पूरक ठरतात..."ठंडी हवाओ में तारों की छाव में(बहू..तलत महमूद यांच्याबरोबर) आणि तुम और हम भूल के गम (फेशन),गुमसुम सा ये जहाँ ,ये रात है जवा (दुनिया झुकती है)ही हेमंत कुमार यांच्याबरोबरची त्यांची अवीट गोडी लाभलेली द्वंद्ववगीते...!!!!
"साहिब बीबी और गुलाम" हे गीताजी आणि हेमंतकुमार यांच्या संगीतातील अत्युच्च शिखर...!!!चित्रपटातील छोट्या बहूच्या(मीनाकुमारी) वेदनेला वाचा फोडणारा त्यांचा स्वर मनावर ठसतो... तिच्या दु:खाचा पदर अन पदर आपल्या स्वराने गहिरा करतो... पतीची वाट पाहून पाहून थकलेली विरहिणी म्हणते....."जिया बुझा बुझा,नैन थके थके...पिया धीरे धीरे चले आओ...कोई दूर से आवाज दे चले आओ" काहीशी गूढ,एक अनामिक ओढ त्या स्वरातून व्यक्त होते...बाहेर ख्याली पतीचे मन जिंकून घेण्यासाठी ती साज शृंगार करते ...आणि म्हणते "पिया ऐसे जिया में समाय गयो रे की मैं तनमन की सुध बुध गवा बैठी"......पतिला आपल्या अधीन करून घेण्यासाठी ती मदयप्राशन सुद्धा करते...पण तरीही तो घराबाहेर चालला आहे हे पाहून ती म्हणते "ना जाओ सैय्या छुडाके बैय्या".... !!मीनाकुमारीच्या अभिनयाला गीताजींच्या गहिऱ्या स्वरांची साथ लाभल्याने त्यांच्या अभिनयाला चार चांद लागले आहेत....!!!!"कोई दूर से आवाज दे चले आओ" हा गीताजींचा स्वर जणू आपल्यावर मोहिनी घालतो...त्यातील वेदना,दु:ख ,आर्तता मन कातर करते...!!!
गीत कोणतेही असो, त्यात सर्वस्व ओतून गीतातील भाव जिवंत करणे हा गीताजींचा स्थायीभाव....म्हणूनच "प्रीतम आन मिलो"हे सी एच आत्मा यांनी गायिल्यावर सुद्धा त्यांच्या आवाजातही ते तितकेच व्याकुळ वाटते,आत्मा यांच्यासमोर त्या कुठेही फिक्या पडल्या नाहीत,तसेच "न ये चांद होगा "हे हेमंतकुमार यांनी सुद्धा गायले आहे ,पण गीताजींनी तिथेही हेमंतकुमार यांच्या तोडीस तोड गीत सादर केले आहे..."बादबान" मधील "कैसे कोई जिये" हे गीतही त्यांनी प्रभावी पणे ,निराशेचा डोह गहिरा करत म्हटले आहे...!!!!"वक्त ने किया क्या हसी सितम"हे गीत म्हणजे दु:खाचा कडेलोट...गीताजींनी ते जीव ओतून गायले आहे...त्यांचा स्वर जणू आत्म्याला भिडतो....!!!
जायेंगें कहा सुझता नहीं
चल पडे मगर रास्ता नहीं,
क्या तलाश है कुछ पता नहीं,
बुन रहे है हम ख्वाब दम-ब-दम...
काळ माणसाला निमिषार्धात कुठून कुठे नेतो ना...!!!एवढी गुणी कलावती...बंगालची शान.. गाण्यातील नेमकी भावना ,मग ती वेदना असो खुशी असो,रुसवा असो,नाराजी असो त्या नेमकी आपल्या स्वरात पकडत,आणि गाणे सजवत ...गुरुदत्त च्या चित्रपटात गाताना त्यांनी जीव ओतला होता...आरपार,बाझी,साहिब बीबी और गुलाम,प्यासा,कागज के फूल,चौदहवी का चांद या चित्रपटासाठी त्यांनी आपले सर्वोत्कृष्ट दिले... सचीनदा एकदा म्हणाले होते, "वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!"दैवाचे फासे उलटे पडले..."वक्त ने किया"या गाण्यातून भळभळणारे दु:ख तिचे स्वतःचे होते का....मन कासावीस होते...!!!!डोळे पाणावतात....!!!गुरुदत्त गेल्यानंतर तिची जबाबदारी वाढली..हक्काचे संगीतकार दुरावले.. एके काळी नय्यरसाहेबांच्या संगीतातील मुख्य गायिका त्या होत्या,सगळी मादक गीते ते त्यांच्याकडून म्हणून घेत...पण त्यांच्या संगीतात आशाजी आल्या आणि गीताजी लुप्त होत गेल्या...!!! तरीही त्यांच्या मनातील आशेची ज्योत विझली नव्हती...
कोई चुपके से आके
सपने सुलाके मुझको जगाके
बोले की की मैं आ रहा हूँ
कौन आया....!!!!
गीताचे ते सुरांचे अवकाश आजही तिला खुणावत होते.... नियतीशी झगडून ती थकली होती पण स्वर मात्र तसाच होता ,सतेज...ताजा...जीवनाची समीकरणं बदलली पण गाण्याची ओढ तशीच होती...हृदयातून प्रकटणारा स्वर तसाच होता.... म्हणत होता....!!!
चांद है वही
चांद है,वही सितारे है
वही गगन...
फिर भी क्यूँ उदास है
उदास मेरा मन..
©मानसी पटवर्धन..
---------- Forwarded message ----------
From: "Manasi Patwardhan" <mmpatwardhan58@gmail.com>
Date: 20 Jul 2017 8:47 a.m.
Subject: गीता दत्त
To: "prasad sanwatsarkar" <prasad.photomusic@gmail.com>
Cc:
मेरा सुंदर सपना बीत गया.....!!!!!
"मेरा सुंदर सपना बीत गयाssss....आजही या गाण्याचे मन व्याकुळ करणारे शब्द कानी पडले की मन कातर होते...दु:खी होते....ही जादू आहे या गाण्यातील शब्दांची,संगीताची आणि दर्दभऱ्या स्वराची...होय "गीता रॉय" यांचा स्वर होता तो ...हृदयात अलगदपणे शिरून मनात झिरपायचा तो स्वर....जीवनातील वेदना बोलक्या करणारा तो स्वर होता...ग्रेस म्हणतात की "गीता रॉय च्या स्वरातील चाकूचे रेशमी झळझळते पाते इतके सफाईदार होते की आर पार गेले तरी कळत नसे"..."रायबहादूर चुन्नीलाल" यांचा विरोध पत्करून हट्टाने "सचिन देव बर्मन" यांनी वरील गाण्यासाठी "गीताजींचा" स्वर निवडला...."दो भाई" चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही ,पण यातील गाणी मात्र प्रचंड गाजली ,त्यात गीताजींची ६ गाणी होती.."याद रखना मुझे याद रखना" ,"आज प्रीत का नाता टुट गया","हमे छोड पिया किस देस चले"...ही त्यातील काही गीते...गीताच्या स्वरात फक्त दु:खाची छटा नव्हती हं... त्या स्वराने घायाळ करणारी क्लब सोंग्स दिली,तर प्रेमाने ओतप्रोत अशी काही रोमँटिक युगलगीते दिली...भक्तिरसात भिजलेली काही रसाळ भजने दिली तर आपल्या मनाशीच हितगुज करणारी काही सोलो सोंग्स दिली....त्या स्वराकाशात सुरांच्या विविधरंगी छटा होत्या...आणि विशाल गगन व्यापण्याची क्षमता त्यात होती....आज गीताजींचा स्मृतिदिन....!!!!त्यांना लक्ष लक्ष प्रणाम...!!!!
देवेंद्रनाथ आणि अमिया रॉय चौधरी यांची ही कन्या..पूर्व बंगाल मधील फ़रीदपूर जिल्ह्यातील इदिलपूर चा जन्म...आई वडिलांचे प्रोत्साहन आणि मेघनेच्या खळाळत्या प्रवाहाची साथ तिला लाभली...मेघनेच्या तीरावरील नावाड्यांची गीते तिने मनात साठवून ठेवली... तिच्या प्रवाहाप्रमाणे आपणही मुक्तपणे गावे असे तिला वाटे... मुंबईच्या वास्तव्यात असेच एकदा मोकळेपणी गाताना हा स्वर "संगीतकार हनुमानप्रसाद" यांच्या कानी पडला ,न राहवून त्यांनी त्याचा शोध घेतला आणि गीताजींच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक मधाळ स्वर लाभला...!!!"गीताने पार्श्वगायन करावे" अशा हनुमानप्रसाद यांच्या आग्रहावरून "भक्त प्रल्हाद" मधील "सुनो सुनो हरी की लीला सुनाए"या समूह गीतात गीता प्रथम गायली...!!!हिरा गवसला होता...आता कोंदणाने सजणार होता....!!!!
नवकेतनच्या "बाजी" मधून पुन्हा एकदा गीताजी आणि सचिनदेव बर्मन यांनी यशाची पताका झळकविली...या दर्द भर्या स्वरात मादकता सुद्धा आहे,मस्ती आहे,नशा आहे हे "तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले,अपने पे भरोसा है तो ये दाव लगा ले....."हे या गाण्याने सिद्ध केले . रुपेरी पडद्यावर हे गीत सादर केले "गीता बाली" यांनी..."गीता बाली" यांची एकेक अदा "गीता रॉय" यांच्या स्वरातून प्रकटली...अगदी सुरवातीच्या गिटारच्या कॉर्डस समवेत आलेल्या हे हे हे हेssssया पाश्चात्य ढंगाच्या आकारापासून... हे गीत म्हणजे एका गीताचा अभिनय आणि दुसऱ्या गीताचा स्वर यांची जुगलबंदीच होती....आणि या गाण्याने त्यांच्या स्वरांचे आकाश मर्यादित नाही याची पोचपावतीच दिली जणू...!!!!बाजीमध्ये गीताजींची आणखीही गाणी होती.पहिल्या प्रेमाची जाणीव झाल्याने धडधडणारे हृदय आणि झालेला आनंद दाखविणारे ,गीताजींच्या उन्मुक्त स्वरातील गिरक्यांचा अनुभव देणारे "ये कौन आया की मेरे दिल की दुनिया में बहार आई" हे गीत तर "देख के अकेली मोहे बरखा सताए"हे त्यांच्या "टीप टीप टीप टीप"हा पर्जन्य ध्वनी अगदी झोकात टिपणारे गीत...!!! गीताजींचा नटखट स्वर आणि गीता बालीचा अंगावर शिंतोडे येत असल्याचा अभिनय यांचा सुंदर मेळ या गीतात दिसतो."आज की रात पिया दिल ना तोडो."..यात प्रियकराची घातलेली समजूत ,त्यासाठी स्वरातील अजीजी त्यांनी उत्तम व्यक्त केलीय..!!!
मधुर ,नशिल्या संगीताचा नजराणा रसिकांना देणाऱ्या नय्यरजींनी गीताच्या स्वरातील मादकतेचा सुंदर उपयोग केला आणि मग जन्मली अवीट गोडीची अनेक गीते...."बाबूजी धीरे चलना"(जे एकॉर्डियन च्या पिसेस नी आणि गीताच्या नशिल्या स्वरांनी बहरले होते),"जाता कहा है दिवाने."..यातील बेफिकिरी आणि स्वरातील नखरा अनुभवावा..."ठंडी हवा ,काली घटा आ ही गयी झुमके "मध्ये गीताचा स्वर आणि मधुबालेचे सौंदर्य दोन्ही ची मधुर नशा अनुभवायला मिळते..."हावडा ब्रिज "मध्ये नय्यर साहेबांनी तिला एकच गीत दिले,जे सगळ्यात लोकप्रिय झाले..."मेरा नाम चीन चीन चू" ही स्वरातील मदिर नशा होती...ताल सम्राट आणि गीत मलिका यांचे अनोखे सृजन होते ते...!!!!ही पाश्चात्य गायकी आत्मसात करण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले ,पाश्चात्य ढंगाच्या अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या,त्यातील बारकावे टिपले आणि ते आपल्या गायकीने सजविले...या गीताचे यश तिला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन गेले...नय्यरजींच्या पहिल्या "आसमान "या चित्रपटापासून त्यांना गीताची साथ होती..."आसमान" मधील "देखो जादुभरे तोरे नैन" हे सतारीच्या झंकाराने बहरलेले सुंदर गीत...!! "जरा सामने आ,जरा आँख मिला" मधील आव्हान (बाज),"हूँ अभी मैं जवा" मधील नशा (आर पार) ,"ये लो मैं हारी पिया "(आर पार)मधील नव्या नव्या प्रीतीतील सपशेल शरणागती कित्ती मधुर,"सुन सुन सुन सुन जालीमा "(आर पार)यातील प्रेमातील शरारत ,अवखळ पणा सारे काही त्यांनी समर्थपणे व्यक्त केले..त्यांची शब्द फेक वाखाणण्यासारखी....अगदी अचूक....!!!! बाबूजी धीरे चलना मध्ये "हाssssबडे धोके है" ...हा "हा "वरील हिंदोळा कित्ती नाजूक ,नशीला ...तिच्या स्वरात एक अनामिक हुरहूर होती...तो स्वर मनात आरपार जाऊन भिडे....!!!"बाजी"नंतर गीताजी सौ दत्त(गुरुदत्त च्या पत्नी) झाल्या...!!!!
गीताजींचा स्वर सोज्वळ होता, त्यात खानदानी शालीनता होती...!!!"जोगन" चित्रपटही मीरेच्या भजनांनी सजला होता..वेळप्रसंगी नशीला,मादक ,अवखळ होणारा हा स्वर भक्तिरसात रंगला की त्याला एक वेगळीच धार येई,उर्मी येई,जणू भक्तीच्या लाटेवर स्वार होऊन तो हृदयात शिरे.."जोगन" मधील भजनात हा स्वर अलौकीकत्वाच्या पातळीवर पोचला होता. गीताच्या भावोत्कट स्वराने भक्तीरंग छान पेलला..."बुलो सी रानी" यांचे संगीत चपखल होते!!!"घुंगट के पट खोल","मत जा जोगी","मैं तो गिरीधर के घर जाऊ","एरी मैं तो प्रेम दिवानी" अशी "जोगन" मधील मीरेची भजने गाताना त्यांनी जी एकरूपता साधली,जणू त्या कृष्ण रूप होऊन कृष्णरंगी सहजतेने रंगून गेल्या होत्या....आजही "मत जा मत जा जोगी" यातील त्यांची साद ऐकून हृदय द्रवते...तसेच "काला बाजार साठी" गायलेले ना मैं धन चाहू ,ना रतन चाहू(सुधा मल्होत्रा बरोबर) , "आनंद मठ "मधील जय जगदीश हरे (हेमंत कुमार यांच्याबरोबर),आन मिलो आन मिलो शाम सावरे(मन्ना डे यांच्याबरोबर-- देवदास),दर्शन प्यासी आई दासी(संग दिल...ज्यात जलतरंगाची सुंदर साथ अल्लाउद्दीन खासाहेबांनी केली आहे ही मोलाची माहिती ज्येष्ठ सिने अभ्यासक श्री अरुण पुराणिक यांनी दिली),कंकर कंकर से मैं पुछु..(हर हर महादेव)ही भजने ऐकून मन थक्क होते..भक्तीरंगात रंगलेले हे गीताजींचे रूप भुरळ घालणारे,त्यांचे अष्ट पैलुत्व सिद्ध करणारे होते..!!!
त्यांची युगलगीतेही मधाळ होती,वैविध्यपूर्ण होती...
१.."हम आप की आँखो में इस दिल को"...हे प्यासा मधील स्वप्न दृश्यावर आधारित रफीजींबरोबरचे गीत...
२.."आँखो ही आँखो में इशारा" हे सी आई डी मधील प्रणय गीत...ज्याचा मुखडा रफी यांनी म्हटला आहे आणि अंतरे मात्र गीताजींनी गायले आहेत...
३.."चुपके से मिले प्यासे प्यासे"... मंझील चित्रपटातील रफी यांच्या बरोबरचे हे युगलगीत...यात त्यांनी मुखडा आणि अंतरा यांच्या मध्ये प्रथम गद्यात गाण्याच्या ओळी म्हटल्या आहेत.. त्यामुळे गाणे खूप बहारीचे झाले आहे..त्यांचा "मद्धम् "ऐकत रहावा...!!!!
४.."दिल युं युं करता है"...१९४८मध्ये आलेल्या हिर राँझा चित्रपटातील दस्तुरखुद्द खैय्याम यांच्या बरोबर म्हटलेले हे गीत ,आजही तितकेच ताजे तवाने वाटते...नवथर प्रेमाची थर थर अशीच असते का..."अरमान है मिलनेके और मिलने से डरता है"यातील "है" वरील हरकत खूप सुंदर...!!!
५.."तुम जो हुए मेरे हमसफर"...12 '0 'क्लॉक मधील हे गीत डोळे मिटून ऐकणे हा एक सुखद अनुभव...समुद्राच्या लाटांसारखे हेलकावे असलेले हे गीत..नय्यर साहेबांची खूप सुंदर रचना रफी आणि गीताजी यांनी सुंदर गाऊन एक गीत शिल्प साकारले आहे..
६.."दो नैना तुम्हारे प्यारे प्यारे" (श्रीमतीजी...हेमंतकुमार ..गीता)हेही एक रोमँटिक युगलगीत...!!!!गीताजींनी म्हटलेले "जिया धडके शरम के मारे,सजन हम हारे, चलेंगे तेरे द्वारे,'तेरी दुनिया बसाएंगे.. गीताजींचा हा गोड वादा कित्ती सुंदर होता..
७.."गोरी तेरे नटखट नैना'..(हम भी इन्सान है..सुबिर सेन ..गीता)...एक अप्रतिम युगलगीत
८.."आँखो में तुम"..... (किशोर कुमार ,गीता,हाफ टिकट)-या शरारत भर्या युगलगीतात गीताजी किशोर कुमार यांच्यापुढे तितक्याच अवखळ पणे त्यांची साथ देतात...!!!!
९...खयालो में किसिके...(बावरे नैन..मुकेश बरोबर..रोशन)अवीट गोडीचे खूप गाजलेले गीत...!!!!
१०...रिमझिम के तराने लेके आई बरसात...(काला बाजार...रफी यांच्याबरोबर)बरसात च्या मोसमात हे गीत हमखास आठवतेच...!!!!किती समरस होऊन म्हटलंय दोघांनी..गीताजींचा "रुमघुम झुम झुम"चा उच्चार कित्ती सुंदर....!!!!
आपल्या सहगायिकांबरोबरही गीताजींनी अनेक गीते गायिली आहेत..."अखियां भूल गयी है सोना"(गुंज उठी शहनाई ...वसंत देसाई लताजींबरोबर),"जानू जानू रे" (इन्सान जाग उठा...आशाजींबरोबर.. एस डी बर्मन),"बचपन के दिन" (सुजाता..एस डी बर्मन,आशाजींबरोबर),"फुलवा बन महके"(हम भी इन्सान है..सुमनजींबरोबर) अशी अनेक गीते...!!!"बाट चलत नई चुनरी रंग डारी रे" हे "लडकी"चित्रपटातील गीत त्यांनी असे बहारदार पेश केले की चित्रपट संगीतात त्या आल्या नसत्या तर शास्त्रीय संगीत गायिका नक्की झाल्या असत्या...त्यांच्या गीतातील वैविध्य थक्क करते...सुजाता मधील "नन्ही परी सोने चली, हवा धीरे आना "ही लोरी त्यांनी ज्या ममतेने आणि लडिवाळ पणे म्हटली त्याला तोड नाही...!!!!प्यासा मधील "आज सजन मोहे अंग लगा ले जीवन सफल हो जाये..."यातील प्रियाच्या मिलनाची ओढ,त्यासाठी तिची होणारी तगमग त्यांनी तळमळीने व्यक्त केली..तर "जाने क्या तूने कही" हे जणू स्वरांचे मोहजाल होते....!!!गीताजींचा स्वराला गहन खोली होती,नाद होता,मंतरुन टाकणारी अदा होती... त्या जीव ओतून गात असत..."ता थैय्या करते आना"(पंचायत),"है ये दुनिया कौनसी"(सैलाब),"बरखा की रात में"(सरदार),"माने ना माने ना"(सवेरा)हे त्याचे काही पुरावे...!!!!
हिंदी सोबत त्या बंगाली,गुजराती अगदी मराठीतही गायल्या.. वसंत बापटांचे "जा सांग लक्ष्मणा सांग रामरायाला "या गीतातील सीतेची वेदना त्यांनी बोलकी केली तसेच "मुक्या मनाचे बोल साजणा" हे देखील त्यांचे गाजलेले गाणे..."शाहीर परशुराम" यांची एक लावणी त्या ठसक्यात गायच्या..."बोले कावळा लवतो डोळा "ही ती लावणी...संगीतकार होते श्री वसंत पवार...!!!!
हेमंतकुमार आणि गीताजी दोघेही बंगाली...आणि त्यांचे आपसातील ट्युनिंगही चांगले होते."आनंदमठ ते साहिब बीबी और गुलाम" ची ही सुरिली मैफल छान रंगली...!!!"जय जगदीश हरे "मधील त्यांचे स्वर दैवी असल्याचा साक्षात्कार होतो...मनाच्या गाभाऱ्यात भक्तीची ज्योत तेजविणारे गीत होते ते...!!!!
"शर्त" या चित्रपटात गीताजींनी गायलेले "न ये चांद होगा ,ना तारे रहेंगे,मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे"हे गीत जणू आपल्यावर मोहिनी घालते...!!!गीताजींचा स्वर ऐकत रहावासा वाटतो ,एका अनाम दुनियेची सफर घडवितो...तसेच "बादबान" मधील "कैसे कोई जिए " हे गीत सुद्धा आपल्या मनसागरात दु:खी लाटांची खळबळ माजविणारे...गीताजींनी हे दु:खाचे आकाश किती संयमित स्वरात तोलले आहे...त्या दु:खाच्या परिघाची व्याप्ती त्यांनी लीलया आपल्या स्वरातून व्यक्त केली आहे..!!!
हेमंत कुमार आणि गीताजी यांचे स्वर युगलगीतात पूरक ठरतात..."ठंडी हवाओ में तारों की छाव में(बहू..तलत महमूद यांच्याबरोबर) आणि तुम और हम भूल के गम (फेशन),गुमसुम सा ये जहाँ ,ये रात है जवा (दुनिया झुकती है)ही हेमंत कुमार यांच्याबरोबरची त्यांची अवीट गोडी लाभलेली द्वंद्ववगीते...!!!!
"साहिब बीबी और गुलाम" हे गीताजी आणि हेमंतकुमार यांच्या संगीतातील अत्युच्च शिखर...!!!चित्रपटातील छोट्या बहूच्या(मीनाकुमारी) वेदनेला वाचा फोडणारा त्यांचा स्वर मनावर ठसतो... तिच्या दु:खाचा पदर अन पदर आपल्या स्वराने गहिरा करतो... पतीची वाट पाहून पाहून थकलेली विरहिणी म्हणते....."जिया बुझा बुझा,नैन थके थके...पिया धीरे धीरे चले आओ...कोई दूर से आवाज दे चले आओ" काहीशी गूढ,एक अनामिक ओढ त्या स्वरातून व्यक्त होते...बाहेर ख्याली पतीचे मन जिंकून घेण्यासाठी ती साज शृंगार करते ...आणि म्हणते "पिया ऐसे जिया में समाय गयो रे की मैं तनमन की सुध बुध गवा बैठी"......पतिला आपल्या अधीन करून घेण्यासाठी ती मदयप्राशन सुद्धा करते...पण तरीही तो घराबाहेर चालला आहे हे पाहून ती म्हणते "ना जाओ सैय्या छुडाके बैय्या".... !!मीनाकुमारीच्या अभिनयाला गीताजींच्या गहिऱ्या स्वरांची साथ लाभल्याने त्यांच्या अभिनयाला चार चांद लागले आहेत....!!!!"कोई दूर से आवाज दे चले आओ" हा गीताजींचा स्वर जणू आपल्यावर मोहिनी घालतो...त्यातील वेदना,दु:ख ,आर्तता मन कातर करते...!!!
गीत कोणतेही असो, त्यात सर्वस्व ओतून गीतातील भाव जिवंत करणे हा गीताजींचा स्थायीभाव....म्हणूनच "प्रीतम आन मिलो"हे सी एच आत्मा यांनी गायिल्यावर सुद्धा त्यांच्या आवाजातही ते तितकेच व्याकुळ वाटते,आत्मा यांच्यासमोर त्या कुठेही फिक्या पडल्या नाहीत,तसेच "न ये चांद होगा "हे हेमंतकुमार यांनी सुद्धा गायले आहे ,पण गीताजींनी तिथेही हेमंतकुमार यांच्या तोडीस तोड गीत सादर केले आहे..."बादबान" मधील "कैसे कोई जिये" हे गीतही त्यांनी प्रभावी पणे ,निराशेचा डोह गहिरा करत म्हटले आहे...!!!!"वक्त ने किया क्या हसी सितम"हे गीत म्हणजे दु:खाचा कडेलोट...गीताजींनी ते जीव ओतून गायले आहे...त्यांचा स्वर जणू आत्म्याला भिडतो....!!!
जायेंगें कहा सुझता नहीं
चल पडे मगर रास्ता नहीं,
क्या तलाश है कुछ पता नहीं,
बुन रहे है हम ख्वाब दम-ब-दम...
काळ माणसाला निमिषार्धात कुठून कुठे नेतो ना...!!!एवढी गुणी कलावती...बंगालची शान.. गाण्यातील नेमकी भावना ,मग ती वेदना असो खुशी असो,रुसवा असो,नाराजी असो त्या नेमकी आपल्या स्वरात पकडत,आणि गाणे सजवत ...गुरुदत्त च्या चित्रपटात गाताना त्यांनी जीव ओतला होता...आरपार,बाझी,साहिब बीबी और गुलाम,प्यासा,कागज के फूल,चौदहवी का चांद या चित्रपटासाठी त्यांनी आपले सर्वोत्कृष्ट दिले... सचीनदा एकदा म्हणाले होते, "वो जब गुरुदत्तके लिये गाती है तो गलेसें नही, दिलसें गाती है!"दैवाचे फासे उलटे पडले..."वक्त ने किया"या गाण्यातून भळभळणारे दु:ख तिचे स्वतःचे होते का....मन कासावीस होते...!!!!डोळे पाणावतात....!!!गुरुदत्त गेल्यानंतर तिची जबाबदारी वाढली..हक्काचे संगीतकार दुरावले.. एके काळी नय्यरसाहेबांच्या संगीतातील मुख्य गायिका त्या होत्या,सगळी मादक गीते ते त्यांच्याकडून म्हणून घेत...पण त्यांच्या संगीतात आशाजी आल्या आणि गीताजी लुप्त होत गेल्या...!!! तरीही त्यांच्या मनातील आशेची ज्योत विझली नव्हती...
कोई चुपके से आके
सपने सुलाके मुझको जगाके
बोले की की मैं आ रहा हूँ
कौन आया....!!!!
गीताचे ते सुरांचे अवकाश आजही तिला खुणावत होते.... नियतीशी झगडून ती थकली होती पण स्वर मात्र तसाच होता ,सतेज...ताजा...जीवनाची समीकरणं बदलली पण गाण्याची ओढ तशीच होती...हृदयातून प्रकटणारा स्वर तसाच होता.... म्हणत होता....!!!
चांद है वही
चांद है,वही सितारे है
वही गगन...
फिर भी क्यूँ उदास है
उदास मेरा मन..
©मानसी पटवर्धन..
No comments:
Post a Comment