Sunday, August 23, 2020

विंदा करंदीकर



[23/08, 12:03] Charudatta Kulkarni: किर्र रात्री सुन्न रात्री
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई

स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्‍ट
दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ

पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !

आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,

डोक्यावरती हँट बीट,
तुम्ही फसाल ! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय ?
नागोबाचा लंबा टाय !

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !
आले आले थातूमातू ;
खाते सातू जर सातू

नसले घरात तर बसते
नखे खात. रोज रात्री
मांजरावरुन हे येते
जग फिरुन, हे भूत

आहे मुत्रे, तरी त्याला
भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आले आले अरेतुरे ;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.

जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण ’कारे’ म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरुन
भुते घेतात स्वैपाक करुन
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.

किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आला आला पिंपळावरुन
एक मुंजा संध्या करुन.

त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्‍तासारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.

तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करु,
पोथीवाचन झाले सुरु;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले !

– विंदा करंदीकर
[23/08, 12:06] Charudatta Kulkarni: कविता मला आवडलेल्या …..
मानवाचे अंती एक गोत्र
      5 Votes

मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा;

-हाईनमध्ये ‘नंगा’ करो स्नान.

सिंधुसाठी झुरो आमेझान थोर’

कांगो बंडखोर टेम्स साठी

नाईलच्या काठी ‘रॉकी’ करो संध्या;

संस्कृती अन वंध्या नष्ट होवो.

व्होल्गाचे ते पाणि वाहू दे गंगेत

लाभो निग्रो रेत पांढरीला

माझा हिमाचल धरो अतंर्पट

लग्नासाठी भट वेद्द्रष्टा!

रक्तारक्तातील कोसळोत भिंती

मानवाचे अंती एक गोत्र

छप्पन भाषांचा केलासे गौरव

तोची ज्ञानदेव जन्मा येवो.

जागृतांनो फेका प्राणांच्या अक्षता

ऐसा योग आता पुन्हा नाही!
[23/08, 12:32] Charudatta Kulkarni: Home | Login   मराठी
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा
BOI
Follow Bookmark Share
Sunday, August 23 | 04:00 AM
...
...
‘देणाऱ्याने देत जावे...’ या आपल्याच कवितेत सांगितल्याप्रमाणे स्वतःला पुरस्काराच्या रूपाने मिळालेल्या लक्षावधी रुपयांचे अत्यंत सहजपणे सत्पात्री दान करणारे विंदा हे महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे कवी. आज, २३ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्या काही आठवणी...
..........................
२३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील धालवलीमध्ये जन्मलेले गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त उत्तुंग व्यक्तिमत्त्व! लहानपणी वार लावून जेवण्याची वेळ आलेले आणि पुढेपुढे स्वतःला ‘कंजूष कोकण्या’ म्हणवून घेणाऱ्या विंदांनी प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे मिळालेल्या लक्षावधी रुपयांचे पुरस्कार निरनिराळ्या संस्थांना दान म्हणून देऊन टाकले होते हे आवर्जून नोंद घेण्यासारखेच!

कॉलेजमध्ये असताना माधव जूलियन यांच्यासारखे विद्वान कवी गुरू म्हणून लाभल्यामुळे विंदांची कवी म्हणून जडणघडण झाली. मराठी कविता छंदामधून मुक्त करून एक नवीन भाषा त्यांनी कवितेला दिली. त्यांच्यात मार्क्सवाद पुरेपूर होता. ‘तेच ते तेच ते...’ सारख्या कवितेतून त्यांनी मांडलेलं सामान्य माणसाचं आयुष्य वर्षांमागून वर्ष गेली तरी अजूनही तस्संच असल्याचं जाणवतं हे त्यांच्यातलं द्रष्टेपण सिद्ध करतं. मराठी कविता सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पाडगांवकर आणि बापट यांच्याबरोबर कविता सादरीकरणाचे प्रयोग गावोगावी केले.

अस्सल कोकणी बाणा अंगात मुरलेल्या विंदांच्या अनेक कवितांमधून आपल्याला नावीन्यपूर्ण कल्पना आणि जोडीला विनोदाची पेरणी दिसते. विंदा प्रचंड मिश्कील होते...आपल्या कोल्हापुरात घालवलेल्या तरुणपणातल्या आठवणींवरची त्यांची ही कविता पाहा –

असेच होते म्हणायचे तर - अशी अचानक भ्यालीस का?
अर्ध्या वाटेवरती  जाऊन, पुन्हा परत तू आलीस का?
असेच होते म्हणायचे तर - वरवर फसवे हसलीस का?
स्वप्नाला चुरडून मिठीतच, पुन्हा तयावर रुसलीस का?
असेच होते म्हणायचे तर - उगाच खोटे रडलीस का?
भरात येऊन भलत्या सलत्या, करांत माझ्या शिरलीस का?
असेच होते म्हणायचे तर - अशी जिवाला डसलीस का?
केस मोकळे ओले घेऊन, वणव्यामध्ये घुसलीस का?..’

.......या जन्मात ‘तिला’ ‘पटवणे’ जमले नाही तरी पुनर्जन्मावर विश्वास ठेवून लिहिलेली ही गझल पाहा –

माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी...
तू झुंजूमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी
मी वेंधळा मग सांडतो, थोडा चहा बाहीवारी...
तू बोलता साधेसुधे, सुचवून जाशी केव्हढे
मी बोलतो वाचाळसा, अन् पंडिती काहीतरी...
होशी फुलासह फूल तू, अन् चांदण्यासह चांदणे
ते पाहणे इतकेच मी बघ, मानले माझ्या करी...  
म्हणतेस तू मज आवडे, हा रांगडा सिधेपणा  
विश्वास मी ठेवू कसा, या हुन्नरी शब्दावरी......
लिहिता बटा भालावारी, उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला, ती वाचताना शायरी......

.....आणि कवींची खिल्ली उडवणारी ही त्यांची विरूपिका –

तरुणपणी त्याने एकदा,
दर्यामधे लघवी केली
आणि आपले उर्वरित आयुष्य,
त्यामुळे दर्याची उंची किती वाढली -
हे मोजण्यात खर्ची घातले!..........

विंदांच्या कित्येक ओळी मिश्कील अंगाने जाताजाता जबरदस्त तत्त्वज्ञान  सांगून जातात-
शेक्सपियर आणि तुकारामाच्या भेटीत त्यांनी हे किती सुंदर मांडलंय –

‘...तुका म्हणे विल्या, ‘तुझे कर्म थोर, अवघाचि संसार उभा केला’-
शेक्सपियर म्हणे ‘एक ते राहिले, तुवां जे पाहिले विटेवरी!’
तुका म्हणे, ‘बाबा, ते त्वां बरे केले, त्याने तडे गेले संसाराला;
विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया-’....
आणि शेवटी लिहितात – ‘....दोघे निघोनिया गेले दोन दिशा – कवतिक आकाशां आवरेना!’

विंदा हे श्रेष्ठ कवी तर होतेच; पण समीक्षक आणि लघुनिबंधकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम बालकविता. ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’  कोण विसरेल?

विंदा यांना कबीर पुरस्कार, कालिदास पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, मसाप पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

स्वेदगंगा, जातक, विरुपिका, अष्टदर्शने, संहिता इत्यादी काव्यसंग्रह; स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ, परी गं परी, राणीचा बाग, किंग लियर, फाउस्ट असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

१४ मार्च २०१० रोजी त्यांचं निधन झालं.

(विंदा करंदीकरांच्या ‘... पण हे श्रेय तुझेच आहे’ या कवितेचे ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केलेले रसग्रहण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)






 
Follow us on:

Wednesday, August 19, 2020

खय्याम यांचा जन्मदिवस

 काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये खय्याम साहेबांच्या  वाढदिवसाच्या कार्यक्रमास हजर राहण्याचे भाग्य मला मिळाले होते. माझे मित्र आणि सिनेरसिक संगीत रसिक श्री प्रदीप देसाई (आरबीआय) यांनी अंधेरीला त्यांच्या घरी खय्याम साहेबांचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले होते. मला पण बोलवले होते त्यावेळी खय्याम साहेबांशी खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या मी त्यांना विचारले की ' तेरी आखो का रंग निराला' आणि 'रंग रंगीला सावरा ' अशी छान गाणी आपण  बारूद सारख्या  सो सो  सिनेमासाठी कशी काय  केलीत. त्यावेळेस त्यांचे उत्तर आदर्श होते. ते म्हणाले की "मै संगीत मन लगा के बनाता हूँ. उस समय पिक्चर कौन सी है वो चलेगी  या नही चलेगी इसका विचार नही करता हु.
 और कौनसा गाना हिट  होना ये  ऊस गानेकी अपनी अपनी तकदीर होती है." त्यादिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या मरून कलरचा शर्ट प्रेझेंट दिला होता.
[19/08, 18:20] Charudatta Kulkarni: *आज १९ ऑगस्ट.*
*आज जेष्ठ संगीतकार खय्याम यांचा स्मृतीदिन.*
जन्म. १८ फेब्रुवारी १९२७
मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... ज्यांना सारे जग संगीतकार खय्याम या नावाने ओळख असे.
वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम..
खय्याम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लींत राहणाऱ्या काकांच्याकडे आले. तेथेच राहून त्यांनी आपल्या करिअर घडवण्याची स्वप्ने बघितली. मुंबईत आल्यानंतर त्यां यच्या करिअरला खऱ्या‍ अर्थाने सुरुवात झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पहील्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी पुढे संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नासच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवत असे. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. खय्याम हे गेली ७० हून अधीक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. खय्यार यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून खय्याम टाकले होते. ’कभी कभी’,‘बाजार’,‘त्रिशूल’,‘ नुरी’,‘आखरी खत’अशा अनेक चित्रपटाना त्यांनी संगीत दिले होते. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा गौरव केला होता. खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांना आर्थिक मदत केली जाते. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे १९ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/sN1EQEg4tSo
https://youtu.be/1J2GL1hRrOo
https://youtu.be/Y6JQpwwLcfI

i: *खय्याम* 

संगीतकार मोहंमद झहूर खय्याम हाश्मी   यांचा प्रथम स्मृतीदिन  १९ ऑगस्ट,२०१९
टोपणनाव(खय्याम)

१९५३ ते १९९० या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी साधारण ५० चित्रपटांना संगीत दिले.

यांचा जन्म पंजाबातील राहोन येथे झाला.शालेय शिक्षणाची  त्यांना अजिबात आवड नव्हती,त्या ऐवजी त्यांना चित्रपटसृष्टीमधें नायक व्हायचे होते.  तेव्ह्ड्यासाठी ते दिल्लीला काकांच्या घरी दाखल झाले.काकांनी देखील त्यांना शाळेत दाखल केले पण त्यांचे शाळेत मन रमत नाही हे पाहून त्यांनी संगीत शिकायला परवानगी दिली आणि ते लाहोरला बाबा चिस्ती यांच्याकडे संगीत शिकायला गेले.सहा महिन्यातच त्यांची संगीतातली गती पाहून आपला सहाय्यक होण्यास सांगितले ,त्या वेळी त्यांचे वय होते फक्त १७ वर्षांचे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यानी तीन वर्षे लष्करामध्ये काम केले. दुसरे महायुद्ध संपले आणि नशीब अजमावण्यासाठी ते १९४८ साली मायानगरी मुंबईला आले आणि हिर रांझा या चित्रपटासाठी संगीत देणाऱ्या शर्माजी वर्माजी या जोडगोळीतील शर्माजी म्हणजे खय्यामच होते. ही ओळख पुढे पाच वर्षे राहिली. भारताची फाळणी झाली आणि त्यांचे सहकारी रहेमान वर्मा पाकिस्तानला निघून गेले व खय्याम यांनी एकट्याने संगीत द्यायला सुरवात केली.

लगेचच बीबी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातल्या मोहम्मद रफी यांच्या आवाजतील "अकेले वो घबराते तो होंगे" हे गाणे त्या काळी खूपच लोकप्रिय झाले होते.फिर सुबहा होगी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले ,गीतकार होते साहिर लुधियानवी ,गायक होते मुकेश आणि अशा भोसले. राज कपूर आणि माला  सिन्हा यांनी काम केलेल्या या चित्रपटातील १)वो सुबह कभी तो आयेगी, २)चीन ओ अरब हमारा हिंदोस्ता हमारा,३)अस्मान पे है खुदा और जमीन पर हम .या गाण्यांनी संगीतकार म्हणून त्यांचे नाव झाले आणि शोला और शबनम या चित्रपटाने त्याच्यावर शिक्का मोर्तब झाले.

त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाच्या यादीतल्या काहींची यादी देत आहे.
शगुन,आखरी खत,फुटपाथ.गुलबहार,लाला रुख ,मुहोब्बत इसको कहेते है.कभी कभी, नुरी,त्रिशूल,थोडीसी बेवफाई,बाजार,उमराव जान,आहिस्ता आहिस्ता,दिल ए नादान,रझिया सुलतान आणि अलीकडचा म्हणजे २०१६ सालचा गुलाम बंधू

कभी कभी चित्रपटातील,>>कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है, तेरे चेहरे से नजर नही हटती, मै पल दो पल का शायर हूँ, ही गाणी लोकप्रिय झाली.
उमराव जान चित्रपटातील >इन आखोंकी मस्ती के, ये क्या जगह है दोस्तो,दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए या गाण्यांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले होते.त्यांचे संगीत, गझल च्या अंगाने जाणारे असले तरी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आधार होता.त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही गाण्यांना संगीत दिले आहे. पाव पडू तोरे श्याम,ब्रिज मी लौट चलो,गजब किया तेरे वादे पे एतबार किया इत्यादी. मीनाकुमारीने गायलेल्या 'I Write, I Recite' या अल्बमसाठी संगीत दिले.

बुजुर्ग आणि समकालीन अश्या दोन्ही गीतकारांबरोबर त्यांनी काम केले, या मध्ये मिर्झा गालिब,अली सरदार जाफरी,वली साहेब,मजरुह सुलतानपुरी,साहिर लुधियानवी, नक्श लयलपुरीं,निदा फझली, ही नावे आहेत.

८९ वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी "खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट" स्थापन केला आणि त्यांची सर्व संपत्ती  *रु.दहा कोटी*  या ट्रस्टला दान केली.या ट्रस्ट मधून नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञ याना मदत केली जाते.

खय्याम याना  एकूण तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
१९७७ कभी कभी> सर्वोत्कृष्ठ संगीतदिग्दर्शक१९८२ उमराव जान> सर्वोत्कृष्ठ संगीतदिग्दर्शक२००७
संगीत नाटक अकादमी पुरस्कार > सर्जनशील संगीत दिग्दर्शक २०१०.
 जीवन गौरव पुरस्कार२०११ साली भारत सरकारने त्यांना पदम भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले .

त्यांच्या प्रथम  स्मृतीतीदिनाच्या  निमित्ताने उमराव जान चित्रपटातील सदाबहार *दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए* हे  आशा भोसले यांनी गायलेले गाणे  देत आहे. अभिनेत्री रेखा ने तिच्या अदाकारीने या कोठीवरच्या गाण्याला चार चांद लावले आहेत.
खय्याम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०


[19/08, 18:20] Charudatta Kulkarni: प्रतिभावान संगीतकार खय्याम यांचा आज पहिला स्मॄतीदिन...

खय्याजींसारख्या सॄजनशील ,सह्रुदय,शालीन व्यक्तीशी, त्यांच्या कुटुंबाशी माझे अनेक वर्षांचे ॠणानुबंध निर्माण झाले हे मी माझं भाग्य समजते.  ते नेहमी मला ’बिटीया’ नावानेच हाक मारत असत. 

’सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ या माझ्या पुस्तकातील त्यांच्याविषयीच्या या काही आठवणी...

      पत्रकारितेमध्ये आल्यानंतर एक दिवस
 "जान ए वफा" या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्यावेळी खय्याम साहेबांना मी सर्वप्रथम भेटले होते. 

स्टुडियोतील रेकॉर्डिंग रुममध्ये मी पाऊल टाकत नाही तोच रेकॉर्डिस्टला काही सुचना देत असलेल्या खय्यामसाहेबांनी मान वळवुन माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर ही कोण आहे? कशाला आली आहे? असे त्रासिक भाव अगदी स्पष्टपणे मला दिसले होते. आपलं येणं यांना आवडलेलं दिसत नाही? मला वाटुन गेलं आणि मनातुन मी थोडी खट्टु झाले. हा माझ्यासाठी नवा,नेहमीपेक्षा वेगळा अनुभव होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अनु मलिक या संगीतकारांच्या रेकॉर्डिंग कव्हरेजसाठी गेलं की ते आनंदाने स्वागत करत, रेकॉर्ड होणार्‍या गाण्याविषयी भरभरुन बोलत असत. 

"अच्छा, ठीक है, बैठिये, रेकॉर्डिंग होने के बादही मैं बात करुंगा" स्वत:ची ओळख करुन देत माझ्या येण्याचं कारण सांगितल्यावर रुक्ष पण सौम्य स्वरात त्यांनी मला सांगितलं. 

रेकॉर्डिंग संपल्यावर मात्र रेकॉर्ड झालेल्या गाण्याविषयी, चित्रपटाच्या संगीताविषयी ते बोलते झाले होते.त्यांचा मुलगा प्रदीप या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे याचीही त्यांनी माहिती दिली होती. त्यादिवशी खय्यामजींच्या पत्नी व जेष्ठ गायिका जगजीतजी व प्रदीप सुध्दा स्टुडियोमध्ये हजर होते जगजीतजींचं मधुर हास्य व मोहक चेहरा तिथल्या गंभीर, शीस्तबध्द वातावरणामध्ये वार्‍याची झुळुक यावी तशी प्रसन्नता निर्माण करत होता."तुम अपना रंजो गम" किंवा " काहे को ब्याही बिदेस" ही त्यांनी गायलेली गाणी केवळ मलाच नव्हे तर अनेक सिनेरसिकांना आवडत असतील यात शंका नाही. 

या भेटीनंतर जवळपास दहा-बारा वर्ष खय्यामसाहेबांना भेटण्याचा योग आला... 
त्यांच्याशी पुन्हा भेट झाली ती २००२ मध्ये. त्या भेटीनंतर त्यांच्याशी माझा घनिष्ठ परिचय तर झालाच परंतु त्यांच्या स्वभावाशी देखील माझी ओळख झाली. लेखक-दिग्दर्शक कमाल अमरोही व मीनाकुमारी यांच्या जीवनावर आधारित "इष्काचा जहरी प्याला" या पुस्तकावर मी काम करत होते व त्यानिमित्ताने अमरोही व मीनाकुमारीचे नातेवाईक, त्यांच्यासह काम केलेल्या व्यक्ती, मित्रमंडळी आदिंना भेटत होते. कमाल अमरोही निर्मित "शंकर हुसैन" व " रजिया सुल्तान" या दोन्ही चित्रपटांना खय्याम यांचं संगीत होतं. 
त्यामुळे एक दिवस खय्यामसाहेबांना फोन करुन मी सदर पुस्तकाविषयी माहिती देत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 
"आप संडे दोपहर बारा बजे घर आ जाइए, मैं सिर्फ बीस मिनिट बात करुंगा, आपको जो पुछना है बीस मिनिट में पुछिए, और हां...मुझे देरी पसंद नहीं, आप ठीक बारा बजे आ जना". इतकं बोलुन त्यांनी खाडकन फोन बंद झाला. 

पुस्तकासाठी मला त्यांची भेट हवी होती. जागेच्या-शब्दांच्या मर्यादा सांभाळत वॄत्तपत्रामध्ये त्रोटक लेख लिहिणं आवश्यक असतं. परंतु पुस्तकामध्ये सर्व गोष्टी सविस्तर, सर्व बारकाव्यांसह येणं गरजेचं असतं असं मला वाटतं. "रझिया सुल्तान" ची सर्वच गाणी हिट आहेत. "शंकर हुसैन" हा चित्रपट जास्त चालला नसला तरी त्यातील "आप युं फ़ासलों से गुजरते रहें" (लता मंगेशकर) आणि कहीं एक मासुम" (महंमद रफी) ही दोन गाणी आजही लोकप्रिय आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या संगीताविषयी आणि कमाल अमरोही- मीनाकुमारी यांच्याबद्दल वीस मिनिटांमध्ये सविस्तर बोलणं कसं शक्य होईल ? 

बघु, त्यांची पुन्हा एखादी भेट मागण्याचा प्रयन करु असा विचार करत रविवारी दुपारी ठीक १२ वाजता मी खय्यामजींच्या फ्लॅटची बेल वाजवली. त्यांच्या मुलाने- प्रदिपने दरवाजा उघडला. हाय हॅलो करुन मला बसण्यास सांगुन मी आल्याची वर्दी खय्याम साहेबांना देण्यासाठी तो आतल्या रुममध्ये निघुन गेला.  

काही मिनिटांतच खय्याम साहेबांनी हॉलमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वामध्ये असलेला एक प्रकारचा दबदबा मला पुन्हा एकदा जाणवला. दोन चार वाक्यांमध्ये पुस्तकाविषयी माहिती देत मी त्याचं बोलणं रेकॉर्ड करु लागले.

ते अतिशय तन्मयतेने, मनापासुन मीना कुमारी व कमाल अमरोहींविषयी बोलत होते. काही वेळाने हॉलमधील भिंतीवर लटकत असलेल्या मोठ्या घडाळ्यावर माझी नजर गेली.जवळपास पाऊण तास होऊन गेला होता. पण तरीही मी बोलणं, प्रश्न विचारणं सुरुच ठेवलं. बोलणं संपल्यावर पुन्हा एकदा मी घडाळ्याच्या काट्यावर नजर टाकली तर दोन वाजायला पाच मिनिटं बाकी होती.खय्यामजींनी मला वीस मिनिटं वेळ दिला असला तरी दोन तास आमचं बोलणं झालं होतं. बोलणं पुर्ण होताच त्यांनी जगजीतजींना हाक दिली तशा त्या हॉलमध्ये आल्या.

"ये अनिता है, कमालसहाब और मीनाजी पर कि़ताब लिख रही है, बड़ी होनहार बच्ची है, बहोत मालुमात रख़़ती है". त्यांनी जगजीतजींना सांगितलं. 

पुढे काही महिन्यांत पुस्तक लिहून पुर्ण झाल्यावर प्रस्तावना लिहिण्याविषयी विचारणा केल्यावर खय्यामसाहेबांनी तात्काळ होकार तर दिलाच परंतु कसलेही आढेवेढे न घेता पुस्तकाचं प्रकाशन करण्यास देखील ते राजी झाले. 
त्यावेळेपासुन खय्याम व त्यांच्या कुटुंबीयांशी माझे जवळचे संबंध निर्माण झाले ते कायमचे. आज खय्यामसाहेब या जगात नाहीत, परंतु आपल्या सुमधुर,श्रवणीय गाण्यांव्दारे ते कायम जीवंत रहातील.

खय्यामसाहेबांना विनम्र अभिवादन👏

अनिता पाध्ये
[19/08, 18:23] Charudatta Kulkarni: अर्थाला चाल लावणारा माणूस... 

प्रत्येक गायक, संगीतकार, गीतकार आपल्या आवडीचा असतोच असं नाही. काहीजण आपल्याला कायमस्वरूपी आवडून जातात, काहीजण काही कालावधीत आवडतात, काहीजण उगाचच आवडत नाहीत म्हणजे तसं ठोस कारण काही नसतं पण नाही आवडत. काहीजण एक वेगळा आब, दर्जा राखून असतात, त्यांच्याकडे आदरानेच पाहिलं जातं. मदनमोहन, जयदेव आणि खय्याम हे त्या वर्गातले. मोजकं पण भरीव काम, उगाच तडजोड नाही. उगाच एक ग्रॅमचे दागिने घडवणारे कारागीर नव्हेत ते, राजघराण्याचे दागिने घडवणारे सोनार सगळे. तत्व ठरवणं खूप सोपं असतं, यशापयशाची पर्वा न करता ते शेवटपर्यंत सांभाळणं मोठं कठीण काम. खय्यामनी उच्च दर्जाचं काव्य कायम निवडलं. बाकीच्या संगीतकारांना कुणी बंदी केलीये का पण अर्थ समजणे आणि तो हुडकणे यात फरक असतो. मदनमोहन, जयदेव, खय्याम या तिघांकडे हे कसब होतं.

प्रत्येक संगीतकाराची एक खासियत असते. कुणी ठेकाप्रवीण असतं, कुणी मेलडी छान देतं, कुणी गायला अवघड पण ऐकणीय चाली देतं, कुणी चायना माल देतं - आकर्षक, पटकन संपणारा, कुणी गुणगुणायला सोपं काम करतं तर कुणी एका ठराविक साच्यात काम करतं. खय्यामकडे धावपळ, चमत्कृती, वेगळेपणाचा अट्टाहास दिसणार नाही. जे काय आहे ते सगळं शांत शांत. आपल्याला शांतता सहन होत नाही कारण आपल्याला त्याची सवय नाही. एखाद्या निबिड अरण्यात असणारी शांतता आपण उपभोगू शकत नाही, आपल्याला भीती वाटते कारण सवय नाही. तुम्ही ते किडे बघाल, ते भगभगत्या दिव्याकडे लवकर आकर्षित होतात, भले प्रसंगी जीव गेला तरी चालेल. खय्यामच्या चाली म्हणजे दीपमाळ आहे. भव्य पण शांतपणे तेवणा-या अनेक ज्योती. त्याचं कुठलंही गाणं ऐकाल, धबधबा आढळणार नाही. एक संथ लय असलेल्या नदीच्या काठी बसल्यासारखं वाटेल. संथपणा हा एरवी दुर्गुण असतो पण खय्यामच्या चालीत येतो तेंव्हा तो गुण असतो. काही लोकांचा नशीबी प्रसिद्धी, कौतुक, गुणवत्ता असूनही सतत यश नशीबी नसतं. मदनमोहनच्या नशीबात टुकार हिरो आणि पडेल चित्रपट होते. खय्यामला यश मिळालं, पुरस्कार मिळाले हे त्यांचं भाग्यं. आरडीला टुकार 'सनम तेरी कसम'ल मिळालं फिल्मफेअर, खय्यामला 'कभी कभी' आणि 'उमराव जान'साठी. अलौकिक काम केलंत तरी त्याचं कौतुक होणं नशीबात लागतं. 

खय्यामचा दोष म्हणाल तर एकच, त्याची गाणी त्याची म्हणून ओळखू येतात, त्यातल्या हिरो हिरोईनचा चेहरा डोळ्यापुढे येईलच असं नाही. फारुख शेख, जितेंद्र, खन्ना ते अमिताभ अशी अफाट रेंज त्याच्या गाण्यात होती पण म्हणून ती त्यांची गाणी म्हणून ओळख राखून नाहीत. तलत, लता, आशा, रफी, मुकेश आणि किशोर सगळे त्याच्याकडे गायले. 'त्रिशूल', 'नूरी', 'आखरी खत', 'थोडीसी बेवफाई', 'कभी कभी', 'बाजार', 'रझिया सुलतान' आणि अख्खा 'उमराव जान' अशी क्लासेस ते मासेस रेंज त्यांनी दिली. तलम महमूदचं 'शामे गमकी कसम' ऐकाल कधी. आधीच त्याचा तो कापरा आवाज आणि ती शांत चाल अंगावर येते, उदासीन वाटू शकतं तुम्हांला, ही ताकद असते चांगल्या संगीतकाराची.

आजी म्हणायची, बाहेरचं खाऊ नये, त्या माणसाचा स्वभाव त्यात उतरतो. आता ते शक्य नाही पण खय्यामकडे बघितलं की मला ते पटतं. त्यांचं बोलणं, वागणं किती शांत होतं. खळखळून हसणारे खय्याम क्वचित दिसले, त्यांच्या चाली ऐकाल तर जाणवतं की त्यांचा स्व'भाव त्या चालीत मुक्तपणे संचार करतोय. कुठलंही गाणं घ्या, धावपळ नाही, 'वो सुबह कभी तो आयेगी', 'बहारों मेरा जीवन', 'तुम अपना रंज ओ गम', ' कभी कभी मेरे दिलमे', 'मैं पल दो पलका शायर', 'मेरे घर आयी एक', 'दिखाई दिये यूं', 'करोगे याद तो', 'फिर छिडी रात', 'आजा रे, ओ मेरे दिलबर', 'ऐ दिले नादान', कुठलंही ऐका, एक शांतरस कुणीतरी भरभरून ओततंय असं वाटेल. 'जाव, चने खाव' असा राजकुमारचा टुकार डायलॉग असलेला 'चंबल की कसम' मी पाहिलाय, त्यातलं 'सिमटी हुई ये घडियां' ऐकाल. खय्यामचा दोष इथे कामाला येतो, कुणावर चित्रित केलंय हे नाही कळत तेच बरं आहे. मला 'मिलो न तुम तो' आणि 'ये दुनिया' बघताना पण  हे वाटत आलेलं आहे, मदनमोहनला पार भुईसपाट केलंय त्यात. 

किशोर आरडीकडे कायम वेगळा भासतो असं माझं मत आहे. पण तुम्ही खय्याम कडे किशोर ऐकला तर तसंच वाटेल. 'प्यार कर लिया तो', 'तेरे चेहरेसे', 'मोहब्बत बडे काम की', 'जानेमन तुम कमाल करती हो', 'आखोंमे हमने आपके', 'ये मुलाकात एक बहाना है' आणि 'हजार राहे मुडके देखी', ऐकाल आणि अनुभवाल. गुरु जशी एखादी चीज आपल्या खास विद्यार्थ्याला देतो तसा खय्यामने 'उमराव जान' आशाला दिला. ओपी, आरडीकडची आशा वेगळी आणि खय्यामकडची वेगळी. 'दिल चीज क्या है', 'इन आखोंकी', 'ये क्या जगह है' आणि विषयांतर होईल पण तिचं जयदेवकडचं 'तुमुल कोलाहल कलहमें' ऐकाल, एकच जातकुळी आढळेल. व्रात्य कार्टी जिथे दबदबायुक्त आदर आहे अशा मास्तुरे समोर शांत बसतात, तसे मला किशोर आणि आशा खय्यामकडे दिसतात. 

मरण सगळ्यांनाच आहे. अकाली गेलेत का खय्याम? नाही, पण एकगठ्ठा मतदान व्हावं तशी एकापाठोपाठ एक सज्जन आणि गुणी माणसं नाहीशी होत चाललीयेत. शब्दाला चाल कदाचित कुणीही लावू शकेल, पण अर्थाला चाल लावायला ताकद हवी. 

खय्याम! अर्थाला चाल लावणारा माणूस परवा गेला, एवढं खरं. 

जयंत विद्वांस
[19/08, 18:25] Charudatta Kulkarni: #खय्याम 

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है 
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें

दोन वर्षांपूर्वी , आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाला खय्याम साहेबांनी नव्वद लाख रुपये दान दिले. आयुष्याच्या या टप्प्यावर, विशेषतः सामाजिक जीवनातून निवृत्त झाल्यावर समाजाशी अशी ठेवलेली बांधिलकी पाहायला मिळत नाही. अतिशय कौतुक आणि आदर वाटत असतानाच, मनात पाल चुकचुकली, नव्वद वर्ष ! नव्वद वर्ष झालीही … 
अगदी अजूनही, संध्याकाळ झाली की तलत रुंजी घालतो की. चौसष्ट वर्षांपूर्वी बांधलेले हे  गीत त्याच हळवेपणाने साद घालते.

दिल परेशान है, रात वीरान है ( फुटपाथ ) 
देख जा किस तरह, आज तनहा हैं हम
शाम ए ग़म की कसम

आकाशाच्या कॅनव्हासवर हवे तसे रंग भिरकटवुन सूर्य नुकताच क्षितिजाखाली जातो. ती परवलीची खूण समजून छोटीशी चांदणी हळूच डोकावते. त्या  धूसर प्रकाशात नेहेमीचा परिसरही वेगळा दिसतो. उतरलेल्या सावल्या अंगावर झेपावतात. मन उगाच कातर होते. नको नकोसे विचार गुदमरून टाकतात. मनाच्या खोल कबरीत दफन केलेल्या आठवणी बाहेर येण्यासाठी धडका देऊ लागतात.
मागे टाकलेले आयुष्य, जुन्याच स्वरूपात सामोरे येऊन जाब घेते.
मागे तर जाता येत नाही आणि मागचे विसरता ही येत नाही. 

गाणे सुरूच होते इलेक्ट्रिक ऑर्गनने ...मग पिआनो आणि नंतर स्ट्रिंग इन्स्टुमेंट्स.. त्याला  धरून तलत चा सूर येतो. 
आ भी जा आ  भी जा...ची आर्त विनवणी दिलीपच्या डोळ्यात दिसते. 
फुटपाथ या  सिनेमाला माफक यश मिळाले पण हे गीत तुफान गाजले. 
एक ताऱ्याचा उदय झाला. 

मिळालेलं यश वापरून  घेणे खय्याम यांनी केले नाही. एका वर्षाला एक सिनेमा हे धोरण  ठेवल्याने असेल,  त्यांनी दर्जाशी तडजोडी केल्या नाहीत. 

शोला और शबनम  या  सिनेमात असेच  अजून एक हळवे करणारे गीत आहे, 

जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें ( शोला और शबनम ) 
राख के ढेर में शोला है न चिंगारी है

मोहम्मद रफीच्या पहिल्या दहा गीतांत याचा नंबर लागेल. अतिशय गुंतागुंतीची रचना , 

तुटलेल्या मनाचे बरेच  कंगोरे असतात. विरहाची वेदना, प्रतारणेचे दुःख,  नियतीचा फटका..
आधीच्या विरह गीतात मिलनाची उत्कट इच्छा आहे तर हा विरह मात्र नायकाने स्वतःहून स्वीकारला आहे. त्यात  ठाम निर्धार सुद्धा आहे..
समजूत काढणारे आणि स्वतःच्याच मनाला सावरणार असे हे गीत, स्वतः खय्यामजींचे आवडते आहे. 

मित्राचा त्याग का मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग; मैत्री का प्रेम हा सवाल कठीण. हिंदी सिनेमाच्या आदर्शवादी नायकाचा पर्याय हा
दुसरा असणार हे स्वाभाविक आहे. इथे तो आपल्या प्रियेला समजावत आहे. 
काव्याबद्दल असलेला आदर खय्याम यांच्या  स्वरात प्रत्ययास येतो.शब्दाचे वजन सांभाळून केलेली ही स्वररचना आहे .

सारंगी, मग संतूर  आणि  टोका  चाइम्स बरोबर  बासुरी  सुद्धा पूर्ण गीतात  पाठशिवणीचा खेळ खेळते. सारंगी, बासुरी, गिटार आणि सॉफ्ट व्हायोलिन चा  कल्लोळ आणि  नायकाच्या मनातील ‘controlled” वादळ यांचा मेळ  आहे या रचनेत . 
स्वतःचा स्वार्थ डावलून नायक  समजावतो, 

आरजू जुर्म, वफ़ा जुर्म, तमन्ना है गुनाह
ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता
कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊँ
बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता

१९६६ मध्ये आलेल्या आखरी खत मध्ये असलेली  तीनही गीते गाजली.
 “बहारों मेरा जीवन भी सवारों “ या गीतात  नायिकेची निरागसता आहे.  वयात आलेल्या मुलीचे मनोगत. हे गीत गाजले. 
दुसरे आहे, “ और कुछ देर ठहर “ bold words, full of open lust …आणि त्याला साजेसी sensuous melody. 
Sex can be so sublimely erotic.  

यातच भूपेंद्रचे एक सुरेख गाणे आहे. 

रुत जवां जवां, रात मेहेरबां ( आखरी खत )
छेडो कोई दास्तां 

हे गीत क्लब सॉन्ग. अशा अनवट , अनोळखी आवाजांचा योग्य वापर खय्याम यांनी योग्य जागी केला आहे. नितीन मुकेश चे ‘आजा रे ओ  मेरे दिलबर आजा’ , किंवा सुलक्षणा पंडित चे” माना 'तेरी नजर में ,तेरा प्यार हम नही’  तसेच रझिया सुलतान मधले कब्बन मिर्झा चे ‘ खुदा खैर करे “ .त्यांनी कुठेही दर्जाशी तडजोड केली नाही .. हे आवाज, मुख्य आवाज मिळाले नाहीत म्हणून घेतले नाहीत  असे नाही .. हे आवाज त्या त्या पात्राला फिट्ट बसले आहेत.  
संगीत शब्दाला जागा देते इथे.  सुराबरोबर शब्द सरकतात. भूपेंद्र गिटारिस्ट आहे हे अनेक जणांना माहित  असेल. त्यामुळे त्याचे गिटार धरणे सुद्धा परफ़ेक्ट आहे आणि कॉर्ड्स वाजवल्या जात आहेत ..डोळ्यांना बरे वाटते ते. :) 
हे गीत गाताना , मधल्या जागी पात्रांचे संभाषण आहे ..त्याला कुठेही धक्का येऊ न देता गाणे पुढे सरकते. 
प्रसंगाला धक्का लागू न देता  गाणे मनावर ठसवणे हे खय्याम साहेबांचे कौशल्य आहे. 
आखरी खत या सिनेमाबद्दल बोलताना खय्याम म्हणतात, 
या सिनेमात  चारहजार फूटाचे  संवाद होते तर आठ हजार फुटांची स्तब्धता. चेतन आनंदने  संगीत कसे हे सांगताना म्हटले होते,  निरव शान्तता, मग त्याच्या पोटी असंख्य भावना असल्या तरी चालेल,  ही  संगीताच्या माध्यमातूनच व्यक्त झाली पाहीजे .
या सिनेमातच नाही तर पुढेही खय्याम साहेबांनी या शांततेला बोलके केले. 

ऐ दिल -ऐ - नादान , (रझिया सुलताना)
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है ?

रझिया सुलतान ही प्रेमकहाणी आहे .  एक राणी आणि तिचा गुलाम यांची प्रेमकहाणी. शाही सल्तनतीचे सारे नियम धुडकावून रझिया राज्ञीपद पटकावते. तिच्या मंत्रिमंडळाला, रयतेला  हा निर्णय सुरुवातीला आवडलेला नसतोच पण आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर  रझिया त्यांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण करते. शासक हा जरी प्रजेला बांधील असला तरीही त्याचे स्वतःचे मन असतेच. ते कोणावर जडेल हे तो कसे ठरवू शकतो ! रझियाचे प्रेम आहे जमात उद दिन याकूतवर. हा एक हबशी गुलाम आहे. रयतेला हे  मान्य असणे असंभव . राज्य किंवा प्रेम यातील एकच पर्याय निवडणे रझियाच्या हातात आहे. रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे .

आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है ?
ह्या गीतात शब्द आणि सूर तर आहेतच पण वादळी शांतता आहे. पाच ते सात सेकंदाचे मोठे अल्प विराम या गीतात गुंफले आहेत.  राज्यकरण्याची तिची मनीषा आहेच.  ते केवळ कर्तव्य नाही . ती महत्वाकांक्षा आहे पण ती एक स्त्रीसुद्धा आहे. प्रेमात असलेली स्त्री . राणी का प्रेयसी ह्यातील पर्याय निवडणे दुःखदायक आहे.  

क्या क़यामत है, क्या मुसीबत है,
कह नहीं सकते, किसका अरमाँ है
ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है
ये ज़मीं चुप है, आसमां चुप है
रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे .

हरवलेली ती,  जमिनीकडून, आकाशाकडून आपल्या प्रश्नाची उत्तरे मागते पण ते सुद्धा तिच्या मनातील स्पंदने जाणून गप्प आहेत . एवढी निरव शांतता आहे की फक्त  तिच्या दिलाची  धडकन त्या शांततेची साक्षीदार आहे .
मन आणि हृदय यांच्यात फरक आहे. हृदय भावनेशी बांधलेले  असते. त्याला विचारांची जोड नसते. हृदयातून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. मन, भावना आणि विचारांना स्मरून निर्णय घेते. बंध तोडणे हृदयाला कठीण आहे खरे पण मन मात्र हा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेऊ शकते. महत्वाचे असते ते एका क्षणात निर्णय घेणे. जेवढा जास्त विचार तेवढी मनाची दुविधा. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणे अस्वस्थ करते, गोंधळात पाडते. एकतर ठरवलेला रस्ता अचानक वेगळेच वळण घेतो किंवा रस्त्याच्या फुटणाऱ्या फाट्यावर मन घट्ट करून दुर्लक्ष करावे लागते . भले तो रस्ता कितीही हवाहवासा वाटुदे!  

सिनेमाच्या क्षेत्रात काम करताना , परिपूर्णतेचा ध्यास ठेवणे  हे कठीण आहे. व्यावहारिक यशाच्या मोजमापनात अडकायचे झाले  तर अशक्य कठीण आहे. खय्याम हे सुखद  अपवाद आहेत.सिनेमा कोणत्याही दर्जाचा असो, त्यांच्या संगीताचा दर्जा फार वरचा आहे.

He is a romantic perfectionist . त्यांच्या पत्नीचा प्रभाव असेल ..काही अप्रतिम प्रेमगीते त्यांनी बांधली आहेत.
 

ठहरिये होश में आ लूँ, तो चले जाईएगा
आप को दिल में बिठा लूँ, तो चले जाईएगा

Flirting song ...त्याला उत्तर म्हणून सुमन कल्याणपूरचा हुंकार आहे तो खूप गोड़ आहे.

तसेच शंकर हुसैन मधले “आप यु फासलों से” 

रात आती रही रात जाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे

सुरुवातीलाच लताचे खळखळते हसणे ऐकू येते ..दबलेले.   ...गातानाच  आलेले हसू .. ते नक्की कसले आहे हे समजत नाही . प्रियकराच्या आठवणीने आलेले ..कोणता तरी किस्सा आठवून ..का एवढ्या सुंदर रात्री साथ द्यायला तो नाहीच ह्याने खंतावलेले आहे..

कतरा कतरा पिघलता रहा आस्माँ
रूह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी... इक नदी दिलरुबा गीत गाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही

लता बाईंचा आवाज एवढा स्वर्गीय आहे की हे कठीण सूर…(गाणे परत एका, अतिशय अवघड मेलडी आहे ही..) कुणीतरी आकाशातल्या दूरस्थ आत्म्याचे रुदन वाटते. आणि अंतराच्या शेवटी येणारे काहीसे उपहासात्मक हसू… आता अगदी स्पष्ट…

शंकर हुसेन मधली सगळीच गाणी  अप्रतिम… सिनेमा मात्र  त्याला न्याय देऊ शकला नाही. 
त्यांच्या संगीतात एक नजाकत होती आणि अर्थात संगीताची उत्तम जाण. बुद्धिमान संगीतकारांत खय्याम यांची गणना होते कारण कथा, गीत या सर्वाना अनुसरून त्यांच्या चाली होत्या . त्याच्यापेक्षा त्यातले सूर त्यांनी श्रेष्ठ व्हायला दिले नाहीत.
हे भल्या भल्या संगीतकारांना जमत नाही.. 
मला स्वतःला इथे त्रिशूल, कभी कभी ची गाणी घालायची नाहीत ..पण त्रिशूल मधले एक अंगाईगीत  आहे, “ तू मेरे साथ रहेगा मुन्ने”  एका कुमारी मातेने गायलेली अंगाई आहे ही. नेहेमीसारखा चांदोबा, पर्या, तारे या गीतात नाही. साऱ्या जगानेच नाकारलेली ही स्त्री, मुलाला कणखर बनायला सांगत आहे.स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्याला तयार करते आहे.
हे सूर आहेत विद्रोहाचे ...आणि करुणेचे..
या एकाच गीतात खय्याम यांची “ सिने-संगीतकार’ म्हणून ताकद दिसून येते.  

एका अत्यंत गुणी संगीतकाराला, तेवढ्या ताकदीचे सिनेमा का मिळाले नाहीत हा नशिबाचा भाग आहे..पण त्यामुळे त्या संगीताचे , त्या गीतांचे मोल कमी होत नाही. 

“फिर सुबह कभी तो आयेगी” या गंभीर सिनेमात सुद्धा एक सुंदर गाणे आहे, 

फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझको

गढद निळ्या रात्रीच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी हे चित्रित झाले आहे. मंद सुटलेला वारा, रात्रीची निरव शांतता, लांबून येणारी समुद्राची गाज आणि मुकेशचा हितगुज करणारा आवाज. 
प्रेमाची कबुली सगळ्यांनाच काही स्पष्ट शब्दात देता येत नाही.पण शब्द जरी बुजलेले असले तरी नजर धीट आहे. तिचा अन्दाज त्याला माहित नाही. ती रागावली नसेल याची खात्री तिच्या लाजऱ्या नजरेने दिली असली तरीही खात्री करून घेण्यासाठी तो विचारतो,
 
एक यूँ ही सी नजर दिल को जो छू लेती है
कितने अरमान जगाती है तुम्हे क्या मालूम

प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, त्यात पुढची स्वप्ने आहेत...सोबतीची अपेक्षा आहे. जिच्या प्रेमभऱया नजरेने त्याला ती हिम्मत दिली आहे.त्यांची नजर भिडते मग गडबडून दुसरीकडे वळते ..  त्याचा आता धीर वाढतो.

हर नज़र आपकी जज्बात को उकसाती है
मैं अगर हाथ पकड़ लूं तो खफ़ा मत होना

साहिरचे धीट शब्द, मधात बुडून येतात आणि मग मात्र ती स्पष्ट कबुली देऊन टाकते,

मेरी दुनिया-ए-मोहब्बत है तुम्हारे दम से
मेरी दुनिया-ए-मोहब्बत से जुदा मत होना

फार कमी गाण्यात साशंकता,लज्जा, धिटाई आणि समर्पण एकेमकांचे हात धरून येतात . 
राज कपूर आणि माला सिन्हा साठी सुद्धा हे गीत पहा. त्यावेळचा मेलोड्रामा लक्षात आणला तर खूप वेगळे आणि खरे वाटते..

ही सगळी गाणी म्हणजे शब्द आणि सुरांचा संगम. काव्याची जाण खय्याम साहेबांना होती आणि म्हणूनच कभी कभी सिनेमाच्या संगीतासाठी साहिर यांनी खय्याम यांचे नाव सुचवले. त्यांचा मृत्यू धक्कादायक नाही. वय झाले होते आणि एक संपन्न , समृद्ध कारकीर्द यशस्वीरीत्या संपली होती. तरीही काल  त्यांच्या मृत्यूनंतर सुन्न वाटले. रेंगाळणारी उदासी, जी त्यांच्या गाण्यात दिसते तशीच.. एक पर्व अस्ताला गेले. मदनमोहन, एस डी बर्मन, अनिल विश्वास, सलील चौधरी..आणि त्या वेळचे अनेक, ज्यांच्यासाठी संगीत हा व्यवसाय नाही तर त्यांचा श्वास होता.जगण्याचे माध्यम नाही तर  जगण्याचे कारण होते. ते युग अस्ताला गेले

बरसता-भीगता मौसम धुआँ-धुआँ होगा    
पिघलती शमों पे दिल का मेरे ग़ुमां होगा
हथेलियों की हिना, याद कुछ दिलायेगी   

तुमची गीते सदैव स्मरणात राहतील ..  

 
(  आधीचा लेख खय्यामवर नसून साहिर- अमृतावर झाला आहे असे अनेक लोकांना वाटले, ते खरेही होते..पण ‘ चांदनी रात में इक बार तुम्हे देखा है”, ‘ सिमटी हुई ये घडियां , आणि तुम अपना रंजो गम “ ही तीनही गाणी  माझी अत्यंत आवडती..आणि माझ्यासाठी तरी ती साहिर--अमृता--इमरोज यांची आहेत...त्याबद्दल परत  कधीतरी )

Priya Prabhudesai

अलविदा जसराज जी

 भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🌹🌹🌹🌹

संजीव वेलणकर यांच्या भिंतीवरून साभार 

जन्म. २८ जानेवारी १९३० भोपाळ येथे.
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील  मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे. 
पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.  माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं होते. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते.साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर,कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. पंडित जसराज मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते. पंडित जसराज यांना आपल्या भावपुर्ण श्रध्दांजली.



[
 *आज मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे अमेरिकेत दुख:द निधन झाले.*
*पंडित जसराज यांचा अल्पपरिचय.*
जन्म. २८ जानेवारी १९३० भोपाळ येथे.
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील  मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे. 
पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.  माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं होते. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते.साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर,कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. पंडित जसराज मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते. पंडित जसराज यांना आपल्या भावपुर्ण श्रध्दांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=tujcCI6MLD0&t=354s
https://www.youtube.com/watch?v=O96US8xksoo
https://www.youtube.com/watch?v=nMTkjLWMXLQ
https://www.youtube.com/watch?v=Kh9USxy15js: 


ख्यातनाम गायक पंडित जसराज यांनीच त्यांच्या  एका मुलाखतीत सांगितले होते...

ते भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव  त्यांना जिवंत वाटत असे.

त्यांनी का त्यांच्या मुलाने
नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती. 
पण त्या गडबडीत  तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला. 
पंडितजी अस्वस्थ झाले.  

मेरा कान्हा मुझसे रूठ गया ... असेच सारखे सारखे म्हणत होते. 

आठ दिवसानंतर त्यांची गुरूवायूर इथे  गायनसेवा होती.

पण ह्यांचे म्हणणे  एकच...
जब कान्हा रूठा है तो जीनेमे रहाही क्या है ? 

मुलाला कार्यक्रम रद्द करायला सांगितला. जे नुकसान  होईल तेपण भरून दे असेही सांगितले.  
आणि जणू काही आमरण उपोषण सुरू केले. 
एकच ध्यास... कान्हा रूठ गया है. . अब जिंदगी नहीं जी पाऊंगा..

सगळे जण समजूत काढून थकले ... फोटो शोधून पण थकले ...जुन्या घरी नवीन घरी... कुठेच नाही. .. 

मग तर पंडितजीनी ठरवलेच ..
 आता मेलेलेच बरे...

रात्र झाली. .. घरातील कोणीच जेवले नव्हते.

हळूहळू सर्वजण तसेच उपाशीपोटी झोपी गेले. 

पंडितजी ... जब कान्हा  नहीं है तो ऐसी जिंदगी जीनेसे बेहेतर है की मर जाए... करत करत झोपी गेले... झोप कसली ग्लानीत होते..

पहाटे  ..साधारण  साडेतीनच्या दरम्यान त्यांना एका स्त्रीचा आवाज ऐकू आला व ते जागे झाले. जागो जसराज....

ह्याना कळेना, कोण ह्या ? 

ते... माताजी, आप कौन हो ? और मेरे घरमे इस वक्त? 

...  उत्तर  ऐकल्यावर पंडितजी सटपटलेच...
मैं ...राधा हूं ...
तूने सुबहसे एक ठान ली है और उसके कारण तूने सुबहसे कुछभी नहीं खाया है...

पं.... हां... लेकिन  जब कान्हा  मुझसे रूठे हैं, तो मैं कैसे खा सकता हूँ? 

राधाजी.... किसने कहा तुझे, कि कान्हा रूठे हैं ? और तो और, तुझे मालूम है... तुने नहीं खाया है सुबहसे... इसी कारण तेरा कान्हा भी अबतक भूखा है...  उसने भी कुछ नहीं खाया है... 
अगर कान्हा नहीं खाता है, तो बाकी हम सब कैसे खा सकते हैं?
अब उठो और कुछ खा लो ..
तसबीर मिल जाएगी..

अचानक पुन्हा अंधार ...
पंडितजीनी सर्वांना जोरात हाका मारून उठवलं . 

हा किस्सा सांगून पत्नीला ताबडतोब ताजा स्वयंपाक करायला सांगितले आणि नैवेद्‍य दाखवून खाऊन घेतले .. 
प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते.

ठरल्याप्रमाणे गुरूवायूर येथे  गेले ... 

सकाळी मंदिरात दर्शनाला गेले होते. 
गर्दीत सगळे थोडे पुढेमागे  झाले.

अचानक त्यांच्या मुलाला एका लहान व गोंडस मुलाने हटकले .. ये आपके पिताजीको देना.. मुरलीधरने दिया है ...
असे म्हणून  एक गुंडाळी दिली.

मुलानं त्यांना हाक मारून बोलावले व हातात ती गुंडाळी दिली. निरोपही सांगितला...

उघडून पहातात तर तोच फोटो होता.. श्रीकृष्णाचा ... जो सापडत नव्हता.

अरे, वह छोकरा कहां है ?  ढूंढ लो उसको..

खूप शोधलं ....पण.........

सोनी टी व्ही वर...
"मानो या ना मानो" ...
ह्या कार्यक्रमातील किस्सा. 
पंडितजीनी स्वतः सांगितलेला...


#नशेत_गुंगवणारा_तापसी

नक्की सांगता येणार नाही १९९२ की १९९३, पण एक नक्की शाखा सोडली होती. अर्थात तिथली जिवाभावाची सुटली नव्हतीच. त्यातलेच दोघे, काळे बंधू. जुन्या तांबट आळीत राहणारे. धाकट्यामुळे कंटाळून का होईना पण शास्त्रीय संगीत ऐकावसं वाटायला लागलं. आणि थोरल्यानी भले टोमणे मारू देत, पण बरंच काही चांगलं ऐकवलं.  

अशाच एका संध्याकाळी ड्यूटी संपल्यावर गेलो घराकडे. बघितलं तर दाराची फळी जवळपास बंद. पण नाही. आत अंधार असला तरी उजेडाची तिरीप आत जाताना दिसली. ढकललं तर दार उघडलं. भस्सकन आत शिरलो तर अंधार. थोरले पलंगावर बसलेले, ओठांवर बोट ठेवून शांत रहायची खूण, आणि लगेच कानांकडे बोट. म्हणजे ऐकायची खूण.  लक्षात आलं काही तरी ऐकायला मिळणार.

नुकतीच कॅसेट लावली होती. पूर्ण अंधार, एक उजेडाची तिरीप आणि एक सुंदर स्वर. श्री अ नं त ह री ना रा  य ण…. मागे तंबोऱ्याचा सुस्पष्ट आवाज, आणि पाण्यावरच्या लहरी दाखवतांना ज्या वाद्याचा आवाज येतो तो आवाज मधून मधून. स्वरमंडल म्हणतात ते नंतर कळालं.

आणि आवाज लावला बुवांनी, कौन जिया ठाने, मंगलाचरण म्हणून झालं होतं, आणि ठॅणकन साक्षात्कार झाला हे ऐकलंय आधी नक्कीच. ते ही सकाळी मंगलमय सकाळी. बुवा गात होते आणि मग एकेक खूण पटत गेली.

भुसावळात दिवाळीच्या तेल लावून अभ्यंगस्नानानंतर, हळूहळू फटाकड्यांचे आवाज येत असतांना, फराळाची ताटं हाती आलेली असतांना, आत्येबहिणी, जोगळेकर सिस्टर्सपैकी कुणी आग्रह केल्याने, आत्याच्या मिस्टरांनी लावलेल्या कॅसेटवरचा हा राग, आणि त्याच्या कव्हरवर वाचल्यामुळे कळालेलं, राग बैरागी भैरव. 

खूणगाठ पटलीच. आणि मग कळलं थोरल्याने शांत रहायची खूण का केली ते. खरं तर ती वेळ संध्याकाळची. पण डोळे मिटले आणि त्या स्वरांची नशा चढायला लागली. एकेका स्वराबरोबर आठवत गेल्या काही सुंदर पहाट वेळा. द्रुत लयीतले शब्द होते बांवरी बनाये की गये, पिहरवा मोरे, खरंच खरंच, वेड लावणारी नशा.

राग संपल्यावर थोरल्याने लाईट लावली, आणि काही बोलायच्या आत मी ठॅणकन म्हणालो. बैरागी भैरव. थोरले थक्क. रेड्यानी गीता म्हणावी तेवढे अचंबीत.

हा बैरागी भैरव, भैरव, पुरीया धनाश्री आणि मारवा, हे बुवा रंगून जात ती नशा गुंगवणारी.

असंच एकदा सांगलीत आल्यावर, एकांबरोबर त्यांच्या रानात जायचा म्हणजे शेतात जायचा योग आला. ते कट्टर हिंदुत्ववादी. शहीद म्हणू नका हुतात्मा म्हणा आणि पुढे शिवी. ती नॅचरली यायची. आम्हांला सवय झाली होती. भीमण्णांची भजनं वगैरे ऐकतात माहिती होतं. आम्ही साताठ जणं होतो. रात्री जेवण झाल्यावर सगळी रिलॅक्स झालो होतो. मधेच ते म्हणाले, हेरंबा मोबाईलवर छानसं काही ऐकव. तु ऐकतोस तसं. 

बाहेर डोलणाऱ्या शाळूवर चांदणं टपटपत होतं. बुवांचं नाव यु ट्यूबला टाकलं, पहिला राग दिसला तो लावला. नेमका निघाला भैरव आणि चीजेचे शब्द, मेरो अल्लाह मेहेरबान. साऊंड फुल सोडला होता. क्षणात ते सोडून बाकीच्यांनी चमकून पाहिलं माझ्याकडे. मलाही लक्षात आलं, झाली चुक, पण….

त्यांच्याकडे बघतांना चिडलेले जाणवले, पण तोवर बुवांच्या ताना सुरू झाल्या आणि ते रंगले. चेहरा निवळत गेला. तबल्याच्या अनुषंगाने बोटांनी ठेका पकडला होता. अल्लाह मेहेरबान संपल्यावर पुढचा राग सुरू झाला, आणि मंगलाचरणानंतर शब्द आले, नैय्या लगा दे मोरी पार, भवसागरातली ही नाव पार कर ही विनवणी. ते खुललेच अक्षरश: आणि… आणि नंतर एका विलक्षण स्वरवेलीच्या आविष्कारानंतर शब्द आले, ख्वाजा तुम बडे गरीब नवाज, नैय्या लगा दे मोरी पार.

आता मनातल्या मनात मी माझ्या नशिबाला श्या घातल्या. पण ते म्हणाले, मृगनयना रसिक मोहीनीच्या जवळचा आहे का रे राग?. म्हणलं हो. तो दरबारी कानडा, हा गुंजी कानडा. 

Xxx मजाय रे ही, ते म्हणाले आणि तो राग संपल्यावर जे लागलं तिथे तर ते खुष झाले, राग होता हंसध्वनी आणि चीजेचे शब्द होते, पवन पूत हनुमान लला तुम.  इथे ते खुलले. बाकीच्यांनी निश्वास टाकला. सगळं झाल्यावर ते म्हणाले, नक्कीच हे बुवा तपस्वी असावेत गाण्यातले, तापसी म्हणतात तसे. मला अल्लाह ख्वाजा ऐकलं तरी भडकतो पण ऐकावंसं वाटलं. नाव सांग. मग सांगितलं नाव बुवांचं.

किती आणि काय काय ऐकलंय. हां त्यांची नक्की कोणती गोष्ट आवडते हे सांगितीक व्याकरणात नाही सांगू शकणार, पण हे गाणं गुंगवणारं, परत ऐकायची नशा लावणारं, आणि तरीही गाणारा स्वत:च्याच धुनकीत रममाण होऊन, जग विसरून रमणारा, जोगी, तापसी असावा हे जाणवून देणारा. कारण प्रत्येकवेळी एक सात्विक भावना उमटविणारा.

पहाटे भैरव, बैरागी भैरव , भटीयार ऐकावा, दुपारी रसिक निरंतर पलना झुले चा मधमाद सारंग स्वरांच्या लयबद्ध हिंदोळ्यावर ऐकावा. संध्याकाळी गुंजन लागी चा पुरीया धनाश्रीतला खर्ज आर्तता जाणवायची सुरूवात झाली आहे हे कळवून नंतर निषाद, रिषभ, धैवताशी खेळत ती आर्तता, ती हूरहूर, ती खिन्नता मारव्यातून चरन प्रित करूणानिधानकी हे अंतीम सत्य जाणवून देईस्तोवर प्रवास व्हावा.

आणि हे सगळं एका निराशेच्या टोकावर जात असतानांच, कानड्यातला कोणताही प्रकार यावा, पुन्हा मनात एक नवी उमंग दाटून यावी, आणि मग यावा अडाणा, माता कालिका…. 
खङगमुंडखप्परकरधरिणी करधरिणी असे उच्चारी खडखडाटी शब्दही स्वरांमुळे विनवणीचा कोमलपणा घेऊन यावेत आणि मातेची विनवणी करतांना तारसप्तकांपर्यंत तानांवर ताना ऐकाव्यात.

असं म्हणतात बुवांनी हा राग गायल्यावर महाकालीच्या मूर्तीतून आंसवे गळाली. खरं खोटं माहिती नाही पण अप्रत्यक्ष ऐकतांना आतपर्यंत ती विनवणी पोचते, तिथे प्रत्यक्ष ऐकतांना काय होत असेल?

फक्त एक झालंय आजपावेतो त्यांचं सुमिरन कर ले मोरे मना पूर्ण नाही ऐकू शकलो. त्रिपूरी पौर्णिमेला थंडगार वातावरणात रात्री आजुबाजुला दगडी घाटांवर साचलेल्या शेवाळाचा एक विचित्र वास साचलेला असतांनाच, गंगा गोदेच्या पात्रात, पळसाच्या पानांच्या द्रोणात वात लावून दिवा लहरींवर सोडून देतात, आणि तो हलत डूलत, वाऱ्यामुळे फडफडत जातांना हेलकावा घेतो आणि पाणी आत शिरल्याने ज्योत विझल्यावर, तुपकट धुराचा वास सोडत शांत होतो तसं काहीसं या बुवांची भैरवी ऐकतांना होतं. हळूहळू रिक्त होणं. 

नाही जमणार पूर्ण ऐकायला.

प्रत्यक्ष ऐकायचं असं तळतळून कधीच वाटलं नाही कारण अप्रत्यक्ष ऐकतांनाही कायम जवळ होता. स्वरांच्या जवळीकीतून.  शास्त्रीय संगीताची आवड लागण्यात तुम्हीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता.

स्वरमार्तंड, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पदव्या तुम्हांला देऊन गौरवलं गेलं. पण पंडीत जसराज या नावाची सांगड माझ्यापुरती तरी नशेत गुंगवणारा तापसी हीच राहील.

श्री अनंत हरी नारायण........🙏🙏
i: *......और राग सब बने बराती*

                   ✍      सुहास किर्लोस्कर

*पंडित जसराज यांची खासियत म्हणजे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सर्वसामान्य रसिकांसाठी "रोमँटिक" केले.* रसिक श्रोत्यांना त्यांचे गायन आपलेसे वाटायचे, वाटते. असे असूनही त्यांनी टाळ्यांच्या मागे धावण्यासाठी आलापी कधी कमी केली नाही. ते गायचे ते तब्येतीत. एक तास उपलब्ध आहे या कारणास्तव त्यांनी कधीही एका तासात चार रागाचे पॅकेज दिले नाही. किंवा "थोडा वेळ शास्त्रीय गातो आणि नंतर तुम्हाला आवडते ते गातो" असे कधी म्हणाले नाहीत. दर्जेदार आलापी, त्यानंतर विलंबित लयीमध्ये राग विस्तार सविस्तरपणे मेवाती घराण्याप्रमाणे करताना त्यामध्ये स्वतःचा विचार मांडला. जाणकार आणि आम जनता या दोघांची दाद मिळवण्याचे कसब पंडित जसराज यांनी कमावले होते. स्वतः उत्तम तबलावादक असल्यामुळे विलंबित लयीनंतर ते मध्यलयीमध्ये आणि द्रुतलयीमध्ये लय-ताल-स्वर याचा संगम घडवून आणताना सर्व श्रोत्यांना त्यामध्ये सामावून घेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये सहसा त्याच त्या बंदिशी गायल्या जातात. तो प्रघात मोडून जसराजजी यांनी अनेक बंदिशी लिहिल्या, अनेक अनवट बंदिशी ते सादर करायचे.  साध्य शब्दात सांगायचे झाले तर त्यांची मैफल कंटाळवाणी होणार नाही यासाठी ते विशेष प्रयत्न करायचे तरीही लोकानुनयाचा म्हणजे "playing to the gallery" चा अतिरेक कधी केला नाही. 

*अलूरकर यांच्या कॅसेटमधून ते पहिल्यांदा भेटले. एका बाजूला "पुरीया कल्याण" आणि दुसऱ्या बाजूला "बिहाग" असलेल्या त्या कॅसेटची अनेक पारायणे केली.* "आज सो बन" हा विलंबित एकतालामधला पुरीया कल्याण मधला ख्याल आणि त्यानंतर "दिन रैन कछु ना सुहावे, उनके देखे बिन" ही बंदिश उस्ताद नजीमुद्दीन खां यांच्या तबला साथीने खुलवली आहे. 

https://youtu.be/ULMq_-ke3sk

कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला असलेला त्यांचा बिहाग अनेकवेळा ऐकला आणि त्यातल्या त्या रागाच्या प्रेमात पडलो.  "कैसे सुख सोवे निम दारिया" या विलंबित एकतालामधील ख्यालामधील विस्तारात त्यांनी असा काही माहोल तयार केला आहे की आपण तेच संगीत ऐकण्यातल्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेत राहतो. मध्यलय तीनतालामध्ये त्यांनी गायलेली बंदिश "लट उलझे सुलझा जा बालम, माथे की बिंदीया गिर गयी सेज पे, अपने हाथ से सजा, हाथ मे मेहेंदी लगी, मोरे बालम" अजूनही ऐकू येत असते....रेकॉर्ड वाजत नसली तरी. रागाची धून बनवून ती रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहणे हे कलाकाराचे कौशल्य असते. पंडित जसराज यांच्याकडे ते कसब होते. 

https://youtu.be/OVKnETtCCWk

*यानंतर जसराजजी यांचे गायन सवाई मध्ये दरवर्षी ऐकत राहिलो*. गेली पाच सहा वर्षे त्यांच्या गायनामध्ये त्यांचे वय जाणवायचे, त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या चार-पाच शिष्यांचा ताफा असायचा. अन्यथा त्यांच्या त्यापूर्वीच्या सर्व मैफिली जमलेल्या असायच्या. स्वरमंचावर आल्यानंतर सर्व रसिकांना नमस्कार करत "जय हो" म्हणायचे. ते ही त्यांचे एक स्टाईल स्टेटमेंट बनले. सुनील गावस्करने क्रिकेटमध्ये उत्तम खेळाबरोबरच स्वतःचा ब्रँड तयार केला, तद्वत जसराजजी यांनी स्वतः चा "ऑरा" तयार करून चाहत्यांना शास्त्रीय संगीताचे वेड लावले. पं भीमसेन जोशी यांनी जसे किराणा घराण्यात जे काम केले ते पंडित जसराज यांनी मेवाती घरण्यासाठी केले. हवेली संगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जसरंगी जुगलबंदी या त्यांच्या उत्तम संकल्पनेचे सादरीकरण विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं संजीव अभ्यंकर यांनी सवाई मध्ये सादर केले.....,हे म्हणजे "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" असा प्रकार झाला. 

*केदार पंडित यांच्यासारख्या तबला वादक आणि अप्पा जळगावकर यांच्यासारख्या हार्मोनियम वादकांबरोबर त्यांचे "सूर" जमलेले असायचे.* साथीदाराला दाद देता देता ते मैफल रंगवायचे. आप्पा जळगावकर यांच्याबरोबर त्यांचे खास मैत्रीचे नाते होते. पं अरविंद थत्ते साथीला असताना एक आवर्तन त्यांनी तबला साथीने हार्मोनियमवर वाजवल्यानंतर "बजाओ"अशी फर्माईश केली. पं अरविंदजी यांनी त्यांच्या स्वभावानुसार पुन्हा एक आवर्तन न वाजवता मंद स्मित केले.  एकदा सवाई मध्ये तराना सुरू असताना एका तबलावादक साथीदाराला त्यांनी बोटांनी खूण करत "धाडेगीन धाडेगीन" वाजवण्यास सुचवल्याचे बघितले आहे.  जसराजजी स्वतः उत्तम तबलावादक असल्यामुळे त्यांचे उ झाकीर हुसेन यांच्याबरोबर खास नाते होते, जे मैफिलीत जाणवायचे. Masters of India या कॅसेटमध्ये जसराज-झाकीर-अप्पा असा त्रिवेणी संगम झालेला होता. त्या लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये गायलेले मियाँ की मल्हार, हवेली बसंत, "सुमिरन कर ले" हे भजन  ही मर्मबंधातली ठेव आहे. 

https://youtu.be/er7h1QX7zdg

*सवाईमध्ये त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या पण त्यातल्या खास निवडायच्या झाल्या तर एका वर्षी त्यांना स्वरसाथ करण्यासाठी त्यांचे शिष्य संजीव अभ्यंकर मागे बसले होते ती मैफल.* संजीवजी यांनी स्वरसाथ करताना गुरू पं जसराजजी आणि श्रोते यांची वाहवा मिळवली आणि मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.  

https://youtu.be/p6qrZ0yT0vE

*और राग सब बने बराती, दूल्हा राग बसंत*
*मदन महोत्सव आज सखी री अब, विदा भयो हेमंत*
सहचर गान करत ऊंचे स्वर, कोकिल बोले असंख्य
गावत नारी पंचम स्वर ऊंचे स्वर, ऐसो गीत अनंत
कृष्ण दास स्वामिन बड़भागिन, मिल्यो है भावतो…

*पंडित जसराज अनेक रागांचा मदन महोत्सव पेश करत राहिले आणि श्रोते त्या रागांच्या वरातीमध्ये सामील होत राहिले....तल्लीन झाले....मैफल अजूनही सुरूच आहे कारण त्यांचे स्वर आपल्या मनात रुंजी घालत आहेत.*

सुहास किर्लोस्कर
9422514910

Tuesday, August 18, 2020

गुलजार जी Happy Birthday

[
गुलजार - चित्रपट कथा,पटकथा आणि त्यांच्या चित्रपटातील स्त्री...
चित्रपट रसिकांना एखादा चित्रपट खूप आवडतो..म्हणजे काय?. तर..त्याची कथावस्तू (स्टोरी) प्रथम आपल्या मनाचा ठाव घेतेआपल्या भोवतालचीच कथा आहे असे वाटते आणि आपण त्यात रमून जातो. त्या नंतर त्यात अभिनय करणारे कलाकार येतात.संगीत,गाणी,संवाद,चित्रकरण हे एक जमेची बाजू.आणि मग तो चित्रपट गाजतो.यशस्वी होतो.असे हे चित्रपट यशस्वी करण्यात पटकथेचा सर्वात मोठा वाटा असतो.
आता ही पटकथा म्हणजे तरी काय? तर.. त्या चित्रपटाची लेखकाने लिहिलेली मूळ कथा पासून चित्रपट निर्मिती साठी मुद्देसूद लिहिलेली एक संवाद सहित आणखीन कथा म्हणजे पटकथा.
ही पटकथा.जितकी सशक्त आणि मनाला भिडणारी तुमच्या भावना चालवणारी,डोळ्यात पाणी आणणारी आणि दर्शकांना खिळविण ठेवणारी असली तेवढाच चित्रपट यशस्वी होणाया मदत होते.कथा कर (लेखक) हा ऊत्तम पटकथाकार कधीच नसतो.. सिने जगतात अशी पटकथा उत्कृष्ट पणाने लिहिणारी एक जमात असते.त्यांना ' पटकथाकार ' असे म्हणतात "गुलजार" त्या पैकी एक गाजलेले नांव आहे.
चित्रपटाला एक साधारण गती असते.(असायला पाहिजे). ती लक्ष्यात घेता ..सध्या शब्दात सांगायचे तर ..चित्रपटाचा प्रत्येक सिन (दृश्य) कथेनुसार एक पाऊल पुढे गेले पाहिजे. (चालण्याच्या गतीला जसा एक 'फॉर्म' असतोना,तसा सिनेमाच्या दृश्याला एक 'फॉर्म' असायला हवा. हे चित्रपट धूम चालण्याचे साधे,सरळ गणित आहे.)
पटकथा लेखनाच्या यशा मध्ये 'मूळकथा' निवडीला फार प्राधान्य असते.तुम्हाला कथा नीट निवडता आली पाहिजे कथा तुमच्या मनाला भिडणारी,संदेश देणारी असली तर तुम्ही तिच्यात अतिरिक्त कथा कंगोरे, वळण,धक्का दायक प्रसंग खुलवीत आपली लेखन क्षमता आणि प्रतिभाला पूर्ण वाव देऊ शकता.
"गुलजार" प्रत्येक चित्रपट का गाजतात? तर प्रेक्षका ना वैचारिक आणि भावनिक द्वंद्व करायला लावणारी त्यांची पटकथा कारणीभूत असते.
"गुलजार" यांच्या कारकीदीत सफल आणि चर्चित चित्रपट कथा ह्या बंगलोर येथी एक साधारण हॉटेल "वेस्ट एन्ड" मध्ये वास्तव्य करून आजूबाजूचा परिसर निसर्ग रम्य परिसरता फक्त एक साधारण टेबल-खुर्ची वर बसून लिहिलेल्या आहेत.
त्यात एकदा 'मोसम" ची पटकथा लिहीत असतांना त्यानं भेटायला आलेल्या एक चाहत्यां महिलांची बोलण्याची ढब आणि नखरे पाहून त्यानं 'मोसम" मधील 'कजरी' ह्या पात्राची बोलण्याची कल्पना सूचली होती. "वेस्ट एन्ड" हॉटेल मधील एका वेटरच्या मुक्या आणि बधिर मुलाला पाहूनच त्यांनी एक वेगळा संदेश आणि समाजचे लक्ष अश्या व्यंग असणाऱ्या लोकां कडे आकृष्ट करण्या करिता प्रयोगात्मक पटकथा "कोशिश" म्हणून लिहिली होती.(संजीव कुमार,जया भादुरी अभिनित हा चित्रपट समीक्षक यांनी वाखाणला होता.)
"गुलजार" यांच्या काही गाजलेले चित्रपटाच्या पटकथात गुड्डी,कोशिश,मौसम,अचानक,इजाजत,आनंद,अंगूर,हू तू तू.बसेरा,आंधी.मीरा प्रामुख्याने आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटाच्या पटकथा ह्या मोजून दहापंधरा दिवसात तयार झाल्या आहेत.
फिल्मी जगतात जेंव्हा एखादी स्त्री चित्रपट निर्मात्री व्हायचे ठरवते तेंव्हा ती स्त्रीवादी चित्रपटच बनविणार असे गृहीत धरले जाते. पण एखादा पुरुष स्त्री केन्द्री चित्रपट बनवितो, तेंव्हा ते थोडे वेगळ मानले जाते. मला प्रश्न पडतो: गुलजार यांना स्त्रीवादी दिग्दर्शक म्हणून का मानल जात नाही? विशेषत: त्यांनी बरीच केंद्रीय पात्र- "मेरे अपने' मधील मीना कुमारीने साकारलेल्या नानी मा पासून ते पार "हुतुतू" मधल्या तब्बुच्या पन्ना पर्यंत -स्त्री असतांना.
खरोखर हिंदी सिनेमातल्या बर्यच अविस्मरणीय स्त्री भूमिका त्यांच्या चित्रपटात आहेत.या सर्व पात्रांच्या छटा वेग वेगळ्या असतील. पण स्त्रीच सामर्थ्य ( किंवा तिचा दुर्बल पणा ) हे कायम त्यांच्या चित्रपटचा ठळक भाग राहिला आहे. "मी हे मुद्दाम केले नाही,स्त्रियांचं बाजूने पक्षपात केला असे ही नाही पण मी नेहमी सविस्तर काम करतो.माझी पात्रे म्हणजे केवळ रेखाटन नसतात.चित्रपट मधील छोट पात्र--मग ते स्त्री असो की पुरुष नीट आखल जात. कदाचित मी अशा कथा निवडल्या ज्यात स्त्रीपात्र अधिक महत्वाची होती". असे गुलजार म्हणतात.आजचे बरेच आघाडीचे नायक स्त्री केन्द्री विषयान पासून दूर राहणे पसंत करतील.
.स्वत: संवेदनशील असल्यानेआपल्या चित्रपटातील स्त्रीत्वाची वेदना, भावना पकडण्यात ते यशस्वी झालेत का?? या वर ते म्हणतात "यात साहित्याचा फार मोठा वाटा आहे.शिवाय प्रत्यक्ष जीवनात,समाजात आजूबाजूला दिसणाऱ्या स्त्रियांचे पात्र रेखाटन चा बराच सहभाग असतो. औरत ही औरत का दर्द समझेगी हे जुने झाले आहे.कदाचित पुरुषच स्त्रीयांन अधिक चांगले ओळखतात असे ते सांगतात.
आठवून बघा - त्यांची चित्रपटातील स्त्री पात्रे :- नानीमा,आरतीदेवी,कजरी,कुसुम,मीरा,सुधा,रेवा,पन्ना..एका पुरुषाने अगदी जवळून ओळखलेल्या स्त्रिया....++++++++++++++++++++++++
आजची स्पॉट लाईट- आमचा देवानंदची एक खासियत तुमच्या लक्ष्यात आली नसेल.चित्रपटात त्याच्या हातात कुठलेही पत्र आले तर ते कधीच सरळ न वाचता आधी त्याकडे डोळे बारीक करून पाहणारा मग ते पत्र हातात गोल गोल फिरविणार आणि वाचून झाल्या वर त्या वर हाताने फटका मारीत डायलॉग बोलणार..फिल्मी भाषेत याला 'मॅनेरिज्म' म्हणतात..  
- ननावरे वामनराव 

'शहतूत की शाख़ पे बैठी मीना'
('मीनाकुमारी की शायरी')

मीनाकुमारीच्या शायरीवर गुलजारजीनें 
'मीनाकुमारी की शायरी' म्हणून एक सुंदर पुस्तक पब्लिश केलं आहे.
मीना कुमारीचा 1 ऑगस्ट जन्म दिवस असतो आणि गुलजारजींचा 18 ऑगस्ट मीना कुमारीच खर नाव 'महजबीं बानो' ,मीना कुमारी ह्या स्वतः सुंदर गझल लिहत असत.
देखणे व्यक्तिमत्व, त्याचं हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं.मीनाकुमारी मध्ये एक नजाकत होती,तिच्या आवाजात एक दर्द होता गोडवा होता. म्हणूच तिच्या आवाजाची मधुबाला चाहती होती,दिलीप कुमार तिच्या समोर नि:शब्द होत असत.राजकुमार आपले संवाद विसरून जात असत.गुलजार तिच्या शायरीचे दिवाणे होते.भरतभूषण तिच्या ऐकतर्फी प्रेमात होता .त्यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षकही रडत असत, असे सांगितले जाते.
मीना कुमारी यांच्या वाट्याला अनेक शोकात्म भूमिका आल्या. तिच्या चित्रपटातील प्रत्येक नायकासोबत तिचे नाव जोडले गेले. असे म्हटले जाते की तिच्या शेवटच्या काळात तिला फक्‍त दोनच गोष्टी हव्या होत्या एक म्हणजे तिच्या आवडत्या व्यक्ती सोबत वेळ घालवणे आणि दुसरे दारु.म्हणूनच मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हटलं जातं.

'आग़ाज़ तो होता है अंजाम नहीं होता
जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता'

'इष्काचा जहरी प्याला'त्यांनी आयुष्यभर प्यायला.'कमल अमरोही' शिवाय त्यांची कथा पूर्णच होणार नाही मीनाकुमारी आणि अमरोहीजी यांचं रिलेशनशिप ही आगळी वेगळी होती.अमरोहींनीचे मीनाजींशी संबध पार बिघडले होते,तरी ती पुन्हा त्यांच्याकडे का जावू इच्छित होत्या, जगजीत कौर, खय्याम, सुनिल दत्त, यांच्या सांगण्यावरून त्यांनी पाकिजा पूर्ण करायचा निर्णय घेतला होता. मला तलाक देवू नका, मला तुमच्या निकाहमध्ये राहू दया, अशी चिठ्ठी त्यांनी अमरोहींना का पाठवली होती, हे एक कोडंच आहे.असो...मी जास्त काही विस्तृत लिहणार नाही पण...
मराठी वाचकांनी लेखिका अनिता पाध्ये यांचं एक सुंदर पुस्तक 'इष्काचा जहरी प्याला' हे पुस्तक अवश्य वाचावं.
गुलजारजी आणि त्यांच नात एक अनोख होत, गुलजाजींना मीनाकुमारी बद्दल प्रचंड आपलेपणा होता .एक आंतरिक ओढ होती.म्हणूनच आज ही गुलजारजींच्या ऑफिस मध्ये मीनाजींचं मोठं चित्र लावलेल आहे.गुलजार आणि मीनाकुमारी यांची भेट ‘बेनज़ीर’ च्या सेट वर झाली त्यात बिमल राय निर्देशक होते आणि गुलज़ारजी सहायक .गुलज़ार जेव्हा ते स्वतंत्र फिल्म निर्देशक झाले तेव्हा फिल्म ‘मेरे अपने’ मध्ये एक मुख्य भूमिका गुलज़ार यांनी मिनाकुमारीना दिली ..गुलजारजी त्यांच्या शायरीचे दिवाने होते ,मीनाजीं एकदा गुलजारीना म्हणाल्या...
“ये जो एक्टिग मैं करती हूं उसमें एक कमी है। ये फन, ये आर्ट मुझसे नही जन्मा है। ख्याल दूसरे का, किरदार किसी का और निर्देशन किसी का। मेरे अंदर से जो जन्मा है, वह लिखती हूं। जो मैं कहना चाहती हूं, वह लिखती हूं।“
म्हणूनच मिनाजी इतक्या स्पष्ट आणि सच्च्या होत्या ऍकटिंग असो वा शायरी त्यांनी अगदी मनापासून केली.
गुलजार आपल्या अत्यंत आवडत्या शायरा वर एक नज़्म लिहतातं...
शहतूत की शाख़ पे बैठी मीना
बुनती है रेशम के धागे
लम्हा-लम्हा खोल रही है
पत्ता-पत्ता बीन रही है
एक-एक सांस बजाकर सुनती है सौदायन
एक-एक सांस को खोल के, अपने तन
पर लिपटाती जाती है
अपने ही तांगों की क़ैदी
रेशम की यह शायर इक दिन
अपने ही तागों में घुटकर मर जाएगी।
गुलजारजी नी प्रत्यक्षात त्यांच्या मनातील मीनाकुमारी उभी केली.....मीना कुमारीजींनी जेव्हा ही नज्म ऐकली तेव्हा त्यांना हसू आलं त्या त्यावर म्हणाल्या.. “जानते हो न, वे तागे क्या हैं? उन्हें प्यार कहते हैं। मुझे तो प्यार से प्यार है। प्यार के एहसास से प्यार है, प्यार के नाम से प्यार है। इतना प्यार कोई अपने तन से लिपटा कर मर सके तो और क्या चाहिए?”
वा ...क्या बात आहे...प्रेमाचा इतका सुंदर उल्लेख ...यालाच तर प्रेम जगणं म्हणतात ...फक्त एक ऐहसास प्रेमाचा...म्हणूनच गुलजारजी ही आपल्या गीतातून तेच तर म्हणत आहेत...सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो हम ने देखी है ...
आज 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंती निमित्त आणि त्यांचे मित्र गुलजारजी यांच्या 18 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना नतमस्तक होतो ,आज त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.मीनाजी अत्यन्त संवेदनाशील शायरा होत्या त्याचा प्रत्यय आपल्याला
'मीनाकुमारी की शायरी' हे शायरी संग्रह पुस्तकातील गझल वाचल्या वर येईलच ,त्यातीलच ही माझीआवडती अप्रतिम गझल...

महंगी रात...

जलती-बुझती-सी रोशनी के परे
हमने एक रात ऐसे पाई थी

रूह को दांत से जिसने काटा था
जिस्म से प्यार करने आई थी

जिसकी भींची हुई हथेली से 
सारे आतिश फशां उबल उट्ठे
जिसके होंठों की सुर्खी छूते ही
आग-सी तमाम जंगलों में लगी

आग माथे पे चुटकी भरके रखी
खून की ज्यों बिंदिया लगाई हो

किस कदर जवान थी, कीमती थी
महंगी थी वह रात
हमने जो रात यूं ही पाई थी। 

नाझ(मीना कुमारी)

© श्रीकांत
[


🔶’प्रतिभावंत-‘संपूर्ण’’🔶

आत्ता महाराष्ट्रात पडतो आहे तसाच पाऊस तेव्हाही बरसत होता. जराही उसंत नव्हती. आभाळ जर्द निळ्या अन गडद करड्या रंगांच्या ढगांनी नुसतं ओथंबलेलं. शिक्षण पूर्ण करून ग्रुपमधले सर्व मित्र काम-धंद्याला लागलेलो. मी प्रकाशचित्रणाच्या व्यवसायाला सुरुवात केलेली. पण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरीही सर्वांचा नक्की भेटायचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. त्या दिवशी आम्ही कोणत्या ना कोणत्या ट्रेकसाठी जायचोच. शुक्रवार, १५ ऑगस्ट १९८६ या दिवशी सर्वांनी मिळून ‘ड्युक्स नोज’ च्या ट्रेकला आणि मनसोक्त भिजायला जायचे ठरले. पहाटे ६.२५ च्या सिंहगड एक्स्प्रेसने खंडाळा... आणि तेथून पुढे ट्रेक.

मी नुकतेच माझ्या व्यवसायासाठी स्टेट बँकेतून कर्ज घेतलेले. आणि अचानक मला बँकेकडून निरोप आला की त्यांच्या शिवाजीनगर शाखेत सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. कोणी महत्वाचे अधिकारी येणार आहेत. त्या कार्यक्रमाचे त्यांना फोटो काढून हवे आहेत. झालं. घेतल्या कर्जाला जागायला तर हवं. मी मित्रांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा मी नंतरच्या लोकलने येऊन त्यांना सामील होईन. स्टेशनवर जाऊन मी अगोदरच लोकलचे तिकीट काढून ठेवले. बरोबर ७.३० ला बँकेचा सुरू झालेला कार्यक्रम सुमारे पंचेचाळीस मिनिटे चालला. मला ८.३० ची लोणावळा लोकल होती. कॅमेरा पटकन प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला आणि पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून दिला. धावतच शिवाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले. मी आणि लोकल जवळजवळ एकाच वेळी फलाटावर पोहोचलो. मिळाली एकदाची. पण अडचण एकच होती की लोकल लोणावळ्यापर्यंतच होती. मला तर पुढे खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत जायचे होते. अर्थातच माझा ट्रेक माझ्या मित्रांपेक्षा ४.५ कि.मी. ने जास्त असणार होता.

लोणावळ्याला उतरलो. गपचूप रेल्वे ट्रॅकच्या कडेने चालायला लागलो. ढगांनी परत बरसायला सुरुवात केली. आणि आता तर लोणावळ्याचा पाऊस. चेहऱ्यावर ते मोठाले थेंब वेगाने आपटत होते. पण एकूणच वातावरणातला तो कुन्द्पणा, अचानक ढगातून चालल्याचा अनुभव आणि मित्रांना भेटण्याची उत्सुकता यांचा मिलाफ होत पाय भरभर पडत होते. मधेच पाऊस थांबे. काही क्षण उन्हाचे कवडसे पडत. सुस्नात झालेले वनवैभव. झाडांच्या पानांवरून गळणाऱ्या थेंबातून ती किरणे परावर्तीत होताना हिरा चमकल्याचा आभास. ‘हिरा मोती निबजे ...’ ही कुमारजींची बंदिश न आठवली तरच नवल.

साधारण सव्वा तासाच्या चालण्यानंतर मला खंडाळा स्टेशन दिसू लागले. स्टेशन संपल्यावर डावीकडे वर जाणारी वाट आपल्याला ड्युक्स नोजला घेऊन जाते. पावलांचा वेग नकळत वाढला. स्टेशन पार करून थोडा पुढे आलो. तर साधारण शंभर-सव्वाशे फुटांवर एका प्लास्टिकच्या भल्यामोठ्या तुकड्याखाली काही माणसं उभी होती. सगळे जण पाठमोरे. चार जणांनी तो तुकडा ताणून धरला होता. त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर पांढरा पोलो शर्ट, पांढरी पँट, पांढरे शूज आणि काळी छत्री डोक्यावर धरून एक व्यक्ती उभी होती. कोणत्यातरी चित्रपटाचे शूटिंग चालले आहे हे माझ्या लगेच लक्षात आले. आवडीचा विषय. माझे पाय थबकले. 
 
पावसापासून संरक्षण म्हणून तो प्लास्टिकचा तुकडा. त्याखाली कॅमेरामन आणि त्याचे युनिट. त्यातच असणार डायरेक्टर. माझ्या विचारांची साखळी भरभर धावू लागली. कशाचे शूटिंग करीत असतील ते? एखाद्या गाण्यासाठी तर नाही? असे माझे विचार सुरू असतानाच माझ्या मागून म्हणजे खंडाळा स्टेशनकडून एक माणूस धावत आला. तो त्या युनिटकडे ओरडून सांगत होता की पलीकडच्या स्टेशनवरून म्हणजे मंकी हिल स्टेशनवरून ट्रेन सुटली आहे. आणि काहीच मिनिटात ती ट्रेन येथे पोहोचेल. युनिट मधल्या काही लोकांनी मागे वळून पाहिले. त्याबरोबरच त्या छत्रीवाल्यानेही मागे वळून पाहिले. मी त्यांच्यापासून पन्नास फुटांवर असेन. स्तब्ध उभा. पाठीवर सॅक. पूर्ण भिजलेला. प्रकाश पुरेसा नसल्याने आणि त्यातही छत्रीच्या सावलीमुळे त्या व्यक्तीचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. मला पाहताच त्या व्यक्तीने मला जवळ बोलावण्यासाठी एका हाताने खूण केली. मी नकळत माझ्या मागे वळून पाहिले. माझ्या मागे आता कोणीच नव्हते. म्हणजे ते मलाच बोलावत होते तर? त्यांना ते लक्षात आले असावे. त्यांनी परत एकदा खूण केली. आणि मीही त्यांच्या दिशेने चालू लागलो. तोपर्यंत त्यांनी परत युनिटकडे तोंड फिरवले होते.

मी तेथे पोहोचलो. माझी चाहूल लागताच त्यांनी परत पाहिले. आता मी त्यांच्या पासून दोन पावलांवर उभा होतो. माझी आणि त्यांची नजरानजर झाली. त्या भिजलेल्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कारण ती छत्रीधारी व्यक्ती होती सुप्रसिद्ध लेखक, कवी, पटकथाकार, गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक संपूर्णसिंग कालरा म्हणजेच ‘गुलजार’. 

गुलजार या शब्दाचा अर्थ आहे बगीचा. माझ्या पुढ्यात कलेचा बगीचाच उभा होता. माझ्या दृष्टीने माझा अत्यंत आवडता कवी आणि दिग्दर्शक. त्यांनी मला जवळ बोलावले आणि आमच्या दोघांच्या डोक्यावर छत्री धरली. माझ्या ओल्या कपड्यांची जराही पर्वा न करता. मी जणू मूकच झालो होतो. पण मनात अर्थातच लाखो विचारांची आवर्तने चालू झाली होती.

इतक्यात समोरून ट्रेन आली. आमच्या उजव्या बाजूने खंडाळा स्टेशनकडे गेलीही. कॅमेरामनने ट्रेनच्या बरोबरीने कॅमेरा पॅनिंग केले. शॉट ओ के झाला आहे असे सांगितले. केवळ काही सेकंदांचाच तो शॉट. पण त्यासाठी सर्वांनी बरीच तयारी केलेली होती. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. एका अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शकाच्या चित्रीकरणात त्याच्याच छत्रीत उभे राहून ते शूटिंग मी अनुभवले होते. वातावरण हलके फुलके झाले. मी तोपर्यंत मनात शब्दांची जुळवाजुळव केली होती.

मी त्यांना म्हणालो – “ आप गुलजारजी है ना ?” त्यांनी मानेनेच होकार दिला. माझ्या मनात त्यांना किती सांगू आणि किती नको अशा भावना दाटल्या होत्या. मी परत त्यांना म्हणालो – “ मैं ने आपकी हर एक फिल्म देखी है.” यावर त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य उमटले. त्यांना भेटणारा प्रत्येकजण हेच सांगत असणार की! मग ते एकदम म्हणाले – “ मेरी कौनसी फिल्म तुम्हें सबसे अच्छी लगी?” मी क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो – “ कोशिश.” आता ते हसले. माझ्या मनात त्यांच्या ‘मेरे अपने’,  ‘परिचय’, ‘अचानक’, ‘मौसम’, ‘खुशबू’, ‘आँधी’, ‘किताब’, ‘किनारा’, ‘मीरा’, ‘नमकीन’, ‘अंगूर’ या इतर चित्रपटांच्या दृश्यांची एक मालिकाच झळकून गेली. काय समृद्ध काम केलंय या माणसाने.

मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले – “ इस घनी बारिश में, अकेले कहाँ जा रहे थे?” मी त्यांना आमच्या ड्युक्स नोजच्या ट्रेकबद्दल सर्व सांगितले. त्यांना ते सर्व ऐकून अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी मला परत विचारले – “अगर तुम्हारे दोस्त आगे जाकर तुम्हें नहीं मिले तो?” त्यावर मी उत्तर दिले की – “फिर तो मैं अकेलाही ड्युक्स नोज होकर फिर लोकलसे पूना जाऊंगा.”  तर्जनी आणि अंगठा यांच्या चिमटीत नाक पकडून त्यांनी मान हलवली. ते परत एकदा आश्चर्यचकित.

हा संवाद होईपर्यंत मला उत्सुकता निर्माण झाली होती की आता ते कोणती फिल्म बनवीत आहेत? म्हणून तसे मी विचारले. त्यांनी उत्तर दिले – “इस फिल्म का नाम है ‘इजाजत’. अभी जो ट्रेन का शॉट लिया है वह टायटल सिक्वेंस मे आनेवाला है. बाकी फिल्म शूट पुरा हुआ है.”  मी फिल्म मधील कलावंत कोण आहेत हे विचारल्यावर त्यांनी “ रेखा, नसिरुद्दीन शाह और अनुराधा पटेल” ही नावे सांगितली. ती काही मिनिटे आम्ही दोघेही त्यांच्या छत्रीत उभे राहून बोलत होतो. मी तर आधीच भिजलेला होतो पण आता ते ही एका बाजूने भिजले होते. इतक्यात पलीकडच्या रस्त्यावर त्यांची कार आली आहे असा निरोप घेऊन एक माणूस आला. त्यांनी हात हातात घेऊन ‘शेक-हँड’ केला. आणि ते जाण्यासाठी वळले. काही पाऊले गेल्यावर परत मागे वळून म्हणाले –“तुम्हारे ट्रेक के लिये बेस्ट लक. टेक केअर.” त्यांच्या या निरोपानंतर ही स्वप्नवत वाटणारी भेट संपली. माझ्याजवळ माझ्या सॅकमध्ये कॅमेरा असूनही मला तो बाहेर काढता आला नाही याची रुखरुख मनात घेऊन मी ट्रेक पूर्ण केला.

१९८७ मध्ये ‘इजाजत’ प्रदर्शित झाला. पुण्याच्या डेक्कन थिएटर मध्ये मी तो पाहिला. त्यात आशा भोसले यांच्या आवाजात एक अति सुंदर गाणं आहे त्यात शब्द येतात की –
“एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे    आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी      गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो              वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो...”

त्यांच्या त्या भेटीच्या आठवणीने मला परत एकदा खंडाळ्याला नेऊन ठेवलं. भावनांचा किती तरल आविष्कार ! आणि तो ही खास ‘गुलजार’ शैलीत. त्या सिनेमाचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की – ‘इजाजत ही गुलजार यांनी लिहिलेली सिनेमारूपी कविताच आहे.’

नंतर मला एका कार्यक्रमात त्यांची प्रकाशचित्रे घेण्याची संधी मिळाली. पुढे त्यांचे अनेक कार्यक्रम, भाषणे ऐकण्याची संधीही मिळाली. जसा चित्रपट तसेच तरल भाषण. त्यांच्या एका भाषणात मला भावला तो त्यांचा आशावाद. भाषणा दरम्यान त्यांनी त्यांची एक कविता सादर केली आशावादाने ओतप्रोत भरलेली -

“ थोडेसे करोडो सालोमें, 
सूरज की आग बुज़ेगी जब,                               और राख उडेगी सूरजसे, 
जब कोई चाँद न डुबेगा,                                   और कोई जमिन न उभरेगी, 
तब एक बुज़े कोयलेसा 
टुकडा ये जमिन का घुमेगा,
भटका भटका...मद्धम मद्धम... 
खाकिस्तरी रोशनी में...

मैं सोचता हूँ उस वक्त अगर, 
कागज़ पर लिखी एक नज़्म कही,                       उडते उडते कही सूरज में गिरे, 
और सूरज फ़िरसे जलने लगे...”

येत्या १८ ऑगस्टला ‘गुलजार’ या प्रतिभावान कलावंताची ८५ वर्षे पूर्ण होतील. त्यांचा हा आशावाद त्यांना त्यांच्या शंभरी पर्यंत विनासायास घेऊन जाईल या शुभेच्छांसह.....

- सतीश पाकणीकर / ९८२३० ३०३




#शंभरनंबरी_सोनं 

एक साधा मोटार मेकॅनिक असलेल्या मनुष्याचे आयुष्य लेखन आणि सिनेमाच्या जगतात व्यतीत होऊ शकते यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे. माखनसिंह कालरा आणि सुजन कौर या दांपत्याच्या मुलाच्या आयुष्यात हे घडलं गेलय व या मुलाचं नाव होतं संपूरन सिंह कालरा... सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या दिना मध्ये या संपूरन चा जन्म झाला १९३४ मध्ये, फाळणीच्या चटक्या नंतर हे कुटुंब मुंबईत आलं आणि परिस्थितीशी झगडू लागलं, त्यामुळे संपूरनला आपले शिक्षण सोडून मुंबईत विचारे मोटर्स कडे मेकॅनिक म्हणून नोकरी करावी लागली, त्याला एकच काम होतं, अपघातात मोडलेल्या गाड्यांना रंग देणं आणि उरलेल्या वेळात मालकानं त्याला पुस्तक वाचायला परवानगी दिली होती. या रंगांनीच त्याचं आयुष्य बदलून टाकलं आणि पुस्तक वेडा संपूरन पीडब्लूए (प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन)कडे ओढला गेला आणि लेखन करता करता त्यानं नाव आधी धारण केलं गुलजार दिनवी ज्याचं पुढे जाऊन झालं गुलजार.... पुढे याचं नावाने तो आजतागायत ओळखला जातोय. 

तिथे गुलजार ची ओळख तिथे गीतकार शैलेंद्र बरोबर झाली आणि शैलेंद्र मुळे प्रख्यात दिग्दर्शक बिमल राॅय यांच्या बरोबर सुत जुळले. गुलजार बिमलदांचा असिस्टंट म्हणून काम करु लागला. त्याच सुमारास बिमलदांच्या बंदिनी मध्ये गुलजारला एक गाणं लिहायची संधी बिमलदांनी दिली, सचिन देव बर्मन यांचे कर्णमधुर संगीत असलेल्या बंदिनी मधील ते गाणं होतं 'मोरा गोरा अंग लै ले' वास्तविक या सिनेमाचा गीतकार शैलेंद्र आहे पण शैलेंद्र आणि सचिनदांचे काहीतरी बिनसले आणि एक गाणं बिमलदांनी गुलजार ला लिहण्याचा आग्रह केला त्याला सचिनदांनी पण अनुमोदन दिले आणि जन्म झाला एका सिद्धहस्त लेखणीतून वाहणार्‍या अमर्याद गाण्यांचा... 

बिमलदांचेच असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या सोबत पुढे गुलजार ने स्वतंत्र वाट धरली. अगदी आशिर्वाद पासून पुढे खूबसुरत पर्यंत ही साथ राहिली, हृषिदांच्या सिनेमात कधी संवाद लेखक, पटकथा लेखक, गीतकार अशा विविध बहुरंगी भूमिका मोठ्या प्रतिभेच्या गुलजार ने प्रामाणिकपणे निभावल्या. पण त्याच्यातील सर्जनशील दिग्दर्शक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग यातूनच तो दिग्दर्शनाकडे वळला, मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, आँधी, मौसम, खुशबू, किनारा, किताब, मीरा, अंगूर, नमकीन, इजाजत, लिबास, लेकीन, माचीस, हुतूतू पर्यंत कित्येक दर्जेदार सिनेमे गुलजार ने दिग्दर्शित केलेले आहेत. पण याच बरोबर त्याचं इतरांच्या सिनेमामधील गीत लेखनाचं काम अव्याहतपणे चालूच होतं. 

जसा परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं तसचं काहीसं गुलजारच्या बाबतीतही आहे. शक्ती सामंता च्या आराधनाने राजेश खन्ना ला या देशात पहिल्या सुपरस्टार चा दर्जा मिळाला परंतु तो गुलजार होता पटकथा आणि संवाद लेखक ज्यानं राजेश मधला अस्वस्थ आणि अस्सल अभिनेता ओळखला, मग तो खामोशी असो, आनंद, बावर्ची असो किंवा अंडरप्ले केलेला नमक हराम, पलकों की छाँव में  मधील राजेश असो, तो सर्वस्वी त्याच्या इतर सिनेमांच्या पेक्षा भिन्न होता, वेगळा होता, तोच परिस्पर्श त्याचा रेखा च्या बाबतीत झाला आणि घर सिनेमामुळे तिचं त्या पुढील करिअरच बदलले, खूबसुरत आणि इजाजत मधली रेखा ही प्रचंड प्रगल्भ अभिनेत्री वाटते ,जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, शबाना आझमी, हेमामालिनी,अमोल पालेकर, डिंपल कपाडिया, तबू अश्या स्टार लोकांमधील अस्सल अभिनय बाहेर काढणारा गुलजारच होता. 

त्याचं आख्खे सिनेमाचं करिअर हे दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी भारुन टाकलय. त्यातील एक म्हणजे जन्मजात अभिनेता संजीव कुमार आणि दुसरा त्याचा जिवश्च कंठश्च मित्र संगीतकार राहुल देव बर्मन उर्फ पंचम होय. या दोन व्यक्तींच्या वर त्यानं जीव ओतून प्रेम केलं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आणि त्याचे रिटर्न्स म्हणजे या तिकडीने केलेले सिनेमे होय, पंचम आणि गुलजार या जोडीची गाणी हा लेखनाचा एक स्वतंत्र विषय आहे. गालीब वर त्याची श्रद्धा होती तर शैलेंद्र ला तो आपला गीत लेखनातील गुरु मानतो, दिग्दर्शनातील त्याचे गुरु म्हणजे बिमल राॅय. सिनेमा करता करता गुलजार ने लहान मुलांच्या मालिकेसाठी पण गीत लेखन केले आहे, मग जंगल बूक चे हिंदी संस्करण मधलं जंगल जंगल बात चली है पासून ते आत्ता आत्ता पर्यंत मोटू पतलू साठी लिहलेलं मोटू और पतलू की जोडी हे गाणं असो, किताब, मासूम या सिनेमांपासूनच त्याची लहान मुलांच्या गाण्यांसाठीची खासियत दिसून येते. 

गीत लेखनातील त्याची रेंज अफाट आणि अचाट आहे, सचिनदांपासून ते रहमान, शंकर एहसान लाॅय पर्यंत अनेक दिग्गज संगीतकाराकडे गीत लेखनातील आरस्पानी सौंदर्याची खाण गुलजार ने मुक्त हस्ताने उधळली आहे. पंचमच्या पश्चात (परिचय ते लिबास) त्याची जास्त जोडी ही विशाल भारद्वाज बरोबर जमली अगदी दूरदर्शन वरील जंगल बूक, पोटली बाबा की पासून ते अलीकडच्या हैदर सिनेमापर्यंत यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गुलजार म्हणजे हिंदी सिनेमाला पडलेलं एक सहजसुंदर स्वप्न आहे, त्याचा आवाजातील खर्ज जेव्हा तुमच्याशी संवाद साधू लागतो तेव्हा त्याची कविता कधी होते ते समजतही नाही. मागे एकदा गदिमांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलजार आला होता तेव्हा त्यानं गदिमांचे वर्णन त्यांच नाव घेताच गदिमा म्हणजे माँ के गोदी जैसा मुझे लगता है म्हटल्याचं स्मरतय मला, त्याला  गदिमा, कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यामधील कर्तृत्व माहिती आहे, पंचम मॅजिकच्या कार्यक्रमात पण गुलजार आला होता आणि पंचम बदल भरभरून बोलला होता, पंचम हा त्याच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा आहे, पंचम बद्दल बोलताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी पाहिले आहेत.....

पुरस्कारांच्या बाबतीत त्याला जवळपास सर्वच पुरस्कार मिळाले आहेत, अगदी फिल्मफेअर, राष्ट्रीय, पद्म, दादासाहेब फाळके आणि आंतरराष्ट्रीय (आॅस्कर) पर्यंत झाडून सर्व पुरस्कार त्याच्या पायावर लोळणं घेत आहेत. माझ्या लेखी गुलजार हा सिनेमाच्या वर्गातील एक प्रचंड प्रतिभाशाली सिद्धहस्त लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार आणि कमालीचा दिग्दर्शक असलेला विद्यार्थी आहे. वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याचं वैवाहिक जीवन गुलजार होऊ शकले नाही, त्यानं ताकदीचा अभिनय करणाऱ्या राखीशी लग्नगाठ बांधली पण त्यांचं लग्न अयशस्वी ठरलं, त्यांची मुलगी मेघना गुलजार ही आता प्रतिथयश दिग्दर्शिका आहे. 

गुलजारने आम्हा रसिकांचे आयुष्य मात्र प्रचंड श्रीमंत केलय. त्याची लिहलेली सर्वच गाणी लोकप्रिय तर आहेतच पण आयुष्याचं मूल्य वृद्धिंगत करणारी आहेत आणि हेच खरं गुलजारचं यश आहे, आज ही वयाच्या ८५ व्या वर्षात त्याची अभ्यासपूर्ण लेखणी अखंडपणे चालूच आहे, गुलजार सारखी माणसं ही रसिकां प्रमाणेच सामान्य माणसाचं आयुष्य समृद्ध करायला जन्म घेत असतात. म्हणूनच तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही लिहणारा गुलजार ऐ जिंदगी गले लगा ले पण लिहून जातो तर लकडी की काठी लिहणारा गुलजार मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है सारखं गद्यमय पद्य पण लिहू शकतो. परमेश्वराने गुलजारला सिनेमाच्या जगात धाडायची बुद्धी बिमलदांच्या करवी दिली असली तरीही आपली स्वतंत्रपणे वाटचाल करताना गुलजार म्हणजे नक्षत्र वाटणारा एखादा आकाशगंगेमधला यक्ष भासू लागतो.....

खाली काही हटके गुलजारची वेगवेगळ्या संगीतकाराकडे लिहलेली गाणी द्यायचा प्रयत्न करतो. 

१. मोरा गोरा अंग लै ले - सचिन देव बर्मन (बंदिनी) 
२. वो शाम कुछ अजीब थी - हेमंत कुमार (खामोशी)
३. हम को मन की - वसंत देसाई (गुड्डी) 
४. मैनै तेरे लिये - सलील चौधरी (आनंद)
५. दिल ढुंढता है फिर वही - मदनमोहन (मौसम)
६. डाकिया डाक लाया - लक्ष्मीकांत प्यारेलाल (पलकों की छाँव में) 
७. दो दिवाने शहर में - जयदेव (घरोंदा) 
८. थोडा है थोडे की जरुरत है - राजेश रोशन (खट्टामीठा) 
९. दो नैना और एक कहानी - राहुल देव बर्मन (मासूम)
१०. ऐ जिंदगी गले लगा ले - इल्लय राजा (सदमा)
११. यारा सिली सिली - हृदयनाथ मंगेशकर (लेकीन) 
१२.दिल हुम हुम करें - भूपेन हजारिका (रुदाली) 
१३. पानी पानी रे - विशाल भारद्वाज (माचीस) 
१४.आजा माहिया - अनु मलिक (फिजा) 
१५.छैया छैया - ए आर रहमान (दिल से) 
१६.कजरारे कजरारे - शंकर एहसान लाॅय (बंटी और बबली) 

तळटीप - गुलजारच्या सर्व सिनेमांचा अंतर्भाव विस्तारभयास्तव केलेला नाही. 

© अतुल श्रीनिवास तळाशीकर 
         १८ आॅगस्ट २०२० 

#Cinemagully 

#Happy_Birthday_Gulzar 💐🎂
[19/08, 10:41] Charudatta Kulkarni: माझी ’वाईट्ट’ व्यसनं : गुलजारसाहेब 

१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. ‘माया मेमसाब’ ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या….

खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….

सिनेमा कधी एकदा सुरु होतोय या एक्साईटमेंटमध्ये टायटल्सकडे दुर्लक्षच झालेले होते. ते नेहमीच होते म्हणा. त्यामुळे बाहेर आल्यावर पोस्टरवर गीतकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही काही माहिती नव्हती.  बरं पुन्हा टिकिट काढून आत घुसावे म्हटले तर खिश्यात पुरेसे पैसेही नव्हते. काय करायचे? मग आमच्या बरोबर चित्रपट बघुन बाहेर पडलेल्या लोकांना अडवून विचारणे सुरु झाले. “तुम्ही सुरुवातीला दाखवतात ती टायटल्स बघितलीत?”

लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. पण एका काकांनी विचारले, “का रे बाबा? काय हवेय?”

थोडंसं बिचकतच त्यांना कारण सांगितलं. त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं….

” गुलजार! ”

गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं….., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.

‘पुखराज’ या आपली मुलगी ‘बोस्की’ उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली त्यांची  ‘पनाह’ ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.

उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट – गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !

(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)

गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा ‘पुखराज’ मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.

कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी

लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..
मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..
तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..

(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)

तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने….

आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे ‘संत कबीर’! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलु)

मग एक दिवस कुणीतरी सांगितलं ‘अबे ‘इजाजत’ बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची.

 ‘कतरा कतरा’ ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?

तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..

सुधाला नवर्‍याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात …

“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है….”

इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला …

त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे ‘रेखा’ ! असो…., त्याबद्दल परत कधीतरी !

मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?

रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे

“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो” हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक  मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.

सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है

आणि हाच ‘गुलजार’ एका कवितेत लिहून जातो…

गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !

‘प्रचंड उकडतय’ या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं. अशक्य रोमँटीक लिहीतो हा माणूस.

“मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी सीने पे झूलता लॉकेट
उल्टा हो जाए तो मैं हाथों से
सीधा करता रहूँ उसको
मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी आवेज़ा उलझे बालों में
मुस्कुराके बस इतना सा कह दो
आह चुभता है ये अलग कर दो
मुझको इतने से काम पे रख लो….
जब ग़रारे में पाँव फँस जाए
या दुपट्टा किवाड़ में अटके
एक नज़र देख लो तो काफ़ी है
मुझको इतने से काम पे रख लो…
‘प्लीज़’ कह दो तो अच्छा है
लेकिन मुस्कुराने की शर्त पक्की है
मुस्कुराहट मुआवज़ा है मेरा
मुझको इतने से काम पे रख लो”

(http://kawyasagarwithneal.blogspot.in/2010/08/blog-post_3128.html इथून साभार..)

माझी धाकटी बहिण दिप्तीसुद्धा माझ्यासारखीच गुलझारवेडी, ती म्हणते...

म्हणतात ना, पाहणार्‍याला भिंती पलिकडचं दिसतं, न पाहणार्‍याला काचेपलिकडचंही दिसत नाही. गुलजार हा माणूस भिंतीपलिकडचं पाहणारा, त्याहून जास्त ते योग्य आणि खूब शब्दात वाचकांपर्यंत पोचवून त्यांचा मनाचा ठाव घेणारा लेखक.

एक पुराना मौसम लौटा यादभरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है, वो भी हो तनहाई भी……

किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,

”आपको तैरना आता है?”

गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ”नही, सिर्फ डूबना आता है…”

‘डुबणं, बुडून जाणं’ एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात, काव्यात स्वतःला पुर्णपणे झोकून देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.

रात का नशा अभी, आंख सें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा….वही, वो…वोही…
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं.…

शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या ‘शाहरुख आणि करीना’ ऐवजी ‘घर’ची ‘विनोद मेहरा आणि रेखा’ किंवा ‘तराना’ मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा…

“सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं…”

या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला….. पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.

गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.

नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा…
बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?

आयुष्‍याच्‍या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्‍ये कार मेकॅनिक म्‍हणून काम करणारा ‘संपूरणसिंग कालरा’ हा तरुण आज चित्रसृष्‍टीत ‘गुलझार साहब’ या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्‍हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्‍यांनी विपुल लेखन करून आपल्‍या वाचकांमध्‍ये मानाचे स्‍थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या ‘गुलजार’ व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की ‘गुलजार’ हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.

एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था
आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय…

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए…

गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.

गुलझार भेटेपर्यंत  हिंदी कविता फ़क्त वाचनापुरतीच मर्यादीत होती माझ्यासाठी. पण नंतर गुलजारने हिंदी लिहायची सुद्धा सवय लावली. 

गुलजारसाहब, थोड़ी बहुत आपकी नकल कर लेता हुँ मैं भी ! ये छोटासा तोहफा आपके लिये, आपके इस नाचीज दिवानेकी तरफसे...

*चाय की प्याली ...*

ठिठुरती हुयी धुप ..
कोहरे की चादर ओढ़े,
घंटों हमसे बाते करती रहीं !
कुछ शिकवे, कुछ शिकायत
सर्दी के आलम को कोसती रही !
अतीत की नर्म यादोंके,
गर्म अलावपें हात सेकते हुए..
हम मुस्कराते रहें..., यूँही !

आँखों के सामने मंडराते रहें
हवाओं से अटखेलियां करते,
लहलहाते बाजरे के खेत
बाजरे के भूट्टोसे जुझते,
चहचहाते चिड़ियोंके झुण्ड
सर्दी की चादर ओढ़े हुए,
खेतों की नहरोमे बहता पानी !
और आती रहीं...
चूल्हे के ऊपर रक्खे बर्तनसे आती,
बेब्बेके हाथकी बनी ...
बगैर दुध के चाय की भिनी सी खुशबू !

'बाबूजी चाय ले लो , गरमागरम अद्रक मारके'
ठेलेवाले छोकरेने प्यारसे..
हाथ में चाय की प्याली थमायी,
हंसकर बोला...
"कहाँ खो गए थे साब? कबसे पुकार रहा हूँ!"
हम बस मुसकुरा दिए... यूँही 
आँखे ढूंढती रही ....
शहरकी भीडभाडमें खोएं हुए
लहलहाते वे बाजारें के खेत ,
और ढूंढते रहें..
उस चाय की प्यालीमें बेब्बेके हाथोंकी खुशबू !

(© विशाल कुलकर्णी )

शेवटी गुलझारसाहेबांच्याच एक कवितेने क्रमश: समारोप करूयात. क्रमश: एवढ्याचसाठी की या प्रवासाला अंत नाही. हे मृत्युनंतरही उरणारं स्वप्न आहे, व्यसन आहे.

”आओ फिर नज्म कहें,
फिर किसी दर्द को सहला के सुजा ले आंखें,
फिर किसी दुखती रग से छुआ दे नश्तर,
या किसी भूली हुई राह पे मुडकर, एक बार नाम लेकर,
किसी हमनाम को आवाज ही दे ले,
आओ फिर नज्म कहें”

गुलजारसाहब, आपकी गुलजारीयत हमारी जिंदगी का एक अहम हिस्सा है, इसके बिना जिंदगी तो जिंदगी..., हम भी अधूरे है !

धन्यवाद !

#CinemaGully #GulzarSahab #Poetry 

#Repost

© विशाल विजय कुलकर्णी


नीलकंठ...       गुलजार

Prapurika 

प्रेमाची स्वतःची एक भाषा असते, 
भावनेची. अनुभवाची..माया ची..आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. ...
भाषा असते. चित्रांची, प्रतिमांची, संकेतांची. आणि म्हणून....जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य घडत अगदी गुलजार च्या गाण्या सारखं..
रूप, रंग ,गंध ,स्पर्श, चव, ह्या पाच  सुख मधुन आपण सर्व  आपले आखे जीवन अनुभवतो. काही जाणीव ह्या ही वरच्या असतात,.. त्याची ही जाणीव आन्तरिक व्हायला लागते कधी कधी ह्याची अनुभूति असे च कधीतरी संतूर चा एखादा आठवणी मधली धुन मनात गुणगुणावी..आणि यमन राग अलापा मध्ये मनात असावा आणी ते सुर "निरेग रेग मग रेगरे निरेसा" ...ऐकयाला यावे,.. समोर सहज डोंगर रांग बघातना इंद्रधनुष दिसावे.. 
अश्या गंध  ला घेऊन गीतकार गुलज़ार नी खामोशी फ़िल्म मधल्या ह्या गाण्यात असे ओवले..की बस, ,गुलज़ार ची विशुद्ध भाषा आहे ह्या शब्दात जणु त्यानी प्रेमाला शब्दां च्या अश्या मोती मध्ये ओवले आहेत की प्रेमाची प्रत्येक रूप,अगदी मौन रूप ही दाखवावे असे च हे गाणे..

"हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
हम ने देखी है ...

आता विचार करा बर जरा कोणी खुशबु ,म्हणजे गंध  पाहू शकला आहे का आज पर्यन्त..,पण जेव्हा आपण एखादा सुवासिक फूल,जसे सोनचाफ़ा,गुलाब, .. नैसर्गिक स्रोत मधुन येणारा सुवास अपल्याला येतो तेव्हा किती सहज आनंद अनुभवतो..मनात,अपल्या जाणीवेत तो सुगंध ,त्या सुवासीक फुलाची मानसिक कल्पना मधुन गंध द्वारा  समोर दीसायला लागते..एक रस तृप्ति चा सहज तरल आनंदात पोहोंचणे अशी ही रचना गुलजार च्या बोल मध्ये ,मी त्या सुवासिक गंध ला ही बघितले . ,गाणे  अजुन टवटवित असे च हे ग्रेसफुल  ,त्याचे प्रेमळ बोल,प्रेमाच्या उच्च अवस्था पर्यन्तर घेऊन अनुभवा ची जाणीव गुलजार करुन देतात . टागोर नि ही त्यांच्या कविता मध्ये प्रेम  विषयी सुंदर शब्दात सांगितले आहे की 
"
 ""प्रेम हे अंतहीन रहस्य आहे
त्त्याला समजण्या साठी
त्याचा व्यतिरिक्त काही
ही  कुठे असे नाही ये
बस प्रेम स्वतः च आहे"

    कवी, शायर, नी त्यांच्या शब्दात,त्या अनुभूतित,त्यांच्या व्याख्यात,प्रेमाला समजण्या साठी ,प्रेमातच मग्न असावे ऎसे बोल मध्ये ,प्रेमात डुबलेले,..
 .. अनुभव घेऊ शकु ह्याची जाणीव मध्ये अश्या शब्दात

"प्यार कोई बोल नहीं, 
प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ..."

          प्रेम प्रकाशाचा एक थेम्ब  आहे,ऐसा जो आदि काळ पासून वाहत आहे..तुम्ही त्याला एकदा का स्पर्श केला की तो तुम्हाला प्रकाशित करतो ..प्रेमाचे ह्या पेक्षा पवित्र रूप, त्याचे अस्तित्वाची जाणीव जी कधी विजत नाही..थांबत नाही..फक्त तुम्हाला प्रकाशित करते,बस ह्या तेजस्वित रूपा ला फक्त प्रेमळ रुपात बघा,प्रेमाचा एक स्रोत ज्याचाशी प्रत्येक व्यक्ति,मी तू तो ती सर्व च एक उत्कट अभिलाषा कड़े खेचलो जातो की कवि म्हणत्तात प्रेमा ला प्रेम च राहु  दे,त्याला कोणते ही नाव नको देउ...

"मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने खामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ...

कोणते ही नाते जे एकमेकांना बांधते,जे प्रकृति कड़े नेते, एक प्रेमाची तरल अनुभूति रदयात वसलेली,डोळ्यात जपलेली, हस्यात फुललेली, डोळ्यांच्या पापण्यात लज्जेने जाकलेली,.. होठ काही ही बोलत नाहीये, पण त्यात किती तरी गोष्टी अश्या ज्या तिला ,त्याला, सांगण्या साठी चुप अश्या शांतातेत पणे थांबलेल्या  ..किती तप पर्यन्तर ह्या भावना ज्या फक्त जाणीवेत फक्त होत्या त्या वर उचळम्बून वर आलेल्या ज्या फक्त अनुभवव्या अश्या च त्याला कोणते ही नाव नको .....

गुलज़ार नी ह्या गण्यातून विशुद्ध आनंद ओतला आहे, एक तरल रचना सूक्ष्म अश्या गोष्टीची जाणीव जी फक्त रुदयातून अनुभवावी अशी....
,प्रेम अहंकार नष्ट करणारे, आतल्या शांततेला एकायला लवाणारे,स्वतः ला  "स्व "जी जाणीव करुन देणारे,अहंकारा ला नष्ट करणारे, मौन ची भाषेत बोलणारे, जे गहिरे मौन आहे ते स्वर,गंध,रूप,रंग द्वारा  अनुभूति करुन देणारे ,आणी न थांबता वाहणारे ..
सर्व श्रवणीय च...हो...!!

अंबरीश मिश्र नी बोस्की च्या गोष्टी ह्या पुस्तकाचा प्रकाशन वेळीस गुलजार बद्दल जे बोल  बोलले आहे,ते....की गुलजार म्हणजे "एक नीलकंठ आहे"..आपले जीवन जगताना आलेले अनुभव,व्यक्ती,..एखादे मनावर ठसले गेलेले दृश्य.. समोर च्या माणसाच्या वागण्याची पद्धत,त्याचा स्वभाव ह्याची लकब..गुलजार बरोबर अचूक ओळखत..आणि हे सर्व त्यांच्या कविता मधून कथा मधून व्यक्त केल्या त्यांनी..त्यांचे गाणे म्हणजे कुठे सप्तरंग,तर कुठे दर्दभरे सुर..तर कुठे छोट्या मुला शी मारलेल्या गप्पा...

    
गुलजार आणि त्यांचा गजल हा एक अजुन सुंदर पेहेलू..हिर्या ला अजुन पेहेलू पडले की तो अजुन चमकदार व मौल्यवान होत जातो ,म्हणतात..असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जेव्हा बोलतात तेव्हा मेहेफिल टाळ्यांचा गडगडाटासह गाजून उठते..
गुलजार जगजीत सिंग ला एका मेहेफिल मध्ये म्हणाले.".ह्यांचा सारखा मेहेबुब कोणी नाही,जेव्हा पाहिजे तेव्हा हसवतात,जेव्हा पाहिजे तेव्हा रडवतात.. एका मेहेफिल मध्ये त्यांचे बोल ऐकण्या सारखे ...त्यांचा आवाज मधून तुम्हाला ते उडत घेऊन जातील, .."
.जगजीत सिंग चा  आणि ग़ज़ल सुरुवात करण्या अगोदर गुलजार ह्यांचे  बोल मोती सारखे वाहत होते...
ते म्हणतात...

"मुझे इश्क हे जुबा से मे मानता हुं.. ये केईसा इश्क हे उर्दू जुबा का,..मझा घुलता हे लब्झो का जबा पर, की जैसे पान मे उमदा कीमाम घुलता हे..".नशा आता हे उर्दू बोलने मे..." हलफ छुती हे उर्दू मे तो , हलफ से " मै " का घुट उतरता हे" 

खरंच 
चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो. 
तिचा प्रत्येक शेर मुकम्मल असा, परिपूर्ण. ...
स्वतःच संपूर्ण कविता असणारा. 
आणि तरीही जेव्हा ते सारे शेर एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिर रूप घेत जाणारी.  सबंध  ग़ज़ल ..आणि जेव्हा गुलजार आणि जगजितसिंग सारखे दोन दिगज्ज  एकाच व्यासपीठावर बघणे,,ऐकणे ही पर्वणी च ..
प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, ....तेव्हा
आपल्या मनावर अलगद ...हळूहळू धागा-धागा उसवत राहणारे गुलजार,... समोर हळव्या रंगाची फुले उधळावी, एवढे सुंदर बोल.....गुलजार साहेबांसोबत चा "मरासिम"  अल्बम् अवर्णनीय,व अर्थपूर्ण बोल असलेले .सौम्य आवाज जगजीत सिंग गायलेल्या गझल..आणि गुलजार .
जीवनातलं सत्य समजून घ्यायचं असेल तर आधी प्रेम करायला आले तर जगणं किती सोपं ..असा सल्ला ते  माणसांना देतात.

 संतांपासून ते शायरांपर्यंत आणि तत्वज्ञांन मधून अनेकांचा प्रेम हा चिंतनाचा विषय राहिला आहे. कारण तो नैसर्गिक , सहज..,तरल आहे...
प्रेम भाव ही रदयात उत्पन्न होते,,,ही सर्वात सुंदर भावना आहें,,,ज्याचा मनात निरागस ,सहज भाव आहें  ,त्याला अचूक ऐसे काहि प्राप्त होत असावे .. हया भाबडे पण मध्ये काहि मागावे लागत नाहीं...अंतर्यामी प्रेमचा पाउस मस्त रिमज़िम बरसत असतो नुसता.....

"कायनात.". गुलजार.."रात  पश्मीने की"..मधली एक नझ्म.

रात में जब मेरी आंख खुले
नंगे पांव ही निकल जाता हूँ
आसमानोंसे गुजर जाता हूँ
कहकशॉं छू के निकलती है जो इक पगडंडी
अपने पिछवाडे मे सन्तुरी सितारे की तरफ
दूधिया तारों पे पांव रखता
चलता रहता हूँ यहीं सोच के मैं
कोई सय्यारा अगर जागता मिल जाए कही
इक पडोसी की तरह पास बुला ले शायद
और कहे
तुम जमी पर हो अकेले
मैं यहॉं तन्हा हूँ..
- काएनात – गुलजार .. (रात पश्मीने की..)
(कहकशाँ – आकाशगंगा      सैय्यारा – तारा)

There is only one happiness in this life ,to love and be loved your soul,your life.your own belief.

.........................

Prapurika
[19/08, 10:44] Charudatta Kulkarni: आज माझे आवडते गुलजारजींचा जन्मदिन..
त्यानिमित्त वाचनात आलेला हा त्यांच्याच मला आवडणार्या गाण्यावर वृशालीताईंनी लिहिलेला उत्कृष्ट लेख आपणासमोर.. फारच छान लिहिले आहे..

चित्रपट संगीत म्हणजे आपला श्वास आहे . कितीतरी गाणी आपल्या मनावर गारुड करून रहातात. त्यातलंच हे एक गीत.  रेपोस्ट करतीये आज..

कारण ....
आपल्या बडे बॉय साठी हो...तो जो माणूस घुसलाय आपल्या  काळजात ...संपूर्णपणे..संपूर्ण सिंग ...गुलजार जी .. तुम्ही आहात तसेच रहा..पॉज होऊ दे वेळ.. आम्हाला ना सवय आहे तुमची..आमचे शब्द सापडले नाहीत की आम्ही तुमचे शब्द शोधत रहातो आणि खर सांगू ..खूप खूप काही गवसत जातं. जियो जियो गुलजारजी 💐🎂 

चूक भूल द्यावी घ्यावी.  कारण आज ज्या गाण्यावर , आवाजावर , संगीताबद्दल लिहितीये , त्यांच्यावर लिहायची माझी अंशतः सुद्धा पात्रता नाही.  पण आपण म्हणतो ना , close to my heart ..Or philosophy of life.. तसं काहीसं हे गाणं माझ्यासाठी आहे. म्हणून हा लेखन प्रपंच .

1970 साली प्रदर्शित झालेला एक चित्रपट..  
खमोशी ..    राजेश खन्ना... वहिदा रहेमान...धर्मेंद्र दिग्दर्शक ..  असित सेन 
संगीत ...    .हेमंत कुमार
गीतकार ...  गुलजार जी

ह्यातील सगळीच गाणी एकसे एक आहेत .. जसं
पुकार लो..तुम्हारा इंतजार..हेमंत कुमार .., किंवा ,  वो शाम कुछ अजीब थी...किशोर कुमार . पण मला सगळ्यात आवडणार गाणं म्हणजे .... हमने देखी है इन .. लताबाईंचं..  अशक्य ... ! कल्पनेच्या पलीकडे आहे. खरंतर ना प्रेमाची व्याख्या अशी नसतेच हो..! जे खूप अगम्य.. Undefined आहे ते प्रेम.. गुलजारजीनी ह्या गाण्यात प्रेम किती संवेदनशील पद्धतीने उलगडून दाखवलंय ... एक एक शब्द थेट काळजाचा ठाव घेतात. 

हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो... 

सुरवातच पहा हो..! पहिली ओळच किती tangent आहे. डोळ्यामध्ये 'मेहेकती  खुशबू' म्हणणारे फक्त गुलजारच. वर म्हणतात .. स्पर्श सुद्धा नको अशा प्रेमाला.. ते अनुभवावा  आत्म्याने..शुद्ध.. समोरच्या व्यक्तीच्या स्पंदनातून ..स्पर्शून नव्हे..त्यातील विचार केला तर किती अशारीरिक प्रेम अपेक्षित आहे.  कुठलं बंधन..नाव नकोच ..प्रेम आहे ते प्रेमच राहू दे..

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक ख़ामोशी है, सुनती है, कहा करती है
न ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ एहसास...

प्रेम किती अव्यक्तपणे व्यक्त होऊ शकतं.. परिसीमा आहे ना..! कुठलाच आवाज..आणाभाका.. नकोत हो.. एक सुंदर अशी 'खामोशी' जी बोलत असते, काही सांगत असते.. जणू आत्म्याचा आत्म्याशी संवाद आहे . गहिरेपण ते किती ! कुणी अडवू शकत नाही, ना थांबवू शकत, ना त्यास शांत करू शकत. 'नूर की बुंद' हा शब्दच किती सुंदररर.. नूर म्हणजे प्रकाश, रोशनी. पण तो रस्त्यावरचा उजेड नाही तर तो दिव्यत्वाचा प्रकाश आहे. जो आतून उजळून टाकतोय.  त्या प्रकाशाचा एक बुंद .. अव्याहत वहात राहिलाय ..थांबला  नाही..साठला नाही .प्रवाही राहिला ...त्यामुळे कायम निर्मळता  आहे..वाह...!

मुस्कुराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से झुके रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने ख़ामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास

शेवट तर, क्या कहना...बघा ना... गुलजारजी शब्द असे काही रचतात  की भ्रम पडावा.  डोळे हसतात, सुगंधी होतात. आणि पापण्यांवर 'उजाले' आहेत . जरी बोललो नाही तरी ओठांवरची थरथर खामोशी कितीतरी गोष्टी साठवून आहेत. अबोल  भावना बोलके करणारे काव्य. 

ह्या पूर्ण गाण्यात, गाणं म्हणणारी राजेश खन्ना (अरुण) ची मैत्रीण रेडिओ वर हे गाणं म्हणतीये.. पण ते आपल्याला स्तब्ध वहिदाच्या चेहेऱ्यावर वाचता येतं. कुठलेच expression  न देता ते गाणं वहिदा जगलीये . सगळ्यात मोठा भाग, हा चित्रपट कृष्ण धवल. Black and White  आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात तो ठेहेराव, तो effect  कल्पनातीत आहे. Chenematography कमल बोस ह्यांनी केलीये..त्यांना त्या वर्षी Film Fare मिळाल होतं.
 
एक शेर आहे..

प्यार के लिये और क्या चाहिये..
बस्स, 
दो प्यारभरे दिल चाहिये..💕
 
गुलजार..लताबाई..हेमांतकुमार ह्या तिघांना मनापासून मुजरा.  दिलतोड गाणं आहे. मनाला पार  हळवं करतं ... खूप वेळ वहिदा आणि गाणं मनात रुंजी 
घालत राहतं ..... आणि शब्दांचा ओलावाही  .....❤️

लेखन.. वृशाली अंबर्डेकर