भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🌹🌹🌹🌹
संजीव वेलणकर यांच्या भिंतीवरून साभार
जन्म. २८ जानेवारी १९३० भोपाळ येथे.
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं होते. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते.साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर,कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. पंडित जसराज मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते. पंडित जसराज यांना आपल्या भावपुर्ण श्रध्दांजली.
*आज मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे अमेरिकेत दुख:द निधन झाले.*
*पंडित जसराज यांचा अल्पपरिचय.*
जन्म. २८ जानेवारी १९३० भोपाळ येथे.
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. पंडित जसरात हे ८० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं होते. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते.साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर,कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. पंडित जसराज मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते. पंडित जसराज यांना आपल्या भावपुर्ण श्रध्दांजली.
सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=tujcCI6MLD0&t=354s
https://www.youtube.com/watch?v=O96US8xksoo
https://www.youtube.com/watch?v=nMTkjLWMXLQ
https://www.youtube.com/watch?v=Kh9USxy15js:
ते भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव त्यांना जिवंत वाटत असे.
त्यांनी का त्यांच्या मुलाने
नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती.
पण त्या गडबडीत तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला.
पंडितजी अस्वस्थ झाले.
मेरा कान्हा मुझसे रूठ गया ... असेच सारखे सारखे म्हणत होते.
आठ दिवसानंतर त्यांची गुरूवायूर इथे गायनसेवा होती.
पण ह्यांचे म्हणणे एकच...
जब कान्हा रूठा है तो जीनेमे रहाही क्या है ?
मुलाला कार्यक्रम रद्द करायला सांगितला. जे नुकसान होईल तेपण भरून दे असेही सांगितले.
आणि जणू काही आमरण उपोषण सुरू केले.
एकच ध्यास... कान्हा रूठ गया है. . अब जिंदगी नहीं जी पाऊंगा..
सगळे जण समजूत काढून थकले ... फोटो शोधून पण थकले ...जुन्या घरी नवीन घरी... कुठेच नाही. ..
मग तर पंडितजीनी ठरवलेच ..
आता मेलेलेच बरे...
रात्र झाली. .. घरातील कोणीच जेवले नव्हते.
हळूहळू सर्वजण तसेच उपाशीपोटी झोपी गेले.
पंडितजी ... जब कान्हा नहीं है तो ऐसी जिंदगी जीनेसे बेहेतर है की मर जाए... करत करत झोपी गेले... झोप कसली ग्लानीत होते..
पहाटे ..साधारण साडेतीनच्या दरम्यान त्यांना एका स्त्रीचा आवाज ऐकू आला व ते जागे झाले. जागो जसराज....
ह्याना कळेना, कोण ह्या ?
ते... माताजी, आप कौन हो ? और मेरे घरमे इस वक्त?
... उत्तर ऐकल्यावर पंडितजी सटपटलेच...
मैं ...राधा हूं ...
तूने सुबहसे एक ठान ली है और उसके कारण तूने सुबहसे कुछभी नहीं खाया है...
पं.... हां... लेकिन जब कान्हा मुझसे रूठे हैं, तो मैं कैसे खा सकता हूँ?
राधाजी.... किसने कहा तुझे, कि कान्हा रूठे हैं ? और तो और, तुझे मालूम है... तुने नहीं खाया है सुबहसे... इसी कारण तेरा कान्हा भी अबतक भूखा है... उसने भी कुछ नहीं खाया है...
अगर कान्हा नहीं खाता है, तो बाकी हम सब कैसे खा सकते हैं?
अब उठो और कुछ खा लो ..
तसबीर मिल जाएगी..
अचानक पुन्हा अंधार ...
पंडितजीनी सर्वांना जोरात हाका मारून उठवलं .
हा किस्सा सांगून पत्नीला ताबडतोब ताजा स्वयंपाक करायला सांगितले आणि नैवेद्य दाखवून खाऊन घेतले ..
प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते.
ठरल्याप्रमाणे गुरूवायूर येथे गेले ...
सकाळी मंदिरात दर्शनाला गेले होते.
गर्दीत सगळे थोडे पुढेमागे झाले.
अचानक त्यांच्या मुलाला एका लहान व गोंडस मुलाने हटकले .. ये आपके पिताजीको देना.. मुरलीधरने दिया है ...
असे म्हणून एक गुंडाळी दिली.
मुलानं त्यांना हाक मारून बोलावले व हातात ती गुंडाळी दिली. निरोपही सांगितला...
उघडून पहातात तर तोच फोटो होता.. श्रीकृष्णाचा ... जो सापडत नव्हता.
अरे, वह छोकरा कहां है ? ढूंढ लो उसको..
खूप शोधलं ....पण.........
सोनी टी व्ही वर...
"मानो या ना मानो" ...
ह्या कार्यक्रमातील किस्सा.
पंडितजीनी स्वतः सांगितलेला...
नक्की सांगता येणार नाही १९९२ की १९९३, पण एक नक्की शाखा सोडली होती. अर्थात तिथली जिवाभावाची सुटली नव्हतीच. त्यातलेच दोघे, काळे बंधू. जुन्या तांबट आळीत राहणारे. धाकट्यामुळे कंटाळून का होईना पण शास्त्रीय संगीत ऐकावसं वाटायला लागलं. आणि थोरल्यानी भले टोमणे मारू देत, पण बरंच काही चांगलं ऐकवलं.
अशाच एका संध्याकाळी ड्यूटी संपल्यावर गेलो घराकडे. बघितलं तर दाराची फळी जवळपास बंद. पण नाही. आत अंधार असला तरी उजेडाची तिरीप आत जाताना दिसली. ढकललं तर दार उघडलं. भस्सकन आत शिरलो तर अंधार. थोरले पलंगावर बसलेले, ओठांवर बोट ठेवून शांत रहायची खूण, आणि लगेच कानांकडे बोट. म्हणजे ऐकायची खूण. लक्षात आलं काही तरी ऐकायला मिळणार.
नुकतीच कॅसेट लावली होती. पूर्ण अंधार, एक उजेडाची तिरीप आणि एक सुंदर स्वर. श्री अ नं त ह री ना रा य ण…. मागे तंबोऱ्याचा सुस्पष्ट आवाज, आणि पाण्यावरच्या लहरी दाखवतांना ज्या वाद्याचा आवाज येतो तो आवाज मधून मधून. स्वरमंडल म्हणतात ते नंतर कळालं.
आणि आवाज लावला बुवांनी, कौन जिया ठाने, मंगलाचरण म्हणून झालं होतं, आणि ठॅणकन साक्षात्कार झाला हे ऐकलंय आधी नक्कीच. ते ही सकाळी मंगलमय सकाळी. बुवा गात होते आणि मग एकेक खूण पटत गेली.
भुसावळात दिवाळीच्या तेल लावून अभ्यंगस्नानानंतर, हळूहळू फटाकड्यांचे आवाज येत असतांना, फराळाची ताटं हाती आलेली असतांना, आत्येबहिणी, जोगळेकर सिस्टर्सपैकी कुणी आग्रह केल्याने, आत्याच्या मिस्टरांनी लावलेल्या कॅसेटवरचा हा राग, आणि त्याच्या कव्हरवर वाचल्यामुळे कळालेलं, राग बैरागी भैरव.
खूणगाठ पटलीच. आणि मग कळलं थोरल्याने शांत रहायची खूण का केली ते. खरं तर ती वेळ संध्याकाळची. पण डोळे मिटले आणि त्या स्वरांची नशा चढायला लागली. एकेका स्वराबरोबर आठवत गेल्या काही सुंदर पहाट वेळा. द्रुत लयीतले शब्द होते बांवरी बनाये की गये, पिहरवा मोरे, खरंच खरंच, वेड लावणारी नशा.
राग संपल्यावर थोरल्याने लाईट लावली, आणि काही बोलायच्या आत मी ठॅणकन म्हणालो. बैरागी भैरव. थोरले थक्क. रेड्यानी गीता म्हणावी तेवढे अचंबीत.
हा बैरागी भैरव, भैरव, पुरीया धनाश्री आणि मारवा, हे बुवा रंगून जात ती नशा गुंगवणारी.
असंच एकदा सांगलीत आल्यावर, एकांबरोबर त्यांच्या रानात जायचा म्हणजे शेतात जायचा योग आला. ते कट्टर हिंदुत्ववादी. शहीद म्हणू नका हुतात्मा म्हणा आणि पुढे शिवी. ती नॅचरली यायची. आम्हांला सवय झाली होती. भीमण्णांची भजनं वगैरे ऐकतात माहिती होतं. आम्ही साताठ जणं होतो. रात्री जेवण झाल्यावर सगळी रिलॅक्स झालो होतो. मधेच ते म्हणाले, हेरंबा मोबाईलवर छानसं काही ऐकव. तु ऐकतोस तसं.
बाहेर डोलणाऱ्या शाळूवर चांदणं टपटपत होतं. बुवांचं नाव यु ट्यूबला टाकलं, पहिला राग दिसला तो लावला. नेमका निघाला भैरव आणि चीजेचे शब्द, मेरो अल्लाह मेहेरबान. साऊंड फुल सोडला होता. क्षणात ते सोडून बाकीच्यांनी चमकून पाहिलं माझ्याकडे. मलाही लक्षात आलं, झाली चुक, पण….
त्यांच्याकडे बघतांना चिडलेले जाणवले, पण तोवर बुवांच्या ताना सुरू झाल्या आणि ते रंगले. चेहरा निवळत गेला. तबल्याच्या अनुषंगाने बोटांनी ठेका पकडला होता. अल्लाह मेहेरबान संपल्यावर पुढचा राग सुरू झाला, आणि मंगलाचरणानंतर शब्द आले, नैय्या लगा दे मोरी पार, भवसागरातली ही नाव पार कर ही विनवणी. ते खुललेच अक्षरश: आणि… आणि नंतर एका विलक्षण स्वरवेलीच्या आविष्कारानंतर शब्द आले, ख्वाजा तुम बडे गरीब नवाज, नैय्या लगा दे मोरी पार.
आता मनातल्या मनात मी माझ्या नशिबाला श्या घातल्या. पण ते म्हणाले, मृगनयना रसिक मोहीनीच्या जवळचा आहे का रे राग?. म्हणलं हो. तो दरबारी कानडा, हा गुंजी कानडा.
Xxx मजाय रे ही, ते म्हणाले आणि तो राग संपल्यावर जे लागलं तिथे तर ते खुष झाले, राग होता हंसध्वनी आणि चीजेचे शब्द होते, पवन पूत हनुमान लला तुम. इथे ते खुलले. बाकीच्यांनी निश्वास टाकला. सगळं झाल्यावर ते म्हणाले, नक्कीच हे बुवा तपस्वी असावेत गाण्यातले, तापसी म्हणतात तसे. मला अल्लाह ख्वाजा ऐकलं तरी भडकतो पण ऐकावंसं वाटलं. नाव सांग. मग सांगितलं नाव बुवांचं.
किती आणि काय काय ऐकलंय. हां त्यांची नक्की कोणती गोष्ट आवडते हे सांगितीक व्याकरणात नाही सांगू शकणार, पण हे गाणं गुंगवणारं, परत ऐकायची नशा लावणारं, आणि तरीही गाणारा स्वत:च्याच धुनकीत रममाण होऊन, जग विसरून रमणारा, जोगी, तापसी असावा हे जाणवून देणारा. कारण प्रत्येकवेळी एक सात्विक भावना उमटविणारा.
पहाटे भैरव, बैरागी भैरव , भटीयार ऐकावा, दुपारी रसिक निरंतर पलना झुले चा मधमाद सारंग स्वरांच्या लयबद्ध हिंदोळ्यावर ऐकावा. संध्याकाळी गुंजन लागी चा पुरीया धनाश्रीतला खर्ज आर्तता जाणवायची सुरूवात झाली आहे हे कळवून नंतर निषाद, रिषभ, धैवताशी खेळत ती आर्तता, ती हूरहूर, ती खिन्नता मारव्यातून चरन प्रित करूणानिधानकी हे अंतीम सत्य जाणवून देईस्तोवर प्रवास व्हावा.
आणि हे सगळं एका निराशेच्या टोकावर जात असतानांच, कानड्यातला कोणताही प्रकार यावा, पुन्हा मनात एक नवी उमंग दाटून यावी, आणि मग यावा अडाणा, माता कालिका….
खङगमुंडखप्परकरधरिणी करधरिणी असे उच्चारी खडखडाटी शब्दही स्वरांमुळे विनवणीचा कोमलपणा घेऊन यावेत आणि मातेची विनवणी करतांना तारसप्तकांपर्यंत तानांवर ताना ऐकाव्यात.
असं म्हणतात बुवांनी हा राग गायल्यावर महाकालीच्या मूर्तीतून आंसवे गळाली. खरं खोटं माहिती नाही पण अप्रत्यक्ष ऐकतांना आतपर्यंत ती विनवणी पोचते, तिथे प्रत्यक्ष ऐकतांना काय होत असेल?
फक्त एक झालंय आजपावेतो त्यांचं सुमिरन कर ले मोरे मना पूर्ण नाही ऐकू शकलो. त्रिपूरी पौर्णिमेला थंडगार वातावरणात रात्री आजुबाजुला दगडी घाटांवर साचलेल्या शेवाळाचा एक विचित्र वास साचलेला असतांनाच, गंगा गोदेच्या पात्रात, पळसाच्या पानांच्या द्रोणात वात लावून दिवा लहरींवर सोडून देतात, आणि तो हलत डूलत, वाऱ्यामुळे फडफडत जातांना हेलकावा घेतो आणि पाणी आत शिरल्याने ज्योत विझल्यावर, तुपकट धुराचा वास सोडत शांत होतो तसं काहीसं या बुवांची भैरवी ऐकतांना होतं. हळूहळू रिक्त होणं.
नाही जमणार पूर्ण ऐकायला.
प्रत्यक्ष ऐकायचं असं तळतळून कधीच वाटलं नाही कारण अप्रत्यक्ष ऐकतांनाही कायम जवळ होता. स्वरांच्या जवळीकीतून. शास्त्रीय संगीताची आवड लागण्यात तुम्हीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता.
स्वरमार्तंड, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पदव्या तुम्हांला देऊन गौरवलं गेलं. पण पंडीत जसराज या नावाची सांगड माझ्यापुरती तरी नशेत गुंगवणारा तापसी हीच राहील.
श्री अनंत हरी नारायण........🙏🙏
i: *......और राग सब बने बराती*
✍ सुहास किर्लोस्कर
*पंडित जसराज यांची खासियत म्हणजे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सर्वसामान्य रसिकांसाठी "रोमँटिक" केले.* रसिक श्रोत्यांना त्यांचे गायन आपलेसे वाटायचे, वाटते. असे असूनही त्यांनी टाळ्यांच्या मागे धावण्यासाठी आलापी कधी कमी केली नाही. ते गायचे ते तब्येतीत. एक तास उपलब्ध आहे या कारणास्तव त्यांनी कधीही एका तासात चार रागाचे पॅकेज दिले नाही. किंवा "थोडा वेळ शास्त्रीय गातो आणि नंतर तुम्हाला आवडते ते गातो" असे कधी म्हणाले नाहीत. दर्जेदार आलापी, त्यानंतर विलंबित लयीमध्ये राग विस्तार सविस्तरपणे मेवाती घराण्याप्रमाणे करताना त्यामध्ये स्वतःचा विचार मांडला. जाणकार आणि आम जनता या दोघांची दाद मिळवण्याचे कसब पंडित जसराज यांनी कमावले होते. स्वतः उत्तम तबलावादक असल्यामुळे विलंबित लयीनंतर ते मध्यलयीमध्ये आणि द्रुतलयीमध्ये लय-ताल-स्वर याचा संगम घडवून आणताना सर्व श्रोत्यांना त्यामध्ये सामावून घेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये सहसा त्याच त्या बंदिशी गायल्या जातात. तो प्रघात मोडून जसराजजी यांनी अनेक बंदिशी लिहिल्या, अनेक अनवट बंदिशी ते सादर करायचे. साध्य शब्दात सांगायचे झाले तर त्यांची मैफल कंटाळवाणी होणार नाही यासाठी ते विशेष प्रयत्न करायचे तरीही लोकानुनयाचा म्हणजे "playing to the gallery" चा अतिरेक कधी केला नाही.
*अलूरकर यांच्या कॅसेटमधून ते पहिल्यांदा भेटले. एका बाजूला "पुरीया कल्याण" आणि दुसऱ्या बाजूला "बिहाग" असलेल्या त्या कॅसेटची अनेक पारायणे केली.* "आज सो बन" हा विलंबित एकतालामधला पुरीया कल्याण मधला ख्याल आणि त्यानंतर "दिन रैन कछु ना सुहावे, उनके देखे बिन" ही बंदिश उस्ताद नजीमुद्दीन खां यांच्या तबला साथीने खुलवली आहे.
https://youtu.be/ULMq_-ke3sk
कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला असलेला त्यांचा बिहाग अनेकवेळा ऐकला आणि त्यातल्या त्या रागाच्या प्रेमात पडलो. "कैसे सुख सोवे निम दारिया" या विलंबित एकतालामधील ख्यालामधील विस्तारात त्यांनी असा काही माहोल तयार केला आहे की आपण तेच संगीत ऐकण्यातल्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेत राहतो. मध्यलय तीनतालामध्ये त्यांनी गायलेली बंदिश "लट उलझे सुलझा जा बालम, माथे की बिंदीया गिर गयी सेज पे, अपने हाथ से सजा, हाथ मे मेहेंदी लगी, मोरे बालम" अजूनही ऐकू येत असते....रेकॉर्ड वाजत नसली तरी. रागाची धून बनवून ती रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहणे हे कलाकाराचे कौशल्य असते. पंडित जसराज यांच्याकडे ते कसब होते.
https://youtu.be/OVKnETtCCWk
*यानंतर जसराजजी यांचे गायन सवाई मध्ये दरवर्षी ऐकत राहिलो*. गेली पाच सहा वर्षे त्यांच्या गायनामध्ये त्यांचे वय जाणवायचे, त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या चार-पाच शिष्यांचा ताफा असायचा. अन्यथा त्यांच्या त्यापूर्वीच्या सर्व मैफिली जमलेल्या असायच्या. स्वरमंचावर आल्यानंतर सर्व रसिकांना नमस्कार करत "जय हो" म्हणायचे. ते ही त्यांचे एक स्टाईल स्टेटमेंट बनले. सुनील गावस्करने क्रिकेटमध्ये उत्तम खेळाबरोबरच स्वतःचा ब्रँड तयार केला, तद्वत जसराजजी यांनी स्वतः चा "ऑरा" तयार करून चाहत्यांना शास्त्रीय संगीताचे वेड लावले. पं भीमसेन जोशी यांनी जसे किराणा घराण्यात जे काम केले ते पंडित जसराज यांनी मेवाती घरण्यासाठी केले. हवेली संगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जसरंगी जुगलबंदी या त्यांच्या उत्तम संकल्पनेचे सादरीकरण विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं संजीव अभ्यंकर यांनी सवाई मध्ये सादर केले.....,हे म्हणजे "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" असा प्रकार झाला.
*केदार पंडित यांच्यासारख्या तबला वादक आणि अप्पा जळगावकर यांच्यासारख्या हार्मोनियम वादकांबरोबर त्यांचे "सूर" जमलेले असायचे.* साथीदाराला दाद देता देता ते मैफल रंगवायचे. आप्पा जळगावकर यांच्याबरोबर त्यांचे खास मैत्रीचे नाते होते. पं अरविंद थत्ते साथीला असताना एक आवर्तन त्यांनी तबला साथीने हार्मोनियमवर वाजवल्यानंतर "बजाओ"अशी फर्माईश केली. पं अरविंदजी यांनी त्यांच्या स्वभावानुसार पुन्हा एक आवर्तन न वाजवता मंद स्मित केले. एकदा सवाई मध्ये तराना सुरू असताना एका तबलावादक साथीदाराला त्यांनी बोटांनी खूण करत "धाडेगीन धाडेगीन" वाजवण्यास सुचवल्याचे बघितले आहे. जसराजजी स्वतः उत्तम तबलावादक असल्यामुळे त्यांचे उ झाकीर हुसेन यांच्याबरोबर खास नाते होते, जे मैफिलीत जाणवायचे. Masters of India या कॅसेटमध्ये जसराज-झाकीर-अप्पा असा त्रिवेणी संगम झालेला होता. त्या लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये गायलेले मियाँ की मल्हार, हवेली बसंत, "सुमिरन कर ले" हे भजन ही मर्मबंधातली ठेव आहे.
https://youtu.be/er7h1QX7zdg
*सवाईमध्ये त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या पण त्यातल्या खास निवडायच्या झाल्या तर एका वर्षी त्यांना स्वरसाथ करण्यासाठी त्यांचे शिष्य संजीव अभ्यंकर मागे बसले होते ती मैफल.* संजीवजी यांनी स्वरसाथ करताना गुरू पं जसराजजी आणि श्रोते यांची वाहवा मिळवली आणि मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
https://youtu.be/p6qrZ0yT0vE
*और राग सब बने बराती, दूल्हा राग बसंत*
*मदन महोत्सव आज सखी री अब, विदा भयो हेमंत*
सहचर गान करत ऊंचे स्वर, कोकिल बोले असंख्य
गावत नारी पंचम स्वर ऊंचे स्वर, ऐसो गीत अनंत
कृष्ण दास स्वामिन बड़भागिन, मिल्यो है भावतो…
*पंडित जसराज अनेक रागांचा मदन महोत्सव पेश करत राहिले आणि श्रोते त्या रागांच्या वरातीमध्ये सामील होत राहिले....तल्लीन झाले....मैफल अजूनही सुरूच आहे कारण त्यांचे स्वर आपल्या मनात रुंजी घालत आहेत.*
सुहास किर्लोस्कर
9422514910
No comments:
Post a Comment