काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये खय्याम साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास हजर राहण्याचे भाग्य मला मिळाले होते. माझे मित्र आणि सिनेरसिक संगीत रसिक श्री प्रदीप देसाई (आरबीआय) यांनी अंधेरीला त्यांच्या घरी खय्याम साहेबांचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले होते. मला पण बोलवले होते त्यावेळी खय्याम साहेबांशी खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या मी त्यांना विचारले की ' तेरी आखो का रंग निराला' आणि 'रंग रंगीला सावरा ' अशी छान गाणी आपण बारूद सारख्या सो सो सिनेमासाठी कशी काय केलीत. त्यावेळेस त्यांचे उत्तर आदर्श होते. ते म्हणाले की "मै संगीत मन लगा के बनाता हूँ. उस समय पिक्चर कौन सी है वो चलेगी या नही चलेगी इसका विचार नही करता हु.
और कौनसा गाना हिट होना ये ऊस गानेकी अपनी अपनी तकदीर होती है." त्यादिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या मरून कलरचा शर्ट प्रेझेंट दिला होता.
[19/08, 18:20] Charudatta Kulkarni: *आज १९ ऑगस्ट.*
*आज जेष्ठ संगीतकार खय्याम यांचा स्मृतीदिन.*
जन्म. १८ फेब्रुवारी १९२७
मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... ज्यांना सारे जग संगीतकार खय्याम या नावाने ओळख असे.
वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम..
खय्याम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लींत राहणाऱ्या काकांच्याकडे आले. तेथेच राहून त्यांनी आपल्या करिअर घडवण्याची स्वप्ने बघितली. मुंबईत आल्यानंतर त्यां यच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पहील्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी पुढे संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नासच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवत असे. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. खय्याम हे गेली ७० हून अधीक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. खय्यार यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून खय्याम टाकले होते. ’कभी कभी’,‘बाजार’,‘त्रिशूल’,‘ नुरी’,‘आखरी खत’अशा अनेक चित्रपटाना त्यांनी संगीत दिले होते. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा गौरव केला होता. खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांना आर्थिक मदत केली जाते. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे १९ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.
*सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://youtu.be/sN1EQEg4tSo
https://youtu.be/1J2GL1hRrOo
https://youtu.be/Y6JQpwwLcfI
i: *खय्याम*
संगीतकार मोहंमद झहूर खय्याम हाश्मी यांचा प्रथम स्मृतीदिन १९ ऑगस्ट,२०१९
टोपणनाव(खय्याम)
१९५३ ते १९९० या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी साधारण ५० चित्रपटांना संगीत दिले.
यांचा जन्म पंजाबातील राहोन येथे झाला.शालेय शिक्षणाची त्यांना अजिबात आवड नव्हती,त्या ऐवजी त्यांना चित्रपटसृष्टीमधें नायक व्हायचे होते. तेव्ह्ड्यासाठी ते दिल्लीला काकांच्या घरी दाखल झाले.काकांनी देखील त्यांना शाळेत दाखल केले पण त्यांचे शाळेत मन रमत नाही हे पाहून त्यांनी संगीत शिकायला परवानगी दिली आणि ते लाहोरला बाबा चिस्ती यांच्याकडे संगीत शिकायला गेले.सहा महिन्यातच त्यांची संगीतातली गती पाहून आपला सहाय्यक होण्यास सांगितले ,त्या वेळी त्यांचे वय होते फक्त १७ वर्षांचे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यानी तीन वर्षे लष्करामध्ये काम केले. दुसरे महायुद्ध संपले आणि नशीब अजमावण्यासाठी ते १९४८ साली मायानगरी मुंबईला आले आणि हिर रांझा या चित्रपटासाठी संगीत देणाऱ्या शर्माजी वर्माजी या जोडगोळीतील शर्माजी म्हणजे खय्यामच होते. ही ओळख पुढे पाच वर्षे राहिली. भारताची फाळणी झाली आणि त्यांचे सहकारी रहेमान वर्मा पाकिस्तानला निघून गेले व खय्याम यांनी एकट्याने संगीत द्यायला सुरवात केली.
लगेचच बीबी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यातल्या मोहम्मद रफी यांच्या आवाजतील "अकेले वो घबराते तो होंगे" हे गाणे त्या काळी खूपच लोकप्रिय झाले होते.फिर सुबहा होगी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले ,गीतकार होते साहिर लुधियानवी ,गायक होते मुकेश आणि अशा भोसले. राज कपूर आणि माला सिन्हा यांनी काम केलेल्या या चित्रपटातील १)वो सुबह कभी तो आयेगी, २)चीन ओ अरब हमारा हिंदोस्ता हमारा,३)अस्मान पे है खुदा और जमीन पर हम .या गाण्यांनी संगीतकार म्हणून त्यांचे नाव झाले आणि शोला और शबनम या चित्रपटाने त्याच्यावर शिक्का मोर्तब झाले.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाच्या यादीतल्या काहींची यादी देत आहे.
शगुन,आखरी खत,फुटपाथ.गुलबहार,लाला रुख ,मुहोब्बत इसको कहेते है.कभी कभी, नुरी,त्रिशूल,थोडीसी बेवफाई,बाजार,उमराव जान,आहिस्ता आहिस्ता,दिल ए नादान,रझिया सुलतान आणि अलीकडचा म्हणजे २०१६ सालचा गुलाम बंधू
कभी कभी चित्रपटातील,>>कभी कभी मेरे दिलमे खयाल आता है, तेरे चेहरे से नजर नही हटती, मै पल दो पल का शायर हूँ, ही गाणी लोकप्रिय झाली.
उमराव जान चित्रपटातील >इन आखोंकी मस्ती के, ये क्या जगह है दोस्तो,दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए या गाण्यांनी रसिकांना अक्षरशः वेडे केले होते.त्यांचे संगीत, गझल च्या अंगाने जाणारे असले तरी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आधार होता.त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही गाण्यांना संगीत दिले आहे. पाव पडू तोरे श्याम,ब्रिज मी लौट चलो,गजब किया तेरे वादे पे एतबार किया इत्यादी. मीनाकुमारीने गायलेल्या 'I Write, I Recite' या अल्बमसाठी संगीत दिले.
बुजुर्ग आणि समकालीन अश्या दोन्ही गीतकारांबरोबर त्यांनी काम केले, या मध्ये मिर्झा गालिब,अली सरदार जाफरी,वली साहेब,मजरुह सुलतानपुरी,साहिर लुधियानवी, नक्श लयलपुरीं,निदा फझली, ही नावे आहेत.
८९ वा वाढदिवस साजरा करताना त्यांनी "खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट" स्थापन केला आणि त्यांची सर्व संपत्ती *रु.दहा कोटी* या ट्रस्टला दान केली.या ट्रस्ट मधून नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञ याना मदत केली जाते.
खय्याम याना एकूण तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
१९७७ कभी कभी> सर्वोत्कृष्ठ संगीतदिग्दर्शक१९८२ उमराव जान> सर्वोत्कृष्ठ संगीतदिग्दर्शक२००७
संगीत नाटक अकादमी पुरस्कार > सर्जनशील संगीत दिग्दर्शक २०१०.
जीवन गौरव पुरस्कार२०११ साली भारत सरकारने त्यांना पदम भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले .
त्यांच्या प्रथम स्मृतीतीदिनाच्या निमित्ताने उमराव जान चित्रपटातील सदाबहार *दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए* हे आशा भोसले यांनी गायलेले गाणे देत आहे. अभिनेत्री रेखा ने तिच्या अदाकारीने या कोठीवरच्या गाण्याला चार चांद लावले आहेत.
खय्याम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
[19/08, 18:20] Charudatta Kulkarni: प्रतिभावान संगीतकार खय्याम यांचा आज पहिला स्मॄतीदिन...
खय्याजींसारख्या सॄजनशील ,सह्रुदय,शालीन व्यक्तीशी, त्यांच्या कुटुंबाशी माझे अनेक वर्षांचे ॠणानुबंध निर्माण झाले हे मी माझं भाग्य समजते. ते नेहमी मला ’बिटीया’ नावानेच हाक मारत असत.
’सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ या माझ्या पुस्तकातील त्यांच्याविषयीच्या या काही आठवणी...
पत्रकारितेमध्ये आल्यानंतर एक दिवस
"जान ए वफा" या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्यावेळी खय्याम साहेबांना मी सर्वप्रथम भेटले होते.
स्टुडियोतील रेकॉर्डिंग रुममध्ये मी पाऊल टाकत नाही तोच रेकॉर्डिस्टला काही सुचना देत असलेल्या खय्यामसाहेबांनी मान वळवुन माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहर्यावर ही कोण आहे? कशाला आली आहे? असे त्रासिक भाव अगदी स्पष्टपणे मला दिसले होते. आपलं येणं यांना आवडलेलं दिसत नाही? मला वाटुन गेलं आणि मनातुन मी थोडी खट्टु झाले. हा माझ्यासाठी नवा,नेहमीपेक्षा वेगळा अनुभव होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अनु मलिक या संगीतकारांच्या रेकॉर्डिंग कव्हरेजसाठी गेलं की ते आनंदाने स्वागत करत, रेकॉर्ड होणार्या गाण्याविषयी भरभरुन बोलत असत.
"अच्छा, ठीक है, बैठिये, रेकॉर्डिंग होने के बादही मैं बात करुंगा" स्वत:ची ओळख करुन देत माझ्या येण्याचं कारण सांगितल्यावर रुक्ष पण सौम्य स्वरात त्यांनी मला सांगितलं.
रेकॉर्डिंग संपल्यावर मात्र रेकॉर्ड झालेल्या गाण्याविषयी, चित्रपटाच्या संगीताविषयी ते बोलते झाले होते.त्यांचा मुलगा प्रदीप या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे याचीही त्यांनी माहिती दिली होती. त्यादिवशी खय्यामजींच्या पत्नी व जेष्ठ गायिका जगजीतजी व प्रदीप सुध्दा स्टुडियोमध्ये हजर होते जगजीतजींचं मधुर हास्य व मोहक चेहरा तिथल्या गंभीर, शीस्तबध्द वातावरणामध्ये वार्याची झुळुक यावी तशी प्रसन्नता निर्माण करत होता."तुम अपना रंजो गम" किंवा " काहे को ब्याही बिदेस" ही त्यांनी गायलेली गाणी केवळ मलाच नव्हे तर अनेक सिनेरसिकांना आवडत असतील यात शंका नाही.
या भेटीनंतर जवळपास दहा-बारा वर्ष खय्यामसाहेबांना भेटण्याचा योग आला...
त्यांच्याशी पुन्हा भेट झाली ती २००२ मध्ये. त्या भेटीनंतर त्यांच्याशी माझा घनिष्ठ परिचय तर झालाच परंतु त्यांच्या स्वभावाशी देखील माझी ओळख झाली. लेखक-दिग्दर्शक कमाल अमरोही व मीनाकुमारी यांच्या जीवनावर आधारित "इष्काचा जहरी प्याला" या पुस्तकावर मी काम करत होते व त्यानिमित्ताने अमरोही व मीनाकुमारीचे नातेवाईक, त्यांच्यासह काम केलेल्या व्यक्ती, मित्रमंडळी आदिंना भेटत होते. कमाल अमरोही निर्मित "शंकर हुसैन" व " रजिया सुल्तान" या दोन्ही चित्रपटांना खय्याम यांचं संगीत होतं.
त्यामुळे एक दिवस खय्यामसाहेबांना फोन करुन मी सदर पुस्तकाविषयी माहिती देत भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
"आप संडे दोपहर बारा बजे घर आ जाइए, मैं सिर्फ बीस मिनिट बात करुंगा, आपको जो पुछना है बीस मिनिट में पुछिए, और हां...मुझे देरी पसंद नहीं, आप ठीक बारा बजे आ जना". इतकं बोलुन त्यांनी खाडकन फोन बंद झाला.
पुस्तकासाठी मला त्यांची भेट हवी होती. जागेच्या-शब्दांच्या मर्यादा सांभाळत वॄत्तपत्रामध्ये त्रोटक लेख लिहिणं आवश्यक असतं. परंतु पुस्तकामध्ये सर्व गोष्टी सविस्तर, सर्व बारकाव्यांसह येणं गरजेचं असतं असं मला वाटतं. "रझिया सुल्तान" ची सर्वच गाणी हिट आहेत. "शंकर हुसैन" हा चित्रपट जास्त चालला नसला तरी त्यातील "आप युं फ़ासलों से गुजरते रहें" (लता मंगेशकर) आणि कहीं एक मासुम" (महंमद रफी) ही दोन गाणी आजही लोकप्रिय आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या संगीताविषयी आणि कमाल अमरोही- मीनाकुमारी यांच्याबद्दल वीस मिनिटांमध्ये सविस्तर बोलणं कसं शक्य होईल ?
बघु, त्यांची पुन्हा एखादी भेट मागण्याचा प्रयन करु असा विचार करत रविवारी दुपारी ठीक १२ वाजता मी खय्यामजींच्या फ्लॅटची बेल वाजवली. त्यांच्या मुलाने- प्रदिपने दरवाजा उघडला. हाय हॅलो करुन मला बसण्यास सांगुन मी आल्याची वर्दी खय्याम साहेबांना देण्यासाठी तो आतल्या रुममध्ये निघुन गेला.
काही मिनिटांतच खय्याम साहेबांनी हॉलमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वामध्ये असलेला एक प्रकारचा दबदबा मला पुन्हा एकदा जाणवला. दोन चार वाक्यांमध्ये पुस्तकाविषयी माहिती देत मी त्याचं बोलणं रेकॉर्ड करु लागले.
ते अतिशय तन्मयतेने, मनापासुन मीना कुमारी व कमाल अमरोहींविषयी बोलत होते. काही वेळाने हॉलमधील भिंतीवर लटकत असलेल्या मोठ्या घडाळ्यावर माझी नजर गेली.जवळपास पाऊण तास होऊन गेला होता. पण तरीही मी बोलणं, प्रश्न विचारणं सुरुच ठेवलं. बोलणं संपल्यावर पुन्हा एकदा मी घडाळ्याच्या काट्यावर नजर टाकली तर दोन वाजायला पाच मिनिटं बाकी होती.खय्यामजींनी मला वीस मिनिटं वेळ दिला असला तरी दोन तास आमचं बोलणं झालं होतं. बोलणं पुर्ण होताच त्यांनी जगजीतजींना हाक दिली तशा त्या हॉलमध्ये आल्या.
"ये अनिता है, कमालसहाब और मीनाजी पर कि़ताब लिख रही है, बड़ी होनहार बच्ची है, बहोत मालुमात रख़़ती है". त्यांनी जगजीतजींना सांगितलं.
पुढे काही महिन्यांत पुस्तक लिहून पुर्ण झाल्यावर प्रस्तावना लिहिण्याविषयी विचारणा केल्यावर खय्यामसाहेबांनी तात्काळ होकार तर दिलाच परंतु कसलेही आढेवेढे न घेता पुस्तकाचं प्रकाशन करण्यास देखील ते राजी झाले.
त्यावेळेपासुन खय्याम व त्यांच्या कुटुंबीयांशी माझे जवळचे संबंध निर्माण झाले ते कायमचे. आज खय्यामसाहेब या जगात नाहीत, परंतु आपल्या सुमधुर,श्रवणीय गाण्यांव्दारे ते कायम जीवंत रहातील.
खय्यामसाहेबांना विनम्र अभिवादन👏
अनिता पाध्ये
[19/08, 18:23] Charudatta Kulkarni: अर्थाला चाल लावणारा माणूस...
प्रत्येक गायक, संगीतकार, गीतकार आपल्या आवडीचा असतोच असं नाही. काहीजण आपल्याला कायमस्वरूपी आवडून जातात, काहीजण काही कालावधीत आवडतात, काहीजण उगाचच आवडत नाहीत म्हणजे तसं ठोस कारण काही नसतं पण नाही आवडत. काहीजण एक वेगळा आब, दर्जा राखून असतात, त्यांच्याकडे आदरानेच पाहिलं जातं. मदनमोहन, जयदेव आणि खय्याम हे त्या वर्गातले. मोजकं पण भरीव काम, उगाच तडजोड नाही. उगाच एक ग्रॅमचे दागिने घडवणारे कारागीर नव्हेत ते, राजघराण्याचे दागिने घडवणारे सोनार सगळे. तत्व ठरवणं खूप सोपं असतं, यशापयशाची पर्वा न करता ते शेवटपर्यंत सांभाळणं मोठं कठीण काम. खय्यामनी उच्च दर्जाचं काव्य कायम निवडलं. बाकीच्या संगीतकारांना कुणी बंदी केलीये का पण अर्थ समजणे आणि तो हुडकणे यात फरक असतो. मदनमोहन, जयदेव, खय्याम या तिघांकडे हे कसब होतं.
प्रत्येक संगीतकाराची एक खासियत असते. कुणी ठेकाप्रवीण असतं, कुणी मेलडी छान देतं, कुणी गायला अवघड पण ऐकणीय चाली देतं, कुणी चायना माल देतं - आकर्षक, पटकन संपणारा, कुणी गुणगुणायला सोपं काम करतं तर कुणी एका ठराविक साच्यात काम करतं. खय्यामकडे धावपळ, चमत्कृती, वेगळेपणाचा अट्टाहास दिसणार नाही. जे काय आहे ते सगळं शांत शांत. आपल्याला शांतता सहन होत नाही कारण आपल्याला त्याची सवय नाही. एखाद्या निबिड अरण्यात असणारी शांतता आपण उपभोगू शकत नाही, आपल्याला भीती वाटते कारण सवय नाही. तुम्ही ते किडे बघाल, ते भगभगत्या दिव्याकडे लवकर आकर्षित होतात, भले प्रसंगी जीव गेला तरी चालेल. खय्यामच्या चाली म्हणजे दीपमाळ आहे. भव्य पण शांतपणे तेवणा-या अनेक ज्योती. त्याचं कुठलंही गाणं ऐकाल, धबधबा आढळणार नाही. एक संथ लय असलेल्या नदीच्या काठी बसल्यासारखं वाटेल. संथपणा हा एरवी दुर्गुण असतो पण खय्यामच्या चालीत येतो तेंव्हा तो गुण असतो. काही लोकांचा नशीबी प्रसिद्धी, कौतुक, गुणवत्ता असूनही सतत यश नशीबी नसतं. मदनमोहनच्या नशीबात टुकार हिरो आणि पडेल चित्रपट होते. खय्यामला यश मिळालं, पुरस्कार मिळाले हे त्यांचं भाग्यं. आरडीला टुकार 'सनम तेरी कसम'ल मिळालं फिल्मफेअर, खय्यामला 'कभी कभी' आणि 'उमराव जान'साठी. अलौकिक काम केलंत तरी त्याचं कौतुक होणं नशीबात लागतं.
खय्यामचा दोष म्हणाल तर एकच, त्याची गाणी त्याची म्हणून ओळखू येतात, त्यातल्या हिरो हिरोईनचा चेहरा डोळ्यापुढे येईलच असं नाही. फारुख शेख, जितेंद्र, खन्ना ते अमिताभ अशी अफाट रेंज त्याच्या गाण्यात होती पण म्हणून ती त्यांची गाणी म्हणून ओळख राखून नाहीत. तलत, लता, आशा, रफी, मुकेश आणि किशोर सगळे त्याच्याकडे गायले. 'त्रिशूल', 'नूरी', 'आखरी खत', 'थोडीसी बेवफाई', 'कभी कभी', 'बाजार', 'रझिया सुलतान' आणि अख्खा 'उमराव जान' अशी क्लासेस ते मासेस रेंज त्यांनी दिली. तलम महमूदचं 'शामे गमकी कसम' ऐकाल कधी. आधीच त्याचा तो कापरा आवाज आणि ती शांत चाल अंगावर येते, उदासीन वाटू शकतं तुम्हांला, ही ताकद असते चांगल्या संगीतकाराची.
आजी म्हणायची, बाहेरचं खाऊ नये, त्या माणसाचा स्वभाव त्यात उतरतो. आता ते शक्य नाही पण खय्यामकडे बघितलं की मला ते पटतं. त्यांचं बोलणं, वागणं किती शांत होतं. खळखळून हसणारे खय्याम क्वचित दिसले, त्यांच्या चाली ऐकाल तर जाणवतं की त्यांचा स्व'भाव त्या चालीत मुक्तपणे संचार करतोय. कुठलंही गाणं घ्या, धावपळ नाही, 'वो सुबह कभी तो आयेगी', 'बहारों मेरा जीवन', 'तुम अपना रंज ओ गम', ' कभी कभी मेरे दिलमे', 'मैं पल दो पलका शायर', 'मेरे घर आयी एक', 'दिखाई दिये यूं', 'करोगे याद तो', 'फिर छिडी रात', 'आजा रे, ओ मेरे दिलबर', 'ऐ दिले नादान', कुठलंही ऐका, एक शांतरस कुणीतरी भरभरून ओततंय असं वाटेल. 'जाव, चने खाव' असा राजकुमारचा टुकार डायलॉग असलेला 'चंबल की कसम' मी पाहिलाय, त्यातलं 'सिमटी हुई ये घडियां' ऐकाल. खय्यामचा दोष इथे कामाला येतो, कुणावर चित्रित केलंय हे नाही कळत तेच बरं आहे. मला 'मिलो न तुम तो' आणि 'ये दुनिया' बघताना पण हे वाटत आलेलं आहे, मदनमोहनला पार भुईसपाट केलंय त्यात.
किशोर आरडीकडे कायम वेगळा भासतो असं माझं मत आहे. पण तुम्ही खय्याम कडे किशोर ऐकला तर तसंच वाटेल. 'प्यार कर लिया तो', 'तेरे चेहरेसे', 'मोहब्बत बडे काम की', 'जानेमन तुम कमाल करती हो', 'आखोंमे हमने आपके', 'ये मुलाकात एक बहाना है' आणि 'हजार राहे मुडके देखी', ऐकाल आणि अनुभवाल. गुरु जशी एखादी चीज आपल्या खास विद्यार्थ्याला देतो तसा खय्यामने 'उमराव जान' आशाला दिला. ओपी, आरडीकडची आशा वेगळी आणि खय्यामकडची वेगळी. 'दिल चीज क्या है', 'इन आखोंकी', 'ये क्या जगह है' आणि विषयांतर होईल पण तिचं जयदेवकडचं 'तुमुल कोलाहल कलहमें' ऐकाल, एकच जातकुळी आढळेल. व्रात्य कार्टी जिथे दबदबायुक्त आदर आहे अशा मास्तुरे समोर शांत बसतात, तसे मला किशोर आणि आशा खय्यामकडे दिसतात.
मरण सगळ्यांनाच आहे. अकाली गेलेत का खय्याम? नाही, पण एकगठ्ठा मतदान व्हावं तशी एकापाठोपाठ एक सज्जन आणि गुणी माणसं नाहीशी होत चाललीयेत. शब्दाला चाल कदाचित कुणीही लावू शकेल, पण अर्थाला चाल लावायला ताकद हवी.
खय्याम! अर्थाला चाल लावणारा माणूस परवा गेला, एवढं खरं.
जयंत विद्वांस
[19/08, 18:25] Charudatta Kulkarni: #खय्याम
हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें
दोन वर्षांपूर्वी , आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाला खय्याम साहेबांनी नव्वद लाख रुपये दान दिले. आयुष्याच्या या टप्प्यावर, विशेषतः सामाजिक जीवनातून निवृत्त झाल्यावर समाजाशी अशी ठेवलेली बांधिलकी पाहायला मिळत नाही. अतिशय कौतुक आणि आदर वाटत असतानाच, मनात पाल चुकचुकली, नव्वद वर्ष ! नव्वद वर्ष झालीही …
अगदी अजूनही, संध्याकाळ झाली की तलत रुंजी घालतो की. चौसष्ट वर्षांपूर्वी बांधलेले हे गीत त्याच हळवेपणाने साद घालते.
दिल परेशान है, रात वीरान है ( फुटपाथ )
देख जा किस तरह, आज तनहा हैं हम
शाम ए ग़म की कसम
आकाशाच्या कॅनव्हासवर हवे तसे रंग भिरकटवुन सूर्य नुकताच क्षितिजाखाली जातो. ती परवलीची खूण समजून छोटीशी चांदणी हळूच डोकावते. त्या धूसर प्रकाशात नेहेमीचा परिसरही वेगळा दिसतो. उतरलेल्या सावल्या अंगावर झेपावतात. मन उगाच कातर होते. नको नकोसे विचार गुदमरून टाकतात. मनाच्या खोल कबरीत दफन केलेल्या आठवणी बाहेर येण्यासाठी धडका देऊ लागतात.
मागे टाकलेले आयुष्य, जुन्याच स्वरूपात सामोरे येऊन जाब घेते.
मागे तर जाता येत नाही आणि मागचे विसरता ही येत नाही.
गाणे सुरूच होते इलेक्ट्रिक ऑर्गनने ...मग पिआनो आणि नंतर स्ट्रिंग इन्स्टुमेंट्स.. त्याला धरून तलत चा सूर येतो.
आ भी जा आ भी जा...ची आर्त विनवणी दिलीपच्या डोळ्यात दिसते.
फुटपाथ या सिनेमाला माफक यश मिळाले पण हे गीत तुफान गाजले.
एक ताऱ्याचा उदय झाला.
मिळालेलं यश वापरून घेणे खय्याम यांनी केले नाही. एका वर्षाला एक सिनेमा हे धोरण ठेवल्याने असेल, त्यांनी दर्जाशी तडजोडी केल्या नाहीत.
शोला और शबनम या सिनेमात असेच अजून एक हळवे करणारे गीत आहे,
जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें ( शोला और शबनम )
राख के ढेर में शोला है न चिंगारी है
मोहम्मद रफीच्या पहिल्या दहा गीतांत याचा नंबर लागेल. अतिशय गुंतागुंतीची रचना ,
तुटलेल्या मनाचे बरेच कंगोरे असतात. विरहाची वेदना, प्रतारणेचे दुःख, नियतीचा फटका..
आधीच्या विरह गीतात मिलनाची उत्कट इच्छा आहे तर हा विरह मात्र नायकाने स्वतःहून स्वीकारला आहे. त्यात ठाम निर्धार सुद्धा आहे..
समजूत काढणारे आणि स्वतःच्याच मनाला सावरणार असे हे गीत, स्वतः खय्यामजींचे आवडते आहे.
मित्राचा त्याग का मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग; मैत्री का प्रेम हा सवाल कठीण. हिंदी सिनेमाच्या आदर्शवादी नायकाचा पर्याय हा
दुसरा असणार हे स्वाभाविक आहे. इथे तो आपल्या प्रियेला समजावत आहे.
काव्याबद्दल असलेला आदर खय्याम यांच्या स्वरात प्रत्ययास येतो.शब्दाचे वजन सांभाळून केलेली ही स्वररचना आहे .
सारंगी, मग संतूर आणि टोका चाइम्स बरोबर बासुरी सुद्धा पूर्ण गीतात पाठशिवणीचा खेळ खेळते. सारंगी, बासुरी, गिटार आणि सॉफ्ट व्हायोलिन चा कल्लोळ आणि नायकाच्या मनातील ‘controlled” वादळ यांचा मेळ आहे या रचनेत .
स्वतःचा स्वार्थ डावलून नायक समजावतो,
आरजू जुर्म, वफ़ा जुर्म, तमन्ना है गुनाह
ये वो दुनिया है यहाँ प्यार नहीं हो सकता
कैसे बाजार का दस्तूर तुम्हे समझाऊँ
बिक गया जो वो खरीदार नहीं हो सकता
१९६६ मध्ये आलेल्या आखरी खत मध्ये असलेली तीनही गीते गाजली.
“बहारों मेरा जीवन भी सवारों “ या गीतात नायिकेची निरागसता आहे. वयात आलेल्या मुलीचे मनोगत. हे गीत गाजले.
दुसरे आहे, “ और कुछ देर ठहर “ bold words, full of open lust …आणि त्याला साजेसी sensuous melody.
Sex can be so sublimely erotic.
यातच भूपेंद्रचे एक सुरेख गाणे आहे.
रुत जवां जवां, रात मेहेरबां ( आखरी खत )
छेडो कोई दास्तां
हे गीत क्लब सॉन्ग. अशा अनवट , अनोळखी आवाजांचा योग्य वापर खय्याम यांनी योग्य जागी केला आहे. नितीन मुकेश चे ‘आजा रे ओ मेरे दिलबर आजा’ , किंवा सुलक्षणा पंडित चे” माना 'तेरी नजर में ,तेरा प्यार हम नही’ तसेच रझिया सुलतान मधले कब्बन मिर्झा चे ‘ खुदा खैर करे “ .त्यांनी कुठेही दर्जाशी तडजोड केली नाही .. हे आवाज, मुख्य आवाज मिळाले नाहीत म्हणून घेतले नाहीत असे नाही .. हे आवाज त्या त्या पात्राला फिट्ट बसले आहेत.
संगीत शब्दाला जागा देते इथे. सुराबरोबर शब्द सरकतात. भूपेंद्र गिटारिस्ट आहे हे अनेक जणांना माहित असेल. त्यामुळे त्याचे गिटार धरणे सुद्धा परफ़ेक्ट आहे आणि कॉर्ड्स वाजवल्या जात आहेत ..डोळ्यांना बरे वाटते ते. :)
हे गीत गाताना , मधल्या जागी पात्रांचे संभाषण आहे ..त्याला कुठेही धक्का येऊ न देता गाणे पुढे सरकते.
प्रसंगाला धक्का लागू न देता गाणे मनावर ठसवणे हे खय्याम साहेबांचे कौशल्य आहे.
आखरी खत या सिनेमाबद्दल बोलताना खय्याम म्हणतात,
या सिनेमात चारहजार फूटाचे संवाद होते तर आठ हजार फुटांची स्तब्धता. चेतन आनंदने संगीत कसे हे सांगताना म्हटले होते, निरव शान्तता, मग त्याच्या पोटी असंख्य भावना असल्या तरी चालेल, ही संगीताच्या माध्यमातूनच व्यक्त झाली पाहीजे .
या सिनेमातच नाही तर पुढेही खय्याम साहेबांनी या शांततेला बोलके केले.
ऐ दिल -ऐ - नादान , (रझिया सुलताना)
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है ?
रझिया सुलतान ही प्रेमकहाणी आहे . एक राणी आणि तिचा गुलाम यांची प्रेमकहाणी. शाही सल्तनतीचे सारे नियम धुडकावून रझिया राज्ञीपद पटकावते. तिच्या मंत्रिमंडळाला, रयतेला हा निर्णय सुरुवातीला आवडलेला नसतोच पण आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर रझिया त्यांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण करते. शासक हा जरी प्रजेला बांधील असला तरीही त्याचे स्वतःचे मन असतेच. ते कोणावर जडेल हे तो कसे ठरवू शकतो ! रझियाचे प्रेम आहे जमात उद दिन याकूतवर. हा एक हबशी गुलाम आहे. रयतेला हे मान्य असणे असंभव . राज्य किंवा प्रेम यातील एकच पर्याय निवडणे रझियाच्या हातात आहे. रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे .
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है ?
ह्या गीतात शब्द आणि सूर तर आहेतच पण वादळी शांतता आहे. पाच ते सात सेकंदाचे मोठे अल्प विराम या गीतात गुंफले आहेत. राज्यकरण्याची तिची मनीषा आहेच. ते केवळ कर्तव्य नाही . ती महत्वाकांक्षा आहे पण ती एक स्त्रीसुद्धा आहे. प्रेमात असलेली स्त्री . राणी का प्रेयसी ह्यातील पर्याय निवडणे दुःखदायक आहे.
क्या क़यामत है, क्या मुसीबत है,
कह नहीं सकते, किसका अरमाँ है
ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है
ये ज़मीं चुप है, आसमां चुप है
रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे .
हरवलेली ती, जमिनीकडून, आकाशाकडून आपल्या प्रश्नाची उत्तरे मागते पण ते सुद्धा तिच्या मनातील स्पंदने जाणून गप्प आहेत . एवढी निरव शांतता आहे की फक्त तिच्या दिलाची धडकन त्या शांततेची साक्षीदार आहे .
मन आणि हृदय यांच्यात फरक आहे. हृदय भावनेशी बांधलेले असते. त्याला विचारांची जोड नसते. हृदयातून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. मन, भावना आणि विचारांना स्मरून निर्णय घेते. बंध तोडणे हृदयाला कठीण आहे खरे पण मन मात्र हा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेऊ शकते. महत्वाचे असते ते एका क्षणात निर्णय घेणे. जेवढा जास्त विचार तेवढी मनाची दुविधा. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणे अस्वस्थ करते, गोंधळात पाडते. एकतर ठरवलेला रस्ता अचानक वेगळेच वळण घेतो किंवा रस्त्याच्या फुटणाऱ्या फाट्यावर मन घट्ट करून दुर्लक्ष करावे लागते . भले तो रस्ता कितीही हवाहवासा वाटुदे!
सिनेमाच्या क्षेत्रात काम करताना , परिपूर्णतेचा ध्यास ठेवणे हे कठीण आहे. व्यावहारिक यशाच्या मोजमापनात अडकायचे झाले तर अशक्य कठीण आहे. खय्याम हे सुखद अपवाद आहेत.सिनेमा कोणत्याही दर्जाचा असो, त्यांच्या संगीताचा दर्जा फार वरचा आहे.
He is a romantic perfectionist . त्यांच्या पत्नीचा प्रभाव असेल ..काही अप्रतिम प्रेमगीते त्यांनी बांधली आहेत.
ठहरिये होश में आ लूँ, तो चले जाईएगा
आप को दिल में बिठा लूँ, तो चले जाईएगा
Flirting song ...त्याला उत्तर म्हणून सुमन कल्याणपूरचा हुंकार आहे तो खूप गोड़ आहे.
तसेच शंकर हुसैन मधले “आप यु फासलों से”
रात आती रही रात जाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
सुरुवातीलाच लताचे खळखळते हसणे ऐकू येते ..दबलेले. ...गातानाच आलेले हसू .. ते नक्की कसले आहे हे समजत नाही . प्रियकराच्या आठवणीने आलेले ..कोणता तरी किस्सा आठवून ..का एवढ्या सुंदर रात्री साथ द्यायला तो नाहीच ह्याने खंतावलेले आहे..
कतरा कतरा पिघलता रहा आस्माँ
रूह की वादियों में न जाने कहाँ
इक नदी... इक नदी दिलरुबा गीत गाती रही
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
लता बाईंचा आवाज एवढा स्वर्गीय आहे की हे कठीण सूर…(गाणे परत एका, अतिशय अवघड मेलडी आहे ही..) कुणीतरी आकाशातल्या दूरस्थ आत्म्याचे रुदन वाटते. आणि अंतराच्या शेवटी येणारे काहीसे उपहासात्मक हसू… आता अगदी स्पष्ट…
शंकर हुसेन मधली सगळीच गाणी अप्रतिम… सिनेमा मात्र त्याला न्याय देऊ शकला नाही.
त्यांच्या संगीतात एक नजाकत होती आणि अर्थात संगीताची उत्तम जाण. बुद्धिमान संगीतकारांत खय्याम यांची गणना होते कारण कथा, गीत या सर्वाना अनुसरून त्यांच्या चाली होत्या . त्याच्यापेक्षा त्यातले सूर त्यांनी श्रेष्ठ व्हायला दिले नाहीत.
हे भल्या भल्या संगीतकारांना जमत नाही..
मला स्वतःला इथे त्रिशूल, कभी कभी ची गाणी घालायची नाहीत ..पण त्रिशूल मधले एक अंगाईगीत आहे, “ तू मेरे साथ रहेगा मुन्ने” एका कुमारी मातेने गायलेली अंगाई आहे ही. नेहेमीसारखा चांदोबा, पर्या, तारे या गीतात नाही. साऱ्या जगानेच नाकारलेली ही स्त्री, मुलाला कणखर बनायला सांगत आहे.स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्याला तयार करते आहे.
हे सूर आहेत विद्रोहाचे ...आणि करुणेचे..
या एकाच गीतात खय्याम यांची “ सिने-संगीतकार’ म्हणून ताकद दिसून येते.
एका अत्यंत गुणी संगीतकाराला, तेवढ्या ताकदीचे सिनेमा का मिळाले नाहीत हा नशिबाचा भाग आहे..पण त्यामुळे त्या संगीताचे , त्या गीतांचे मोल कमी होत नाही.
“फिर सुबह कभी तो आयेगी” या गंभीर सिनेमात सुद्धा एक सुंदर गाणे आहे,
फिर ना कीजै मेरी गुस्ताख़ निगाहों का गिला
देखिये आप ने फिर प्यार से देखा मुझको
गढद निळ्या रात्रीच्या प्रकाशात, समुद्राच्या किनारी हे चित्रित झाले आहे. मंद सुटलेला वारा, रात्रीची निरव शांतता, लांबून येणारी समुद्राची गाज आणि मुकेशचा हितगुज करणारा आवाज.
प्रेमाची कबुली सगळ्यांनाच काही स्पष्ट शब्दात देता येत नाही.पण शब्द जरी बुजलेले असले तरी नजर धीट आहे. तिचा अन्दाज त्याला माहित नाही. ती रागावली नसेल याची खात्री तिच्या लाजऱ्या नजरेने दिली असली तरीही खात्री करून घेण्यासाठी तो विचारतो,
एक यूँ ही सी नजर दिल को जो छू लेती है
कितने अरमान जगाती है तुम्हे क्या मालूम
प्रत्येक शब्द अर्थपूर्ण, त्यात पुढची स्वप्ने आहेत...सोबतीची अपेक्षा आहे. जिच्या प्रेमभऱया नजरेने त्याला ती हिम्मत दिली आहे.त्यांची नजर भिडते मग गडबडून दुसरीकडे वळते .. त्याचा आता धीर वाढतो.
हर नज़र आपकी जज्बात को उकसाती है
मैं अगर हाथ पकड़ लूं तो खफ़ा मत होना
साहिरचे धीट शब्द, मधात बुडून येतात आणि मग मात्र ती स्पष्ट कबुली देऊन टाकते,
मेरी दुनिया-ए-मोहब्बत है तुम्हारे दम से
मेरी दुनिया-ए-मोहब्बत से जुदा मत होना
फार कमी गाण्यात साशंकता,लज्जा, धिटाई आणि समर्पण एकेमकांचे हात धरून येतात .
राज कपूर आणि माला सिन्हा साठी सुद्धा हे गीत पहा. त्यावेळचा मेलोड्रामा लक्षात आणला तर खूप वेगळे आणि खरे वाटते..
ही सगळी गाणी म्हणजे शब्द आणि सुरांचा संगम. काव्याची जाण खय्याम साहेबांना होती आणि म्हणूनच कभी कभी सिनेमाच्या संगीतासाठी साहिर यांनी खय्याम यांचे नाव सुचवले. त्यांचा मृत्यू धक्कादायक नाही. वय झाले होते आणि एक संपन्न , समृद्ध कारकीर्द यशस्वीरीत्या संपली होती. तरीही काल त्यांच्या मृत्यूनंतर सुन्न वाटले. रेंगाळणारी उदासी, जी त्यांच्या गाण्यात दिसते तशीच.. एक पर्व अस्ताला गेले. मदनमोहन, एस डी बर्मन, अनिल विश्वास, सलील चौधरी..आणि त्या वेळचे अनेक, ज्यांच्यासाठी संगीत हा व्यवसाय नाही तर त्यांचा श्वास होता.जगण्याचे माध्यम नाही तर जगण्याचे कारण होते. ते युग अस्ताला गेले
बरसता-भीगता मौसम धुआँ-धुआँ होगा
पिघलती शमों पे दिल का मेरे ग़ुमां होगा
हथेलियों की हिना, याद कुछ दिलायेगी
तुमची गीते सदैव स्मरणात राहतील ..
( आधीचा लेख खय्यामवर नसून साहिर- अमृतावर झाला आहे असे अनेक लोकांना वाटले, ते खरेही होते..पण ‘ चांदनी रात में इक बार तुम्हे देखा है”, ‘ सिमटी हुई ये घडियां , आणि तुम अपना रंजो गम “ ही तीनही गाणी माझी अत्यंत आवडती..आणि माझ्यासाठी तरी ती साहिर--अमृता--इमरोज यांची आहेत...त्याबद्दल परत कधीतरी )
Priya Prabhudesai
No comments:
Post a Comment