गुलजार - चित्रपट कथा,पटकथा आणि त्यांच्या चित्रपटातील स्त्री...
चित्रपट रसिकांना एखादा चित्रपट खूप आवडतो..म्हणजे काय?. तर..त्याची कथावस्तू (स्टोरी) प्रथम आपल्या मनाचा ठाव घेतेआपल्या भोवतालचीच कथा आहे असे वाटते आणि आपण त्यात रमून जातो. त्या नंतर त्यात अभिनय करणारे कलाकार येतात.संगीत,गाणी,संवाद,चित्रकरण हे एक जमेची बाजू.आणि मग तो चित्रपट गाजतो.यशस्वी होतो.असे हे चित्रपट यशस्वी करण्यात पटकथेचा सर्वात मोठा वाटा असतो.
आता ही पटकथा म्हणजे तरी काय? तर.. त्या चित्रपटाची लेखकाने लिहिलेली मूळ कथा पासून चित्रपट निर्मिती साठी मुद्देसूद लिहिलेली एक संवाद सहित आणखीन कथा म्हणजे पटकथा.
ही पटकथा.जितकी सशक्त आणि मनाला भिडणारी तुमच्या भावना चालवणारी,डोळ्यात पाणी आणणारी आणि दर्शकांना खिळविण ठेवणारी असली तेवढाच चित्रपट यशस्वी होणाया मदत होते.कथा कर (लेखक) हा ऊत्तम पटकथाकार कधीच नसतो.. सिने जगतात अशी पटकथा उत्कृष्ट पणाने लिहिणारी एक जमात असते.त्यांना ' पटकथाकार ' असे म्हणतात "गुलजार" त्या पैकी एक गाजलेले नांव आहे.
चित्रपटाला एक साधारण गती असते.(असायला पाहिजे). ती लक्ष्यात घेता ..सध्या शब्दात सांगायचे तर ..चित्रपटाचा प्रत्येक सिन (दृश्य) कथेनुसार एक पाऊल पुढे गेले पाहिजे. (चालण्याच्या गतीला जसा एक 'फॉर्म' असतोना,तसा सिनेमाच्या दृश्याला एक 'फॉर्म' असायला हवा. हे चित्रपट धूम चालण्याचे साधे,सरळ गणित आहे.)
पटकथा लेखनाच्या यशा मध्ये 'मूळकथा' निवडीला फार प्राधान्य असते.तुम्हाला कथा नीट निवडता आली पाहिजे कथा तुमच्या मनाला भिडणारी,संदेश देणारी असली तर तुम्ही तिच्यात अतिरिक्त कथा कंगोरे, वळण,धक्का दायक प्रसंग खुलवीत आपली लेखन क्षमता आणि प्रतिभाला पूर्ण वाव देऊ शकता.
"गुलजार" प्रत्येक चित्रपट का गाजतात? तर प्रेक्षका ना वैचारिक आणि भावनिक द्वंद्व करायला लावणारी त्यांची पटकथा कारणीभूत असते.
"गुलजार" यांच्या कारकीदीत सफल आणि चर्चित चित्रपट कथा ह्या बंगलोर येथी एक साधारण हॉटेल "वेस्ट एन्ड" मध्ये वास्तव्य करून आजूबाजूचा परिसर निसर्ग रम्य परिसरता फक्त एक साधारण टेबल-खुर्ची वर बसून लिहिलेल्या आहेत.
त्यात एकदा 'मोसम" ची पटकथा लिहीत असतांना त्यानं भेटायला आलेल्या एक चाहत्यां महिलांची बोलण्याची ढब आणि नखरे पाहून त्यानं 'मोसम" मधील 'कजरी' ह्या पात्राची बोलण्याची कल्पना सूचली होती. "वेस्ट एन्ड" हॉटेल मधील एका वेटरच्या मुक्या आणि बधिर मुलाला पाहूनच त्यांनी एक वेगळा संदेश आणि समाजचे लक्ष अश्या व्यंग असणाऱ्या लोकां कडे आकृष्ट करण्या करिता प्रयोगात्मक पटकथा "कोशिश" म्हणून लिहिली होती.(संजीव कुमार,जया भादुरी अभिनित हा चित्रपट समीक्षक यांनी वाखाणला होता.)
"गुलजार" यांच्या काही गाजलेले चित्रपटाच्या पटकथात गुड्डी,कोशिश,मौसम,अचानक,इजाजत,आनंद,अंगूर,हू तू तू.बसेरा,आंधी.मीरा प्रामुख्याने आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटाच्या पटकथा ह्या मोजून दहापंधरा दिवसात तयार झाल्या आहेत.
फिल्मी जगतात जेंव्हा एखादी स्त्री चित्रपट निर्मात्री व्हायचे ठरवते तेंव्हा ती स्त्रीवादी चित्रपटच बनविणार असे गृहीत धरले जाते. पण एखादा पुरुष स्त्री केन्द्री चित्रपट बनवितो, तेंव्हा ते थोडे वेगळ मानले जाते. मला प्रश्न पडतो: गुलजार यांना स्त्रीवादी दिग्दर्शक म्हणून का मानल जात नाही? विशेषत: त्यांनी बरीच केंद्रीय पात्र- "मेरे अपने' मधील मीना कुमारीने साकारलेल्या नानी मा पासून ते पार "हुतुतू" मधल्या तब्बुच्या पन्ना पर्यंत -स्त्री असतांना.
खरोखर हिंदी सिनेमातल्या बर्यच अविस्मरणीय स्त्री भूमिका त्यांच्या चित्रपटात आहेत.या सर्व पात्रांच्या छटा वेग वेगळ्या असतील. पण स्त्रीच सामर्थ्य ( किंवा तिचा दुर्बल पणा ) हे कायम त्यांच्या चित्रपटचा ठळक भाग राहिला आहे. "मी हे मुद्दाम केले नाही,स्त्रियांचं बाजूने पक्षपात केला असे ही नाही पण मी नेहमी सविस्तर काम करतो.माझी पात्रे म्हणजे केवळ रेखाटन नसतात.चित्रपट मधील छोट पात्र--मग ते स्त्री असो की पुरुष नीट आखल जात. कदाचित मी अशा कथा निवडल्या ज्यात स्त्रीपात्र अधिक महत्वाची होती". असे गुलजार म्हणतात.आजचे बरेच आघाडीचे नायक स्त्री केन्द्री विषयान पासून दूर राहणे पसंत करतील.
.स्वत: संवेदनशील असल्यानेआपल्या चित्रपटातील स्त्रीत्वाची वेदना, भावना पकडण्यात ते यशस्वी झालेत का?? या वर ते म्हणतात "यात साहित्याचा फार मोठा वाटा आहे.शिवाय प्रत्यक्ष जीवनात,समाजात आजूबाजूला दिसणाऱ्या स्त्रियांचे पात्र रेखाटन चा बराच सहभाग असतो. औरत ही औरत का दर्द समझेगी हे जुने झाले आहे.कदाचित पुरुषच स्त्रीयांन अधिक चांगले ओळखतात असे ते सांगतात.
आठवून बघा - त्यांची चित्रपटातील स्त्री पात्रे :- नानीमा,आरतीदेवी,कजरी,कुसुम,मीरा,सुधा,रेवा,पन्ना..एका पुरुषाने अगदी जवळून ओळखलेल्या स्त्रिया....++++++++++++++++++++++++
आजची स्पॉट लाईट- आमचा देवानंदची एक खासियत तुमच्या लक्ष्यात आली नसेल.चित्रपटात त्याच्या हातात कुठलेही पत्र आले तर ते कधीच सरळ न वाचता आधी त्याकडे डोळे बारीक करून पाहणारा मग ते पत्र हातात गोल गोल फिरविणार आणि वाचून झाल्या वर त्या वर हाताने फटका मारीत डायलॉग बोलणार..फिल्मी भाषेत याला 'मॅनेरिज्म' म्हणतात..
- ननावरे वामनराव
'शहतूत की शाख़ पे बैठी मीना'
('मीनाकुमारी की शायरी')
मीनाकुमारीच्या शायरीवर गुलजारजीनें
'मीनाकुमारी की शायरी' म्हणून एक सुंदर पुस्तक पब्लिश केलं आहे.
मीना कुमारीचा 1 ऑगस्ट जन्म दिवस असतो आणि गुलजारजींचा 18 ऑगस्ट मीना कुमारीच खर नाव 'महजबीं बानो' ,मीना कुमारी ह्या स्वतः सुंदर गझल लिहत असत.
देखणे व्यक्तिमत्व, त्याचं हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं.मीनाकुमारी मध्ये एक नजाकत होती,तिच्या आवाजात एक दर्द होता गोडवा होता. म्हणूच तिच्या आवाजाची मधुबाला चाहती होती,दिलीप कुमार तिच्या समोर नि:शब्द होत असत.राजकुमार आपले संवाद विसरून जात असत.गुलजार तिच्या शायरीचे दिवाणे होते.भरतभूषण तिच्या ऐकतर्फी प्रेमात होता .त्यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षकही रडत असत, असे सांगितले जाते.
मीना कुमारी यांच्या वाट्याला अनेक शोकात्म भूमिका आल्या. तिच्या चित्रपटातील प्रत्येक नायकासोबत तिचे नाव जोडले गेले. असे म्हटले जाते की तिच्या शेवटच्या काळात तिला फक्त दोनच गोष्टी हव्या होत्या एक म्हणजे तिच्या आवडत्या व्यक्ती सोबत वेळ घालवणे आणि दुसरे दारु.म्हणूनच मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हटलं जातं.
'आग़ाज़ तो होता है अंजाम नहीं होता
जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता'
'इष्काचा जहरी प्याला'त्यांनी आयुष्यभर प्यायला.'कमल अमरोही' शिवाय त्यांची कथा पूर्णच होणार नाही मीनाकुमारी आणि अमरोहीजी यांचं रिलेशनशिप ही आगळी वेगळी होती.अमरोहींनीचे मीनाजींशी संबध पार बिघडले होते,तरी ती पुन्हा त्यांच्याकडे का जावू इच्छित होत्या, जगजीत कौर, खय्याम, सुनिल दत्त, यांच्या सांगण्यावरून त्यांनी पाकिजा पूर्ण करायचा निर्णय घेतला होता. मला तलाक देवू नका, मला तुमच्या निकाहमध्ये राहू दया, अशी चिठ्ठी त्यांनी अमरोहींना का पाठवली होती, हे एक कोडंच आहे.असो...मी जास्त काही विस्तृत लिहणार नाही पण...
मराठी वाचकांनी लेखिका अनिता पाध्ये यांचं एक सुंदर पुस्तक 'इष्काचा जहरी प्याला' हे पुस्तक अवश्य वाचावं.
गुलजारजी आणि त्यांच नात एक अनोख होत, गुलजाजींना मीनाकुमारी बद्दल प्रचंड आपलेपणा होता .एक आंतरिक ओढ होती.म्हणूनच आज ही गुलजारजींच्या ऑफिस मध्ये मीनाजींचं मोठं चित्र लावलेल आहे.गुलजार आणि मीनाकुमारी यांची भेट ‘बेनज़ीर’ च्या सेट वर झाली त्यात बिमल राय निर्देशक होते आणि गुलज़ारजी सहायक .गुलज़ार जेव्हा ते स्वतंत्र फिल्म निर्देशक झाले तेव्हा फिल्म ‘मेरे अपने’ मध्ये एक मुख्य भूमिका गुलज़ार यांनी मिनाकुमारीना दिली ..गुलजारजी त्यांच्या शायरीचे दिवाने होते ,मीनाजीं एकदा गुलजारीना म्हणाल्या...
“ये जो एक्टिग मैं करती हूं उसमें एक कमी है। ये फन, ये आर्ट मुझसे नही जन्मा है। ख्याल दूसरे का, किरदार किसी का और निर्देशन किसी का। मेरे अंदर से जो जन्मा है, वह लिखती हूं। जो मैं कहना चाहती हूं, वह लिखती हूं।“
म्हणूनच मिनाजी इतक्या स्पष्ट आणि सच्च्या होत्या ऍकटिंग असो वा शायरी त्यांनी अगदी मनापासून केली.
गुलजार आपल्या अत्यंत आवडत्या शायरा वर एक नज़्म लिहतातं...
शहतूत की शाख़ पे बैठी मीना
बुनती है रेशम के धागे
लम्हा-लम्हा खोल रही है
पत्ता-पत्ता बीन रही है
एक-एक सांस बजाकर सुनती है सौदायन
एक-एक सांस को खोल के, अपने तन
पर लिपटाती जाती है
अपने ही तांगों की क़ैदी
रेशम की यह शायर इक दिन
अपने ही तागों में घुटकर मर जाएगी।
गुलजारजी नी प्रत्यक्षात त्यांच्या मनातील मीनाकुमारी उभी केली.....मीना कुमारीजींनी जेव्हा ही नज्म ऐकली तेव्हा त्यांना हसू आलं त्या त्यावर म्हणाल्या.. “जानते हो न, वे तागे क्या हैं? उन्हें प्यार कहते हैं। मुझे तो प्यार से प्यार है। प्यार के एहसास से प्यार है, प्यार के नाम से प्यार है। इतना प्यार कोई अपने तन से लिपटा कर मर सके तो और क्या चाहिए?”
वा ...क्या बात आहे...प्रेमाचा इतका सुंदर उल्लेख ...यालाच तर प्रेम जगणं म्हणतात ...फक्त एक ऐहसास प्रेमाचा...म्हणूनच गुलजारजी ही आपल्या गीतातून तेच तर म्हणत आहेत...सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो हम ने देखी है ...
आज 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंती निमित्त आणि त्यांचे मित्र गुलजारजी यांच्या 18 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना नतमस्तक होतो ,आज त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.मीनाजी अत्यन्त संवेदनाशील शायरा होत्या त्याचा प्रत्यय आपल्याला
'मीनाकुमारी की शायरी' हे शायरी संग्रह पुस्तकातील गझल वाचल्या वर येईलच ,त्यातीलच ही माझीआवडती अप्रतिम गझल...
महंगी रात...
जलती-बुझती-सी रोशनी के परे
हमने एक रात ऐसे पाई थी
रूह को दांत से जिसने काटा था
जिस्म से प्यार करने आई थी
जिसकी भींची हुई हथेली से
सारे आतिश फशां उबल उट्ठे
जिसके होंठों की सुर्खी छूते ही
आग-सी तमाम जंगलों में लगी
आग माथे पे चुटकी भरके रखी
खून की ज्यों बिंदिया लगाई हो
किस कदर जवान थी, कीमती थी
महंगी थी वह रात
हमने जो रात यूं ही पाई थी।
नाझ(मीना कुमारी)
© श्रीकांत
[
आत्ता महाराष्ट्रात पडतो आहे तसाच पाऊस तेव्हाही बरसत होता. जराही उसंत नव्हती. आभाळ जर्द निळ्या अन गडद करड्या रंगांच्या ढगांनी नुसतं ओथंबलेलं. शिक्षण पूर्ण करून ग्रुपमधले सर्व मित्र काम-धंद्याला लागलेलो. मी प्रकाशचित्रणाच्या व्यवसायाला सुरुवात केलेली. पण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरीही सर्वांचा नक्की भेटायचा दिवस म्हणजे १५ ऑगस्ट. त्या दिवशी आम्ही कोणत्या ना कोणत्या ट्रेकसाठी जायचोच. शुक्रवार, १५ ऑगस्ट १९८६ या दिवशी सर्वांनी मिळून ‘ड्युक्स नोज’ च्या ट्रेकला आणि मनसोक्त भिजायला जायचे ठरले. पहाटे ६.२५ च्या सिंहगड एक्स्प्रेसने खंडाळा... आणि तेथून पुढे ट्रेक.
मी नुकतेच माझ्या व्यवसायासाठी स्टेट बँकेतून कर्ज घेतलेले. आणि अचानक मला बँकेकडून निरोप आला की त्यांच्या शिवाजीनगर शाखेत सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. कोणी महत्वाचे अधिकारी येणार आहेत. त्या कार्यक्रमाचे त्यांना फोटो काढून हवे आहेत. झालं. घेतल्या कर्जाला जागायला तर हवं. मी मित्रांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा मी नंतरच्या लोकलने येऊन त्यांना सामील होईन. स्टेशनवर जाऊन मी अगोदरच लोकलचे तिकीट काढून ठेवले. बरोबर ७.३० ला बँकेचा सुरू झालेला कार्यक्रम सुमारे पंचेचाळीस मिनिटे चालला. मला ८.३० ची लोणावळा लोकल होती. कॅमेरा पटकन प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला आणि पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून दिला. धावतच शिवाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले. मी आणि लोकल जवळजवळ एकाच वेळी फलाटावर पोहोचलो. मिळाली एकदाची. पण अडचण एकच होती की लोकल लोणावळ्यापर्यंतच होती. मला तर पुढे खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत जायचे होते. अर्थातच माझा ट्रेक माझ्या मित्रांपेक्षा ४.५ कि.मी. ने जास्त असणार होता.
लोणावळ्याला उतरलो. गपचूप रेल्वे ट्रॅकच्या कडेने चालायला लागलो. ढगांनी परत बरसायला सुरुवात केली. आणि आता तर लोणावळ्याचा पाऊस. चेहऱ्यावर ते मोठाले थेंब वेगाने आपटत होते. पण एकूणच वातावरणातला तो कुन्द्पणा, अचानक ढगातून चालल्याचा अनुभव आणि मित्रांना भेटण्याची उत्सुकता यांचा मिलाफ होत पाय भरभर पडत होते. मधेच पाऊस थांबे. काही क्षण उन्हाचे कवडसे पडत. सुस्नात झालेले वनवैभव. झाडांच्या पानांवरून गळणाऱ्या थेंबातून ती किरणे परावर्तीत होताना हिरा चमकल्याचा आभास. ‘हिरा मोती निबजे ...’ ही कुमारजींची बंदिश न आठवली तरच नवल.
साधारण सव्वा तासाच्या चालण्यानंतर मला खंडाळा स्टेशन दिसू लागले. स्टेशन संपल्यावर डावीकडे वर जाणारी वाट आपल्याला ड्युक्स नोजला घेऊन जाते. पावलांचा वेग नकळत वाढला. स्टेशन पार करून थोडा पुढे आलो. तर साधारण शंभर-सव्वाशे फुटांवर एका प्लास्टिकच्या भल्यामोठ्या तुकड्याखाली काही माणसं उभी होती. सगळे जण पाठमोरे. चार जणांनी तो तुकडा ताणून धरला होता. त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर पांढरा पोलो शर्ट, पांढरी पँट, पांढरे शूज आणि काळी छत्री डोक्यावर धरून एक व्यक्ती उभी होती. कोणत्यातरी चित्रपटाचे शूटिंग चालले आहे हे माझ्या लगेच लक्षात आले. आवडीचा विषय. माझे पाय थबकले.
पावसापासून संरक्षण म्हणून तो प्लास्टिकचा तुकडा. त्याखाली कॅमेरामन आणि त्याचे युनिट. त्यातच असणार डायरेक्टर. माझ्या विचारांची साखळी भरभर धावू लागली. कशाचे शूटिंग करीत असतील ते? एखाद्या गाण्यासाठी तर नाही? असे माझे विचार सुरू असतानाच माझ्या मागून म्हणजे खंडाळा स्टेशनकडून एक माणूस धावत आला. तो त्या युनिटकडे ओरडून सांगत होता की पलीकडच्या स्टेशनवरून म्हणजे मंकी हिल स्टेशनवरून ट्रेन सुटली आहे. आणि काहीच मिनिटात ती ट्रेन येथे पोहोचेल. युनिट मधल्या काही लोकांनी मागे वळून पाहिले. त्याबरोबरच त्या छत्रीवाल्यानेही मागे वळून पाहिले. मी त्यांच्यापासून पन्नास फुटांवर असेन. स्तब्ध उभा. पाठीवर सॅक. पूर्ण भिजलेला. प्रकाश पुरेसा नसल्याने आणि त्यातही छत्रीच्या सावलीमुळे त्या व्यक्तीचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. मला पाहताच त्या व्यक्तीने मला जवळ बोलावण्यासाठी एका हाताने खूण केली. मी नकळत माझ्या मागे वळून पाहिले. माझ्या मागे आता कोणीच नव्हते. म्हणजे ते मलाच बोलावत होते तर? त्यांना ते लक्षात आले असावे. त्यांनी परत एकदा खूण केली. आणि मीही त्यांच्या दिशेने चालू लागलो. तोपर्यंत त्यांनी परत युनिटकडे तोंड फिरवले होते.
मी तेथे पोहोचलो. माझी चाहूल लागताच त्यांनी परत पाहिले. आता मी त्यांच्या पासून दोन पावलांवर उभा होतो. माझी आणि त्यांची नजरानजर झाली. त्या भिजलेल्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कारण ती छत्रीधारी व्यक्ती होती सुप्रसिद्ध लेखक, कवी, पटकथाकार, गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक संपूर्णसिंग कालरा म्हणजेच ‘गुलजार’.
गुलजार या शब्दाचा अर्थ आहे बगीचा. माझ्या पुढ्यात कलेचा बगीचाच उभा होता. माझ्या दृष्टीने माझा अत्यंत आवडता कवी आणि दिग्दर्शक. त्यांनी मला जवळ बोलावले आणि आमच्या दोघांच्या डोक्यावर छत्री धरली. माझ्या ओल्या कपड्यांची जराही पर्वा न करता. मी जणू मूकच झालो होतो. पण मनात अर्थातच लाखो विचारांची आवर्तने चालू झाली होती.
इतक्यात समोरून ट्रेन आली. आमच्या उजव्या बाजूने खंडाळा स्टेशनकडे गेलीही. कॅमेरामनने ट्रेनच्या बरोबरीने कॅमेरा पॅनिंग केले. शॉट ओ के झाला आहे असे सांगितले. केवळ काही सेकंदांचाच तो शॉट. पण त्यासाठी सर्वांनी बरीच तयारी केलेली होती. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. एका अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शकाच्या चित्रीकरणात त्याच्याच छत्रीत उभे राहून ते शूटिंग मी अनुभवले होते. वातावरण हलके फुलके झाले. मी तोपर्यंत मनात शब्दांची जुळवाजुळव केली होती.
मी त्यांना म्हणालो – “ आप गुलजारजी है ना ?” त्यांनी मानेनेच होकार दिला. माझ्या मनात त्यांना किती सांगू आणि किती नको अशा भावना दाटल्या होत्या. मी परत त्यांना म्हणालो – “ मैं ने आपकी हर एक फिल्म देखी है.” यावर त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य उमटले. त्यांना भेटणारा प्रत्येकजण हेच सांगत असणार की! मग ते एकदम म्हणाले – “ मेरी कौनसी फिल्म तुम्हें सबसे अच्छी लगी?” मी क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो – “ कोशिश.” आता ते हसले. माझ्या मनात त्यांच्या ‘मेरे अपने’, ‘परिचय’, ‘अचानक’, ‘मौसम’, ‘खुशबू’, ‘आँधी’, ‘किताब’, ‘किनारा’, ‘मीरा’, ‘नमकीन’, ‘अंगूर’ या इतर चित्रपटांच्या दृश्यांची एक मालिकाच झळकून गेली. काय समृद्ध काम केलंय या माणसाने.
मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले – “ इस घनी बारिश में, अकेले कहाँ जा रहे थे?” मी त्यांना आमच्या ड्युक्स नोजच्या ट्रेकबद्दल सर्व सांगितले. त्यांना ते सर्व ऐकून अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी मला परत विचारले – “अगर तुम्हारे दोस्त आगे जाकर तुम्हें नहीं मिले तो?” त्यावर मी उत्तर दिले की – “फिर तो मैं अकेलाही ड्युक्स नोज होकर फिर लोकलसे पूना जाऊंगा.” तर्जनी आणि अंगठा यांच्या चिमटीत नाक पकडून त्यांनी मान हलवली. ते परत एकदा आश्चर्यचकित.
हा संवाद होईपर्यंत मला उत्सुकता निर्माण झाली होती की आता ते कोणती फिल्म बनवीत आहेत? म्हणून तसे मी विचारले. त्यांनी उत्तर दिले – “इस फिल्म का नाम है ‘इजाजत’. अभी जो ट्रेन का शॉट लिया है वह टायटल सिक्वेंस मे आनेवाला है. बाकी फिल्म शूट पुरा हुआ है.” मी फिल्म मधील कलावंत कोण आहेत हे विचारल्यावर त्यांनी “ रेखा, नसिरुद्दीन शाह और अनुराधा पटेल” ही नावे सांगितली. ती काही मिनिटे आम्ही दोघेही त्यांच्या छत्रीत उभे राहून बोलत होतो. मी तर आधीच भिजलेला होतो पण आता ते ही एका बाजूने भिजले होते. इतक्यात पलीकडच्या रस्त्यावर त्यांची कार आली आहे असा निरोप घेऊन एक माणूस आला. त्यांनी हात हातात घेऊन ‘शेक-हँड’ केला. आणि ते जाण्यासाठी वळले. काही पाऊले गेल्यावर परत मागे वळून म्हणाले –“तुम्हारे ट्रेक के लिये बेस्ट लक. टेक केअर.” त्यांच्या या निरोपानंतर ही स्वप्नवत वाटणारी भेट संपली. माझ्याजवळ माझ्या सॅकमध्ये कॅमेरा असूनही मला तो बाहेर काढता आला नाही याची रुखरुख मनात घेऊन मी ट्रेक पूर्ण केला.
१९८७ मध्ये ‘इजाजत’ प्रदर्शित झाला. पुण्याच्या डेक्कन थिएटर मध्ये मी तो पाहिला. त्यात आशा भोसले यांच्या आवाजात एक अति सुंदर गाणं आहे त्यात शब्द येतात की –
“एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो...”
त्यांच्या त्या भेटीच्या आठवणीने मला परत एकदा खंडाळ्याला नेऊन ठेवलं. भावनांचा किती तरल आविष्कार ! आणि तो ही खास ‘गुलजार’ शैलीत. त्या सिनेमाचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की – ‘इजाजत ही गुलजार यांनी लिहिलेली सिनेमारूपी कविताच आहे.’
नंतर मला एका कार्यक्रमात त्यांची प्रकाशचित्रे घेण्याची संधी मिळाली. पुढे त्यांचे अनेक कार्यक्रम, भाषणे ऐकण्याची संधीही मिळाली. जसा चित्रपट तसेच तरल भाषण. त्यांच्या एका भाषणात मला भावला तो त्यांचा आशावाद. भाषणा दरम्यान त्यांनी त्यांची एक कविता सादर केली आशावादाने ओतप्रोत भरलेली -
“ थोडेसे करोडो सालोमें,
सूरज की आग बुज़ेगी जब, और राख उडेगी सूरजसे,
जब कोई चाँद न डुबेगा, और कोई जमिन न उभरेगी,
तब एक बुज़े कोयलेसा
टुकडा ये जमिन का घुमेगा,
भटका भटका...मद्धम मद्धम...
खाकिस्तरी रोशनी में...
मैं सोचता हूँ उस वक्त अगर,
कागज़ पर लिखी एक नज़्म कही, उडते उडते कही सूरज में गिरे,
और सूरज फ़िरसे जलने लगे...”
येत्या १८ ऑगस्टला ‘गुलजार’ या प्रतिभावान कलावंताची ८५ वर्षे पूर्ण होतील. त्यांचा हा आशावाद त्यांना त्यांच्या शंभरी पर्यंत विनासायास घेऊन जाईल या शुभेच्छांसह.....
- सतीश पाकणीकर / ९८२३० ३०३
#शंभरनंबरी_सोनं
एक साधा मोटार मेकॅनिक असलेल्या मनुष्याचे आयुष्य लेखन आणि सिनेमाच्या जगतात व्यतीत होऊ शकते यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे. माखनसिंह कालरा आणि सुजन कौर या दांपत्याच्या मुलाच्या आयुष्यात हे घडलं गेलय व या मुलाचं नाव होतं संपूरन सिंह कालरा... सध्या पाकिस्तान मध्ये असलेल्या दिना मध्ये या संपूरन चा जन्म झाला १९३४ मध्ये, फाळणीच्या चटक्या नंतर हे कुटुंब मुंबईत आलं आणि परिस्थितीशी झगडू लागलं, त्यामुळे संपूरनला आपले शिक्षण सोडून मुंबईत विचारे मोटर्स कडे मेकॅनिक म्हणून नोकरी करावी लागली, त्याला एकच काम होतं, अपघातात मोडलेल्या गाड्यांना रंग देणं आणि उरलेल्या वेळात मालकानं त्याला पुस्तक वाचायला परवानगी दिली होती. या रंगांनीच त्याचं आयुष्य बदलून टाकलं आणि पुस्तक वेडा संपूरन पीडब्लूए (प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन)कडे ओढला गेला आणि लेखन करता करता त्यानं नाव आधी धारण केलं गुलजार दिनवी ज्याचं पुढे जाऊन झालं गुलजार.... पुढे याचं नावाने तो आजतागायत ओळखला जातोय.
तिथे गुलजार ची ओळख तिथे गीतकार शैलेंद्र बरोबर झाली आणि शैलेंद्र मुळे प्रख्यात दिग्दर्शक बिमल राॅय यांच्या बरोबर सुत जुळले. गुलजार बिमलदांचा असिस्टंट म्हणून काम करु लागला. त्याच सुमारास बिमलदांच्या बंदिनी मध्ये गुलजारला एक गाणं लिहायची संधी बिमलदांनी दिली, सचिन देव बर्मन यांचे कर्णमधुर संगीत असलेल्या बंदिनी मधील ते गाणं होतं 'मोरा गोरा अंग लै ले' वास्तविक या सिनेमाचा गीतकार शैलेंद्र आहे पण शैलेंद्र आणि सचिनदांचे काहीतरी बिनसले आणि एक गाणं बिमलदांनी गुलजार ला लिहण्याचा आग्रह केला त्याला सचिनदांनी पण अनुमोदन दिले आणि जन्म झाला एका सिद्धहस्त लेखणीतून वाहणार्या अमर्याद गाण्यांचा...
बिमलदांचेच असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या सोबत पुढे गुलजार ने स्वतंत्र वाट धरली. अगदी आशिर्वाद पासून पुढे खूबसुरत पर्यंत ही साथ राहिली, हृषिदांच्या सिनेमात कधी संवाद लेखक, पटकथा लेखक, गीतकार अशा विविध बहुरंगी भूमिका मोठ्या प्रतिभेच्या गुलजार ने प्रामाणिकपणे निभावल्या. पण त्याच्यातील सर्जनशील दिग्दर्शक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग यातूनच तो दिग्दर्शनाकडे वळला, मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, आँधी, मौसम, खुशबू, किनारा, किताब, मीरा, अंगूर, नमकीन, इजाजत, लिबास, लेकीन, माचीस, हुतूतू पर्यंत कित्येक दर्जेदार सिनेमे गुलजार ने दिग्दर्शित केलेले आहेत. पण याच बरोबर त्याचं इतरांच्या सिनेमामधील गीत लेखनाचं काम अव्याहतपणे चालूच होतं.
जसा परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं तसचं काहीसं गुलजारच्या बाबतीतही आहे. शक्ती सामंता च्या आराधनाने राजेश खन्ना ला या देशात पहिल्या सुपरस्टार चा दर्जा मिळाला परंतु तो गुलजार होता पटकथा आणि संवाद लेखक ज्यानं राजेश मधला अस्वस्थ आणि अस्सल अभिनेता ओळखला, मग तो खामोशी असो, आनंद, बावर्ची असो किंवा अंडरप्ले केलेला नमक हराम, पलकों की छाँव में मधील राजेश असो, तो सर्वस्वी त्याच्या इतर सिनेमांच्या पेक्षा भिन्न होता, वेगळा होता, तोच परिस्पर्श त्याचा रेखा च्या बाबतीत झाला आणि घर सिनेमामुळे तिचं त्या पुढील करिअरच बदलले, खूबसुरत आणि इजाजत मधली रेखा ही प्रचंड प्रगल्भ अभिनेत्री वाटते ,जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, शबाना आझमी, हेमामालिनी,अमोल पालेकर, डिंपल कपाडिया, तबू अश्या स्टार लोकांमधील अस्सल अभिनय बाहेर काढणारा गुलजारच होता.
त्याचं आख्खे सिनेमाचं करिअर हे दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी भारुन टाकलय. त्यातील एक म्हणजे जन्मजात अभिनेता संजीव कुमार आणि दुसरा त्याचा जिवश्च कंठश्च मित्र संगीतकार राहुल देव बर्मन उर्फ पंचम होय. या दोन व्यक्तींच्या वर त्यानं जीव ओतून प्रेम केलं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आणि त्याचे रिटर्न्स म्हणजे या तिकडीने केलेले सिनेमे होय, पंचम आणि गुलजार या जोडीची गाणी हा लेखनाचा एक स्वतंत्र विषय आहे. गालीब वर त्याची श्रद्धा होती तर शैलेंद्र ला तो आपला गीत लेखनातील गुरु मानतो, दिग्दर्शनातील त्याचे गुरु म्हणजे बिमल राॅय. सिनेमा करता करता गुलजार ने लहान मुलांच्या मालिकेसाठी पण गीत लेखन केले आहे, मग जंगल बूक चे हिंदी संस्करण मधलं जंगल जंगल बात चली है पासून ते आत्ता आत्ता पर्यंत मोटू पतलू साठी लिहलेलं मोटू और पतलू की जोडी हे गाणं असो, किताब, मासूम या सिनेमांपासूनच त्याची लहान मुलांच्या गाण्यांसाठीची खासियत दिसून येते.
गीत लेखनातील त्याची रेंज अफाट आणि अचाट आहे, सचिनदांपासून ते रहमान, शंकर एहसान लाॅय पर्यंत अनेक दिग्गज संगीतकाराकडे गीत लेखनातील आरस्पानी सौंदर्याची खाण गुलजार ने मुक्त हस्ताने उधळली आहे. पंचमच्या पश्चात (परिचय ते लिबास) त्याची जास्त जोडी ही विशाल भारद्वाज बरोबर जमली अगदी दूरदर्शन वरील जंगल बूक, पोटली बाबा की पासून ते अलीकडच्या हैदर सिनेमापर्यंत यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गुलजार म्हणजे हिंदी सिनेमाला पडलेलं एक सहजसुंदर स्वप्न आहे, त्याचा आवाजातील खर्ज जेव्हा तुमच्याशी संवाद साधू लागतो तेव्हा त्याची कविता कधी होते ते समजतही नाही. मागे एकदा गदिमांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलजार आला होता तेव्हा त्यानं गदिमांचे वर्णन त्यांच नाव घेताच गदिमा म्हणजे माँ के गोदी जैसा मुझे लगता है म्हटल्याचं स्मरतय मला, त्याला गदिमा, कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यामधील कर्तृत्व माहिती आहे, पंचम मॅजिकच्या कार्यक्रमात पण गुलजार आला होता आणि पंचम बदल भरभरून बोलला होता, पंचम हा त्याच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा आहे, पंचम बद्दल बोलताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मी पाहिले आहेत.....
पुरस्कारांच्या बाबतीत त्याला जवळपास सर्वच पुरस्कार मिळाले आहेत, अगदी फिल्मफेअर, राष्ट्रीय, पद्म, दादासाहेब फाळके आणि आंतरराष्ट्रीय (आॅस्कर) पर्यंत झाडून सर्व पुरस्कार त्याच्या पायावर लोळणं घेत आहेत. माझ्या लेखी गुलजार हा सिनेमाच्या वर्गातील एक प्रचंड प्रतिभाशाली सिद्धहस्त लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार आणि कमालीचा दिग्दर्शक असलेला विद्यार्थी आहे. वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याचं वैवाहिक जीवन गुलजार होऊ शकले नाही, त्यानं ताकदीचा अभिनय करणाऱ्या राखीशी लग्नगाठ बांधली पण त्यांचं लग्न अयशस्वी ठरलं, त्यांची मुलगी मेघना गुलजार ही आता प्रतिथयश दिग्दर्शिका आहे.
गुलजारने आम्हा रसिकांचे आयुष्य मात्र प्रचंड श्रीमंत केलय. त्याची लिहलेली सर्वच गाणी लोकप्रिय तर आहेतच पण आयुष्याचं मूल्य वृद्धिंगत करणारी आहेत आणि हेच खरं गुलजारचं यश आहे, आज ही वयाच्या ८५ व्या वर्षात त्याची अभ्यासपूर्ण लेखणी अखंडपणे चालूच आहे, गुलजार सारखी माणसं ही रसिकां प्रमाणेच सामान्य माणसाचं आयुष्य समृद्ध करायला जन्म घेत असतात. म्हणूनच तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही लिहणारा गुलजार ऐ जिंदगी गले लगा ले पण लिहून जातो तर लकडी की काठी लिहणारा गुलजार मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है सारखं गद्यमय पद्य पण लिहू शकतो. परमेश्वराने गुलजारला सिनेमाच्या जगात धाडायची बुद्धी बिमलदांच्या करवी दिली असली तरीही आपली स्वतंत्रपणे वाटचाल करताना गुलजार म्हणजे नक्षत्र वाटणारा एखादा आकाशगंगेमधला यक्ष भासू लागतो.....
खाली काही हटके गुलजारची वेगवेगळ्या संगीतकाराकडे लिहलेली गाणी द्यायचा प्रयत्न करतो.
१. मोरा गोरा अंग लै ले - सचिन देव बर्मन (बंदिनी)
२. वो शाम कुछ अजीब थी - हेमंत कुमार (खामोशी)
३. हम को मन की - वसंत देसाई (गुड्डी)
४. मैनै तेरे लिये - सलील चौधरी (आनंद)
५. दिल ढुंढता है फिर वही - मदनमोहन (मौसम)
६. डाकिया डाक लाया - लक्ष्मीकांत प्यारेलाल (पलकों की छाँव में)
७. दो दिवाने शहर में - जयदेव (घरोंदा)
८. थोडा है थोडे की जरुरत है - राजेश रोशन (खट्टामीठा)
९. दो नैना और एक कहानी - राहुल देव बर्मन (मासूम)
१०. ऐ जिंदगी गले लगा ले - इल्लय राजा (सदमा)
११. यारा सिली सिली - हृदयनाथ मंगेशकर (लेकीन)
१२.दिल हुम हुम करें - भूपेन हजारिका (रुदाली)
१३. पानी पानी रे - विशाल भारद्वाज (माचीस)
१४.आजा माहिया - अनु मलिक (फिजा)
१५.छैया छैया - ए आर रहमान (दिल से)
१६.कजरारे कजरारे - शंकर एहसान लाॅय (बंटी और बबली)
तळटीप - गुलजारच्या सर्व सिनेमांचा अंतर्भाव विस्तारभयास्तव केलेला नाही.
© अतुल श्रीनिवास तळाशीकर
१८ आॅगस्ट २०२०
#Cinemagully
#Happy_Birthday_Gulzar 💐🎂
[19/08, 10:41] Charudatta Kulkarni: माझी ’वाईट्ट’ व्यसनं : गुलजारसाहेब
१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. ‘माया मेमसाब’ ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या….
खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींदमें भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….
सिनेमा कधी एकदा सुरु होतोय या एक्साईटमेंटमध्ये टायटल्सकडे दुर्लक्षच झालेले होते. ते नेहमीच होते म्हणा. त्यामुळे बाहेर आल्यावर पोस्टरवर गीतकाराचे नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरही काही माहिती नव्हती. बरं पुन्हा टिकिट काढून आत घुसावे म्हटले तर खिश्यात पुरेसे पैसेही नव्हते. काय करायचे? मग आमच्या बरोबर चित्रपट बघुन बाहेर पडलेल्या लोकांना अडवून विचारणे सुरु झाले. “तुम्ही सुरुवातीला दाखवतात ती टायटल्स बघितलीत?”
लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते. पण एका काकांनी विचारले, “का रे बाबा? काय हवेय?”
थोडंसं बिचकतच त्यांना कारण सांगितलं. त्यांनी हसत हसतच उत्तर दिलं….
” गुलजार! ”
गुलजारसाहेबांचं नाव याआधीही ऐकलं होतं. पण मुळातच राज कपुर आवडता असल्याने आम्हाला शैलेंद्रचं वेड. तसे थोड्या फार प्रमाणात मजरुह, साहिरही आवडायचे. थोड्याफार प्रमाणात एवढ्यासाठी की त्यावेळी गाणं आवडायचं, पण ते कुणी लिहीलय हे शोधण्याकडे फारसा कल नसायचा. आमच्यासाठी त्याचा गायकच देव असायचा. थँक्स टू गुलजारसाहेब ! थँक्स टू केतन मेहता, थँक्स टू माया मेमसाब . त्यादिवशी जर माया मेमसाब बघायला म्हणून गेलो नसतो तर कदाचित आहे तसंच रुटीन चालु राहीलं असतं. गायक आणि संगीतकार यांचेच गोडवे गाण्यात आयुष्य गेलं असतं. त्या गाण्याने आधी गुलजारसाहेबांचा शोध सुरु झाला. जस-जसे गुलजार साहेब आवडायला लागले तस-तसे इतर गीतकारांचीही माहिती मिळवणं सुरु झालं आणि शैलेंद्रच्या पलिकडेही एक खुप मोठं जग आहे हे लक्षात आलं. जसजसा खोलात जायला लागलो. साहिर, मजरुह वाचनात यायला लागले, तस तसं त्यांच्या प्रेमात पडत गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत कविता हा केवळ एक छंद होता. आता त्या छंदाचं रुपांतर व्यसनात झालं. श्रेय जातं गुलजारसाहेबांना ! पुढे कधीतरी २००५-६ च्या दरम्यान ’पुखराज’ हातात आलं….., ते वाचलं आणि गुलजारच्या इतरही कविता शोधायचा नाद लागला.
‘पुखराज’ या आपली मुलगी ‘बोस्की’ उर्फ मेघना गुलजारला समर्पित केलेल्या काव्यसंग्रहातली त्यांची ‘पनाह’ ही कविता आतवर स्पर्शून गेली. अंतर्बाह्य ढवळून गेली.
उखाड़ दो अरज़-ओ-तूल खूंटों से बस्तियों के
समेटो सडकें, लपेटो राहें
उखाड़ दो शहर का कशीदा
कि ईंट – गारे से घर नहीं बन सका किसी का
पनाह मिल जाए रूह को जिसका हाथ छूकर
उसी हथेली पे घर बना लो
कि घर वही है
और पनाह भी
तुम्हारे हाथों में मैंने देखी थी अपनी एक लकीर, सोना !
(अरज्-ओ-तूल : लांबी रुंदी)
गुलजार, आता रोज कुठे ना कुठे भेटायला लागले. कधी चित्रपट गीतातून कधी गैर फिल्मी कवितांमधून. त्यांची आधी कुठल्यातरी हिंदी पत्रिकेत वाचलेली ही कविता नंतर बहुदा ‘पुखराज’ मध्येही घेतली होती. श्रद्धेचं महत्व,मानवी आयुष्यात तिची काय अहमियत आहे, काय जागा आहे? हे सांगण्याचा हा एक जगावेगळा अंदाज होता त्या वयात माझ्यासाठी तरी.
कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..
मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..
तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..
(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)
तुम्हारे हाथोंको चूमकर, छू के अपनी आँखोसे आज मैने….
आँखोसे छूकर ! आता या कल्पनेत नाविन्य राहीलेलं नाही, पण त्यावेळी १८-१९ वर्षाच्या त्या वयात ती कल्पनाच रोमांचित करुन टाकणारी होती. अशा पद्धतीने काही थेट आतपर्यंत जाऊन पोचणा्रं लिहीता येवु शकतं ही कल्पनाच नवीन होती माझ्यासाठी. पण त्यावेळी उर्दुच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे गुलझारच्या कवितांमध्ये सौंदर्यस्थळ म्हणून वापरलेले शब्दही आमच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरायचे कारण मुळात त्याचा अर्थच कळायचा नाही. त्यासाठी मग आम्ही एक नवीनच मार्ग शोधला. सोलापूरला सिद्धेश्वर मंदीराजवळच एक पीरबाबाची मजार आहे. तिथे माझ्या एका मित्राबरोबर (इरफ़ान काझी) नेहमी जायचो, त्यामुळे तिथल्या मौलवींशी ओळख झालेली होती. मग असे काही शब्द अडले की इकबालचचांना गाठायचे हा शिरस्ताच पडून गेला. चचा स्वत:देखील गालिबमियांचे भक्त होते. त्यामुळे त्यांच्याकडून गालिबबद्दलही खुप ऐकायला मिळायचं. इकबालचचांनीच अजुन एक वेड दिलं मला ते म्हणजे ‘संत कबीर’! (त्या बद्दल नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलु)
मग एक दिवस कुणीतरी सांगितलं ‘अबे ‘इजाजत’ बघ बे, त्यात कसल्ली खतरा गाणी आहेत गुलजारची.
‘कतरा कतरा’ ओठात घोळवतच चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. शेवटचं कडवं आठवतय?
तुम ने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन हैं
काँटे भी तुम्हारी आरजू हैं
शायद अयैसी ज़िंदगी हसीं हैं
आरजू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना.. ..
सुधाला नवर्याच्या सामानात सापडलेली त्याच्या प्रेयसीची डायरी तिला प्रचंड अस्वस्थ करुन टाकते. आपण, आपला नवरा आणि त्याची पुर्वाश्रमीची प्रेयसी माया यांच्या सच्च्या प्रेमात एक मोठा अडसर तर ठरत नाही आहोत ना? या कल्पनेने कातर झालेली सुधा आपल्यालाही हळवे करुन टाकते. तशात गुलजारसाहेब लिहून जातात …
“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है….”
इजाजत मी त्यानंतर पुन्हा-पुन्हा बघीतला. कधी गुलजारच्या शब्दांसाठी तर कधी रेखासाठी. हो, या चित्रपटाने गुलजारबरोबरच आणखी एक व्यसन दिलं मला …
त्या वाईट्ट व्यसनाचं नाव आहे ‘रेखा’ ! असो…., त्याबद्दल परत कधीतरी !
मग गुलझारचं वेडच लागलं. पण त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांच्या कवितेत जास्त रस होता मला. साध्या-सरळ पण थेट शब्दात मनाची कोंडी अचुकपणे व्यक्त करण्यात गुलझारचा हात धरणारं कोणी नसेल?
रात कल गहरी निंद मे थी जब
एक ताजा सफ़ेद कॅनवस पर
आतिशी, लाल सुर्ख रंगोसे
मैने रोशन किया था इक सुरज
सुबह तक जल गया था वह कॅनवस
रात बिखर गयी थी कमरेंमे
“मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो” हे लिहीणारा गुलझार हाच होता का हा प्रश्न पडावा इतकं प्रखर आणि दाहक होतं हे. गुलजारची कविता ही त्याच्या अनुभवांतून आलेली होती. फाळणीनंतर घरादाराला मुकलेला एक मुलगा. त्याच्या आयुष्यात घडत गेलेली अनेक स्थित्यंतरं हे त्याच्या कवितेचं मुळ असल्याने जे काही होतं ते अस्सल होतं. परिस्थितीचे, नशिबाचे अनेक चटके सोसुन शेवटी आपल्या अंगभुत तेजाला झळाळी मिळालेलं बावन्नकशी सोनं होतं. कदाचित त्यामुळेच गुलजारची लेखणी जास्त भावली.
सारा दिन मैं खून में लथपथ रहता हूँ
सारे दिन में सूख-सूख के काला पड़ जाता है खून
पपड़ी सी जम जाती है
खुरच खुरच के नाखूनों से
चमड़ी छिलने लगती है
नाक में खून की कच्ची बू
और कपड़ों पर कुछ काले काले चकते से रह जाते हैं
रोज़ सुबह अख़बार मेरे घर
खून में लथपथ आता है
आणि हाच ‘गुलजार’ एका कवितेत लिहून जातो…
गर्मी सें कल रात अचानक आँख खुली तो
जी चाहा के स्विमींग पूल के ठंडे पानीमें एक डुबकी मारके आऊं
बाहर आके स्विमींग पूलपें देखा तो हैरान हुआ
जाने कबसे बिन पुंछे एक चांद आया और मेरे पुल पे लेटा था और तैर रहा था
उफ्फ कल रात बहुत गर्मी थी !
‘प्रचंड उकडतय’ या अतिशय कंटाळवाण्या गोष्टीला एवढ्या रोमँटिकपणे व्यक्त करता येवु शकतं हे मला गुलजारनेच शिकवलं. अशक्य रोमँटीक लिहीतो हा माणूस.
“मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी सीने पे झूलता लॉकेट
उल्टा हो जाए तो मैं हाथों से
सीधा करता रहूँ उसको
मुझको इतने से काम पे रख लो…
जब भी आवेज़ा उलझे बालों में
मुस्कुराके बस इतना सा कह दो
आह चुभता है ये अलग कर दो
मुझको इतने से काम पे रख लो….
जब ग़रारे में पाँव फँस जाए
या दुपट्टा किवाड़ में अटके
एक नज़र देख लो तो काफ़ी है
मुझको इतने से काम पे रख लो…
‘प्लीज़’ कह दो तो अच्छा है
लेकिन मुस्कुराने की शर्त पक्की है
मुस्कुराहट मुआवज़ा है मेरा
मुझको इतने से काम पे रख लो”
(http://kawyasagarwithneal.blogspot.in/2010/08/blog-post_3128.html इथून साभार..)
माझी धाकटी बहिण दिप्तीसुद्धा माझ्यासारखीच गुलझारवेडी, ती म्हणते...
म्हणतात ना, पाहणार्याला भिंती पलिकडचं दिसतं, न पाहणार्याला काचेपलिकडचंही दिसत नाही. गुलजार हा माणूस भिंतीपलिकडचं पाहणारा, त्याहून जास्त ते योग्य आणि खूब शब्दात वाचकांपर्यंत पोचवून त्यांचा मनाचा ठाव घेणारा लेखक.
एक पुराना मौसम लौटा यादभरी पुरवाई भी
ऐसा तो कम ही होता है, वो भी हो तनहाई भी……
किशोर कदम, अर्थात आपल्या लाडक्या सौमित्रने ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. बहुतेक न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत सौमित्र यांनी, त्यांना एक प्रश्न केला,
”आपको तैरना आता है?”
गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ”नही, सिर्फ डूबना आता है…”
‘डुबणं, बुडून जाणं’ एवढं सुंदर असु शकतं, बुडण्याला असाही एक अप्रतिम अर्थ असु शकतं हे मला पहिल्यांदाच समजलं. कुठल्याही कामात, काव्यात स्वतःला पुर्णपणे झोकून देण्यातला आनंद काय असतो ते गुलजारसाहेबांनी शिकवलं.
रात का नशा अभी, आंख सें गया नहीं
तेरा नशीला बदन बाहोनें छोडा नहीं
ऑंखे तो खोली मगर, सपना वो तोडा नहीं
हा….वही, वो…वोही…
सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं.…
शाहरुखचा ’अशोका’ आणि करीनाचं ते हॉट स्नानदृष्य आठवलं ना? पटकन विसरून जा. त्या ‘शाहरुख आणि करीना’ ऐवजी ‘घर’ची ‘विनोद मेहरा आणि रेखा’ किंवा ‘तराना’ मधली दिलीपसाब आणि मधुबालाची जोडी डोळ्यासमोर आणा आणि आता पुन्हा एकदा शेवटची ओळ गुणगुणून बघा…
“सांसो पें रख्खा हुआ तेरे होटोंका सपना अभी है वहीं…”
या ओळी नाही आपल्याश्या वाटल्या, स्वतःला क्षणभर का होइना विनोद किंवा दिलीपसाबच्या जागी ठेवुन नाही पाहीलं तर बोला….. पण खरी गंमत यात आहे की या ओळी करिना आणि शाहरुखला बघतानासुद्धा परक्या वाटत नाहीत, कारण त्या ऐकताना आपण पडद्यावर बघत नसतोच मुळी तर आपण त्या ओळी आपल्या आयुष्याशी रिलेट करुन बघत असतो. ही गुलजारसाहेबांच्या लेखणीची ताकद होती.
गुलजारसाहेबांनी बहुतेक सगळे रस आपल्या कवितेत आजमावले, पण प्रेमरस आपल्या कवितेत वापरताना त्यांच्या कवितेला काही वेगळेच धुमारे फुटायचे. नेहमीप्रमाणे, सर्वसाधारण प्रेमभावना त्यांच्या कवितेत कधीच सापडली नाही. वेगवेगळी प्रतिके, निरनिराळ्या उदाहरणांचा वापर करुन प्रेम आणि प्रेयसीबद्दलच्या भावना व्यक्त करणे हा गुलजारसाहेबांचा हातखंडा होता.
नज्म उलझी हुई है सीने में
मिसरे अटके हुए है होटों पर
उडते-फिरते है तितलीयोंकी की तरह
लफ्ज कागज पे बैठते है नही
कब से बैठा हूं मै जानम
सादे कागज पे लिखके नाम तेरा…
बस तेरा नाम ही मुकम्मल है
इससे बेहतर भी नज्म क्या होगी ?
आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्षे एका गॅरेजमध्ये कार मेकॅनिक म्हणून काम करणारा ‘संपूरणसिंग कालरा’ हा तरुण आज चित्रसृष्टीत ‘गुलझार साहब’ या नावाने आदराने ओळखला जातो. हिंदीच नव्हे, उर्दु, पंजाबी आणि मारवाडी भाषेतही त्यांनी विपुल लेखन करून आपल्या वाचकांमध्ये मानाचे स्थान मिळविले आहेच. पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या ‘गुलजार’ व्यसनाने माझं जगणं फारच सुसह्य करुन टाकलय, समृद्ध करुन टाकलय. कधी कधी असं वाटतं की ‘गुलजार’ हे संवेदनशीलतेचं दुसरं नाव असावं.
एक नज्म मेरी चोरी कर ली कल रात किसी ने
यही पडी थी बाल्कनी में
गोल तिपाही के उपर थी
व्हिस्की वाले ग्लास के नीचे रखी थी
नज्म के हल्के हल्के सिप मैं
घोल रहा था होटाँ में
शायद कोई फोन आया था
अन्दर जाके लौटा तो फिर नज्म वहां से गायब थी
अब्र के उपर नीचे देखी
सुट शफक की जेब टटोली
झांक के देखा पार उफक के
कही नजर ना आयी वो नज्म मुझे
आधी रात आवाज सुनी तो उठ के देखा
टांग पे टांग रख के आकाश में
चांद तरन्नुम में पढ पढ के
दुनिया भर को अपनी कह के
नज्म सुनाने बैठा था
आपल्या पुखराजच्या अर्पणपत्रिकेत गुलजारसाहेबांनी म्हटलय…
नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए…
गुलजारसाहेब, तुमच्या लाडक्या बोस्कीचं किंवा इतरांचं मला माहीत नाही पण तुमचे हे तजुर्बे आणि आशीर्वाद मला माझ्या आयुष्यात नेहमीच मोलाची साथ करत आलेले आहेत.
गुलझार भेटेपर्यंत हिंदी कविता फ़क्त वाचनापुरतीच मर्यादीत होती माझ्यासाठी. पण नंतर गुलजारने हिंदी लिहायची सुद्धा सवय लावली.
गुलजारसाहब, थोड़ी बहुत आपकी नकल कर लेता हुँ मैं भी ! ये छोटासा तोहफा आपके लिये, आपके इस नाचीज दिवानेकी तरफसे...
*चाय की प्याली ...*
ठिठुरती हुयी धुप ..
कोहरे की चादर ओढ़े,
घंटों हमसे बाते करती रहीं !
कुछ शिकवे, कुछ शिकायत
सर्दी के आलम को कोसती रही !
अतीत की नर्म यादोंके,
गर्म अलावपें हात सेकते हुए..
हम मुस्कराते रहें..., यूँही !
आँखों के सामने मंडराते रहें
हवाओं से अटखेलियां करते,
लहलहाते बाजरे के खेत
बाजरे के भूट्टोसे जुझते,
चहचहाते चिड़ियोंके झुण्ड
सर्दी की चादर ओढ़े हुए,
खेतों की नहरोमे बहता पानी !
और आती रहीं...
चूल्हे के ऊपर रक्खे बर्तनसे आती,
बेब्बेके हाथकी बनी ...
बगैर दुध के चाय की भिनी सी खुशबू !
'बाबूजी चाय ले लो , गरमागरम अद्रक मारके'
ठेलेवाले छोकरेने प्यारसे..
हाथ में चाय की प्याली थमायी,
हंसकर बोला...
"कहाँ खो गए थे साब? कबसे पुकार रहा हूँ!"
हम बस मुसकुरा दिए... यूँही
आँखे ढूंढती रही ....
शहरकी भीडभाडमें खोएं हुए
लहलहाते वे बाजारें के खेत ,
और ढूंढते रहें..
उस चाय की प्यालीमें बेब्बेके हाथोंकी खुशबू !
(© विशाल कुलकर्णी )
शेवटी गुलझारसाहेबांच्याच एक कवितेने क्रमश: समारोप करूयात. क्रमश: एवढ्याचसाठी की या प्रवासाला अंत नाही. हे मृत्युनंतरही उरणारं स्वप्न आहे, व्यसन आहे.
”आओ फिर नज्म कहें,
फिर किसी दर्द को सहला के सुजा ले आंखें,
फिर किसी दुखती रग से छुआ दे नश्तर,
या किसी भूली हुई राह पे मुडकर, एक बार नाम लेकर,
किसी हमनाम को आवाज ही दे ले,
आओ फिर नज्म कहें”
गुलजारसाहब, आपकी गुलजारीयत हमारी जिंदगी का एक अहम हिस्सा है, इसके बिना जिंदगी तो जिंदगी..., हम भी अधूरे है !
धन्यवाद !
#CinemaGully #GulzarSahab #Poetry
#Repost
© विशाल विजय कुलकर्णी
नीलकंठ... गुलजार
Prapurika
प्रेमाची स्वतःची एक भाषा असते,
भावनेची. अनुभवाची..माया ची..आणि या भावनेला जेव्हा शब्दांचा स्पर्श होतो, तेव्हा त्याची आपोआप कविता होते. ...
भाषा असते. चित्रांची, प्रतिमांची, संकेतांची. आणि म्हणून....जेव्हा प्रेम हाताळलं जातं, तेव्हा ती नुसतीच चित्रमालिका न राहाता, त्याचं चित्रकाव्य घडत अगदी गुलजार च्या गाण्या सारखं..
रूप, रंग ,गंध ,स्पर्श, चव, ह्या पाच सुख मधुन आपण सर्व आपले आखे जीवन अनुभवतो. काही जाणीव ह्या ही वरच्या असतात,.. त्याची ही जाणीव आन्तरिक व्हायला लागते कधी कधी ह्याची अनुभूति असे च कधीतरी संतूर चा एखादा आठवणी मधली धुन मनात गुणगुणावी..आणि यमन राग अलापा मध्ये मनात असावा आणी ते सुर "निरेग रेग मग रेगरे निरेसा" ...ऐकयाला यावे,.. समोर सहज डोंगर रांग बघातना इंद्रधनुष दिसावे..
अश्या गंध ला घेऊन गीतकार गुलज़ार नी खामोशी फ़िल्म मधल्या ह्या गाण्यात असे ओवले..की बस, ,गुलज़ार ची विशुद्ध भाषा आहे ह्या शब्दात जणु त्यानी प्रेमाला शब्दां च्या अश्या मोती मध्ये ओवले आहेत की प्रेमाची प्रत्येक रूप,अगदी मौन रूप ही दाखवावे असे च हे गाणे..
"हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो
हम ने देखी है ...
आता विचार करा बर जरा कोणी खुशबु ,म्हणजे गंध पाहू शकला आहे का आज पर्यन्त..,पण जेव्हा आपण एखादा सुवासिक फूल,जसे सोनचाफ़ा,गुलाब, .. नैसर्गिक स्रोत मधुन येणारा सुवास अपल्याला येतो तेव्हा किती सहज आनंद अनुभवतो..मनात,अपल्या जाणीवेत तो सुगंध ,त्या सुवासीक फुलाची मानसिक कल्पना मधुन गंध द्वारा समोर दीसायला लागते..एक रस तृप्ति चा सहज तरल आनंदात पोहोंचणे अशी ही रचना गुलजार च्या बोल मध्ये ,मी त्या सुवासिक गंध ला ही बघितले . ,गाणे अजुन टवटवित असे च हे ग्रेसफुल ,त्याचे प्रेमळ बोल,प्रेमाच्या उच्च अवस्था पर्यन्तर घेऊन अनुभवा ची जाणीव गुलजार करुन देतात . टागोर नि ही त्यांच्या कविता मध्ये प्रेम विषयी सुंदर शब्दात सांगितले आहे की
"
""प्रेम हे अंतहीन रहस्य आहे
त्त्याला समजण्या साठी
त्याचा व्यतिरिक्त काही
ही कुठे असे नाही ये
बस प्रेम स्वतः च आहे"
कवी, शायर, नी त्यांच्या शब्दात,त्या अनुभूतित,त्यांच्या व्याख्यात,प्रेमाला समजण्या साठी ,प्रेमातच मग्न असावे ऎसे बोल मध्ये ,प्रेमात डुबलेले,..
.. अनुभव घेऊ शकु ह्याची जाणीव मध्ये अश्या शब्दात
"प्यार कोई बोल नहीं,
प्यार आवाज़ नहीं
एक खामोशी है सुनती है कहा करती है
ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ..."
प्रेम प्रकाशाचा एक थेम्ब आहे,ऐसा जो आदि काळ पासून वाहत आहे..तुम्ही त्याला एकदा का स्पर्श केला की तो तुम्हाला प्रकाशित करतो ..प्रेमाचे ह्या पेक्षा पवित्र रूप, त्याचे अस्तित्वाची जाणीव जी कधी विजत नाही..थांबत नाही..फक्त तुम्हाला प्रकाशित करते,बस ह्या तेजस्वित रूपा ला फक्त प्रेमळ रुपात बघा,प्रेमाचा एक स्रोत ज्याचाशी प्रत्येक व्यक्ति,मी तू तो ती सर्व च एक उत्कट अभिलाषा कड़े खेचलो जातो की कवि म्हणत्तात प्रेमा ला प्रेम च राहु दे,त्याला कोणते ही नाव नको देउ...
"मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने खामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो
हम ने देखी है ...
कोणते ही नाते जे एकमेकांना बांधते,जे प्रकृति कड़े नेते, एक प्रेमाची तरल अनुभूति रदयात वसलेली,डोळ्यात जपलेली, हस्यात फुललेली, डोळ्यांच्या पापण्यात लज्जेने जाकलेली,.. होठ काही ही बोलत नाहीये, पण त्यात किती तरी गोष्टी अश्या ज्या तिला ,त्याला, सांगण्या साठी चुप अश्या शांतातेत पणे थांबलेल्या ..किती तप पर्यन्तर ह्या भावना ज्या फक्त जाणीवेत फक्त होत्या त्या वर उचळम्बून वर आलेल्या ज्या फक्त अनुभवव्या अश्या च त्याला कोणते ही नाव नको .....
गुलज़ार नी ह्या गण्यातून विशुद्ध आनंद ओतला आहे, एक तरल रचना सूक्ष्म अश्या गोष्टीची जाणीव जी फक्त रुदयातून अनुभवावी अशी....
,प्रेम अहंकार नष्ट करणारे, आतल्या शांततेला एकायला लवाणारे,स्वतः ला "स्व "जी जाणीव करुन देणारे,अहंकारा ला नष्ट करणारे, मौन ची भाषेत बोलणारे, जे गहिरे मौन आहे ते स्वर,गंध,रूप,रंग द्वारा अनुभूति करुन देणारे ,आणी न थांबता वाहणारे ..
सर्व श्रवणीय च...हो...!!
अंबरीश मिश्र नी बोस्की च्या गोष्टी ह्या पुस्तकाचा प्रकाशन वेळीस गुलजार बद्दल जे बोल बोलले आहे,ते....की गुलजार म्हणजे "एक नीलकंठ आहे"..आपले जीवन जगताना आलेले अनुभव,व्यक्ती,..एखादे मनावर ठसले गेलेले दृश्य.. समोर च्या माणसाच्या वागण्याची पद्धत,त्याचा स्वभाव ह्याची लकब..गुलजार बरोबर अचूक ओळखत..आणि हे सर्व त्यांच्या कविता मधून कथा मधून व्यक्त केल्या त्यांनी..त्यांचे गाणे म्हणजे कुठे सप्तरंग,तर कुठे दर्दभरे सुर..तर कुठे छोट्या मुला शी मारलेल्या गप्पा...
गुलजार आणि त्यांचा गजल हा एक अजुन सुंदर पेहेलू..हिर्या ला अजुन पेहेलू पडले की तो अजुन चमकदार व मौल्यवान होत जातो ,म्हणतात..असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जेव्हा बोलतात तेव्हा मेहेफिल टाळ्यांचा गडगडाटासह गाजून उठते..
गुलजार जगजीत सिंग ला एका मेहेफिल मध्ये म्हणाले.".ह्यांचा सारखा मेहेबुब कोणी नाही,जेव्हा पाहिजे तेव्हा हसवतात,जेव्हा पाहिजे तेव्हा रडवतात.. एका मेहेफिल मध्ये त्यांचे बोल ऐकण्या सारखे ...त्यांचा आवाज मधून तुम्हाला ते उडत घेऊन जातील, .."
.जगजीत सिंग चा आणि ग़ज़ल सुरुवात करण्या अगोदर गुलजार ह्यांचे बोल मोती सारखे वाहत होते...
ते म्हणतात...
"मुझे इश्क हे जुबा से मे मानता हुं.. ये केईसा इश्क हे उर्दू जुबा का,..मझा घुलता हे लब्झो का जबा पर, की जैसे पान मे उमदा कीमाम घुलता हे..".नशा आता हे उर्दू बोलने मे..." हलफ छुती हे उर्दू मे तो , हलफ से " मै " का घुट उतरता हे"
खरंच
चांगल्या ग़ज़लेचा एक गुण असतो.
तिचा प्रत्येक शेर मुकम्मल असा, परिपूर्ण. ...
स्वतःच संपूर्ण कविता असणारा.
आणि तरीही जेव्हा ते सारे शेर एकत्र येतात, तेव्हा निर्माण होणारी अनुभूती अजूनच स्वतंत्र, अजूनच वेगळी आणि अजूनच गहिर रूप घेत जाणारी. सबंध ग़ज़ल ..आणि जेव्हा गुलजार आणि जगजितसिंग सारखे दोन दिगज्ज एकाच व्यासपीठावर बघणे,,ऐकणे ही पर्वणी च ..
प्रतिमांची भाषा बोलणारा असेल, ....तेव्हा
आपल्या मनावर अलगद ...हळूहळू धागा-धागा उसवत राहणारे गुलजार,... समोर हळव्या रंगाची फुले उधळावी, एवढे सुंदर बोल.....गुलजार साहेबांसोबत चा "मरासिम" अल्बम् अवर्णनीय,व अर्थपूर्ण बोल असलेले .सौम्य आवाज जगजीत सिंग गायलेल्या गझल..आणि गुलजार .
जीवनातलं सत्य समजून घ्यायचं असेल तर आधी प्रेम करायला आले तर जगणं किती सोपं ..असा सल्ला ते माणसांना देतात.
संतांपासून ते शायरांपर्यंत आणि तत्वज्ञांन मधून अनेकांचा प्रेम हा चिंतनाचा विषय राहिला आहे. कारण तो नैसर्गिक , सहज..,तरल आहे...
प्रेम भाव ही रदयात उत्पन्न होते,,,ही सर्वात सुंदर भावना आहें,,,ज्याचा मनात निरागस ,सहज भाव आहें ,त्याला अचूक ऐसे काहि प्राप्त होत असावे .. हया भाबडे पण मध्ये काहि मागावे लागत नाहीं...अंतर्यामी प्रेमचा पाउस मस्त रिमज़िम बरसत असतो नुसता.....
"कायनात.". गुलजार.."रात पश्मीने की"..मधली एक नझ्म.
रात में जब मेरी आंख खुले
नंगे पांव ही निकल जाता हूँ
आसमानोंसे गुजर जाता हूँ
कहकशॉं छू के निकलती है जो इक पगडंडी
अपने पिछवाडे मे सन्तुरी सितारे की तरफ
दूधिया तारों पे पांव रखता
चलता रहता हूँ यहीं सोच के मैं
कोई सय्यारा अगर जागता मिल जाए कही
इक पडोसी की तरह पास बुला ले शायद
और कहे
तुम जमी पर हो अकेले
मैं यहॉं तन्हा हूँ..
- काएनात – गुलजार .. (रात पश्मीने की..)
(कहकशाँ – आकाशगंगा सैय्यारा – तारा)
There is only one happiness in this life ,to love and be loved your soul,your life.your own belief.
.........................
Prapurika
[19/08, 10:44] Charudatta Kulkarni: आज माझे आवडते गुलजारजींचा जन्मदिन..
त्यानिमित्त वाचनात आलेला हा त्यांच्याच मला आवडणार्या गाण्यावर वृशालीताईंनी लिहिलेला उत्कृष्ट लेख आपणासमोर.. फारच छान लिहिले आहे..
चित्रपट संगीत म्हणजे आपला श्वास आहे . कितीतरी गाणी आपल्या मनावर गारुड करून रहातात. त्यातलंच हे एक गीत. रेपोस्ट करतीये आज..
कारण ....
आपल्या बडे बॉय साठी हो...तो जो माणूस घुसलाय आपल्या काळजात ...संपूर्णपणे..संपूर्ण सिंग ...गुलजार जी .. तुम्ही आहात तसेच रहा..पॉज होऊ दे वेळ.. आम्हाला ना सवय आहे तुमची..आमचे शब्द सापडले नाहीत की आम्ही तुमचे शब्द शोधत रहातो आणि खर सांगू ..खूप खूप काही गवसत जातं. जियो जियो गुलजारजी 💐🎂
चूक भूल द्यावी घ्यावी. कारण आज ज्या गाण्यावर , आवाजावर , संगीताबद्दल लिहितीये , त्यांच्यावर लिहायची माझी अंशतः सुद्धा पात्रता नाही. पण आपण म्हणतो ना , close to my heart ..Or philosophy of life.. तसं काहीसं हे गाणं माझ्यासाठी आहे. म्हणून हा लेखन प्रपंच .
1970 साली प्रदर्शित झालेला एक चित्रपट..
खमोशी .. राजेश खन्ना... वहिदा रहेमान...धर्मेंद्र दिग्दर्शक .. असित सेन
संगीत ... .हेमंत कुमार
गीतकार ... गुलजार जी
ह्यातील सगळीच गाणी एकसे एक आहेत .. जसं
पुकार लो..तुम्हारा इंतजार..हेमंत कुमार .., किंवा , वो शाम कुछ अजीब थी...किशोर कुमार . पण मला सगळ्यात आवडणार गाणं म्हणजे .... हमने देखी है इन .. लताबाईंचं.. अशक्य ... ! कल्पनेच्या पलीकडे आहे. खरंतर ना प्रेमाची व्याख्या अशी नसतेच हो..! जे खूप अगम्य.. Undefined आहे ते प्रेम.. गुलजारजीनी ह्या गाण्यात प्रेम किती संवेदनशील पद्धतीने उलगडून दाखवलंय ... एक एक शब्द थेट काळजाचा ठाव घेतात.
हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो...
सुरवातच पहा हो..! पहिली ओळच किती tangent आहे. डोळ्यामध्ये 'मेहेकती खुशबू' म्हणणारे फक्त गुलजारच. वर म्हणतात .. स्पर्श सुद्धा नको अशा प्रेमाला.. ते अनुभवावा आत्म्याने..शुद्ध.. समोरच्या व्यक्तीच्या स्पंदनातून ..स्पर्शून नव्हे..त्यातील विचार केला तर किती अशारीरिक प्रेम अपेक्षित आहे. कुठलं बंधन..नाव नकोच ..प्रेम आहे ते प्रेमच राहू दे..
प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक ख़ामोशी है, सुनती है, कहा करती है
न ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है
सिर्फ एहसास...
प्रेम किती अव्यक्तपणे व्यक्त होऊ शकतं.. परिसीमा आहे ना..! कुठलाच आवाज..आणाभाका.. नकोत हो.. एक सुंदर अशी 'खामोशी' जी बोलत असते, काही सांगत असते.. जणू आत्म्याचा आत्म्याशी संवाद आहे . गहिरेपण ते किती ! कुणी अडवू शकत नाही, ना थांबवू शकत, ना त्यास शांत करू शकत. 'नूर की बुंद' हा शब्दच किती सुंदररर.. नूर म्हणजे प्रकाश, रोशनी. पण तो रस्त्यावरचा उजेड नाही तर तो दिव्यत्वाचा प्रकाश आहे. जो आतून उजळून टाकतोय. त्या प्रकाशाचा एक बुंद .. अव्याहत वहात राहिलाय ..थांबला नाही..साठला नाही .प्रवाही राहिला ...त्यामुळे कायम निर्मळता आहे..वाह...!
मुस्कुराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से झुके रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने ख़ामोश से अफ़साने रुके रहते हैं
सिर्फ़ एहसास
शेवट तर, क्या कहना...बघा ना... गुलजारजी शब्द असे काही रचतात की भ्रम पडावा. डोळे हसतात, सुगंधी होतात. आणि पापण्यांवर 'उजाले' आहेत . जरी बोललो नाही तरी ओठांवरची थरथर खामोशी कितीतरी गोष्टी साठवून आहेत. अबोल भावना बोलके करणारे काव्य.
ह्या पूर्ण गाण्यात, गाणं म्हणणारी राजेश खन्ना (अरुण) ची मैत्रीण रेडिओ वर हे गाणं म्हणतीये.. पण ते आपल्याला स्तब्ध वहिदाच्या चेहेऱ्यावर वाचता येतं. कुठलेच expression न देता ते गाणं वहिदा जगलीये . सगळ्यात मोठा भाग, हा चित्रपट कृष्ण धवल. Black and White आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात तो ठेहेराव, तो effect कल्पनातीत आहे. Chenematography कमल बोस ह्यांनी केलीये..त्यांना त्या वर्षी Film Fare मिळाल होतं.
एक शेर आहे..
प्यार के लिये और क्या चाहिये..
बस्स,
दो प्यारभरे दिल चाहिये..💕
गुलजार..लताबाई..हेमांतकुमार ह्या तिघांना मनापासून मुजरा. दिलतोड गाणं आहे. मनाला पार हळवं करतं ... खूप वेळ वहिदा आणि गाणं मनात रुंजी
घालत राहतं ..... आणि शब्दांचा ओलावाही .....❤️
लेखन.. वृशाली अंबर्डेकर
No comments:
Post a Comment