Friday, August 14, 2020

सुधा मूर्ती। तीन हजार टाके

*तीन हजार टाके.*
*लेखिका – सुधा मूर्ती*
 *काही दिवसांपूर्वी KBC च्या कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये सुधा मूर्ती जी आल्या होत्या.. तेव्हा अमिताभ त्यांच्या पाया पडून म्हणाला ‘हम गर्व से कहते हैं कि, हम उस देश के वासी हैं जिस देश में ‘सुधा मूर्ती’ रहती हैं”...अगदी यथार्थ वर्णन...ते पाहून आलेला काटा आता लिहितांना सुद्धा परत फुलला अंगावर.. कोण आहे असं ज्याला “इन्फोसिस” हे नाव माहिती नाहीये??? कुणाला खरं वाटेल की आज ज्याची उलाढाल कितीतरी कोटींची आहे ती कंपनी उभी करायची सुरवात केवळ 10,000 रुपयांपासून झाली होती.. आजच्या इन्फोसिस च्या उत्तुंग यशामागे सुधा ताई आणि नारायण मूर्ती यांचे अखंड परिश्रम आहेत..जरा विचार करा किती अवघड असेल हि वाट.*
*आज सुधा मूर्ती या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचं निमित्त झालं ते त्यांच्या हस्ते लिखित “तीन हजार टाके” हे वाचनात आलेलं पुस्तकं... रोजच्या आयुष्यतल्या सामान्य व्यक्तींच्या असामान्य जीवन प्रवासाच्या कथा आहे म्हणा, वर्णन आहे म्हणा किंवा अनुभव संकलन आहे म्हणा...काय नाहीये या पुस्तकात? या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आपल्याला एक नवीन गोष्ट शिकवतं, अंतर्मुख करत*.
 *यातली पहिलच प्रकरण ‘तीस हजार टाके’ आहे.. देवदासी प्रथेविरुद्ध आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा मूर्तींनी ऐन तारुण्यात केलेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे.. यात त्यांना अनंत अडचणी आल्या..त्यावर त्यांनी कशी मात केली हे वाचनीय आहे...शिकण्यासारखं आहे.. सुरवातीला च त्यांच्यावर चप्पल आणि टमाटे फेकले गेल्यावर त्या निराश, हताश झाल्यावर त्यांचे वडील त्यांना ज्या पद्धतीने समजावतात आणि काम पुनः सुरु करायला मदत करतात ते वाचून हे जाणवत कि व्यक्तिमत्व घडवण्यात पालकांची भूमिका किती गरजेची असते..  एक छोटीशी गोष्ट सुद्धा ताईंचे वडील त्यांना बदलायला लावतात..ते म्हणजे जीन्स च्या ऐवजी साडी घाल म्हणतात..कारण ज्या समाजाला तुम्हाला बदलायचं आहे आधी तुम्हाला त्या समाजाची विचारसरणी आत्मसात करावी लागते..  if u want to change the system, u have to b in d system... त्यानंतर अनेक वर्षांच्या मेहनती नंतर साधारण 3 हजार देवदासी बायका स्वतःच्या पायावर उभे राहून नवं आयुष्य सुरु करतात..तेव्हा त्या सुधा ताईंना एक गोधडी भेट म्हणून देतात..त्यावर प्रत्येक मोकळ्या झालेल्या देवदासी बाईने एक एक टाका घातला असतो म्हणून त्याच नाव आहे “तीन हजार टाके.*”👌👌👌
*त्यानंतरचे “मुलांवर मात” हे प्रकरण म्हणजे सुधा ताईंनी इंजिनियर होण्यासाठी केलेल्या जीवतोड मेहनतीची कहाणी आहे..550मुलांच्या कॉलेज ला एकटी मुलगी.. सगळे तिच्या विरुद्ध, टॉयलेट ची अजिबात सोय नाही...बोलायला कुणी नाही... जरा विचार करा काय परिस्थिती असेल.. जर आपला निर्धार पक्का असेल तर आहे परिस्थिती ला शरण न जाता संघर्ष करावा लागतो आणि तो यशस्वी होतो हेच शिकायला मिळतं...बऱ्याच वेळा आपल्याला आपण एखाद्या नामांकित विद्यापीठातून पदवी घेतली नसल्याने न्यूनगंड येतो.. पण हे प्रकरण वाचून सुधा ताई म्हणतात त्या प्रमाणे.. ‘ जे शिक्षण तुम्हाला आत्मनिर्भर बनवेल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल ते खरं शिक्षण..” त्यामुळे ह्या न्यूनगंडाला आयुष्यात थारा नसावाच*.👌👌
*त्या नंतर च्या “ विचारला खाद्य” या मध्ये अनेक भारतीय मूळ असलेल्या भाज्या आणि विदेशी भाज्या यातला फरक सांगितला आहे..खूप उपयुक्त माहिती आहे*.. 👌👌
*त्या नंतर चे प्रकरण एक फार सुदंर प्रकरण आहे.. “तीन ओंजळी पाणी”.. यात आपल्या आयुष्यात काशी यात्रेला एक अनन्यसाधारण महत्व आहे हे परत जाणवत.. घरात आजी आजोबा असणं किती सुखाचं असतं हे ते असल्या शिवाय नाहीच कळत.. त्यातली “अव्वा” हि मला माझ्या मीरा आजी सारखी वाटली.. जेव्हा सुधा ताई वाराणसी ला जातात तेव्हा “गंगेत तिसरी ओंजळ सोडताना आपल्याला एक आपली अतिशय आवडती गोष्ट सोडावी लागते म्हणजे मग ती गोष्ट दिसली की आपल्याला देवाचे स्मरण होते” हि त्यांच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवते.. ते आठवून पुस्तक व खाणेपिणे चे पदार्थ सोडून साडी सकट इतर आवडीच्या वस्तूंच्या खरेदीची आवड किती सहज पणे सोडून देतात..आणि नन्तर आयुष्यभर त्या तिसऱ्या ओंजळीशी प्रामाणिक रहातात*.👌👌
*त्यानंतर चे “कॅटल क्लास” हे प्रकरण एक गहन गोष्ट शिकवत..ती म्हणजे “क्लास हा घातलेल्या कपड्यांवरुन ठरत नसून तो केलेल्या कर्तुत्वाने येतो”.. याबद्दल मी एक वेगळा ब्लॉग च लीहिणार आहे*..👌👌👌
*“अलिखित आयुष्य” हे सुधा ताईंच्या वडिलांच्या आयुष्यातील एका प्रसंगाचे चित्रण आहे..व्यवसायाने डॉक्टर असलेल्या कुलकर्णी डॉक्टरांनी एका प्रेमात फसवले गेलेल्या 18,17 वर्षाच्या मुलीचे बाळंतपण करून तिला आत्महत्येपासून परावृत्त करतात.. आणि पुढील आयुष्याची दिशा देतात..त्याच बाईची तीच मुलगी 30 वर्षांनी डॉक्टर बनून भेटल्यावर चांगुलपणा कधीही वाया जात नाही यावर विश्वास बसतो*..👌👌
*“घरासारखं दुसरं ठिकाण नाही” या प्रकरणात तर दुबई कुवेत येथे भारतीय गरीब महिलांना कामाचे लालूच दाखवून कसे घरकामाला व इतर कामाला कसे जुंपले जाते व त्यांना कसे बंदी बनवले जाते याचे विदारक वर्णन आहे..वाचताना काटा येतो भीतीने..अशा स्त्रियांना भारतात परत आणायला सुद्धा इन्फोसिस फाऊंडेशन मदतीचा हात देत*..👌👌

*“रसीला आणि *पोहोण्याचा तलाव” या कथेत मुलांच्या विचारसरणीत काळापरत्वे झालेला बदल चित्रित केला आहे..हसू येत वाचून*..😄😄*
*“जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ हे* *“इन्फोसिस फाउंडेशन मधील एक दिवस” वाचतांना जाणवत...किती तो व्याप कामाचा ...वाचून च दाबायला होत*.👌
*“मला नाही जमणार पण *आम्हाला जमेल” हे प्रकरण दारूच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या ‘ए ए’ म्हणजेच ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ या संस्थेबद्दल ची माहिती आहे.* *त्याचबरोबर अनेक दारूच्या आहारी गेलेल्या व त्यातून मुक्त झालेल्या लोकांचे अनुभव आहेत*.👌👌
*तर असं हे एक नितांत सुदंर पुस्तक मी एका बैठकीत वाचून संपवलं.. किती तरी गोष्टी शिकले मी यातून..सर्वप्रथम सुधा ताईंचा साधेपणा... त्यां नेसत असलेल्या अगदी साध्या साड्या हीच त्यांची ओळख आहे.. कधी कधी आपल्याला उगाचच वाटत राहतं कि आपले* *कपडे style मध्ये नाहीये..त्यातून मग inferiority complex yeto...पण हे वाचून समजत कि style हि inbuilt असावी लागते.. ती कपड्यात नसते... दुसरं म्हणजे सुधा* *ताईंचा आत्मविश्वास.. आणि तो मिळावंता येतो अखंड अभ्यास आणि* *परिश्रमानी.. there is no substitute to hard work...काम नाही जमलं कि कित्येक वेळा आपण स्वतःला excuses देत असतो.सुधा *ताईंचे अनुभव वाचून आपल्या या विचारसरणीत नक्की बदल व्हायला मदत होईल.आणि *लास्ट बट नॉट लिस्ट, खूप खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे* “ *पालकत्व हि एक जवाबदारी आहे” सुधा ताई अशा घडल्या कारण त्यांना घडविणारे हात तसे होते.त्यांच्या *वडिलांचा वेळोवेळी पुस्तकात उल्लेख आलेला आहे.तसेच आईचा आणि आजीचा सुद्धा आलेला आहे.*  *पालकत्वाची पुस्तक वाचून responsible पालक होता येत नाही*. *मदत जरूर होते.पण प्रत्येक पालकत्वाची एक वेगळी व्यथा ही असतेच.ज्याला त्या व्यथेची कथा करता आली तेच जवाबदार पालकत्व.*
*पुस्तकाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे..कारण शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी या *समर्थ व्यक्तिमत्वाकडे आहेत. म्हणून* *एकदा तरी ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक वाचा च*....👌👌👌👌

No comments:

Post a Comment