Tuesday, August 18, 2020

अलविदा महेंद्र सिंग धोनी

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी, आता औपचारिकताच उरली असे करोनापूर्व काळात तरी कोणी म्हणत नव्हते. पण करोना साथीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काही महिने पुढे सरकले आणि नजीकच्या भविष्यातही ते पूर्वपदावर येण्याची शक्यता नाही. एरवी मैदानावर अपवादानेच स्वत:च्या भावना व्यक्त करणारा धोनी याही काळात- त्याच्या निवृत्तीवर कर्कश चर्चा सुरू असताना- गप्प राहिला होता. मैदानात त्याच्या मनाचा थांग क्वचितच लावता येत असे. परंतु अखेरचा निर्णय हा त्याचा असे आणि बहुतेकदा तो परिणामकारकही ठरत असे. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीचा निर्णयही त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता, टीकाटिप्पणीच्या मोहात न पडता जाहीर केला. तो जितका नेमका, तितकाच देदीप्यमान कारकीर्दीचीही क्षणभंगुरता दाखवणारा. त्याहीपलीकडे जाऊन तो महेंद्रसिंह धोनी या अलौकिक क्रिकेटपटूचा, भारतीय समाजसंस्कृतीत आज दुर्मीळ असा स्थितप्रज्ञ अलिप्तपणा दाखवणारा. निर्थक झगमगाटाचा सोस सर्रास दिसणाऱ्या आजच्या जगात हा गुण दुर्मीळच.


[17/08, 09:45] Charudatta Kulkarni: धोनीच्या कारकीर्दीचा, नेतृत्वगुणांचा धांडोळा त्याच्या राजस अलिप्ततेची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विजयाचा उन्माद नाही नि पराभवाचा विषाद नाही. सामन्यातील परिस्थिती कितीही हाताबाहेर जात असली, तरी धोनीच्या चेहऱ्यावर दडपण कधी उमटले नाही. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे वाक्य उच्चारायचे नि मैदानावर जाऊन शिवीगाळ करायची किंवा प्रतिस्पध्र्याकडे पाहून थुंकायचे असल्या खुनशी दांभिकपणाच्या जवळपासही जाण्याची गरज त्याला भासली नाही. त्याची कारकीर्द सुरू झाली, त्या वेळच्या भारतीय क्रिकेटपटूंच्या सहवासाचा हा परिणाम असावा असे सुरुवातीला मानले जायचे. पण राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर असे एकाहून एक मातब्बर, तरीही सरळमार्गी क्रिकेटपटू एकामागोमाग निवृत्त होत गेले, तरी धोनीचा मैदानावरील वावर किंवा स्वभाव बदलला नाही. ‘ते गेले, विसरा त्यांना. आता माझे राज्य’ अशा मस्तीत धोनी कधी वावरला नाही. या प्रमुख क्रिकेटपटूंच्या गैरहजेरीत, अनेक युवा क्रिकेटपटूंना घेऊन तो दक्षिण आफ्रिकेत गेला आणि पहिला ‘टी-२०’ विश्वचषक भारतात घेऊन आला. त्या स्पर्धेदरम्यान किंवा त्यानंतरही धोनीच्या मैदानावरील वा मैदानाबाहेरील वागणुकीत काहीच फरक पडला नाही. कारण क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे. ते जीवन नव्हे आणि धर्म तर अजिबातच नव्हे, हे पथ्य धोनीने सदैव पाळले. तरीही तो दिग्विजयी ठरत गेला यात त्याचे खरे मोठेपण.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून धोनीचे दिवस सरले याची चर्र करणारी चाहूल गतवर्षीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अखेरीस होऊ लागली होती. ५० षटकांमध्ये तो संपला, आता ‘टी-२०’ प्रकारातच तो हुनर दाखवू शकेल असा त्याच्या चाहत्यांचा अंदाज होता. यासाठी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धा, जी यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात व्हायची होती, धोनीसाठी सर्वाधिक कळीची मानली जात होती. पण करोना साथीनंतर ही सगळी समीकरणेच विस्कटून गेली. ‘टी-२०’ विश्वचषक आणखी वर्षभर पुढे सरकला. तोपर्यंत धोनी चाळिशीच्या उंबरठय़ावर असेल. तोवर लोंबकळत राहण्यापेक्षा निवृत्त होणेच योग्य, असा शहाणा निर्णय त्याने घेतला. तो कौतुकास्पद. समारोपाचे कौतुक सगळ्यांकडून व्हावे या मोहात आपल्याकडील भलेभले अडकलेले दिसतात. अमक्या दिवशी आपला शेवटचा सामना असेल, असे सांगून त्या सामन्याला सामन्यापेक्षा स्वत:च्या निरोप सोहळ्याचेच रूप देण्यात कित्येकांनी आत्मकेंद्री धन्यता मानली. पण खेळ, देश आणि संघापेक्षा स्वत:ला मोठे मानण्याचा धोनीचा पिंड कधीच नव्हता. कसोटी क्रिकेटची कारकीर्द त्याने २०१४ मध्ये तडकाफडकी संपवून टाकली. त्या वेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. मालिकेच्या ऐन मध्यावर धोनी निवृत्त होत असल्याची घोषणा त्या वेळी क्रिकेट महामंडळाच्या वतीने करण्यात आली. एक क्रिकेटपटू म्हणून तो अतिशय गुणवान होता. त्याच्या नेतृत्वाची नेहमीच चर्चा होत राहिली. परंतु कर्णधार हा स्वत: संघातील एक उत्तमच नव्हे, तर अविभाज्य घटक असावा लागतो. इंग्लंडचा माइक ब्रेअर्ली किंवा काही काळ आपला सौरव गांगुली हे निव्वळ नेतृत्वगुणांमुळे संघात तरले. धोनीचे तसे नव्हते. २००४ मध्ये त्याने पदार्पण केले नि पाचव्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणम येथे झंझावाती शतक ठोकले.

नवीन सहस्रकातील ते पहिले दशक भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथ करणारे. उत्तर भारतातील अनेक तरुण आत्मविश्वासाने मैदानावर दिसू लागले. धोनी झारखंडचा. पण त्याने याबाबतीत सौरवऐवजी सचिन, राहुल आणि कुंबळे या महान क्रिकेटपटूंचा आदर्श अंगीकारला. प्रचंड गुणवत्तेला गृहीत न धरता सातत्याने मेहनत करणे आणि आपल्याविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना मैदानात खेळातूनच प्रत्युत्तर देणे हा तो आदर्श. त्याव्यतिरिक्त धोनीने कधीच जाहीरपणे कोणी आदर्श मानला नाही वा गुरू केला नाही. पण त्याची अबोल सजगता सचिन-राहुल-अनिलच्या सद्गुणांप्रति संवेदनशील होती. २००७ मधील टी-२० जगज्जेतेपद असो वा २०११ मधील पारंपरिक जगज्जेतेपद असो, धोनीच्या देहबोलीत फरक पडला नाही. आविर्भाव आणि अभिनिवेशाची त्याला गरज भासली नाही. भारताचा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक, भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार, तीन-तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आणि आयपीएलमध्येही एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची बहुपैलू ओळख. त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या सामन्यांची, मालिकांची आणि स्पर्धाची भरपूर चिकित्सा झालेली असल्यामुळे पुनरावृत्तीची गरज नाही.

पण यानिमित्ताने भारतीय क्रिकेटमधील दोन ठळक प्रवाहांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. उद्योगक्षेत्रात जे मोठेपण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे, ते क्रीडाक्षेत्रात धोनीचे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने उद्योगाचे लोकशाहीकरण केले आणि काही निवडक कुटुंबीयांच्या हातून सोडवून ते सर्वासाठी मोकळे केले. मुंबई, दिल्ली, बेंगळूरु वा चेन्नई अशा चार राजमान्य शहरांतील मध्यमवर्गीयांत तोपर्यंत अडकलेले क्रिकेट धोनीने दुर्लक्षित झारखंडापर्यंत नेले. प्रस्थापित मध्यमवर्गातून आलेल्या आणि चमकलेल्या क्रिकेटपटूंची परंपरा या देशात मोठी. परंतु त्याचबरोबर घरची परिस्थिती बेतासबात असलेल्या निमशहरी भागातील एका मोठय़ा वर्गातूनही उत्तम क्रिकेटपटू निपजू शकतात हे धोनीने दाखवून दिले. त्याआधी या चार शहरांपल्याडच्या आकाशातून कपिलदेव निखंजसारखा एक तारा निपजला होता. पण त्यास पंजाब, हरयाणा या प्रांतांच्या खेळ परंपरेचा आधार होता. त्या तुलनेत बिहार-झारखंडसारख्या प्रदेशातील धोनीचा संघर्ष अधिक रोमांचकारी. प्रस्थापित वर्गातील मंडळी नेमून दिलेल्या चौकटीत असामान्य कामगिरी करून जातात. पण या चौकटी भेदून समोरच्याला आपली नोंद घ्यायला भाग पाडणारे धोनीसारखे मोजकेच. १९८३ पासून क्रिकेटजगताचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच स्वरूपाचा बदल २००७ मध्ये घडून आला. या दोन्ही पर्वाचे नायक नि:संशय कपिल आणि धोनीच ठरतात यावरही दुमत असू नये. झारखंडसारख्या राज्यातून आलेला महेंद्रसिंह धोनी क्रिकेटवेडय़ा देशात असामान्य यश मिळवूनही स्वत: वेडाही झाला नाही किंवा भक्तही बनला नाही. यापुढील काळात आपली पुण्याई राखण्यासाठी धोनीने एकच करावे.

धोनीच्या पुण्याईवर डोळा ठेवून असलेले राजकीय पक्ष त्याला जाळ्यात घेण्याच्या प्रयत्नास एव्हाना लागलेही असतील. त्याच्या ‘भारतरत्न’साठीही मागण्या सुरू होतील. निवडणुकीसाठी तो सुदैवाने बधला नाही, तर निदान प्रचारासाठी त्याला मिरवण्याचे प्रयत्न होतील. सुपाऱ्या घेऊन तसे करणाऱ्या तारेतारका, क्रीडापटूंची आपल्याकडे उणीव नाही. पण धोनीने याहीबाबत सौरव गांगुली वा तत्समांच्या रांगेत बसू नये. तसे त्याने केल्यास त्याची अलिप्तता अधिक झळाळेल आणि अधिक आदरणीय ठरेल. अन्यथा इतिहास त्याची नोंद केवळ अन्य अनेकांप्रमाणे केवळ यशस्वी खेळाडू अशी करेल. तेदेखील योग्यच. पण धोनीकडून त्याहून अधिक योग्यतेची अपेक्षा.

[17/08, 13:03] Charudatta Kulkarni: मुंबई : टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. ७ वाजून २९ मिनिटांपासून आपण निवृत्त झालं असल्याचं समजावं, असं धोनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकलं आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने मै पल दो पल का शायर हूं, हे गाणंही वापरलं आहे.


निवृत्त होतानाच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत. टी-२० वर्ल्ड कप, ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीच्याच नेतृत्वात भारत पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.


[आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १९५ स्टम्पिंग करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक १५० टी-२० मॅच जिंकण्याचा विक्रम, विकेट कीपर म्हणून वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअर (श्रीलंकेविरुद्ध २००५ साली १८३ नाबाद), कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ आंतरराष्ट्रीय मॅच, सर्वाधिक म्हणजेच ६ टी-२० वर्ल्ड कपमध्ये देशाचं नेतृत्व करणं (२००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६) हे विश्वविक्रम धोनीच्या नावावर आहेत. 


२००७ साली धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, २००९ साली पद्मश्री आणि २०१८ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. २००८ आणि २०१९ साली धोनीला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला. दोन वेळा आयसीसीचा हा पुरस्कार पटकवणारा धोनी हा पहिलाच खेळाडू होता. 

एमएस धोनीने ५३८ मॅचमध्ये १७,२६६ रन केले, यामध्ये १६ शतकं आणि १०८ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टम्पमागे धोनीने ८२९ विकेट घेतल्या. 

[धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती.

 रांचीचा रॅम्बो

द्वारकानाथ संझगिरी

महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाला आणि त्याच्या पाठोपाठ सुरेश रैना सुद्धा. दोघांची दोस्ती एवढी घट्ट आहे की, रामासाठी लक्ष्मणाने वनवासास जावं, तसा धोनी पाठोपाठ रैना निवृत्त झाला. 

दोघांच्याही बाबतीत ऑ असं आश्चर्याने म्हणावं असं काही नव्हतं. धोनीच्या बाबतीत सचिनला जी मानवंदना शेवटी मिळाली, ती मिळायला हवी होती असं मला वाटतं. म्हणजे सगळं कसं साग्रसंगीत!. कदाचित कोविड्च  जे सावट भारतीय क्रिकेटवर आलंय, त्यामुळे धोनीने हा निर्णय लवकर घेतला असावा. लिजंड चा मानसन्मान हा लिजंड सारखाच व्हायला हवा. 

एखादा खेळाडू केवळ धावा, विकेट, झेल, विक्रम यामुळे लिजंड होत नाही. खेळाचं समाजजीवन ढवळून टाकण्याचं कार्य ज्यांच्या हातून होतं, ते लिजंड  होतात. अर्थात त्यासाठी उच्च कोटीचा परफॉर्मन्स लागतोच लागतो. माझ्या जाणत्या आयुष्यात मी चार क्रिकेटपटूंना लिजंड होताना पाहिलं. 

पहिला सुनिल गावस्कर. त्याने प्रथम 10 हजार धावा केल्या, 34 शतकं ठोकली म्हणून केवळ नाही, तर पुढच्या पिढीची वेगवान गोलंदाजी खेळण्याची भीती कमी केली. त्याला पाहून दहाव्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा चेंडूच्या रेषेत येऊन खेळायला लागला. 

दुसरा कपिल देव. त्याने भारतीय तरुणांना वेगवान गोलंदाज व्हायचं स्वप्नच दिलं. या मातीत वेगवान गोलंदाज निपजत नाहीत, हा भ्रम त्याने दूर केला. आज भारताची वेगवान गोलंदाजी जगात सर्वोत्तम आहे.

तिसरा सचिन. त्याला पाहून क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येक आई  बापाला स्वप्न पडायला लागलं की, आपल्या पोटी सचिन जन्माला आलाय. त्याने क्रिकेट भारताच्या तळागाळात नेलं. 

आणि चौथा धोनी. जो सचिनचं पुढचं पाऊल होता. त्याने त्याच्या कर्तृत्ववाने ओरडून सांगितलं की, क्रिकेट हा फक्त मोठ्या शहरातील मुलांचा खेळ नाही. तिंबकतू किंवा झुमरीतलैयाचा मुलगा सुद्धा देशाचं नेतृत्व करू शकतो. 

धोनीचा परफॉर्मन्स हा तसा शंभर नंबरी होता. सचिनला लिजंड  करण्यात कसोटीबरोबर वनडे क्रिकेटचा वाटा मोठा होता. धोनीला लिजंड करण्यात वनडे आणि टीट्वेन्टीचा वाटा होता. धोनी फक्त कसोटी क्रिकेट खेळत असता तर एक चांगला यष्टीरक्षक, फलंदाज यापलिकडे आपण धोनीकडे पाहिलं नसतं. अर्थात कसोटी कर्णधार धोनीने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या सर्वोच्च स्थानावर (पहिल्या क्रमांकावर) नेऊन बसवलं, हे विसरता येणार नाही. वनडे आणि टीट्वेन्टी क्रिकेटमध्ये धोनी क्रिकेटच्या इतिहासातला एक महापुरुष ठरला. बऱ्याचदा तुमची गुणवत्ता आणि विशिष्ट काळ याचा मेळ जमावा लागतो. लता मंगेशकर 18व्या शतकात जन्माला आली असती तर? आज आपण केवढ्या आनंदाला मुकलो असतो. आणि ती आजच्या एवढी मोठी झाली असती का? धोनीची गुणवत्ता ही अशी होती की, वनडेचा उत्कर्षाचा काळ आणि टीट्वेन्टीची  सुरवात यामुळे तिला वाव मिळाला. धोनीच्या बाबतीत काळ आणि गुणवत्ता याचा मेळ एकदम जुळला. 

सचिनने भारतीय फलंदाजी सुसंस्कृतपणे आक्रमक केली. सेहवागने आक्रमक करताना सुसंस्कृतपणा कधीकधी मागच्या खिशात ठेवला. धोनीने ती स्फोटक केली. मुंबईचं सॉफीस्टिकेशन काढून त्यात रांचीचे रगेल रंग भरले. वनडेत शेवटच्या षटकात धोनीची फलंदाजी पाहताना आपली नाडी डेक्कन क्वीन सारखी पळायची. तो मात्र इतका शांत असायचा की, बुद्ध सुद्धा हतबुद्ध झाला असता. जणू मॅचच्या विजयाची कथा त्यानेच लिहली आहे आणि नियतीला त्याप्रमाणे घडवून आणण्याचा आदेश दिलाय, असा तो खेळायचा. बरं कधी तरी एकदा जिंकून दिलंय असं त्यात नव्हतं. कड्यावरून न कोसळता चालणं ही त्याची मीठ भाकर आहे, असं वाटायचं. त्याचं फलंदाजीचं तंत्र त्याचं स्वतःचं होतं. त्याचा बचाव जगाच्या कुठल्याही पुस्तकात सापडला नसता. तो बचाव पाहून सर जॅक हाॅबज किंवा सर लेन हटन यांनी डोळे मिटले असते. त्याचा बॅट स्पीड भयानक होता त्यात ताकद आणि टायमिंग घाला, त्यामुळे त्याचा फटका हा नॉकआऊट पंच असायचा. चेंडूलाही स्वतःच्या जीवाची भीती वाटली असावी. चौकार आणि षटकारांवर सुखात जगता येण्याची कुवत असूनही तो एकेरी, दुहेरी धावा असा धावायचा की, आयुष्यात आणखी धाव मिळण्याची त्याला शाश्वती नाहीय. ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. वनडेत खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याची सरासरी 50.72 आहे आणि ते सुद्धा 87.55 च्या स्ट्राईक रेटने. त्यात 10 शतकं आणि 70 अर्धशतकं. खालच्या क्रमांकावर येऊन 10 शतकं! ही चक्रावणारी गोष्ट आहे. 

यष्टीरक्षक धोनी मला जास्त वनडे आणि टीट्वेन्टीतला आवडतो. फलंदाजी किंवा गोलंदाजी प्रमाणे वनडे, टीट्वेन्टीतही यष्टीरक्षणात काही बदल करावे लागतात. यष्टीरक्षकाला वनडेत खूप एरिया कव्हर करावी  लागते. धोनी स्टंप जवळ उभा राहिला की फलंदाजाला यष्टीचित असा करायचा की फलंदाजाला वाटायचं की त्याला हिप्नॉटाईझ केलंय.

पण मला सर्वात आवडायचं ते त्याचं नेतृत्व. एकेकाळी टायगर पतोडीने भारतीय संघ जिंकू शकेल, हा विश्वास संघात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तसा संघ बनवला. वाडेकरने तोच संघ धुर्तपणे विजयासाठी वापरला. गांगुलीनेही साधारण तेच केलं, जे पतोडीने केलं होतं. तो संघ धोनीला मिळाला. आणि धोनी, 'यश कदम चूम लेंगे 'हे वाक्य अक्षरशः जगला. कर्णधाराचं यश हे विजयात मोजावंच लागतं. पण म्हणून सर्वच यशस्वी कर्णधार महान नसतात. टीट्वेन्टीचा 2007 चा वर्ल्डकप, 2011 चा विश्वचषक, 2013 ची चॅम्पियन ट्रॉपी या एकाच कर्णधाराने आजच्या स्पर्धात्मक जगात जिंकून देणं, हे पौराणिक काळाचा संदर्भ देऊन सांगायचं तर राजसूर्य यज्ञ आहे. वनडे, टीट्वेन्टी मध्ये काही निर्णय क्षणात घ्यावे लागतात. त्यासाठी जोखीम सुद्धा घ्यावी लागते. आणि कठीण परिस्थितीत डोकं शांत ठेवावं लागतं. देव काही माणसांना पृथ्वीवर पाठवताना डोक्यात अदृश्य एअर कंडिशनर ठेवून पाठवतो. तो  मानवाच्या एमआरए मध्ये दिसत नाही. पण मैदानामध्ये जाणवतो. अजित वाडेकर हा आपला पहिला कॅप्टन कुल. धोनी हा दुसरा. त्याचे काही निर्णय डोक्याला झिंजझिंण्या आणतात. उदा. 2007 विश्वचषकात शेवटचं  षटक जोगिंदरला देणे. कपाळावर मारलेला हात शेवटच्या चेंडूनंतर धोनीच्या पाठीवर कौतुकाने फिरवावासा वाटला. असे कित्तेक त्याचे निर्णय आहेत की, ते त्याक्षणी विचित्र वाटले. पण शेवटी तेच यशाचं भलंमोठं कुंकू मिरवत. मोठा क्षण ओळखण्यात तो दादा होता. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने तो फार लवकर ओळखला. युवराजला बाजूला सारून तो स्वतः फलंदाजीला आला. आणि शेवटी षटकार मारून मॅच जिंकून दिली. आज त्या विश्वचषकाच्या बाबतीत मनावर सर्वात जास्त कोरला गेलेला तो क्षण आहे. 

जगात यष्टीरक्षक कर्णधार फार कमी झालेत. पण धोनीने ते कष्टाचं काम करताना आपल्या निरीक्षणाचा प्रचंड फायदा संघाला करून दिला. तिची बेनाॅ हा क्रिकेटच्या इतिहासातला एक श्रेष्ठ कर्णधार. तो नेहमी म्हणायचा की, 'नेतृत्व म्हणजे 10 टक्के कौशल्य आणि 90 टक्के नशीब.' धोनीकडे पहिले 10 टक्के तर होते आणि पुढचे 80 टक्के तर नक्कीच. नेतृत्व सोडल्यावरही तो बऱ्याचदा मागे उभा राहून रिमोट कंट्रोल नेतृत्व करायचा. गोलंदाजांना सल्ला दयायचा. क्षेत्ररचना करायचा. आणि विराट कोहली सारखा अहंमनय. माणूस ते तीर्थ स्वीकारल्याप्रमाणे स्वीकारायचा. कारण त्याला ते ठावूक होतं की ते तीर्थ त्याच्या भल्यासाठी आहे. धोनीच्या नेतृत्वाच्या कालखंडात एक गोष्ट मात्र मला जाणवली की, गांगुली, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग आणि युवराज ही मंडळी फार स्वेच्छेने निवृत्त झाली नाहीत. 

त्याच्या शेवटच्या कालखंडात त्याच्या यष्टीरक्षणापेक्षा त्याची फलंदाजी पूर्वीच्या दर्जापेक्षा खालावली. तै हुकमी फटके त्याच्या शरीराचे हुकूम मानेनासे झाले. तेव्हाही त्याने कुठचे क्षण टाळायचे ते धुर्तपणे ठरवलं होतं. तो गेल्या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला आला नाही. कदाचित संघाला खांद्यावरून वाहून नेऊन जिंकून द्यायची ताकद आपली संपली आहे, असं त्याला वाटलं असेल. कुरुक्षेत्र जिंकल्यावर अर्जुनाचेही तेच झालं होतं. तो निवृत्तीच्या जवळ होताच होता. निवृत्तीचा क्षण सुद्धा त्याने विचारपूर्वक निवडला. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन. 

खरं तर प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला खो द्यायची त्याला आता संधी आहे. आणि कुवतही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने सोडलं असेल, तरी क्रिकेट त्याने सोडू नये. रांचीच्या एका सामान्य टिकीट चेकरने जागतिक क्रिकेटमध्ये लिजंड व्हायचं , रांचीचा रॅम्बो होणं ही गोष्ट एरव्ही परीकथाच वाटली असती. पण आपण ती डोळ्याने पाहिली आहे. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो.
Dwarkanath Sanzgiri

No comments:

Post a Comment