[11/08, 09:31] Milind Naniwadek: *Happy Birthday My Philosopher...*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
कृष्ण हा देव नव्हे माणूस होता , आहे आणि राहील ....जमलं तर वाचाच...
कृष्ण खरंतर योगेश्वर होता.. शरीरातल्या सोळा सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या.. जणू काय त्याच्या बायकाच.. लगेच आपण त्याला सोळा सहस्त्र बायका चिकटवल्या..ज्ञान फक्त काहींच्याच पोतडीत राहिले..उरलेले त्याला सोळा हजार स्त्रियांशी संग करणारा ठरवून मोकळे झाले.. मग त्याचे उदात्तीकरणही केले..
एखाद्याला ‘देव’ बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. त्याशिवाय माणसाचा देव होत नाही. ही प्रक्रिया शेवटी माणसाला दगड बनवून मंदिरात कोंडते..!! आणि मग त्याने काय करायचं, काय खायचं, कसं वागायचं, कधी झोपायचं, कधी उठायचं हे त्याचे भक्तगण ठरवतात. तो लाचार होतो. कारण त्याचा देव झालेला असतो. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते .
दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रासलीला खेळणारा कृष्ण आणि आणि स्वतःच्या पत्नीला संशयावरून वनवासात पाठवणारा राम ही सोयीस्कर रूपे भारतीय पुरुषांनी मनात जपली .पण त्याच्या ज्या रुपाची आज समाजाला गरज आहे त्याचा आपण खरंच विचार करतो का ?????
या माणसाने आपल्याला ‘गीता’ दिली.. जगभरातले विद्वान आज गीतेला एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मानतात.. या माणसाने आपल्याला ‘कृष्णनीती’ दिली.. राजकारण कसे खेळावे, खेळवावे याचे धडे स्वत:च्या वागणुकीतून घालून दिले....कृष्णाचे व्यक्तिमत्व इतके बहुरंगी आणि बहुढंगी आहे की,त्याचे पैलू दाखवण्यासाठी हरिवंश,भागवत आणि महाभारत या ३ ग्रंथाची निर्मिती करावी लागली आणि त्यानंतरही कितीतरी ग्रंथ आणि पुस्तके....पाळणा ,दूध ,दही ,रासलीला या पलिकडचा कृष्ण गिरीश जखोटिया यांनी त्यांच्या "कृष्णनीती " या पुस्तकात रंगवला आहे...
त्याने जपलेली मूल्ये कालातीत आहे असा-
१.तत्वज्ञानी , राजकारणी , मुत्सद्दी...
२.त्यावेळी अस्तित्वात असलेल्या इंद्रपूजेलाही आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा , त्याचे महत्व पटवून देणारा...रूढी आणि परंपरा न पाळणारा बंडखोर ,
३.गवळी असूनही , आपल्या जातीची खंत न बाळगता लोकांना एकत्र करून त्यावेळच्या जुलमी राज्यसत्तेला उलथवणारा क्रांतिकारक....
५.द्वारकेला व्यापारी बाजारपेठ बनवणारा वेल्थ क्रिएटर .....
अशा अनेक रूपात यातील कृष्ण दिसतो........
गीतेची निर्मिती करणारा विप्र, पांडवांना विजय मिळवून देणारा क्षत्रिय, गोकुळात असताना दही दुधाचे योग्य वितरण करणारा, द्वारकेला बाजारपेठ बनवणारा वैश्य आणि गुराख्याच्या कामालाही प्रतिष्ठा मिळवून देणारा आणि त्यातही कमीपणा न मानता सर्वच समाजाचे स्वकर्तृत्वावर नेतृत्व करणारा शूद्र अशा सर्व वर्णात कृष्ण दिसतो आणि भावतो ....
"महाभारताचा" परिपक्व कृष्ण आपल्यासमोर येतो तो एक नेता, योध्दा, तत्त्वज्ञानी,
राजकारणी आणि क्रांतिकारी म्हणून...
"कृष्णकिनारा" मधून तो भेटतो राधा , द्रौपदी आणि कुंतीचा सखा , मित्र ,पाठीराखा म्हणून ...
आणि जितकं मन , मेंदू , मस्तक जागे ठेवाल तितक्या रूपात तो मग भेटतच राहतो....
कृष्णाची ही रूपं समजून न घेता केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ला शरण जाऊन ज्या प्रथा, जशा आहेत तशा पाळणाऱ्या, जे समज जसे होते तसे निर्बुद्धपणे पुढे नेणाऱ्या सुशिक्षित (??)लोकांची चीड येते!!!! निदान या गोष्टींचे भांडवल करतांना त्याची बुद्धिमत्ता, त्याची समज, त्याचा धोरणीपणा.. कलियुगात कसं वागावं याचा त्याने घालून दिलेला वस्तुपाठ तरी समजून घ्यायचा.....
कृष्ण मस्तीत जगला.. कारण तो माणूस होता.. त्यामुळेच जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर यादव वंश संपला, तेव्हा तो काही करू शकला नाही आणि खंतावला.. माणसासारखे मरण आले त्याला..!!!!!
माणूस म्हणून त्याचे तेज , त्याचा लढाऊ बाणा त्याचे 'योगेश्वर' रूप.. म्हणजेच खरा "कृष्ण"....त्याला विविध पुस्तकांतून वाचणं म्हणजेच त्याची भक्ती , माणसाला माणूस म्हणून ज्यांना समजून घेता येत नाही किंवा घ्यायचंच नसतं त्यांना असे पोकळ भक्तीचे देखावे मांडावे लागतात....
ज्यांना समजून घेता येते त्यांच्यासाठी तर तो नेहमीच दीपस्तंभ......
कृष्णा ...तू थोडा तरी समजलास म्हणून आयुष्यातील कितीतरी चक्रव्यूह भेदता आलीत मला.......
*हॅप्पी बर्थ डे माय फिलॉसॉफर ......*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
[11/08, 23:19] Milind Naniwadek: भगवान श्रीकृष्ण आणि कोल्हापूर
आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरे जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आला कधी आणि त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे .कालयवन अर्थात जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती. कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला कालयवन आला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये ओढले आणि त्यांचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरले मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल .भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली आणि तो जळून भस्म झाला. करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचा चा उद्धार केला तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे आजही जाखले गावात गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्य तल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्क च्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले इथे जणू प्रती द्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून ,या द्वारकाधीशाला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एके वेळी माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाल लीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळ रूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारा पर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. जिथं पर्वत उचलला ती जागा गिरगाव याच परिसरात असलेले वसुदेव ग्राम अर्थात वाशी इथे वसुदेव आणि तप केले अशा रीतीने या करवीर क्षेत्राला व्रजभूमी चा महात्म्य प्राप्त करून देणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले याशिवाय सर्व पापांचा परिवारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा पद्मावती प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली आहे .भगवंताची ही बाळलीला या क्षेत्री झाली याचा संदर्भ कोणी खोटा म्हणेल तर याला जोडून दुसरा संदर्भ देतो तो म्हणजे माशेल गावच्या देवकी कृष्णाचा. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीनं दक्षिणेला आले. सावळ्या परब्रम्हाला बघून देवकीचा उर वात्सल्याने भरून आला. तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळ रूप कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या तिथल्या पुराणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीर घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेव अशी देवकीने कडेवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे करवीराशी अर्थात कोल्हापूर बरोबर देखील अनोखे नाते आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
[12/08, 09:16] Charudatta Kulkarni: *कृष्ण*,,,
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव,,,
प्रत्येक शब्द हा जोडाक्षर,,,
जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण,,
पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा,,
जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा,,
दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण,,
सातवा अवतार प्रभू राम,,
*राम* ही अक्षरे सुद्धा सरळ अन त्याचं वागणं ही सरळ,,मर्यादेत,,
म्हणून *मर्यादा पुरुषोत्तम*,,,
रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीच मर्यादा ओलांडली नाही,,
तरीही काही जणांनी त्याच्यात दोष शोधले,त्याच्यावर टीका केली,,,
मग पुढच्या अवतारात प्रभू ने सर्व मर्यादा ओलांडल्या,,
करा काय करायचं ते,,,😃😃😃
जीवनात आचरण रामसारखं असावं अन समजून कृष्ण घ्यावा,,
कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत पडू नये,,
कृष्ण म्हणजे *श्रीमदभगवद्गीता*,,,
जीवनाचं सार,,,
प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यानी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला,,
जन्म झाल्याबरोबर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं,,
गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला,,,
म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती, कृष्ण 8 वर्षाचा होऊ पर्यंत,,,
जे राधा आणि कृष्णविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा 8 वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी,,,
ईतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नांव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं,,
किंबहुना तीचं प्रेम इतकं नितळ,निस्सीम,निर्मळ होतं की तिचं नांव कायमचं कृष्णाच्या आधी लागलं,,
कृष्ण-राधे कोई ना केहता, केहते राधे-शाम,,,
जनम जनम के फेर मिटाता एक राधा का नाम,,
असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम,,
किंबहुना प्रेमाचं दुसरं नांव म्हणजेच राधा व कृष्ण,,
कृष्णाला 16 हजार 108 बायका,,
त्याचा ही इतिहास,,
ज्यांना त्याने मुक्त केलं त्या म्हणू लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्याचा स्वीकार केला,,
अन नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्याच्या सुख दुःखात सहभागी होता,,,
आज काही महाभाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हरकत आहे,,
अरे त्याने आग लागलेली 50 गावे गिळून टाकली होती,,,
तू जळता एखादा कोळसा गिळून दाखव की आधी मग कृष्णाची बरोबरी कर,,,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात नाही समजण्यात खरी मजा,,
त्या साठी गीता समजून घेणं महत्वाचं,,
गीते मध्ये काय नाही??
तर गीतेत सर्व आहे,,
जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात मिळेल,,,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जीवन शास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं,,,
यावरून अर्जुनाची सुद्धा योग्यता किती मोठी आहे हे समजतं,,
अर्जुन या भूतलावर असा एकमेव मानव झाला जो या नाशवंत देहासह स्वर्गात 5 वर्षे राहिला व शस्त्र चालवण्याचं शिक्षण घेतलं,,
म्हणजे अर्जुनाची योग्यता काय आहे ते समजतं,,
त्या अर्जुनाच्या डोळ्यांवर आलेलं मोह,माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली,,,
गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे 9 अध्याय पाहिलं,,
त्याची तयारी करून घेतली ,,,
मग पुढे खरा गूढार्थ सांगितला,,,
विश्वरूप दाखवतांना सुद्धा त्याला
आधी दिव्य दृष्टी दिली,,,
त्याची तयारी करून घेतली,,
मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे,,
तू फक्त निमित्तमात्र आहेस,,,
असा हा कृष्ण,,
त्याच्या विषयी किती सांगावं अन किती नको,,,
तो जितका अनुभवू तितका तो जास्त भावतो,,जास्त आवडतो,,
त्याला जितकं समजून घेऊ तितकं कमीच,,,
त्याच तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं सार,,,
ते समजून घेतलं की जीवन समजलं,,
जीवन सफल झालं,,
मनुष्य जीवनमुक्त झाला,,
अशा या कृष्णाला वंदन,,
*श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,*
*हे नाथ नारायण वासुदेव,*
*प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ,*
*मुकुंद विष्णू भगवन नमस्ते*!!!
.....जय श्री राधे कृष्णा.....
श्री कृष्णाला *समजून* घेण्यासाठी आपणाला श्री कृष्ण परमात्मा बुद्धी प्रदान करो हीच प्रार्थना,,,
*कुरुक्षेत्रात* युध्दभूमीवर जेव्हा *कर्ण* व *अर्जुन* समोरा-समोर आले तेव्हा,
कर्णाने *वासुकी* नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले.
प्रत्येकाला वाटले- आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार... 😳
तितक्यात,
*श्रीकृष्णाने* आपल्या पायाचा भार रथावर दिला.
रथ थोडा खाली खचला.
व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले.
नंतर,
सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे.
तेव्हा,
पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.
जेव्हा,
पूर्ण युध्द संपले व
पांडवांचा विजय झाला. तेव्हा,
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "आधी तू रथाच्या खाली उतर."
त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.
त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतर च स्वतः रथाच्या खाली उतरला.
दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.🔥
जमलेले सर्व जण आश्चर्या ने ते दृश्य पाहत होते. 😳😳
तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतल्या रथ आपोआप कसा काय पेटला
"अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? "🤔
तेव्हा
*भगवान श्रीकृष्ण म्हणाले की,* 😇
*"युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत.*
*ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली.. तेव्हा, ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस."*
त्याच प्रमाणे
*मानवी देह* आहे.
*जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण ,आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते* .😥😥😥
*।।जय श्रीकृष्ण।।*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
[12/08, 14:05] Charudatta Kulkarni: आई आणि बाळकृष्ण
लग्नाचे सगळे विधी आटोपले. वरात निघायच्या वेळी आईने हळूच तिच्या हातात बाळकृष्ण दिला आणि "कुणालाही दिसू न देता तुझ्या बॅग मध्ये ठेवून दे", असे ती कुजबुजली.
तिनेही काहीही न कळून तो ईवला परंतु वजनदार बाळकृष्ण घाईघाईत आपल्या पर्स मध्ये सरकवला. त्या बाळकृष्णाचे क्षणभर जे दर्शन तिला घडले, हाताला त्याचा जो स्नेहस्पर्श लाभला तो बराच वेळ तिच्या मनात रेंगाळत होता.
का दिला आईने आपल्याला बाळकृष्ण? का देतात लग्नात मुलीला बाळकृष्ण? आणि तोही लपून?
कृष्ण म्हणजे जगद्गुरूचे संपूर्ण रूप ! कृष्ण म्हणजे संपूर्ण पुरुष ! सोळाहजार एकशे आठ स्त्रियांचा पती. तुरुंगात बंदिस्त सोळाहजार स्त्रियांना समाजात मान मिळावा म्हणून त्यांना सन्मानाने पत्नीपद देणारा युगपुरुष !
सुभद्रा आणि द्रौपदी या भगिनींचा पाठीराखा. द्रौपदीने किमती वस्त्राची चिंधी कृष्णाच्या जखमेला बांधली त्याला कायम स्मरून वस्त्रहरणात तिची लाज राखणारा भ्राता. देवकीचा नंदन, यशोधेचा कान्हा. वासुदेवाचा लाडला, नंदराजाचा दुलारा. गोप-गोपिकांचा साथी. राधेचा परमप्रिय!
राधा ही कृष्णाचे स्रीरूप तर कृष्ण हा राधेचे पुरूषबिंब. कोवळा, नटखट, अचाट पराक्रमी आणि जीवनाचे सार सांगणाऱ्या गीतेचा रचियेता.
कृष्णाच्या जीवनाचे प्रत्येक पैलू कर्तव्याशी निगडित. म्हणून बाळकृष्ण देतात का लग्नात मुलीला? पण लपून का देतात ?
मनात विचारांचे असे अनेक आवर्तन उठत असतानाच तिला पायातले जोडवे टोचत असल्याची जाणीव झाली. "आई ग फार दुखतायेत बोटं", ती कळवळून उदगारली.
"होईल सवय" आई घाईघाईत उत्तरली.
आईने उत्तर देताना नजर चोरली का तिला उगाचच वाटून गेले. आता या बोचण्याची, टोचण्याची, व्रणाची तुला सवय करायला हवी असे काहीसे आईला सुचवायचे होते का? आणि मग या दुखणाऱ्या सलात आपला सहभागी कोण? लपवलेला बाळकृष्ण?
आता प्रत्येक गोष्ट निमूट सोसायची. योग्य तिथे लढायचे, निष्काम वृत्तीने काळ काम वेगाचे गणित मांडायचे हेच कृष्णाचे गीतारहस्य का?
पुढच्या दैनंदिन जीवनात तिला पदोपदी कृष्ण जाणवू लागला. लग्नात शृंगार असावा वासना नसावी म्हणजेच राधेचा कृष्ण. एकमेकांना मधूमोहिनी घातल्यासारखे एकमेकांत रत रहावे म्हणजेच कृष्णलीला.
लग्नानंतर अंगणात संतती खेळावी. त्या बालरूपाने, बाललिलांनी आपण, कुटुंबीय आनंदित व्हावे म्हणजेच कृष्णाचा नटखट कारभार.
पुढे कृष्णाने विद्यार्जनासाठी गुरुकुली जावे म्हणजेच आईपासून मुलांचे विलग होऊन वेगळ्या विश्वात भ्रमण करण्यासाठी तयार होणे.
संसारात कधी आपल्याच माणसांच्या विरोधात जाऊन घेतलेले योग्य निर्णय खंबीरपणे तग धरून निभावणे म्हणजेच गीतामहात्म्य!
तिला हे सगळे समजायला जीवनाचा प्रत्येक टप्पा समर्थपणे ओलांडावा लागला. पावलोपावली कृष्ण कळायला लागला. वेळ आली की सगळा राग, सगळा त्रागा निघायचा तो कृष्णावरच आणि मग हलकेच आधारायचाही तो कृष्णच !
कृष्णजन्माच्या दिवशी आपल्या बालगोपालांना मध्यरात्रीपर्यंत जागून सुंठवडयाचा प्रसाद खाताना पाहिले की याही पिढीत कृष्ण स्त्रवत असल्याचा मुलायम भास तिला व्हायचा.
आईने लग्नात कृष्ण दिला आणि अगदी त्या क्षणापासून पदोपदी गृहीत धरलेली आई उमजायला लागली. तिचे देवकीरूप, तिचे यशोधारूप जाणवायला लागले. आईसोबतच राधा, मीरा, रुख्मिणी, सत्यभामा तर उमगल्याच पण कुब्जाही आकळायला लागली.
कडाडत्या थंडीत कुणीही उठले नसलेल्या अंधारात कुब्जा आपले कुरूप शरीर सांभाळत यमुनेच्या पाण्यात मनसोक्त कृष्णपावारवाचा लेप माखून घेत आलेल्या भोगासाठी नव्याने सिद्ध व्हायची.
संसार असा तल्लीनतेने करायचा आणि वेळ आली की विरक्त व्हायचे हाही धडा कृष्ण सानिध्याचाच. संसार ही केवळ कृती नसून हरीने दर्शवलेली वृत्ती आहे. प्रीतिसौख्याचा, जीवनसमृद्धीचा निर्मळ महामंत्र आहे.
महामंत्र, गुरुमंत्र कानातच गुप्तरीत्या सांगितल्या जातो म्हणूनच कदाचित लग्नात आई मुलीला हळूच बाळकृष्ण सोपवत असेल, नाही का ?
जयश्री दाणी
No comments:
Post a Comment